Welcome to misalpav.com
लेखक: धन्या | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

छान लिहिलय . अशीच एक कथा रामदास स्वामींच्या चरित्रात आहे ( त्यांनी नाशिक येथे एका कुळकर्ण्याला ताटीवरुन उठवले होते .) शेवटच्या पॅरा बाबतीत .... आजच्या विज्ञानवादी लोकांचा एक फार मोठ्ठा घोळ आहे " जी गोष्ट आपल्याल्या लक्षात येत नाही ती चुक आहे " असा एकुणच त्यांचा अ‍ॅटीट्युड असतो. पण मुळातच ज्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नसतात त्या आपल्या ज्ञानकक्षेच्या बाहेर असतात तेव्हा तडकाफडकी त्यांना चमत्कार किंव्वा भोंदुगीरी किंव्वा अंधश्रध्दा असे लेबल लावणे फार फार चुकीचे आहे . "ज्ञानेश्वरांनी भिंत चालवणे , पाठीवर मांडे भाजणे , सच्चिदानंद बाबाला उठवणे किंव्वा चांगदेवांनी वाघावर बसुन येणे किंवा इतर काही ...हे सारे आमच्या आजच्या वैज्ञानिक ज्ञानाच्या कक्षेमध्ये अनाकलनीय आहे . तेव्हा हे खरे असेलही कदाचित पण आमच्या लक्षात येत नाही . तेव्हा नुसते अंधश्रध्दा म्हणुन झिडकारण्यापेक्षा ते समजुन घेण्याच्या प्रयत्न करु किंवा ह्या विषयावर मौन बाळगु " असा एकुणच आपला अ‍ॅटीट्युड असला पाहिजे . हे झाले अध्यात्माच्या बाबतीत . पण इव्हन विज्ञानाच्या बाबतीतही ... नुकतेच एका मिपाकर मित्राने आमच्या ध्यानात आणुन दिले आहे की " सगळीच सत्य असलेली विधाने सिध्द करता येतीलच असे नाही " (अर्थात जे आपल्याला सिध्द करता येत नाहीये ते असत्यच आहे असे आपण ठाम पणे म्हणु शकत नाही . पहा - http://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6del%27s_incompleteness_theorems आणि याही पुढे जावुन , एखादी गोष्ट सत्य किंव्वा असत्य असे आपण कशावरुन ठरवतो तर आपल्याला आलेल्या अनुभवांवरुन . हे अनुभव इंद्रियजन्य असतात आणि म्हणुन ते १००% सत्य असतीलच असे आपण ठरवु शकत नाही . उदाहरणार्थ वाळवंटात माझ्या डोळ्यांना मृगजळ दिसते पण तिथे पाणी नसते . थोडक्यात माझे डोळे माझ्याशीच खोटे बोलत असतात . असेच इतर इंद्रियजन्य अनुभवांविषयीही असते... म्हणुन आपण आपल्या ह्या अनुभवांवरुन एखादी गोष्ट सत्य वा असत्य असे ठाम पणे सांगु शकत नाही ... असो. सत्य असत्य ह्या विषयावर एकदा निवांत काथ्याकुटायला घ्यायचा आहे

अध्यात्म म्हणतं तेच अंतिम सत्य नाही. तसेच विज्ञान म्हणते तेच अंतिम सत्य आहे असंही नाही. आज ज्याला आपण सत्य म्हणून उराशी कवटाळत आहोत ते कदाचित उदया ज्ञानाच्या एखाद्या झुळुकेनं खोटं ठरेल. विज्ञानाच्या बाबतीत हे याआधी खुपवेळा झालेलं आहे. त्या त्या वेळी विज्ञानाने नविन सत्याला सामोरं जायची लवचिकता विज्ञानाने दाखवली आहे. दुर्दैवाने हे अध्यात्माच्या बाबतीत होताना दिसत नाही. तुम्ही दिलेल्या ज्ञानदेवांच्या चमत्कारांच्या यादीबद्दल म्हणाल तर या गोष्टी आजच्या विज्ञानवादी बुद्धीला पटत नाहीत. या गोष्टी एकतर रुपके असाव्यात किंवा मग दंतकथा तरी. ज्ञानदेव महान योगी होते, त्यांना या गोष्टी करणे अशक्य नव्हते असं म्हणून आपण या गोष्टींवर विश्वास ठेवतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चारही भावंडांच्या स्वतःच्या साहीत्यात यातील कुठल्याच चमत्काराचा उल्लेख नाही. समजा उदया हे चमत्कार घडले होते असे सिद्ध करणारे संशोधन झाले तर ते स्विकारण्यास काहीच अडचण नसेल. सत्य आणि असत्य यातील फरक सांगताना तुम्ही जे मृगजळाचे उदाहरण दिले आहे ते मला चुकीचे वाटते. मृगजळाचे उदाहरण प्रवचनामध्ये शोभून दिसते. विज्ञानाच्या संदर्भात त्याला अर्थ नाही. विज्ञानासाठी तो दृष्टीभ्रम आहे. विज्ञानाच्या दृष्टीने सार्वत्रिक अनुभव ही सत्याची कसोटी मानली जाते. वैज्ञानिक सत्य हे जगाच्या पाठीवर कुठल्याही कोपर्‍यात त्याच्या पुर्व अटींची पुर्तता झाली की ते तपासुण पाहता येते. अध्यात्मात तसे नाही. तिथे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. इतकंच नव्हे तर कुणीतरी लिहून ठेवलंय किंवा म्हणून ठेवलंय म्हणून त्याची कसलीही चाचणी न घेता मागाहून री ओढणे सर्रास होते. जाता जाता, अध्यात्म आणि विज्ञान हे दोन वेगळे कॉन्टेक्स्ट आहेत. त्यांची कुठल्याच पॅरामिटर्सवर तुलना होऊ शकत नाही. :)

मान्य पण मुदा असा आहे की अनुभव सत्य की असत्य हे कसे पडताळुन पहाणार ? मृगजळ हा एक दाखला झाला . पाण्यात बुडवलेली काठी वाकडी दिसते . हाईनाचा एक प्रकारचा आवाज लहान बाळ हसत असल्या सारखा येतो. अतिषय दुर्गंधी युक्त ठिकाणी काही रूम फ्रेशनर लावल्याने एकदम फ्रेश असल्याचा फील येतो ,एकुणच बरेचसे अनुभव फसवे असु शकतात ... http://www.youtube.com/watch?v=WnEYHQ9dscY
विज्ञानाच्या दृष्टीने सार्वत्रिक अनुभव ही सत्याची कसोटी मानली जाते.
शिवाय सार्वत्रिकते सोबत सर्वकालीनतही महत्वाची गोष्ट आहे . आणि सार्वकालीनता कशी सिध्द करणार ? ( हे फक्त गणितीय सिध्दांता बाबतीत करणे शक्य आहे कारण तिथे अनुभवांचा संबंध नसतो . ) अवांतरः हा एक भारी व्हिदीयो पहा http://www.youtube.com/watch?v=BHihkRwisbE

कान नाक त्वचा डोळे व जीभ ही सर्व ज्ञानेंदिये फसविण्यास युक्त अशी आहेत. कलर डोपलर इफेक्ट, साऊन्ड डॉपलर इफेक्ट ,ऑप्टिकल ईल्युजन, ई ने आपण फसतो. नाक तर फसण्याच्या बाबतीत पहिला नंबर आहे. बेडकीचा पाला जिभेला चोळल्यास साखर मातीसारखी लागते. संमोहन अवस्थेत कारले काकडीसारखे आनंदाने खाणारे लोक दिसतात.

संमोहन अवस्थेत कारले काकडीसारखे आनंदाने खाणारे लोक दिसतात.
कारले? अरे व्वा व्वा! ते तर आम्ही कुठल्याही अवस्थेत अगदी आनंदाने खातो.

ज्यावेळी माणसाची मती कुंठीत होते, समोर घडलेल्या घटनेचं आकलन होत नाही त्यावेळी त्या घटनेला तो चमत्कार म्हणून मोकळा होतो. ह्म्म..

धनाजी राव, एका वाक्याबद्द्ल आपल्याला साष्टांग ( म्हणजे टांगे सहित) दंडवत ! ते वाक्य असे.... विश्वात निसर्ग नियमांपलिकडे जाऊन काहीही होत नसतं निसर्गात होणार्‍या घटनाना काहीही अर्थ नसतो.( हे जग मिथ्या आहे !) एखाद्या गोष्टीला चमत्कार म्हणायचे किंवा कसे हे निरिक्षक कोणत्या क्षितिजावर व कोणत्या कोनातून पहात आहे यावर अवलंबून असते. देव जर जे सर्व घडवतो असे मानायचे झाले तर तो ते अबोधपणे घडवतो असेच म्हटले पाहिजे. प्रत्येक गोष्ट मानवी मनाच्या भाषेत हेतूशिवाय होत नसली तरी निसर्ग काही हेतू बाळगून चालतो असे काही मला तरी वाटत नाही.

निसर्गात होणार्‍या घटनाना काहीही अर्थ नसतो.( हे जग मिथ्या आहे !) एखाद्या गोष्टीला चमत्कार म्हणायचे किंवा कसे हे निरिक्षक कोणत्या क्षितिजावर व कोणत्या कोनातून पहात आहे यावर अवलंबून असते.
अगदी अगदी. घटना घडून जाते. ती घटना चांगली की वाईट हे त्या घटनेचे परीणाम आपल्याला सोयीचे आहेत की गैरसोयीचे यावर अवलंबून असते. आता पुन्हा सोय गैरसोय हे सुद्धा ज्याच्या त्याच्या अपेक्षांनुसार, अग्रक्रमांनुसार अवलंबून असते. निवडणूकीत दोन तुल्यबळ उमेदवारांपैकी कुणीतरी एक हरतो, कुणीतरी एक जिंकतो. घटना एकच परंतू तिचे दोन उमेदवारांवर होणारे परीणाम पुर्णतः परस्परविरोधी असतात.

वरील प्रतिसादाच्या मथळ्याला जोडून एक विचारायचेच राहिले....भिंत चालविण्याचा प्रसंग पैठण येथे झाला की आळंदी येथे... कारण आपल्या लेखात तिचा उल्ल्लेख आळंदी संदर्भात झालेला दिसतोय. मला तर ती भिंत पैठण येथे पहावयास मिळाली.

भिंत चालविण्याचा प्रसंग पैठण येथे झाला की आळंदी येथे... कारण आपल्या लेखात तिचा उल्ल्लेख आळंदी संदर्भात झालेला दिसतोय. मला तर ती भिंत पैठण येथे पहावयास मिळाली.
माझ्या माहितीप्रमाणे ही भिंत आळंदीतच आहे. wall

उडून जाण्याची नाही तर तुकड्या तुकड्यानी लुप्त होण्याची भिती आहे म्हणून. लोक म्हणे त्या भिंतितल्या विटा प्रसाद म्हणून काढून नेऊ लागले. मग भिंतीचे अस्तित्व नष्ट होऊ नये म्हणून त्याला कुंपण घातले. पंढरपूरच्या गरुडखांब (का कुठला तो चांदीने मढवलेला खांब आहे ) त्याचा चांदीचा पत्रा लोकांनी प्रसाद म्हणून कुरतडून न्यायला सुरुवात केलीच आहे.

तुम्ही "मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स" चा संदर्भग्रंथ म्हणून उल्लेख करत आहात का? या पुस्तकात प्रचंड अतिशयोक्ती आहे. संमोहीत अवस्थेत त्या रुग्ण मुलीला चक्क इसवी सन पूर्व १८६३ मधला (1863 BC) जन्म आठवतो. मागच्या ८६ जन्मांचा लेखावजा ती ब्रायनला सांगते हे जरा अती वाटते. या विषयावर दुसरं एक पुस्तक आहे. लाईफ बिफोर लाईफ. पुस्तक मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स सारखं पास्ट लाईफ रीग्रेशनवर नसून पुनर्जन्मावर आहे.

धनाजीबाबा परत लिवते झाले. मग सत्येविनारायनाची पूजा घाला की बुवा...... ! धनाजी बुवा अवतारी पुरूष झाले म्हणायचे ...!

दोन्ही धनाजीरवान्कडे आहेत्,आपल्याला त्याचा औन्शगुणाचा लाभ व्हावा म्हणुनच आपणच पुजा घालावयाची असते.

@आपल्याला त्याचा औन्शगुणाचा लाभ व्हावा म्हणुनच आपणच पुजा घालावयाची असते.>>> आंम्ही धनाजींची ओळख झाल्या दिवसापासून पूजा बांधून आहोत! त्यामुळे आमच्याकडे गुण औंशानी नाही चांगले किलोनी आलेले आहेत! आपणास चिंता नसावी...http://mimarathi.net/modules/smileys/packs/smilies/68.gif आपण आमची पूजा घाला! म्हणजे काही ग्रॅम तुंम्हालाही मिळतील! http://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/10.gif http://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/10.gif http://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/10.gif

हि सुरवातिला सुकिच असते,नन्तर सन्स्कार केले जातात.पण झारा हा मुढ्च असतो म्हणुनच त्याच्यावर काही सन्स्कार करण्याचा प्रयत्न म्हणजे ....... गा.. पु..

अशाच अनुभवांबाबत बाळ सामंत यांचे 'मरणात खरोखर जग जगते' या सर्वस्वी अप्रस्तुत शीर्षकाचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. शक्य झाल्यास ते मिळवून वाचा. अतर्क्य, अनाकलनीय घटना गोष्टी सापडल्या की लगेच बघा बघा विज्ञानाची मर्यादा म्हणणार्‍यांची मला नेहमीच मौज वाटत आलेली आहे. मुद्दा हा आहे की विज्ञान घटना नाकारत नाही, त्यावरून उतावीळ लोकांनी काढलेले सोयीचे निष्कर्ष (देव असणे, मागला जन्म असणे वगैरे) नाकारते. घटनांबद्दल केवळ 'अजून' कार्यकारणभाव सिद्ध न झालेले' इतकेच नोंदवून पुढे जाते, त्याचा मागोवा घेत राहते. कदाचित पुढे त्या कार्यकारणभावाची उकल करते. जसे विज्ञानाने मागला जन्म 'असिद्ध' केलेला नाही तसेच कुणी तो सिद्धही केलेला नाही, तेव्हा विज्ञानाचे 'तूर्तास असिद्ध' हाच अप्रोच अधिक अनुकरणीय आहे असे आपले आमचे मत आहे. ज्यांना हजार वर्षांपूर्वीच हे सिद्ध झाले होते असे मानायचे किंवा अशी एखादी घटना सापडली की लगेच विज्ञान पराभूत झाल्याचे जाहीर करायचे असेल तो त्यांचा प्रश्न आहे. समस्या आहे ती निष्कर्षापूर्वी आपण सर्व बाजूंनी विचार केला होता का, सर्व शक्यता तपासल्या होत्या हे ध्यानात घेणे (अर्थात सोयीस्करपणे किंवा फारच अधीरपणे) नाकारले जाते. गंमत म्हणून आम्ही पुनर्जन्म या विषयासंबंधी काही प्रश्न विचारले होते. विचारले गंमतीने असतील पण प्रश्न गंभीरच होते. या अमुक घटनेबाबत विज्ञान उत्तर देऊ शकत नाही म्हणून ते अपुरे वा त्याला मर्यादा आहेत असे म्हणणे योग्य आहेच, पण त्याचा पर्याय म्हणून जी उत्तरे दिली जातात ती अतिशय हास्यास्पद नि सर्वस्वी निराधार असतात. एक नेहमी ध्यानात ठेवायला हवे, जगातील सर्व प्रश्नांना उत्तरे असतातच असे नाही, असलीच ती आपल्यापर्यंत पोचतीलच असे नाही, पोचली तरी समजतील असे नाही. तेव्हा 'अजून ठाऊक नाही' हे प्रामाणिकपणे मान्य करणे आम्हाला अधिक रुचते. तुमच्याकडे उत्तर नाही ना, मग माझे उत्तर बरोबर हे तर्कशास्त्र अजब आहे. तुमचेही उत्तर तितक्याच सार्थपणे सिद्ध व्हायला हवे. आणि हो पूर्वापार चालत आलेला समज, वा एखाद्या फार फार जुन्या पुस्तकात लिहिलेले आहे हा पुरेसा पुरावा निदान आम्ही मानत नाही. त्याऐवजी विज्ञानाच्या मर्यादा आहेतच, पण त्या सातत्याने कमी होत जाणार आहेत, जुन्या अनुत्तरित प्रश्नांचा वेध चालूच राहणार आहे, त्यातील काही प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत, आधीची काही बदलणार आहेत हे आमच्या दृष्टीने जगण्याला रोमांचकारी बनवणारे आहे. एका दगडावर बसून इथून सगळे जग दिसते हे ठसवण्यासाठी 'इथून दिसते ते जग' अशी व्याख्या बदलून घेणे आम्हाला तितकेसे रुचत नाही. प्रवासाच कंटाळा असलेल्याने तसे करावे फारतर. आम्हाला रस्त्यावरच्या प्रत्येक वळणापलिकडे काय आहे याची उत्सुकता कायम असते. नि त्या उत्सुकतेची सार्थपणे परिपूर्ती विज्ञानमार्ग ('च' प्रत्यय लावलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी) करू शकतो. त्यामुळे तूर्तास आम्ही आमच्या अनुत्तरित प्रश्नांसह मार्गक्रमणा करतो आहोत. इत्यलम.

प्लस वन. अतिशय योग्य भाषेत मांडणी केलेली आहे. मला तर वाटतं 'उत्तर मिळणं म्हणजे काय? काय झाल्याने एखादी गोष्ट किती प्रमाणात सिद्ध झाली असं समजावं?' या बाबतीत विज्ञानाने जो विचार केलेला आहे तो इतर साधनापद्धतीत दिसत नाही. त्यामुळे 'मला वाटतं ते माझ्यापुरतं सत्य' इतक्या मर्यादित स्वरूपात ते रहात नाही. हे वैयक्तिक सत्य काहीही असो. मात्र जेव्हा 'सर्वांसाठी सत्य' अशी विधानं शोधून काढायची असतील तर जे निकष लावावे लागतात त्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोनच आवश्यक आहे.

@ कदाचित पुढे त्या कार्यकारणभावाची उकल करते. जसे विज्ञानाने मागला जन्म 'असिद्ध' केलेला नाही तसेच कुणी तो सिद्धही केलेला नाही, >>> हा आध्यात्माच्या चर्चेतला एक नेहमीचा लोच्या आहे. @
विज्ञानाने मागला जन्म 'असिद्ध' केलेला नाही
>>> ज्यांना असं वाटतं की विज्ञानाने या गोष्टी सिद्ध करून दाखवल्या पाहिजेत..जसे की- मागचा जन्म..आत्मा..देव..! त्यांना विचारावसं वाटतं की .''या गोष्टी विज्ञानाच्या आधारावर सिद्ध कश्या करणार ते मला सांगा..? जे सिद्ध करून दाखवायचं... ते अश्या लोकांनी पुराव्यासाठी एकदा तरी समोर "हजर" करायला हवं की नको? उदा- भूत नाही हे सिद्ध करा.. कसं करणार(सिद्ध)? कारण सिद्ध करणार्‍यांनी जेव्हढ्या म्हणून भूताच्या केसेस तपासल्या त्या सर्व भूत या कल्पनेच्या बाबतीतलं अज्ञान/गाढवपणा/ढोंगबाजी/लबाडी या परिणामाच्या बाहेर गेल्याच नाहीत! जे तपासायचं..ते कोणत्यातरी स्वरुपात..एखादा टक्का तरी अस्तित्वात असायला हवं की नको? त्यामुळे ही सिद्ध करण्याची जबाबदारी.. हे आहे.. असं म्हणणार्‍या लोकांवर जाऊन पडते..आधी त्यांनी हे आहे चे पुरावे द्यावेत..मग नाही म्हणणारे त्या पाठिमागचं सत्य शोधतील....! उद्या कुणी विचारलं..की गाय अंड देते, हे सिद्ध करा.. तर ते कुणालाही सिद्ध करता येणार नाही..गाय जर का अंडे देतच नाही,तर सिद्ध कसं करून दाखवायचं??? :)

द्या कुणी विचारलं..की गाय अंड देते, हे सिद्ध करा.. तर ते कुणालाही सिद्ध करता येणार नाही..गाय जर का अंडे देतच नाही,तर सिद्ध कसं करून दाखवायचं??? smiley
गूगल वर गोमातेची अंडी उआ सर्च मारल्यानंतर काही विदारक सत्ये सापडली गाईची अंडी हा उल्लेख असंतोषजनक आहे काउ एग = http://www.thefarmerscow.com/products/farmers_cow_eggs.html त्या नावावरून गायीची अंडी असू शकतील असे पुरावे देता येतील ;) अवांतरः एखादी गोष्ट नाही असे सिद्ध करता आले नाही तर ती गोष्ट आहे हे सिद्ध होउ शकते का?

अवांतरः एखादी गोष्ट नाही असे सिद्ध करता आले नाही तर ती गोष्ट आहे हे सिद्ध होउ शकते का? एखादी गोष्ट नाही असे सिद्ध केले गेले तर ती गोष्ट आहे असे गृहीत धरण्यात येते, मात्र ठरावीक काळानंतरही ती गोष्ट अस्तित्वात आहे या गृहीतकाला आवश्यक पुरावे मिळाले नसल्यास नाही असे गृहीत धरले जाते. वरील विधान विशेषतः बेपत्ता नागरिकांना / सैनीकांना लागू आहे. मात्र तुमच्या विधानाचा रोख अध्यात्म, मन यांवर असेल तर वरील विधान गैरलागू ठरेल.

शेवटचा पॅरा अतिशय भावला. पण एक सांगा मला, आपल असणं , आपल नसणं हे जर तुम्ही उलगडु शकलात तर पुढच्या शोधाला काही अर्थ काही दिशा असु शकते. हे जोवर उलगडत नाही तोवर निरागस असणच फायद्याच नाही का?

निअर डेथ एक्सपीरीयन्स आणि ज्ञानेश्वरांनी सच्चीदानंद बाबांना शरीरात परत आणणे या भिन्न बाबी आहेत. सध्या एव्हढच. अवांतर: विज्ञान/आध्यात्माने एकमेकांना हरवणे म्हणजे डोळ्याने दृष्टीला हरवणे झाले. असो. अर्धवटराव

सगळ्याच शास्त्रांचा, आभ्यासाचा आणि अनुभवाचा रोख शेवटी 'निसर्गनियम शोधणे, पडताळून पाहणे' असाच असतो आणि 'हे सगळं नक्की काय आणि कसे चाललय ते बघू' याच कुतुहलानी त्याची सुरुवात होते.