Welcome to misalpav.com
लेखक: सुधीर मुतालीक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हां! हां! हां! हे मंत्री संत्री हज्जार येतील भाया अन जातीलही, पण सुधीर मुतालिक एक ही रहेगा। हम्मेशाह।

@अगर मिनिस्टर साहब को श्री सुधीर मुतालीक के साथ फोटो निकलवानि है, तो वो अपने रूम में आज शाम के साडे सात बजेसे साडे आंठ बजे तक उपलब्ध होंगे …… " "वल्ला, क्या आटूडुट है जी, सरकार " एकजण वेडा झाला होता. मै बोला " अटीट्युड नही, इंडियन !">>> खत्तरनाक !!! :-D मूहतोड जवाब! प्रचंड टाळ्या! :-D

मस्त! भारीपैकी खास मराठी बाणा! पण गुगल चालत नसेल तर याहू किंवा एमेस एन उघडावं हे पाकड्यांच्या २ तास टाळक्यात शिरलं नाही याची गंमत वाटली. पाकिस्तानी शोभतात खरे!

त्यामुळं आपण भले अन आपलं काम भलं असे मानेवर खडा ठेऊन काम करणारे असतील. नाहीतर, हल्ली हॅकिंगच्या क्षेत्रात रशियन अन चायनिज हॅकर्सच्या पुढे गेलेयत म्हणे पाकिस्तानी हॅकर्स.

आणि हॅकिंगच्या बाबत म्हणशील तर साधे सरळ काही करण्यापेक्षा उपद्व्याप करायला पाकिस्तानी नेहमीच पुढे!

पण च्यामारी एव्हडं सेल्फ एस्टीम असण्यासाठी मला मास्लो पिरॅमिडच्या पुष्कळ पायर्‍या चढाव्या लागतील. ;)

… कुणी काहीही म्हणा… मराठी बाणा… ताठ कणा
इतकं चुकीचं वाक्य मी आत्तापर्यंत ऐकलेलं नाही. ताठ कणा हा बाणा मराठ्यांचा नव्हे. तो राजपूतांचा. शिवाजी महाराजांनी शिकवल्या प्रमाणे मराठ्यांचा बाणा गनिमी कावा हा आहे. याचं थोडक्यात वर्णन म्हणजे कोणत्याही परिस्थीतीत जिवंत रहाणे, प्रसंगी परिस्थीतीशी थोडी तडजोड करणे, पण वेळ मिळताच दुश्मनाचा खात्मा करणे. लपून छपून लढणे, जितकी हाणामारी करता येईल ती करून पळून जाणे पण परत परत हल्ला करून शत्रूला जेरीस आणणे. इतिहासाचा अभ्यास न करता उगीच काहीही शब्द वापरू नये.

त्या पाकिस्तानींना असा बाणा बघायची संवयच नसेल. वा उस्ताद, मान गये.

लेख आवडला. बाय द वे, रझा माझा इथला म्हंजे इराणमधला सगळा व्यवसाय सांभाळतो. इराणी जनता सॉलिड प्रेमळ. कष्टाळु. आजकाल जरा भेदरलेली. रझा एकदम गुणी बाळ आहे... Don't Tell My Mother नावाची मालिका आठवली. इराण कसा देश आहे हे माध्यमांपेक्षा तुमच्यासारखे अनुभवी लोक जास्त चांगलं सांगू शकतील. तरीपण इराणमध्ये जाऊन व्यवसाय करण्याचं कौतुक वाटलं.

मी सुद्धा हा कार्यक्रम पाहतो . पण खात्रीने सांगतो ,इराण एवढा वाईट देश अजिबात नाही आहे , निदान सौदी पेक्षा तेथील महिलांना बरेच स्वातंत्र्य आहे. माझे येथे जर्मनीत अनेक इराणी कुटुंबीयांशी घनिष्ट संबंध आहेत , त्यापैकी कितीतरी भारतात जाऊन आले आहेत व त्यांना भारताविषयी आत्मीयता आहे. लेख आवडला , व त्याचा शेवट खासच

ये हुई ना बात! अभिनंदन सुधीर मुतालिक तुमचं! अवांतर : देशाबाहेर राहून आपल्याच देशाची चारचौघा अभारतिय माणसांत निंदा करणार्‍यांचा संताप येतो. चांगलं बोलता येत नसेल तर निदान वाईट उगाळू नका तिर्‍हाईता समोर इतकी सुद्धा अक्कल ह्या सुविद्यांना नसते!

देशाबाहेर राहून आपल्याच देशाची चारचौघा अभारतिय माणसांत निंदा करणार्‍यांचा संताप येतो. चांगलं बोलता येत नसेल तर निदान वाईट उगाळू नका तिर्‍हाईता समोर इतकी सुद्धा अक्कल ह्या सुविद्यांना नसते!
अगदी अगदी. मी अशावेळी शक्यतोवर विषयाला वेगळं वळण लावतो किंवा "अगदीच असं नसतं बर्का" छाप काही बोलतो. वय, मान, पद-पदवी यापरत्वे हेही शक्य नसेल तर "झग्यातून पडला होतास का रे रताळ्या" असं मकरंद अनासपुरे ष्टाईलमध्ये मनातल्या मनात बोलतो. :)

त्यांना चांगल्या गोष्टीची माहिती नसते मग हे अज्ञान लपवायला देशाला शिव्या घालणे चालू होते. खर म्हणजे त्यांना आयुष्य कसे जगायचे हेच माहित नसते, म्हणून चांगले जगायला मिळावे म्हणून देश सोडतात, आणि देशाला शिव्या घालत बसतात. ज्यांना छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद घ्यायची सवय आहे ती लोकं निर्जन बेटावर पण सुखी राहू शकतात. $ आला की अक्कल आली अशी समज करून घेतात. अश्या लोकांना त्यांची जागा दाखवून देऊन त्यांची इज्जत काढणे माझा छंद आहे.

हो, नक्की लिहीन या विषयांवर इराणची सांस्कृतिक बाजू मोहकच आहे. सवडीने लिहेन. धन्स.

किस्सा आवडला. पण भारतीय मंत्र्याला भेटायला पाकिस्तानी नागरिकांचा(ही)वशिला चालू शकतो हे मनोरंजक वाटलं :-)

फारच मस्त अनुभव आहे,असे अनेक अनुभव वाचायला आवडेल. आपण चुकीचे नसलो तर, बापाला पण भ्यायचे नाही ही वृत्ती फार कमी पाहायला मिळते.