भारतीय चित्रांत परस्पेक्टिव्ह चा अभाव असायचा. बर्याचदा ती चित्रे वास्तवदर्शी नसायची. देखावे हे फक्त ब्याकग्राउंड म्हणौन यायचे.पाश्चात्य चित्रकारानी भारतीय चित्रकलेत वास्ताविकता आणली
विजुभाऊंचं म्हणणं पटत नाही. चित्रांचं पर्स्पेक्टिव्ह चित्रकारानेच ठरवावं, इतरांनी चित्रकाराच्या दृष्टीवर स्वमताचं आरोहण का करवावं? त्याबरोबरच वास्तवदर्शीत्व म्हणजे हुबेहुबपणाच असायला पाहिजे अशी आवश्यकताही भारतीय (किंवा त्या अनुषंगाने कोणत्याही) चित्रकलेसाठी म्हणता येईल असं वाटत नाही. हे आपलं माझं मत. याची योग्यायोग्यता, चित्रगुप्तकाकांसारख्या चित्रकारांनी ठरवावी.
बाकी धागा आवडला. या विषयावर अधिक वाचायला नक्कीच आवडेल. चित्रकलेचा तौलनिक अभ्यास या मार्गाने झालेला पहाता आला तर बहार यईल.
प्रास साहेब, विजुभौ नी perspective या शब्दाचा वापर तांत्रिक अर्थाने केलेला आहे. इंडियन डेकोरेटीव्ह स्टाईलची शक्तिस्थळे
वेगळी आहेत. तत्कालिन चित्रकाराना परस्पेक्टिव चे ज्ञान असणारच पण लांबवर निमुळ्त्या होत गेलेल्या वस्तूवरचे बारीक काम दूरवर अति वारीक दाखवावे लागत असल्याने चित्रकार जरा परस्पेक्टिव च्या बाबतीत स्वात्रंत्र्य घेत असावेत. अर्थात
हा केवळ एक तर्क आहे.
विजुभाऊंनी लिहिले, ते खरे आहे, परंतु हे पर्स्पेक्टिव्ह, शेड-लाईट वगैरे कित्येकदा अडसर ठरते. उदाहरणार्थ रामाची लंकेवर चढाई, जालंदर नाथ आणि पद्मिनीचे आकाश गमन इ. प्रसंग (त्यातील बारकावे आणि भव्यता यासह) पाश्चात्त्य पद्धतीने चित्रित करणे मुश्किलही नही, नामुमकिन हैत.
या विषयावर खरेतर विस्तृतपणे चर्चा पुढील एका भागात करायची आहे.
.....पाश्चात्य चित्रकारानी भारतीय चित्रकलेत वास्ताविकता आणली....
परंतु त्यामुळे आपली उपरणी, पागोटी, धोत्रे, पैठण्या, नथी इ.इ. टाकून आपण जीन्स - टीशर्ट घालू लागलो, तसे हे झाले.
शिवाय मुख्य गंमत म्हणजे ज्याकाळी रविवर्मा प्रभृति जुनाट वळणाची भारतीय कला टाकून पाश्चात्त्यांच्या पावलावर पाउल टाकुन 'आधुनिक' बनू पहात होते, अगदी त्याच वेळी तिकडे फ्रान्स वगैरे मधील चित्रकार सुद्धा त्यांची जुनाट वळणाची हुबेहुब वास्तवदर्शी कला टाकून, पौर्वात्त्यांच्या पावलावर पाउल टाकून 'आधुनिक' बनू पहात होते, उदाहरणार्थ खालिल चित्रे बघा:
.
तुलुज लोत्रेक, लिथोग्राफ १८८०-९० चे दरम्यान
पहिला भाग खुप आवडला. यातील काही चित्रे आधी पाहिली आहेत, काही पहिल्यांदाच पाहिली. शिव-पार्वती गणेश, नरकयातना आणि मेनेकेचे आधी पाह्यलेत, पण बाकीची आज पहिल्यांदाच पाहतोय. श्री दत्तगुरूंचे राजा रविवर्म्याने काढलेले चित्रही येथे टाका ना.
क्या कहेने. एकदम सरस धागा. एखाद्या कलेचे प्रवासवर्णन जातीवंत कलाकाराने करावे, व आपण श्रवणभक्ती करावी... काय सुख आहे.
एक शंका.
दत्तात्रयांच्या चित्रात गाय आणि कुत्र्यांचे चेहेरे एकदम जसे असावे तसे भाव धारण करुन आहेत... पण खुद्द गुरुंचा चेहेरा चेहेरा न वाटता चित्रं वाटतं.. असं का?
अर्धवटराव
चित्र क्र. २ मधील प्रसंग कुंभकर्ण वधाचा नसून कुंभकर्णाला युद्धासाठी जागे करण्याचा असावा. काही लोक त्याला शास्त्राने टोचून उठवायचा प्रयत्न करत आहेत. एका बाजूला स्त्रिया संगीत / वादन करत आहेत. तो झोपेतून जागा झाल्यावर त्याच्या साठी थोडेसे मांस आणि रांजणात दारू देखील भरून ठेवलेली दिसत आहे.
कुंभकर्णाचे चित्र त्याच्या वधाचे नसून जागे करण्याबद्दल निरिक्षण अगदी बरोबर आहे, लिहिण्यात झालेली ही चूक लेख प्रकाशित केल्यावर लगेच लक्षात आली होती, पण लेख स्वतः संपादित करण्याची सोय मिपावर नाही बहुतेक. मंडळी चित्रे लक्षपूर्वक बघत आहेत, हे बघून चांगले वाटले.
बरीच नविन माहिती आणि चित्रे पहावयास मिळाली. :)
पुण्यातल्या चित्रशाळेतले सिद्धिविनायकाचे पेंटिंग मी कुठेतरी पाहिल्या सारखे वाटते...पण कुठे ते आठवत नाही.
जाता जाता :--- ते साला जलक्रिडा वगरै पाहुन पुढल्या जन्मी राजा किंवा तथाकथित मालदार पार्टी होण्याची कधी कधी प्रबळ इच्छा होते ! ;) मिडलक्लास लाईफ आयुष्य जगणे म्हणजे जन्मभर पैश्यांच्या जुळवाजुळवीत आणि काय गमवले आणि काय कमवले याचा हिशोब करण्यातच कधी संपते ते त्यालाच कळत नसावे असे वाटते. बाकी या सर्वांच्या विरुद्ध म्हणजे नागा साधु बनणे... काय बी टेंशन नाय बघा. शिवाय नंगे से तो खुदा भी डरता है | ;)
नागा साधु तर आपण घरातल्या घरात काही काळासाठी बनूच शकतो, पण मुख्य लोच्या त्या जळक्रिडा वगैरेचा आहे... :) :))
आपल्याइकडे देवादिकांची नसतील एवढी चित्रे अश्या जळक्रिडा वगैरेंची आहेत. खरे रसिक होते आपले पूर्वज.
ह्या विषयात विशेष करुन रस आहे. पहिला भाग तर उत्तम.
मेणवलीच्या (वाई) नाना फडणवीसांच्या वाड्यात जुनी अप्रतिम चित्रे/ तसबिरी आहेत. तसेच औंध संस्थान ( जि. सातारा ) इथेसुद्धा यमाई देवीच्या देवळात आणि परत वेगळ्या म्युझियममध्ये कैक जुनी चित्रे लावलेली आहेत. औंध संस्थानचे राजे पंतप्रतिनिधी हे उत्तम चित्रकार होते त्यांची स्वःतची, त्यांनी जमवलेली आणि पाश्चात्य चित्रकारांनी काढलेली मूळ चित्रे तिथे पहावयास मिळतात.
@ दत्ता काळे आणि स्पा: यमाई देवीच्या देवळात राजा रविवार्माने काढलेली चित्रे बघण्यास उत्सुक आहे, तुम्ही ती अवश्य दाखवा, वाटल्यास स्वतंत्र धागाच काढा त्यासाठी. एकादा फोटो सध्या असेल तर आताच द्या. ही चित्रे म्हणजे लिथोग्राफ्स आहेत की तैलचित्रे ? तैलचित्रे असल्यास त्यांना फारच जपले पाहिजे. फ्रेम केलेले लिथो असले, तरी आता ते दुर्मिळ असल्याने काळजी घेतली गेली पाहिजे.
मी माझ्या डोळ्यांसमोर (चाळीस वर्षांपूर्वी, इंदुरात) एक जुन्या मंदिरातील भव्य भित्तिचित्रावर ऑइलपेंट लावताना बघितले होते, कुण्या शेठने 'जीर्णोद्धारा'साठी देणगी दिली, म्हणून. त्यावेळी आपण काहीही करू शकलो नाही, याची अजूनही खंत वाटते.
स्पा यांनी यमाई देवीचे देऊळाचे आणि तिथल्या चित्रांचे सुंदर फोटो असलेला धागा दिला आहे. ती चित्रे रविवर्माची नसणार. याबद्दल कुणाला माहिती असल्यास/मिळवता आल्यास कळवावे.
स्पा यांचे विशेष आभार.
http://www.misalpav.com/node/25425
लेखांक आवडला.
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत आहे.
फक्त "एकदा समीक्षकाचा चष्मा चढवला, की आस्वादकाची भूमिका गळून पडते, आणि त्या कृतीतील असतील-नसतील त्या उणीवाच तेवढ्या दिसू लागता" अशी टिपणी अनावश्यक व गैरलागु वाटली. असो.
चित्रगुप्त,
चित्रांवर टिपणी करू नये असे म्हणता ते ठीक. आस्वाद घ्यावा व सोडून द्यावे.
आस्वादात्मक विचार -
१) चित्रकारांनी ती काढताना त्यांच्या आसपासच्या वातावणरणाचे, संस्कृतीचे भान राखून ती काढली असावीत.
२) सादर केलेली चित्रे पाहून पौराणिक चित्रकारांनी विशेषतः राम आदी व्यक्तींना देव मानल्यामुळे देवी देवतांच्या जीवनातील युद्धाच्या व सैन्याच्या संचलनाकडे ते सैनिकांच्यावेषात त्यांना दाखवण्याचे साहस करत नसावेत किंवा देवतांच्या लोकप्रिय व्यक्तिमत्वाला तडा जाऊ न देता ती रेखाटणे पसंत करत असावेत. जोधपुरच्या एका चित्रकाराने राम पावसाळा संपून मग सीतेच्या शोधासाठी जायच्या तयारीतील चित्रात डोंगरांचा भाग वगळता वाळवंटासमान भूभाग असल्याचा भासवले आहे. ते असेच सुचवत असावेत.
३) अहिल्येच्या चित्रातील ती फार तरुण आहे. विश्वामित्रांची दाढी पांढरी तर केस कलप लावल्यासारखे काळे कुळकुळीत. तर रानावनातून फिरताना रामलक्ष्मण अनवाणी. आता आजच्य़ा संदर्भात ते खटकते. ओकेबोके वाटते. कितीही झाले तरी ते राजकुमार होते असे अनवाणी दाखवणे अशोभनीय वाटते. कुंभकर्णाच्या चित्रातील तपशील व रेखाटन पाचवीतल्या मुलांसारखे बाळबोध वाटले.
४)नुकतेच सौदर्यशास्त्रावर नाशिकच्या राम कर्वे यांचे व गांगलांनी प्रकाशित केलेले पुस्तक हाती आले. ते वाचून व मिपावरील वल्ली व त्याच्या मित्रांनी काढलेल्या अजंठावेरूळ लेण्यांतील फोटो पाहून त्यावर कर्व्यांनी पुस्तकात जे म्हटले आहे ते यां तज्ज्ञांकडून समजून घ्यायला हवे असे वाटते.
५) वेळ मिळाला की कोहलींच्या लिखाणाची झलक म्हणून हनुमानाचे व्यक्तिमत्व त्यांनी कसे चित्रित केले आहे यावर लिहायचे आहे.
६) सौदर्यशास्त्रावरील या पुस्तकाची ओळख कोणास करून देता आली तर पहा.
गंमत म्हणजे रामाच्या डोईवर सोन्याचा किरीट, पण पायात काही नाही, अशी चित्रे आहेत.
मला वाटते राजा म्हटला की किरीट हवाच, हा संकेत, आणि या तजबिरी देवघरात ठेऊन पूजल्या जायच्या, तस्मात पायावर गंध लावायला पायताणांचा अडसर नको, म्हणून अनवाणी, असेही असेल. मजेदार असतात ही चित्रे.
कुंभकर्णाच्या चित्रातील तपशील व रेखाटन पाचवीतल्या मुलांसारखे बाळबोध वाटले.
असे बाळबोध वा सरधोपट चित्रिकरण हे भारतीय चित्रकलेच्या बलस्थानांपैकी एक आहे.
कोहलींच्या लिखाणाची झलक म्हणून हनुमानाचे व्यक्तिमत्व त्यांनी कसे चित्रित केले आहे यावर लिहायचे आहे.
प्रतिक्रिया
मस्त
अप्रतिम संग्रह .
भारतीय चित्रांत परस्पेक्टिव्ह
असहमत.
अर्थ वेगळे
पर्स्पेक्टिव्ह वगैरे
पहिला भाग खुप आवडला. यातील
दत्तात्रेय
व्वा!!!
असं का असावं ?
छानच! यातल नृसिंहाचे चित्र
लिथोग्राफी
चित्र क्र. २ मधील प्रसंग
कुंभकर्णाचे चित्र
लेख आवडला. च हित्रे तर खूपच
बरीच नविन माहिती आणि चित्रे
नागा साधु आणि जळक्रिडा
खरे रसिक होते आपले पूर्वज.
छान धागा
औंध संस्थानात असलेल्या "यमाई
यमाई देवीच्या देवळातील चित्रे
@दत्ता काळे
राजा रविवर्म्याची तर आहेतच पण
यमाई देवीचे देऊळ
सुरेख
बाकी काही म्हणा गणपती बाप्पा
-
छान
सुंदर
सौदर्याशास्त्रावर नाशिकच्या राम कर्वे यांचे पुस्तक
चित्रे
कोहलींचा हनुमान...
चित्रगुप्तांची चित्रे अन
चित्रान्चा खजिना
सुंदर लेख