अत्यंत शरमेची आणि दुखःदायक आणि तितकीच संतापजनक घटना आहे.
>>महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे >> +१ ह्यापुढे पुरोगामी महाराष्ट्र म्हणवणार नाही, हे नक्की.
'अंनिस" कार श्री. नरेन्द्र दाभोळकरांना भावपूर्ण श्रद्धांजली...
'कालनिर्णय' कार श्री. जयन्त सांळगांवकरांना भावपूर्ण श्रद्धांजली...
एक -महान ज्योतिष-अभ्यासक जयन्त साळगांवकर आणि दुसरे महान ज्योतिष विरोधक- नरेन्द्र दाभोळकर... यांचा दुर्दैवी मृत्यू एकाच दिवशी व्हावा.. हाही एक विचित्र योगायोग किन्वा दैवदुर्विलास !!! .... ~*~*~*~
डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली आहे. आणि साळगावकरांचा नैसर्गिक मृत्यु झाला आहे.
ज्योतिषवाल्या आणि बापू-अम्मावाल्या मंडळींना खरोखरच डॉ दाभोळकरांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांच्या गुरूंचे फोटो आणि स्वतःच्या पत्रिका जाळून टाकाव्या.
ज्योतिषवाल्या आणि बापू-अम्मावाल्या मंडळींना खरोखरच डॉ दाभोळकरांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांच्या गुरूंचे फोटो आणि स्वतःच्या पत्रिका जाळून टाकाव्या.
कृपया.. धाग्याचे गाम्भीर्य पाळावे....
ज्योतिषवाल्या आणि बापू-अम्मावाल्या मंडळींना खरोखरच डॉ दाभोळकरांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांच्या गुरूंचे फोटो आणि स्वतःच्या पत्रिका जाळून टाकाव्या.
ज्योतिषवाल्या आणि बापू-अम्मावाल्या मंडळींना खरोखरच डॉ दाभोळकरांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांच्या गुरूंचे फोटो आणि स्वतःच्या पत्रिका जाळून टाकाव्या.
आणि ती राख पण फेकून द्यावी -अंगारा म्हणून वापरू नये.
राख म्हणजे सिलिका-आलुमिना-लोह -काल्शीयम -अमोर्फस पदार्थांचे मिश्रण असते.
आता बदल घडवणारी समाजसेवा करताना विचार करायला लागेल.
काही वर्षापुर्वी तळेगावमधे आर्.टी.आय कार्यकर्ते सतिश शेट्टी यांची हत्या, पत्रकार जे.डे. यांची मुंबईत केलेली हत्या आठवल्या एकदम :(
हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडुन कडक शिक्षा व्हावी.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली. अंधश्रद्धेविरुद्धचा लढा पोरका झाला.
:(
महाराष्ट्रात आज जे काही चालल्रे आहे, विचारांचा प्रतिवाद लाठ्या-काठ्या किंवा गोळ्यांनी देण्याचा जो पायंडा पडतो आहे त्याबद्दल काय बोलायचं?
राजा कालस्य कारणम् हेच खरंय.
महाराष्ट्राचे दोन दिग्गज व्यक्तीमत्व श्री जयंत साळगावकर आणि डॉ नरेंद्र दाभोळकर
या दोघांना भावपूर्ण श्रध्दांजली.
ज्या भ्याड पध्दतीने डॉ नरेंद्र दाभोळकरांवर पुण्यात हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध
एका बुद्धीमान, बुद्धीवादी विचारवंताची अशी हत्या होणे लाजिरवाणे आहे. ह्या माणसाचे स्वच्छ, तर्कशुद्ध विचार ऐकणे हा एक आनन्ददायक अनुभव होता. त्यांच्या ध्येयवादी अन्धश्रद्धाविरोधी चळवळीबद्दल मला आदर आहे. बाबा आमटे, पु.ल. देशपांडे ह्यांच्या पंक्तीतला हा माणूस.
माझ्या महाराष्ट्रात असे काही होते आहे हे अजूनही खरे वाटत नाही. हे एक दु:स्वप्न असावे अशी आशा.
माझी ह्या थोर माणसाला श्रद्धांजली. असे शेकडो, हजारो दाभोळकर पुन्हा निर्माण होवोत. आणि ह्या निंद्य कृत्यामागे असणार्या सगळ्यांना फाशी होवो.
म्हाराष्ट्र गाडगे बाबांचा आहे, फुल्यांचा आहे, आंबेडकरांचा आहे, तुकोबांचा आहे, शाहू महाराजांचा आहे, ज्ञानदेवांचा आहे
मग अशा महान परंपरा असलेल्या म्हाराष्ट्रात लोकाना अशी अवदसा का आठवते ? की वरील सगळी थोर मंडळी फक्त
पुतळे उभारण्यासाठी आपण वापरीत आहोत ?
दाभोळकरांसारख्या व्यक्तीमत्वाचा अशा प्रकारे झालेला अंत मनाला क्लेश देउन गेला.
पाशवी आणि विकृत मनोवृतीचे लोकच अशा प्रकारचे कृत्य करु शकतात.
या हत्येचा निषेध करण्यापलिकडे आपण काहीच करु शकत नाही याचा खेद होतो आहे.
दाभोळकरांना भावपुर्ण श्रध्दांजली.
पैजारबुवा,
हे अज्ञानी लोकांना कळेल तो सुदिन
दाभोळकर अत्यंत महत्त्वाचं काम करत होते. ते कार्य पुढे जावं यासाठी त्यांनी कार्यकर्ते निर्माण केलेत. घटना केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाच्या मानसिकतेला लज्जास्पद ठरावी अशी आहे.
मृत्यू तर सर्वांनाच आहे. दाभोळकरांचा मृत्यू त्यांच्या कार्याला झळाळी देवो आणि `हत्या करावी' इतका हा प्रभावी विचार काय होता? याचा जनमानसाला विचार करायला प्रवृत्त करो, या आशेनं विनम्र श्रद्धांजली वाहतो.
विचाराचा प्रतिवाद विचाराने केला गेला पाहिजे विरोधी आवाज अशा प्रकारे चिरडून टाकाणा-या प्रवृत्त्ती आजकाल बोकाळ्त आहेत. ऋषीतुल्य डॉ.दाभोळकरांच्या भ्याड हत्येचा करावा तेवढा विरोध कमी आहे. भावपूर्ण श्रध्दांजली.
अतिशय शरमेची बाब महाराष्ट्रासाठी. हल्ला आणि हत्या कोणी केली असेल सर्वांनाच माहिती असेल पण बोलणार कोणीच नाही हे अजुन एक दुर्दैव. बौद्धिक पातळीवर दाभोळकरांशी चर्चा आणि प्रतिवाद न करु शकणार्या लोकांकडुन अजुन काहीच अपेक्षा नाही म्हणा. किडे पडुन मरतील त्यांचे मारेकरी आणि त्यांचे कर्ते करविते एवढाच शाप देउ शकतो.
फारच वाईट..
नेमकी काय उद्देशाने हत्या झाली असावी हे समजायला वेळ लागेल. केवळ वैचारिक विरोधातून झाली असेल हे मानायला कठीण वाटतं. पण कोणीतरी मारेकरी घातले म्हणजे सगळा महाराष्ट्र प्रतिगामी झाला किंवा त्यांच्या विचारांचा पराभव झाला असे नव्हे.
पण तरीही इतका काळ कोणत्याही भीतीखेरीज सर्वत्र संचार करणार्या व्यक्तीचा असा अंत होण्याने कोणत्याही चळवळीच्या कार्यकर्त्यांमधे दहशतीचं वातावरण तयार झालं तर ते जास्त दुर्दैवी ठरेल. पोलीस तरी कोणाकोणाला संरक्षण देणार?
गवि,
तुमचं म्हणणं पटतयं पण महाराष्ट्रात अशा घटना दखल घेण्याजोगत्या प्रमाणात वाढत आहे. बुद्धीजीवी वर्ग अशा प्रकारच्या घटनांचा विरोध यशस्वीपणे करु शकत नाही. आपण करत आहोत तो केवळ वांझोटा विरोध आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी केवळ सरकारच नव्हे तर सामान्य जनता काय करु शकेल या शक्यतेचा विचार या करायची वेळ आली आहे.
विशेषतः पुणे जे विचारवंतांसाठी आणि विद्येसाठी नावाजलेले आहे तिथे अशा घटना घडणे जास्त दु:ख देऊन जातात.
नव्हे. वैचारिक विरोधामुळे (तात्विक कारणाने) हत्या झाली असावी हे पटत नाही याचा अर्थ एकदम चोरीचा उद्देश असं का वाटावं.
उलट यामधे असा अर्थ होता की या अंधश्रद्धा-आधारित व्यवसायांचं जाळं इतकं पसरलं असावं आणि त्यातलं अर्थकारण इतकं मोठं आणि कदाचित संघटितही असावं की अंनिससारख्या संस्थांच्या कार्य आणि मागण्यांमुळे कुठेतरी त्यातले आर्थिक आदि हितसंबंध धोक्यात आल्याची जाणीव त्या क्षेत्राला होऊन त्यांनी हे पाऊल उचललं असणार. यात दहशत बसवण्याचाही उद्देश असू शकतो. त्यामुळे आणखीनच मानसिक हानी होऊ शकते.
अंनिससारख्या संस्थांच्या कार्य आणि मागण्यांमुळे कुठेतरी त्यातले आर्थिक आदि हितसंबंध धोक्यात आल्याची जाणीव त्या क्षेत्राला होऊन त्यांनी हे पाऊल उचललं असणार.
एव्हडा थेट संबंध लाउन भर दिवसा डोक्यात गोळ्या घालायला ते अंडरवर्ल्ड मधल्या कुठल्या ग्यांग मध्ये काम करत नव्हते. त्यामुळे हत्या निसंशय वैचारिक विरोधातूनच झाली आहे. आता तो खून कुण्या अम्मा-बापूच्या लोकांनी केलाय, कुण्या जोतिषाने केलाय की कुण्या वारकर्यानं ते पोलिस शोधून काढणार नाहितच. :(
पोलीस शोध लावतील की नाही-बहुतेक नाहीच-हा भाग अलाहिदा.
पण वैचारिक विरोध असेल तर इतकी वर्षे काही नाही आणि आत्ताच काय झालं एकदम? आर्थिक हितसंबंध आणि अंधश्रद्धा विरोधी विधेयक हेच कारण सयुक्तिक वाटते.
आता कसं बोल्ला गविभाऊ...
हे सगळं एका अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. कोणाच्या विचारांनी लोकांना बदलायचं असतं तर हा बापु नी तो बुवा/अम्मा/राम कडं लोक कशाला जातील. जो कोणी ही अर्थव्यवस्था बदलायला जाईल तोच रसातळाला जाईल ह्याची समाजानी पुर्ण सोय केलेली असते. सध्या त्या पुट्ट्पुर्थीची अवस्था बघायला गेलात तर कळेल. मुख्य माणुस नाही म्हण्ल्यावर अर्थव्यवस्था कोलमडली पण ते नैसर्गीक कारण आहे. मुख्य माणुस असतानां जा बरं, मग कळेल काय खरं आहे ते. उगाच नाही त्या अर्थव्यवस्थेचे सो कॉल्ड सैनीक हल्ला करत. कुठे तुकोबांचा/नाथमहारांजाचा वारसासमाज नी कसलं काय? रामदासकाकांनी एका लेखात सांगीतल्याप्रमाणे हे होतच राहणार आणि समाज पुढे जातच राहणार. फक्त मागच्या पिढीतील फ्रॉडस्टरपेक्षा पुढच्या पिढीतला फ्रॉडस्टर अर्थव्यवस्थेची आणि पर्यायाने ती टिकवण्याची पुढची पायरी गाठणार हेच अंतीम सत्य.
आत्मा मृत होत नाही. शरीर मॄत होत असतं, म्हणुन मॄतात्म्यास म्हणणार नाही पण सुटलेल्या आत्म्यांस सदगती लाभो एवढेच..
- वाट्या...
दाभोलकरांवर कोणत्याही राजकीय पक्षांनी हल्ला केला नसल्याचे सांगून चव्हाण म्हणाले, हा वैचारिक मतभेदाचा विषय आहे. ज्यांनी हा हल्ला घडवून आणला ते नक्कीच राजकीय पक्ष नाहीत. जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मांडले जाऊ नये आणि ते मंजूर होऊ नये, असे ज्यांना वाटत होते, त्यांनीच दाभोलकरांचा आवाज कायमचा बंद केला. अशा प्रकारचे हल्ले करणाऱया संघटनांना समाजाने वाळीत टाकले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रतिक्रिया
अत्यंत शरमेची आणि दुखःदायक
सहा महिने झाले म्हणून
(No subject)
अत्यंत वाईट बातमी !
'अंनिस" कार श्री. नरेन्द्र
काहिही
ज्योतिषवाल्या आणि बापू
+१११
+१
ज्योतिषवाल्या आणि बापू
ज्योतिषवाल्या आणि बापू
संतो, कर्म कि गती न्यारी
संतो, कर्म कि गती न्यारी
श्रद्धांजली.
+१
धक्कादायक, संतापजनक, असहिष्णू
दोनही मृतात्म्याना भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली.
बाप रे
महाराष्ट्रात आज जे काही
श्रद्धांजली
महाराष्ट्राचे दोन दिग्गज
दुर्दैवी घटना!
बापरे!
विनम्र श्रध्दांजली!
वाईट वाईट वाईट!
काय बोलणार .....
श्रध्दांजली
दोघांनाही भावपूर्ण
`हत्या व्यक्तीची होऊ शकते, विचारांची नाही'
+१
सहमत.
निशस्त्र आणि बुद्धिवादी
हे खरंच घडतंय?
विचाराचा प्रतिवाद..
अतिशय शरमेची बाब
अतीशय सुन्न करणारी घटना!!!!
फारच वाईट..
सगळा महाराष्ट्र प्रतिगामी झाला
हम्म...
मग काय चोरीच्या उद्देशाने
.
पोलीस शोध लावतील की नाही
ह्या खूनाचा शोध नक्कीच लागणार
+१
हांगाश्शी...
हे बघा...
+१
आज सकाळीच बातमी समजली आणि
कोमल,
Pagination