Welcome to misalpav.com
लेखक: धन्या | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

दुर्दैवाचा भाग असा की आपल्याला असा काही आजार आहे, किंबहुना कोणताही मानसिक आजार आहे हेच असे काही प्रॉब्लेम्स असलेले लोक नाकारतात. त्यामुळे त्यावर उपचार होणे शक्यच नसते. मानसिक आजारामुळे आयुष्य हकनाक फुकट गेलेले उदाहरण आपण इथे मिपावरच पाहिले आहे. त्या व्यक्तीला असा काही आजार आहे हे त्याला किंवा त्याच्या घरच्यांना न कळल्यामुळे एक घर तरुण बुद्धिमान मुलगा गमावून बसलं. :( एखादा मानसिक प्रॉब्लेम असलेल्या व्यक्तीबरोबर रहाणे ही अत्यंत अवघड आणि सतत परीक्षा घेणारी गोष्ट आहे. अशा व्यक्तींच्या घरच्यांबद्दलही मला अतिशय सहानुभूती वाटते. आपल्याला काही प्रॉब्लेम आहे हे एखाद्याने स्वीकारले तर त्याचा बरे होण्याचा रस्ता उघडतो नाहीतर अनेकांची आयुष्यं अशीच फरपटत रहातात.

सिझोफ्रेनिया अन धनाजीरावांनी केलेला "आत्मरत" ( self centered म्हणता येइल का?) यात खुप फरक असावा पैसाताई. धनाजीरावांनी उल्लेखलेली लक्षण दुसर्‍यांना कमी लेखण्याची अथवा स्वस्तुतीची आहेत. भास आभास होण्याची नाही आहेत. सिझोफ्रेनिक आयुष्यात यशस्वी होउ शकत नाहीत, तर "हे" लोक दुसर्‍यांच हिरावुन घेउन यशस्वी झाल्याचा दावा करतात. अर्थात सिझोफ्रेनिकस ना आपली गरज असते, तर अश्या लोकांपासुन run for your life हेच खर.

मनाचे पुष्कळ वेगवेगळे आजार आहेत. आणि बहुतेक सगळ्या गोष्टींवर उपायही शक्य अहेत. वेळच्या वेळी केले गेले तरच. पण पुष्कळवेळा केस हाताबाहेर गेल्यावरच लक्षात येते की काहितरी बिघडलय... ओसीडी (परत परत एकच गोष्ट करत राहणारे, एक टिपिकल लक्षण प्रत्येक वेळेस जिना चढताना पायर्‍या मोजणे), क्लिप्तोमॅनिअ‍ॅक (आपल्या नसलेल्या वस्तू नकळत उचलणे), डीप्रेशन (टोकाचं नैराश्य), ऑटिझम(संशोधन आणि उपचार पहिल्या पायरीवरच आहेत! :( ) ...हे असे निदान मान्य तरी करतात की आपले काहितरी बिघडतंय, त्यांना समुपदेशन करणं सोपे जाते. छोट्या छोट्या उपायांमधून, मनाच्या एक्सरसाईझ मधून (!) या गोष्टी सोडवता येतात. सिझोफ्रेनिया मध्ये पॅरानॉईड असेल तर सुरुवातीला प्रत्येकजण आपल्याबद्दल काहितरी बोलतोय असं वाटतं.. हे वाढत गेले की डायरेक्ट कुणीतरी आपल्याला मारण्याचा कट करतोय असं वाटतं. यांनानिदान सुरुवातीलातरी जवळच्या लोकांकडून लपवूनच कामिन्गची औषधे द्यावी लागतात. कठीण असलं तरी सुधारण्याचे थोडी तरी शक्यता असते. पॅरानॉइड नसला तरी हॅल्युसिनशन्स (भास) असतातच. पण हे भास आहेत, हेपण त्यांना पटू शकतं आणि काहितरी उपाय होउ शकतात. पर्सनलिटी डिसॉर्दरमध्ये 'नॉर्मल' वाली पर्सोनालिटी चालू असेल तेंव्हाच संवाद साधणं शक्य असतं. पण कधी 'दुसरी' बाजू डोकं वर काढेल, कुणालाच कळू शकत नाही. अतिशय सावधगिरीनी उपाय करावे लागतात. अर्थात सगळेच उपचार जवळचा/ विश्वासाच्या व्यक्तींकडूनच केले जाउ शकतात. परके लोक त्यात हस्तक्षेप करु शकतच नाहीत. ,,पण नार्सिसिस्ट लोकांसाठी स्पष्ट उपाय नाही. कारण संवाद साधता येत नाही. यांना फार तर स्वतःच्या मरणाची भिती असू शकते, त्यापलिकडे भावनाच नसते. त्यामुळे त्यांच्या कोषात बाकी कुणाला कधीच शिरता येत नाही.

खाली डॉ खरेंनी दिल्याप्रमाणे कुंपणावरचे लोक आणि हद्द ओलांडून गेलेले यात फरक असतोच. माझा मुद्दा इतकाच की कोणत्याही प्रकारची डिसऑर्डर असो की मानसिक रोग, ते लोक आपल्याला काही प्रॉब्लेम आहे हेच कबूल करायला तयार होत नाहीत.

फक्त मानसिकच नाही तर कुठलाही लहानमोठा शारिरीक आजार असतानादेखिल असा 'सुपरमॅन सिन्ड्रोम' दाखवणारे खूप लोक पाहिलेत. 'मला काही झालेले नाहिये, मी अगदी ठणठणीत आहे' असे सांगणारी अनेक माणसे भोवती दिसतातच. एकंदरीतच आपल्याला उपचाराची/ औषधाची/ आधाराची गरज आहे हे सांगण्यात कमीपणा अनेकांना वाततो. कदाचित बर्याच वेळा कळतच नाही की आपल्याला नक्की काय कमी पडतय, आणि त्यावर आता करायला काय हवं? उलट बाहेरच्या परिस्थितीलाच दोष दिला जातो.

थोडक्यात ही एक असाध्य व्याधी आहे. दुर्दैवं असं की इतरांना हे समजू शकतं पण व्याधीग्रस्तं व्यक्तीला हे कधीच समजत नाही. त्यांच्या वैयक्तिक जीवनांत त्यांच्या इतर कुटुंब सदस्यांना जन्मभराकरीता हा त्रास भोगावा लागतो.

>>>असाध्य व्याधी सुधारणा होऊ शकते. व्याधी असाध्य नसावी. पेशन्ट बरोबरच कुटुंबियांचा पेशन्स फार महत्त्वाचा असतो.

इतर काही व्यक्तिमत्त्वाशी संबंधित विकार, म्हणजे आत्मरत व्यक्तिमत्त्व (narcissistic personality), कंपल्सिव्ह व्यक्तिमत्त्व, टोकाच्या विचारसरणीची आणि वर्तणुकीची पद्धत असणारी व्यक्तिमत्त्व, यात असामाजिक (antisocial) आणि काठावरचे (boderline) असे दोन्ही प्रकार येतात, या विकारांमधे व्यक्तीचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. त्यांच्या सहभागाशिवाय त्यांना काहीच शिकवता येत नाही. त्यांची वरवरची लक्षणं, टँट्रम्स इ. काही प्रमाणात औषधांमुळे ताब्यात आणता येतं. पण सहकार्य, सहभागाशिवाय पूर्ण इलाज होणं कठीण आहे. यांच्यापैकी बर्‍याचशा लोकांची तक्रार "मला इतरांमुळे (कुटुंबीय, समाजव्यवस्था) त्रास होतोय. त्यांना बदला म्हणजे मी आपोआप बदलेन. मला सांगू नका" अशा प्रकारची असते. वेगवेगळ्या प्रकारच्या नात्यांमधे हाच प्रकार दिसतो, नवरा-बायको, सासू-सून, मुलं-पालक, इ. या लोकांना पूर्णतः डावलूनही चालत नाही. त्यांची तशी मनःस्थितीही नसते. "बाहेरची परिस्थिती बदलणं आपल्या हातात नाही, पण स्वतःचा दृष्टीकोन (approach) बदलण्याचं शस्त्र आपण सहज वापरू शकतो. आपण ते करून पाहू. आणि मग बाकीचे बदलतील का ते पाहू", असं त्यांना सांगावं लागतं. ही मानसिक तयारी करून देणं हे समुपदेशकाचं कसब. ... ... जेव्हा माणूस सातत्याने नेहेमीपेक्षा वेगळा वागतोय, एखादवेळा नाही, त्यामुळे त्या व्यक्तीला मानसिक, शारीरिक आणि सामाजिक संबंधातही त्रास होतोय, चिडचिड होते आहे, कशात रस दाखवत नाहीये, नातेसंबंध बिघडत आहेत, त्यांच्या वागण्यामुळे इतरांना त्रास होतोय, अशा गोष्टी सातत्याने होत असतील तर तज्ञाकडे जाणं इष्ट. आत्मरत, ओसीडीच्या/OCPD च्या रुग्णांना स्वतःला त्रास होत नाही, कारण त्यांना आपलं तेच खरं वाटत असतं. झालाच तर इतर का बदलत नाहीत, आपलं ऐकत का नाहीत याचा त्रास होतो. त्यामुळे जबरदस्ती करणं, राग येणं असं होतं. मुख्य त्रास इतरांना, कुटुंबियांना होतो. तसं होत असेल तर हे सांगून सवरून बदलत नाहीये तर मग तज्ञाची गरज आहे. सरळ सांगून ही व्यक्ती येईलच असं नाही. मग त्यांना सांगताना, आत्ता जे काही होतंय, त्याचा सगळ्यांना त्रास होतोय. व्यक्तिला दोष देण्यापेक्षा परिस्थितीकडे बोट दाखवावं. आपण प्रयत्न केले पण आपल्याच्याने हे सुधारत नाहिये, आता अजून काही करता येईल का यासाठी मानसोपचार तज्ञाकडे जाऊ. असं सांगता येतं. अशा वेळेस रुग्ण "हे लोक आपलं ऐकत नाही निदान तज्ञ, डॉक्टरचं तरी ऐकतील" म्हणून येतात. हे बरेचदा होतं, विशेषतः व्यक्तिमत्त्वाशी संबंधित विकारांमधे हे होतं. रुग्णाचं मत "तुम्हालाच मानसोपचाराची गरज आहे" असं असतं. अशा वेळेस "तू तुझ्या तक्रारी सांगायला डॉक्टरकडे चल" असं रुग्णाला सांगता येतं. थोडक्यात खिन्नता, राग, अस्थिरता वरचेवर होत असेल, त्यांच्यावर ताबा ठेवणं कठीण जात असेल, आणि त्यामुळे मानसिक बदल होत आहेत, कार्यपद्धतीमुळे नुकसान होतंय हे दिसत असेल; कळतंय पण वळतही नाही किंवा कळतच नाहीये असं असेल आणि हे सगळं काही आठवडे, महिने होतंय तर तज्ञाकडून मानसोपचार/औषधोपचाराची गरज आहे. ------ सुलभा सुब्रमण्यम या अनुभवी, मानसोपचार-समुपदेशिकेशी केलेल्या प्रश्नोत्तरांमधून.

ऐसीवर ही दोन भागांमधील मुलाखत वाचली होती. खुप चांगली माहिती दिलीय या मुलाखतीत. ज्या कुटुंबातील व्यक्तींला काही मानसिक आजार असण्याची शक्यता आहे अशा कुटुंबातील व्यक्तींनी आवर्जून वाचावी अशी मुलाखत आहे ती.

मी मोठा शहाणा...
पण खरचं एखादा मोठ्ठा शहाणा असेल अन तसा वागत असेल तर त्याला नार्सिसिस्ट म्हणावे काय ? उदा . गॅरी कॅस्पारोव्ह म्हणाला होते ( १९९० च्या आसपास) जेव्हा नायजेल शॉर्ट त्याचा सर्वात चुरशीचा कॉम्पीटीटर होता तेव्हा " My next will be Nigel Short and the match would be even Short " आता ह्या गॅरी कॅस्पारोव्हला (आणि अशाच इतर माणसांना ) नार्सिसिस्ट म्हणावे काय ? ( बायदवे : पुढील मॅच मधे कॅस्पारोव्हने शॉटचा खरच कचरा केला होता ... अगदी लिंबुटिंबु खेळाडुला हरवावे तसे हरवले होते )

ह्यात नार्सिसिझमचा भाग येत नाही असं वाटतं. हा जबरदस्त आत्मविश्वास आहे. समजा मॅच मध्ये कॅस्पारोव्ह हरला असता आणि त्याचे विश्लेषण करत 'पंचानी चुकीचा निर्णय दिला, त्यांना चेसचे नियमच माहित नाहीत, शॉर्ट जगाच्या दृष्टीने जिंकला असला तरी मुळात तो जबरदस्त हरला आहे. मला कोणी हरविणे शक्यच नाही, कोणाला बुद्धीबळ हा खेळ कळलेलाच नाही' वगैरे विधानं केली असती तर कदाचित कॉस्परॉव्हचे व्यक्तिमत्व नार्सिसिस्टच्या जवळ जाणारे ठरले असते.

नार्सिसिझम बद्दल माहीत होतं पण हा लेख नार्सिसिस्ट व्यक्तीने वाचला तर त्याची/तिची प्रतिक्रिया काय असेल? कदाचित 'यातील एकही लक्षण मला लागू होत नाही' असं असेल की आणखी काही?

ती सगळी गुणगुण वाचण्यापेक्षा अंकलिपीतील म ची बाराखडी पटकन वाचून होईल.

तुझी प्रतीक्रिया चांगल्या लेखाचे काश्मीर करू शकते हे लक्षात येते आहे ना ?? बरे असेल कुणी नार्सिसिस्ट, तुम्ही नॉर्मल आहात ना? करा दुर्लक्ष.

छान लेखन. पण फक्त एका लेखापुरतं मर्यादित ठेवू नकोस. मानसशास्त्रावर अजूनही लेखन येऊ देत. तेव्हढीच वेगवेगळ्या मनोविकारांबद्दल अधिक माहिती मिळेल.

@आत्मरत व्यक्ती असे दुर्दैवी जीव असतात की आपल्यामुळे इतरांना प्रचंड त्रास होतोय याची पुसटशीही जाणिव त्यांना नसते. >>> अप्रतिम लिहिलत धनाजीराव..!

मला आत्मरत असणे हा मानसिक रोग वाटत नाही. तसे असेल तर 'स्वतःकडे दुर्लक्ष करणे' नावाचा अजून मानसिक रोग असे म्हणावे लागेल. 'इतरांकडे लक्ष देणे' , उदा, समाजसेवा, नावाचा अजून एक मानसिक रोग असावा. 'कोणत्यातरी एकाच गोष्टीत लक्ष घालणे' हा ही एक मानसिक आजार ठरावा. लोकांच्या वागण्याने इतरांना त्रास होतो, काही कारणांनी लोक स्वतःशी , इतरांशी नीट वागत नाहीत हे एक सामाजिक सत्य आहे. यात व्याधीवत काही नसावे. मानसशास्त्र सध्याला एक 'प्रमाण मनुष्य' बनवत आहे. जर कोणतीही भावना या प्रमाण मनुष्याच्या भावनेच्या रेंज बाहेर गेली तर तो रोगी समजावा अशी धारणा झालेली दिसते. नवलाची गोष्ट म्हणजे ही रेंज इतकी लहान आहे कि साधारणत: , जो रोगी आहे त्याला, जो त्याच्या बाजूला आहे त्याला आणि समाजाला त्याचा रोग दिसतच नाही ! वर दिसलाच तर तो बरा करता येत नाही. समाजातील लोकांचे दुष्ट वर्तन वर्णन करण्याचा (आणि म्हणून कदाचित समर्थन करण्याचा?) हा मला भलताच प्रकार वाटतो. शेवटी गमतीने - (भीमसेनांचा आत्मरंगी रंगले, मन भवतरंगी रंगले, रंगले, रामरंगी रंगले, मन हो ऐकण्याचा मूड गेला.)

'स्वतःकडे दुर्लक्ष करणे' हा नैराश्याचा मोठा भाग असतो. नैराश्य - depression. 'कोणत्यातरी एकाच गोष्टीत लक्ष घालणे' - Obsessive compulsive disorder / OCD तज्ञांकडून याची अधिक माहिती मिळू शकेल. ---
समाजातील लोकांचे दुष्ट वर्तन वर्णन करण्याचा (आणि म्हणून कदाचित समर्थन करण्याचा?) हा मला भलताच प्रकार वाटतो.
संसर्गजन्य रोग असणार्‍या व्यक्तींना 'जीवशास्त्रीय शस्त्रं' घेऊन फिरतात म्हणून कोणीही प्रॉसेक्यूट करत नाहीत. उलट बाबा आमटेंसारख्या, संसर्गजन्य रुग्णांची सेवा करणार्‍यांना, बरं करणार्‍यांना मोठं मानलं जातं. मग मानसिक विकार असणार्‍यांना गुन्हेगार कसं ठरवायचं? कायद्यात, न्यायदान करताना मानसिक विकार असणार्‍या आणि प्रत्यक्ष गुन्हे करणार्‍या लोकांना सूट दिली जाते. इथे आपण 'पर्सीव्ह्ड' गुन्ह्यांबद्दल, चुकांबद्दल, वाईट वर्तनाबद्दल बोलत आहोत; प्रत्यक्ष गुन्हा नव्हे! --- परिस्थितीमुळेच लोक मानसिक विकारांना बळी पडतात असं नव्हे; काही लोक असे विकार घेऊनच जन्माला येतात. (जसं काही लोकांना जन्मजातच शारीरिक व्याधी, विकार असतात.) मानसिक विकारांमधून 'बरं होणं' म्हणजे 'ताप बरा झाला' इतपत सोपं नाही; कर्करोगाचं रेमिशन (बाजूला पडणे) होतं तसंही असू शकतं. (याबद्दल थोडा अधिक तपशील, वर धन्याने उल्लेख केलेल्या मुलाखतीमधे आहे.) --- खटपट्या, तुम्हाला तुमच्या रूम पार्टनरला मानसोपचारतज्ञाकडे नेता येणं शक्य असेल, तेवढी जबाबदारी घेण्याची तयारी असेल तर ते करा; ते सगळ्यात उत्तम. हे झेपणार नसेल, जबाबदारी घेण्याची इच्छा नसेल तर बाजूला झालेलंही वाईट नाही. त्याला मारणं वगैरे गुन्हे स्वतःच्या समाधानासाठी करता येतील, पण त्यातून त्या रुग्णाची अवस्था आणखी खालावू शकते. जॅक डी, तुम्ही असं काही केलं नाहीत हे वाचून आनंद झाला.

स्वमग्न हा शब्द ऑटीझमसाठी प्रचलित आहे. आत्म"रत" हा शब्द स्वताच्या "प्रेमात" पडलेले लोक अशा अर्थी वापरला आहे. तुम्ही म्हणताय तसा सेल्फ सेंटर्डचा मराठी शब्द आत्मकेंद्री हाही चालला असता.

आमच्या बरोबर काम करणाराच असा आहे. तो माझा रुम पार्ट्नर ही आहे. मी समुपदेश करु शकतो का ? सुरुवात कशी करावी ? त्याच्या या स्वभावामुळे घरी त्याचे कोणाशी पटत नहि. त्यामुळे नोकरी लागताच तो वेगळा राहू लागला. घरातील कोणीही त्याच्या संपर्कामध्ये नाहीत. मी काय करू शकतो.

खरच रूम बदलून टाका, मी अश्याच व्यक्ती बरोबर २ वर्ष काढली आहेत, ते काही बदलणार नाही. उलट तुम्ही अपेक्षा ठेवून बसाल आणि मग तुमचे खूप मानसिक नुकसान होईल. मी रूम सोडल्यावर खूप आनंदात आयुष्य काढले आहे.

आजच कळले की अश्या लोकांना काय म्हणतात ते, भारतात कधी अनुभव आला नव्हता पण अमेरिकेत आल्या वर इकडच्या काही विद्यार्थ्यांचा असाच खूप वाईट अनुभव आला. भारतात असतो तर पोत्यात घालून मारला असता इतकी वाईट वेळ आली होती पण त्यावेळी इकडे पोत मिळाले नाही.:( ती माणसे खरच खूप यशस्वी होतात, पण नंतर त्यांना त्या यशाचे काय करावे हे समजत नसावे बहुतेक.

अगदी अगदी … राग आवरला आणि शांत राहिलो तर अशा लोकांना वाटता कि त्यांचा विजय झाला. किवा त्यांचे म्हणणे आपल्याला पटले आहे. रूम बदलण्याची मानसिक तयारी सुरु आहे.

कितीही स्वार्थी विचार वाटला तरी तुम्ही रुम बदलणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्हाला जर तुमच्या रुम पार्टनरला मदत करावीशी वाट असेल तर अगदी सौम्य शब्दांत तो कसा चुकतो, त्याने त्याचा स्वभाव बदलण्याची कशी गरज आहे हे सांगून पाहा. आणि हो, सांगण्यापूर्वी महाप्रलयाला सामोरं जायची मनाची तयारी करा. त्याने तुमचं शांतपणे ऐकून घेतलं, तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे असं मान्य केलं, त्याचीही स्वतःला बदलायची ईच्छा आहे असं काही म्हणाला तर त्याला मदत करता येईल. अशा व्यक्तीच्या बाबतीत सायकोथेरपी उपयोगी पडू शकते.

'sharing' न समजल्यमुळे असं होत असावं कदाचित. पुस्तकं, वह्या, पेन, पेन्सिल, खाउ, पासून आनंद, दु:ख आणि शिवाय आई, बाबा आणि इतर सर्व... अगदी प्रुथ्वी सुद्धा, आपण सगळी (वेगवेगळ्या नात्यातून संबंध असलेली)भावंडं शेअर करत आहोत, ही भावना कधीच जागी न झाल्याचा हा परीणाम असावा का? फक्त स्वतःपुरता विचार करायची सवय लागून कधीतरी घसरत घसरत असा तोल जात असावा. एक आठवण झाली. मागे एकदा लहान्पणी माझी आई आणि मावशी आश्चर्य करत होत्या, 'आपण आपल्या आईवडलांचा उल्लेख 'आमची आई, आमचे बाबा' असा करतो, तशी ही मुले का बरं करत नाहीत? हे 'माझी' आई, म्हणतात!'

खरच ग! खरच माऊ! तेंव्हा ती आई किमान ४ तरी मुलांची आई असायची, आता फक्त दोघांची असल्याने स्पर्धा कमी होउन एकट्याचा हक्क प्रस्थापित करावासा वाटत असावा.

एकंदरित लेख छान वाटला, परंतु: ........."मग उरते एकच कारण. लहानपणी होणारे संस्कार"......... असे असते, तर एकाच घरात वाढलेल्या सर्व भावंडांचा स्वभाव सारखाच झाला असता, पण असे असलेले दिसत नाही. याचा अर्थ प्रत्येकाचा स्वभाव अमूक असा होण्यामागे आणखी खोल, प्रबळ कारणेही असणार. माझ्या अनुभवात आलेले आहे, की जर उत्तम ज्योतिषी असेल, तर तो पत्रिकेवरून स्वभावाचे अचूक वर्णन करतो. तेंव्हा जन्माला आलेल्या बाळाचा एकंदरित स्वभाव पुढे कसा होणार, हे जन्मतःच ठरलेले असल्याने एकाच घरातील एकाच पालकांची मुले वेगेवेगळ्या स्वभावाची असलेली दिसून येतात. संस्कारांचा मोठाच प्रभाव पडत असतो, हे निर्विवाद, पण तेवढेच कारण पुरेसे वाटत नाही. शिवाय अमूक व्यक्तीवर अमूक संस्कारच घडावेत, ही देखील नियतीच. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने हे कसे मांडले जाते, हे ठाऊक नाही.

........."मग उरते एकच कारण. लहानपणी होणारे संस्कार"......... असे असते, तर एकाच घरात वाढलेल्या सर्व भावंडांचा स्वभाव सारखाच झाला असता, पण असे असलेले दिसत नाही. याचा अर्थ प्रत्येकाचा स्वभाव अमूक असा होण्यामागे आणखी खोल, प्रबळ कारणेही असणार. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने हे कसे मांडले जाते, हे ठाऊक नाही.
तुमच्या प्रश्नाचं एक उत्तर इथे आहे: व्हाय चिल्ड्रन इन सेम फॅमिली बिहेव डिफरंटली
माझ्या अनुभवात आलेले आहे, की जर उत्तम ज्योतिषी असेल, तर तो पत्रिकेवरून स्वभावाचे अचूक वर्णन करतो. तेंव्हा जन्माला आलेल्या बाळाचा एकंदरित स्वभाव पुढे कसा होणार, हे जन्मतःच ठरलेले असल्याने एकाच घरातील एकाच पालकांची मुले वेगेवेगळ्या स्वभावाची असलेली दिसून येतात. संस्कारांचा मोठाच प्रभाव पडत असतो, हे निर्विवाद, पण तेवढेच कारण पुरेसे वाटत नाही. शिवाय अमूक व्यक्तीवर अमूक संस्कारच घडावेत, ही देखील नियतीच.
हा मानण्या न मानण्याचा विषय आहे. एकदा नियती आहे असं मानलं की माणसाच्या कर्तृत्वाला काहीच अर्थ नाही. जे काही होतं ते नियतीच्या ईशार्‍यावर. आपण फक्त प्रवाहपतितासारखे वाहत जाणे. असो. हा विषय या धाग्यावर नको. मुळ मुद्दा बाजूला राहून धागा नको तिकडे भरकटेल. :)

>>>एकदा नियती आहे असं मानलं की माणसाच्या कर्तृत्वाला काहीच अर्थ नाही. जे काही होतं ते नियतीच्या ईशार्‍यावर. आपण फक्त प्रवाहपतितासारखे वाहत जाणे. खिक्क. लई घोळ आहे. ;) चालू द्या. :P

"नार्सिसिस्टीक पर्सनालिटी डीसऑर्डर" हा आजार आहे असे म्हणावे का ? जर हा आजार असेल तर मग लहानपणी होणारे सन्स्कार जबाबदार नाही आहेत.

आजार म्हणा वा स्वभावविकृती. एक मात्र नक्की की ती व्यक्ती तसं जाणून बुजून, किंवा तुम्हाला त्रास दयायचा म्हणून तसं ठरवून वागत नसते. ते वागणं त्या व्यक्तीच्या अंतर्मनात अगदी खोलवर "नॉर्मल" वागणं म्हणून रुतुन बसलेलं असतं. आपण चुकीचं वागतोय याचं भानच त्यांना नसतं. बरेच वेळा गोष्टी असह्य झाल्या की आपण त्राग्याने म्हणतो की "त्याला/तिला कळत नाही का?". या प्रश्नाचं उत्तर त्याला/तिला कळत नाही असंच असतं. या प्रकाराला लहानपणी होणारे संस्कार कसे जबाबदार ठरतात याचं छान स्पष्टीकरण माऊने वर दिलंय.
'sharing' न समजल्यमुळे असं होत असावं कदाचित. पुस्तकं, वह्या, पेन, पेन्सिल, खाउ, पासून आनंद, दु:ख आणि शिवाय आई, बाबा आणि इतर सर्व... अगदी प्रुथ्वी सुद्धा, आपण सगळी (वेगवेगळ्या नात्यातून संबंध असलेली)भावंडं शेअर करत आहोत, ही भावना कधीच जागी न झाल्याचा हा परीणाम असावा का? फक्त स्वतःपुरता विचार करायची सवय लागून कधीतरी घसरत घसरत असा तोल जात असावा.

धनाजीराव अतिशय छान मांडलत तुम्ही स्वभाव विश्लेषण. एकूण संदेश हाच किप युअर डीस्टन्स. म्हणजे शुद्ध मराठीत जमेल तेव्हढे टाळा, अनुल्लेखाने मारा.

माझा एक डोक्टर मित्र फार वर्षापूर्वी मला म्हणाला होता की ज्याला मानसिक विकृति म्हणतात अशी प्रत्येक गोष्ट सर्वांमधे असते. तिचे प्रमाण अति झाले की त्याला आपण " आजार" म्हणून ओळखतो. मिपावर धाग्रे काढून " शहाणे करोन सोडावे सकल जन" चा उद्देश कितीही चांगला असला तरीही मी जर रोज एक नवा धागा काढीत बसलो तर इथले बहुतेक सर्वजण म्हणतील " या चौकटाला येरवड्याला न्या. आत्मस्तुती वा आत्मदोषारोप दोन्ही चा अतिरेक आपले हसे करतो. अशा वेळी एखाद्याला भिडणे याचीही मर्यादा समजून घेतली पाहिजे. शेवटी मी सूर्याला शीतल ठरवायचा कितीही अट्टाहास केला तरी तो काय मला चट्का दिल्याशिवाय रहाणार आहे का? तात्पर्य मानवी मूल्ये , ईझमस याना निसर्गात काहीच अर्थ नाही. त्याचा नियम एकच आहे समतोल पाळा. म्हणून तर त्याने ऋतू निर्माण केले आहेत ना ?

@तात्पर् मावी मल्ये , ईझमस याना निसर्गात काहीच अर्थ नाही. त्याचा नियम एकच आहे समतोल पाळा. म्हणून तर त्याने ऋतू निर्माण केले आहेत ना ?>>> ये हुइ पते की बात! :)

माझा एक डोक्टर मित्र फार वर्षापूर्वी मला म्हणाला होता की ज्याला मानसिक विकृति म्हणतात अशी प्रत्येक गोष्ट सर्वांमधे असते. तिचे प्रमाण अति झाले की त्याला आपण " आजार" म्हणून ओळखतो. माझा एक डोक्टर मित्र फार वर्षापूर्वी मला म्हणाला होता की ज्याला मानसिक विकृति म्हणतात अशी प्रत्येक गोष्ट सर्वांमधे असते. तिचे प्रमाण अति झाले की त्याला आपण " आजार" म्हणून ओळखतो.
होय.
त्याचा नियम एकच आहे समतोल पाळा. म्हणून तर त्याने ऋतू निर्माण केले आहेत ना ?
मानवी स्वभावविकृती एका विशिष्ट मर्यादेपलिकडे गेले की माणसाचं वास्तवाचं भान सुटतं. आणि एकदा असं भान सुटलं की कसला समतोल अन कसलं काय.

माझा एक डोक्टर मित्र फार वर्षापूर्वी मला म्हणाला होता की ज्याला मानसिक विकृति म्हणतात अशी प्रत्येक गोष्ट सर्वांमधे असते. तिचे प्रमाण अति झाले की त्याला आपण " आजार" म्हणून ओळखतो. माझा एक डोक्टर मित्र फार वर्षापूर्वी मला म्हणाला होता की ज्याला मानसिक विकृति म्हणतात अशी प्रत्येक गोष्ट सर्वांमधे असते. तिचे प्रमाण अति झाले की त्याला आपण " आजार" म्हणून ओळखतो. धन्या हे असे कंट्रोल व्ही दोनदा येणे हा ही एक आजार आहे. सिंहगड रोडला तुला कोणते सायकियात्रिस्ट जवळ पडतात बॉ ? येतोस ना ?

धन्या हे असे कंट्रोल व्ही दोनदा येणे हा ही एक आजार आहे.
जगातल्या कुठल्याशी संगणक आज्ञावलीकर्त्याला (तेच ते सॉफ्टवेअर प्रोग्रामर) विचारलंत तर तो निमिषार्धात म्हणेल की ही अगदी सामान्य बाब आहे. त्यात आजार वगैरे काही नाही. कुठल्याही सॉफ्टवेअरमधील बर्‍याचशा मोठया चुका या प्रोग्रामरने केलेल्या "कॉपी पेस्ट" मुळे असतात. ;)

तो प्रोगामर म्हणणारच ही सामान्य बाब आहे. " आजार" नाही.कारण प्रोग्रामरलाही त्याचा अहं स्वस्थ बसू देत नाही.आपली ती सामान्य बाब व दुसर्‍याचा तो आजार काय ? वस्तादच आहेस की ! ( धन्या हे सगळं तू हलके घेशीला ना रे भौ ? )

माझा एक डोक्टर मित्र फार वर्षापूर्वी मला म्हणाला होता की ज्याला मानसिक विकृति म्हणतात अशी प्रत्येक गोष्ट सर्वांमधे असते. तिचे प्रमाण अति झाले की त्याला आपण " आजार" म्हणून ओळखतो. मिपावर धाग्रे काढून " शहाणे करोन सोडावे सकल जन" चा उद्देश कितीही चांगला असला तरीही मी जर रोज एक नवा धागा काढीत बसलो तर इथले बहुतेक सर्वजण म्हणतील " या चौकटाला येरवड्याला न्या. आत्मस्तुती वा आत्मदोषारोप दोन्ही चा अतिरेक आपले हसे करतो. अशा वेळी एखाद्याला भिडणे याचीही मर्यादा समजून घेतली पाहिजे. शेवटी मी सूर्याला शीतल ठरवायचा कितीही अट्टाहास केला तरी तो काय मला चट्का दिल्याशिवाय रहाणार आहे का? तात्पर्य मानवी मूल्ये , ईझमस याना निसर्गात काहीच अर्थ नाही. त्याचा नियम एकच आहे समतोल पाळा. म्हणून तर त्याने ऋतू निर्माण केले आहेत ना >>> सिंपल आणि खरे ! वेलसेड !!

माझा एक डोक्टर मित्र फार वर्षापूर्वी मला म्हणाला होता की ज्याला मानसिक विकृति म्हणतात अशी प्रत्येक गोष्ट सर्वांमधे असते. तिचे प्रमाण अति झाले की त्याला आपण " आजार" म्हणून ओळखतो. मिपावर धाग्रे काढून " शहाणे करोन सोडावे सकल जन" चा उद्देश कितीही चांगला असला तरीही मी जर रोज एक नवा धागा काढीत बसलो तर इथले बहुतेक सर्वजण म्हणतील " या चौकटाला येरवड्याला न्या. आत्मस्तुती वा आत्मदोषारोप दोन्ही चा अतिरेक आपले हसे करतो. अशा वेळी एखाद्याला भिडणे याचीही मर्यादा समजून घेतली पाहिजे. शेवटी मी सूर्याला शीतल ठरवायचा कितीही अट्टाहास केला तरी तो काय मला चट्का दिल्याशिवाय रहाणार आहे का? तात्पर्य मानवी मूल्ये , ईझमस याना निसर्गात काहीच अर्थ नाही. त्याचा नियम एकच आहे समतोल पाळा. म्हणून तर त्याने ऋतू निर्माण केले आहेत ना >>> सिंपल आणि खरे ! वेलसेड !!