Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वाह! छान लेख. अजून लिहायला हवे होते. ते, आणि रिकाम्या जेवणाच्या थाळीचा फटू टाकण्या ऐवजी जेवणाचे फटू टाकले असते तर इथले अनेक आत्मे अतृप्त राहिले नसते!

या खानावळीचा ताटाचा "भाव" वाढलेला असला,तरी त्याची "किंमत" पूर्वी होती, तीच आहे! जेंव्हा "सातत्य" ही बाब असते तेंव्हा "दर" ही गोष्ट गौण ठरली पाहिजे,हे चांगल्या ग्राहकाच्या मनाचं अर्थशास्त्र असेल,तर त्याला हाही दर रुचून जातो!
जेडी पण हेच म्हणतो, jd (हे वाक्य जेडी च्या पहिल्या गुत्त्या मध्ये लिंचबर्ग, टेनेसी ला लावले आहे.) खूप मस्त झाला आहे लेख. संध्याकाळी ६ च्यासुमाराला बादशाही वरून जाताना एक जो खमंग फोडणीचा वास येतो तो लेख वाचताना आला.

तेच म्हणतो. >>> या खानावळीचा ताटाचा "भाव" वाढलेला असला,तरी त्याची "किंमत" पूर्वी होती, तीच आहे! असल्या वाक्यांनी लेखाची लज्जत वाढवली आहे!

लहानपणी बाद्शाहीमधे खाल्लेला घावन आज आठवला. जेवणाचे इतके छान वर्णन वाचल्यावर सडकून भूक लागली आहे. या इतक्या सदाशिवपेठी ब्राह्मणी उपहार गृहाला त्याच्या संस्थापकांनी 'बादशाही' हे नाव कसे ठेवले या बाबत नेहमी कुतूहल वाटत राहिले आहे.

अहो आदुबाळ! आपण सर्वात प्रथम बादशाही मध्ये किती वर्षापूर्वी गेला होता ? आधी माझी आणि मग प्रभाकर पेठकर यांची स्मरणशक्ति बरोबर नाही हे आपण कुठल्या आधारावर म्हणू शकता ?

तुमच्या प्रतिसादातला वैयक्तिक रोख मनावर न घेता तुम्हाला सरळ उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. - सर्वात प्रथम बादशाहीमध्ये इ.स. १९८९ मध्ये गेलो होतो. - तुमची आणि पेठकरकाकांची स्मरणशक्ती बरोबर नाही असा माझा कोणताही दावा नाही. माझी चूक होत असेल.

मी काही आता बाद्शाहीम्ध्ये जावू शकत नाही. आपण जाऊ शकत असला तर बादशाही च्या मालकांना जेवणाची वेळ सोडून इतर वेळी गिर्हाइकाना snacks देण्याची सोय १९८९ च्या आधी होती का असे विचारा. तसेच बादशाहीच्या जवळचे न्यू पूना रिफ्रेशमेंट हाऊस कोणत्या साला पासून सुरु झाले ही माहिती पण विचारून घ्या.

माझ्या मते मीही बादशाहीच्याच आत बसून उपरोक्त पदार्थ खाल्ले आहेत. पण ९९% खात्री अशी वाटते की त्या वेळेला (१५ वर्षांपूर्वी) बादशाहीच्या ज्या भागात बसून ते खाल्ले (रेस्टॉरंटसारखा भाग - खानावळीला संलग्न - दरवाजा वेगळा) त्यालाही "बादशाही" असंच नाव होतं. नंतर तो विभाग अन्य कोणाकडे हस्तांतरित होऊन त्याला आता पूना किंवा नवीन नाव मिळालं असू शकेल. हेदेखील एक शक्यताच. सध्या रोज येणंजाणं असलेल्यांपैकी लोकच खात्रीपूर्वक सांगू शकतील. कारण छोड आये हम वो गलियां.. :)

हा पदार्थ "न्यू पूना रिफ्रेशमेंट हाऊस" (बादशाहीच्या शेजारी कोपर्‍यावर) येथे मिळतो. बादशाही आणि न्यू पूना अगदी आवळे जावळे भाऊ भाऊ वाटत असले तरी त्यांचे मालक वेगवेगळे आहेत. पण पेठकरकाका म्हणतात त्याप्रमाणे हा पदार्थ लय भारी असतो. बटाट्याच्या जाडसर टोस्टमध्ये आत खोबर्‍याची हिरवी चटणी असते. (आठवूनच पाणी सुटलं तोंडाला...:) )

मस्त लेख बाबा, काका, मामा वगैरेंकडुन बादशाही बद्दल ऐकले आहे. बादशाहीवरुन गेलो देखिल आहे पण आत जाउन जेवायचा योग अजुन आलेला नाही. २-३ वर्षापुर्वी मामा गेले होते पण चवीबद्दल नाखुष होते १९७५-७६ ची चव राहीली नाही असं काहीसं म्हणत होते.

बुवा.. स्टिंग ऑपरेशनसारखे फोटो काढण्याचे धाडस कौतुकास्पद. अन्यथा असे काही फोटोसेशन केल्याबद्दल बहुधा तिथे तुम्हाला एखाद्या बोर्डवरचे एखादे कलम दाखवून निस्सारित करण्यात आले असते. लेखही चांगला. काही वाक्ये एकदम क्वोटेबल. बादशाहीविषयी काय बोलावे. जितके बोलावे तितके कमीच. पूर्वी लिहीलेल्या एका धाग्यातला फक्त बादशाहीबाबतचा भाग इथे पेस्टवतो आहे. -(पूर्वाश्रमीचा बादशाही मेंबर) गवि
एक डिफॉल्ट व्यवस्था हवीच. म्हणून आम्ही बादशाही बोर्डिंग "ठेवलं" होतं. तिथे जिथे "येथे गर्दी करु नये" असं लिहिलंय त्या बोर्डाखाली घोळका आणि गलका करत आम्ही अन्नासाठी वेटिंग करत उभे रहायचो. मी पहिल्यांदा या ठिकाणी गेलो ते स्वस्त आणि अनलिमिटेड अन्न म्हणून. काउंटरवर बसलेल्या आजोबांना मी "एक कूपन द्या.." असं म्हणून पन्नासची नोट त्यांच्या हातात दिली. त्यांनी अतिशय रागाने माझ्याकडे बघत ती माझ्या अंगावर परत फेकली. मी धसक्याने विचारलं, "का..काय झालं?" म्हातार्‍याने एक हात वर उचलून त्याची तर्जनी मागच्या भिंतीकडे डाव्या दिशेने रोखली. तर्जनीच्या बरोब्बर प्रोजेक्शनमधे पाहिलं तेव्हा "कृपया सुट्टे पैसे देणे" असं लिहिलं होतं. मला स्वस्त अन्नाची नितांत गरज असल्याने मी हे मनावर न घेता त्यांना नम्रपणे सुट्टे नसल्याचं सांगितलं. त्याने त्यावरही तोंड न उघडता रांगेतल्या माझ्या मागच्या माणसाला खूण केली.."नेक्स्ट" अशा अर्थाने. आयचा घो..नसतील सुट्टे तर नका जेवू.. …आय मीन "नसतील सुट्टे तर नका जेवू.." असं ते आजोबा तोंडाने म्हणाले नाहीत. हे शब्द माझेच आहेत. ते आजोबा कधीही एकही शब्द बोलल्याचं आम्हाला कोणालाच आठवत नाही. मुके नव्हते एवढं नक्की. पाट्यांकडे बोटं दाखवून त्यांचं सगळं संभाषण चालायचं आणि त्यामुळे काहीही अडणार नाही इतक्या पाट्या तिथे खोलीभर लावलेल्या होत्याच. मग कशाला शब्द वाया घालवायचे? तिथे एक काळा ठोकळ्यासारखा जुना फोन ठेवला होता. तो सतत ट्रिंग ट्रिंग ट्रिंग वाजत राहायचा पण आजोबांनी एकदाही तो उचलल्याचं उदाहरण आमच्या पाहण्यात नाही. त्यांना ऐकू यायचं. पण फोन उचलला तर बोलावंही लागलं असतं. म्हणजे पुन्हा अमूल्य शब्द वाया. मग माझे इतर होतकरू मित्र मदतीला आले. नाणी वगैरे जमवून एकवीस रुपये त्या स्थितप्रज्ञाला टिकवले आणि आत जाऊन थाळीसमोर बसलो. ओहो..इतकं घाऊक अन्न मी आयुष्यात खाल्लेलं नव्हतं. आचार्‍यांचा वाढण्याचा सपाटा बघून मी घामाघूम झालो. आपली ताटावरची नजर क्षणभर जरी हलली तरी ताबडतोब आमटी, ताक आणि भाजी पूर्ववत भरत असे. पोटाला तडस लागली तरी पानात अन्न टाकण्याची हिंमत होत नव्हती कारण तिथल्या असंख्य पाट्यांपैकी एकीवर "अन्नाचं महत्व" आणि न टाकण्याची ताकीद होती. बाहेर बसलेल्या कडक म्हातार्‍याचा (सॉरी..आजोबांचा) अनुभव पाहता अन्न टाकणार्‍यांवर काय कारवाई होईल याची खात्री नव्हती. मी ताटावर खूप नीट लक्ष ठेवून एका हाताने माश्या वाराव्यात तसं वाढप्यांना वारीत वारीत एकदाचं अन्न संपवलं. मग मात्र मला सवय झाली. भात मुठीत कुस्करुन खाणार्‍या मद्राशांना लाज आणेल अशा रितीने चारपाच पोळ्या मस्तपैकी आमटीत कालवून खायचो. नॉस्टाल्जिक बोलायला फार आवडतं असं नाही. पण दिसतं ते हे की आता नारायणपेठेतला तो वाडा कै. झालाय. मोठ्ठी अपार्टमेंट्स उभी राहिली तिथे. लकी कै. झालंय. शॉपिंग सेंटर झालंय तिथे. पूना कॉफी हाऊस कै. झालंय. गुडलकला आता शाकाहारी थाळी मिळते आणि कामाशिवाय बसू नये असं म्हणतात. अलका समोरच्या इराण्याच्या जागी आता साबुदाणा खिचडी मिळते. अलकासमोरचा दूधवाला सुद्धा कै. झालाय. ते बादशाहीतले आजोबासुद्धा बहुधा..आता तिथे कौंटरवर इतरच कोणी व्यक्ती आहे असं ऐकतो. तो म्हणे तोंडाने बोलतो. उत्तरही देतो. झपाझप सूचनांकडे बोटं दाखवण्याची रजनीकांतला लाजवेल अशी सफाई नव्या माणसात नाही. तो कदाचित ग्राहक देवो भव म्हणून नम्रपणेही वागत असेल की काय? आणि सुट्टेही गपचूप देत असेल तर? छे बुवा..बादशाहीत जाण्याचं धाडस नाही होणार आता..

पुण्यात आलो होतो तेव्हा मी आणि तिर्थरुपांनी इथे थाळी घेतली होती, मला वाटत रेडिओवर मस्त गाणी देखील लागलेली होती. :) तिर्थरुपांना त्यांच्या मित्रांनी {काळे काका} इथला जेवणा बद्धल सांगितले होते,त्यामुळ ते मला इथे घेउन आले होते. मालक मस्त आरामात बाहेर त्यांच्या गल्ल्यावर बसलेले होते. :) जेवण मस्त होते... :)

मदनबाणचा प्रतिसाद आणि मूळ धाग्यातले वर्णन / फोटो यावरुन एक अत्यंत विचित्र जाणीव झाली की या दोन्हीवरुन एकूण बादशाहीमधे निवांतता, शांतता असे काहीतरी आहे असा भास होतोय. आत्मारामबुवांनी धाग्यात दिलेल्या फोटोंमधेही एकदम रिकामी टेबलं आणि खोल्या दिसत आहेत. मी अनुभवलेलं बादशाही याच्या अत्यंत उलट होतं. म्हणजे वेटिंगची प्रचंड गर्दी, पण पाटीवर क्रमाने नावे लिहून घेण्याच्या आणि पुकारा करण्याच्या शिस्तीमुळे आपला नंबर जाण्याची भीती नाही. आत प्रवेश मिळाला की गजबज गजबज. जिथे कुठे ताटाची जागा मोकळी झाली असेल तिथे एकेकाने बसून घ्यायचं.. (सर्व मित्र एकत्र बसण्याचे प्रसंग क्वचितच.. पण मग जिथे असू तिथून एकमेकांशी मोठ्या आवाजात बोलायचे..). दणादणा वाढणारे वाढपी आणि भरपूर हलचल. असा एकंदरीत अति-सार्वजनिक माहोल असायचा. इतक्या भाऊगर्दीतही ठराविक दिवशी असणारा "खास पदार्थ" - अगदी भरल्या ताटासोबत मधेच बचकाभर भेळच किंवा वर पेठकरकाकांनी म्हटल्याप्रमाणे कसलातरी वेगळा पदार्थ सर्वांना मिळायचा. (नेमका कोणत्या दिवशी असायचा आठवत नाही पण रँडमली मिळाल्याचं आठवतं). अनलिमिटेड अन्नाचा इतका अस्सल अविष्कार आणि त्याला मिळणारा दणदणीत न्याय मी बादशाही सोडून कुठेही पाहिलेला नाही. आता एकदम ग्राहकवर्ग आटला की काय असे वाटून वाईटाची शंका आली.. :( आणखी एक.. टोकन सिस्टीम - नंबर हे नंतर झालेलं दिसतंय. आधी पाटीवर नावे लिहून नावाचाच (प्रेफरेबली आडनावाचा स्वच्छ पुकारा ही पद्धत होती...

टोकन सिस्टिम वैग्रे किमान महिन्याभरापूर्वीपर्यंत तरी नव्हते. मी गेलो होतो तेव्हा तीच पद्धत होती-पाटीवर आडनाव लिहून पुकारा इ.इ. बाकी बादशाहीबद्दल काय बोलावे? जितके बोलावे तितके थोडेच. ताक आणि आमटीच्या चवीवर आपण तर बेहद्द फिदा हौत. भाज्याही एकदम जबरी-फेव्हरीट म्हंजे कोहळा रस्सा.

@ आत्मारामबुवांनी धाग्यात दिलेल्या फोटोंमधेही एकदम रिकामी टेबलं आणि खोल्या दिसत आहेत.>>> तुंम्ही ओपन'वर बोल्ताय...! काल मी क्लोजला होतो...! =)) म्हणून शांतता/रिकाम्या खोल्या इत्यादी दिसतय! ;) बाकी रन टाइमला तीच धावपळ,वाढपी-जेवणार्‍यांचे जोक्स... इत्यादी यथाविधी चालू आहे. :) @आता एकदम ग्राहकवर्ग आटला की काय असे वाटून वाईटाची शंका आली.. smiley>>> ग्राहकवर्ग अटलेला नाही..आणी वाढलेलाही नाही. बादशाही हे मायकेल बेव्हेन सारखं ठराविक रन-रेटनी चालणारं गाडं आहे. :)

नेटकेपणा, शिस्त, सूचनांच्या विविध पाट्या, जेवणाचा आग्रह.. अ.आ.म्हणतात त्याप्रमाणे पदार्थांच्या अस्सल घरगुती चवी. पण हिला खाणावळ म्हणवंत नाही, बादशाहीच म्हणावं. बादशाहीतली जेवणावळ मजेशीर असते त्यात एस.पी. कॉलेजची महिनावारीवर जेवणारी मुलं, मध्यमवर्गीय, नोकरदार, जुने कलावंत, बाहेरगावची, पूर्वी कधीतरी बादशाहीच्या जेवणाचा आस्वाद घेतलेली आणि आता काही कामानिमित्त पुण्यात आलेली मंडळी, हमखास इथे असतात. जेवण साधं असतं. एकदा आपण जेवणाचं कूपन घेतलं की, तिथ नांवं पुकारणार्‍या माणसाला आपलं नावं आणि माणसांची संख्या सांगायची कि तो पाटीवर ( स्लेटवर ) पेन्सीलने नांव लिहीतो, ती पाटी त्याच्या कायम हातात असते. आपला नंबर आला कि तो खणखणीत आवाजात नांव आणि संख्या पुकारतो. अजिबात मागे-पुढेचा गोंधळ नाही. बहुतेक वाढपी सगळे कोकणी असावेत. नेहमीचे मेंबर्स .. एस पी ची पोरे..महिनावारीवाले ह्यांची अन् त्या वाढप्यांची क्वचित चेष्टामस्करी चाललेली असते. मालकही वेळ असेल तर त्यात सामिल होतो. इथली आमटी आणि ताक ह्याला जास्त डिमांड आहे. वाढपीही सढळ हाताने सगळेच पदार्थ वाढत असतात. जुना, जाड पितळी तांब्या प्रत्येक पानाशेजारी पाणी भरून ठेवलेला असतो. एकूण घरगुती वातावरणातच आपण जेवतो आहोत असे वाटते. "भोजनाची पूर्णता तृप्तीच्या ढेकरेनी जेव्हढी यायला हवी,तितकीच "मस्त जेवलो बुवा !" ही समाधानाची हाकही मनातून येणं आगत्याचं आहे. या दोन्ही गोष्टी इथे घडतात,किंबहुना त्या घडून याव्या असाच इथल्या अन्नाचा स्थायीभाव आहे." - हे खरंय.

@एकदा आपण जेवणाचं कूपन घेतलं की, तिथ नांवं पुकारणार्‍या माणसाला आपलं नावं आणि माणसांची संख्या सांगायची कि तो पाटीवर ( स्लेटवर ) पेन्सीलने नांव लिहीतो, ती पाटी त्याच्या कायम हातात असते. आपला नंबर आला कि तो खणखणीत आवाजात नांव आणि संख्या पुकारतो.>>> तो मी जो वयस्क माणूस पूर्वी होता,म्हटलं त्याच्यापर्यंतच हे चालू होतं.नंबर पुकारण्याची पद्धत अलिकडची आहे. :)

आज सांजच्याला अड्ड्यावरनं घरला निघालो
आम्हाला दारुचा आणि जुगाराचा असे दोनच अडडे माहिती आहेत. पुरोहितांचाही कसलातरी अडडा असतो हे नविनच ऐकतोय.
आणी गाडी सवईनी पानाच्या आमच्या आवाडत्या ठेल्यावर गेली.
एकाच वाक्यात आपण सवाईला जातो आणि आपण पानाचेही "शौकिन" आहोत हे सांगण्याची खुबी वाखाणण्याजोगी आहे.
"बोलो साब...कितना...?" मी-"तीन बनाओ,तीनो पार्सल करो. असं म्हणालो
तुम्ही स्वतःच्या रुपयांनीसुद्धा पानांचे पार्सल नेता?
आणी जरा कानावरचा हेडफोन दूर करुन आजूबाजुला न्याहाळायला लागलो.
काय न्याहाळत होतात ते नाही लिहिलंत. आणि हेडफोन जेबीएलचे आहेत हे लिहायचं राहीलं का?
आमच्या सदाशिवपेठेतली ही गल्ली पूर्वी सदाशिवपेठेचा केवळ एक भाग होती
तुमची सदाशिवपेठ ???
आणी भरत नाट्य मंदिराचा चौक ते टिळक स्मारक मंदिराचा चौक यांना जोडणारी गल्ली.."इतकिच" नाट्यमय तिची ओळख होती.पण गेल्या १५ वर्षात या गल्लीला एक नविन ओळख मिळाली... मटण-गल्ली! हो....! हेच नाव त्या लेनला आता मिळालं आहे.म्हणजे मला वैयक्तिक रित्या ही काहि खेद-जनक अथवा शरमेची गोष्ट वगैरे वाटत नाही.पण काळाबरोबर मूल्य कशी आणी किती बदलतात,याचा हा एक गमतीशीर पुरावा.
अच्छा. म्हणजे सदाशिवपेठेतील गल्ल्या या मुल्यांचे आगार होत्या असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आणि तुम्हाला वैयक्तिक रित्या ही काहि खेद-जनक अथवा शरमेची गोष्ट वगैरे वाटत नाही तर मग तसं लिहिताय तरी कशाला?
या गल्लीत पूर्वी नागपुर खानावळ ही एकच पारंपारिक नॉनव्हेज खानावळ होती.आणी त्यानंतर त्याला तात्विक शह द्यायला आलेली सात्विक-थाळी!
तात्विक - सात्विक. वा व्वा. काय यमक जुळवले आहे. अर्थात तुमच्यासारखी "सुलभ" कवीला यमके जुळवणे ही अवघड गोष्ट नाही म्हणा.
पण हल्लीच्या रस्सास्वादवादी चळवळीच्या जनकांनी गावभर जिथेतिथे जे तांबड्या/पांढर्‍याचं व्यापक आंदोलन "सुरू" केलय त्याची पाळमुळं याच गल्लीत असावी असा माझा आपला एक अंदाज आहे.
तुमचीही वाटचाल नवसंशोधक होण्याच्या दृष्टीने चालू आहे तर. आज "असा माझा आपला एक अंदाज आहे" म्हणताय, उदया मी केलेल्या संशोधनातून असे निष्पन्न झाले आहे असे म्हणाल.
आपली मांसाहारावर प्रीतीही नाही...दुस्वासही नाही!
मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली. क्रमशः

नाही हो. आत्माराम बपू आमचे नेलेले पुस्तक परत न करनारे मित्र आहेत. शिवाय आम्ही सिंहगड रोडवरचे सख्खे शेजारी आहोत.
जागे व्हा! काय? काय?? काय??? दिसला लेख काढ मापं?
मी चांगल्या लेखाला कधीच नावे ठेवत नाही. :)

तुम्ही स्वतःच्या रुपयांनीसुद्धा पानांचे पार्सल नेता?
अर्थात तुमच्यासारखी "सुलभ" कवीला यमके जुळवणे ही अवघड गोष्ट नाही म्हणा.
आणि शेवटी तर, पोटावर पाय दिलायं! :
मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली.
आणि वर पुन्हा आणखी `बुवालिक्स' ची हमी -
क्रमशः
पेरूगेट पासल्या पूना गेस्ट हाऊसच्या जेवणावर सगळी गुजराण झाल्यानं बादशाहीचं कधी प्रेम वाटलं नाही. नंतर बर्‍याच वर्षांनी कोणताही नॉस्टाल्जिया न ठेवता, दोन्हीकडे जेवल्यावर, पहिलाच पर्याय योग्य वाटला.

धन्यानं डायरेक्ट बुवांच्या सोग्यालाच हात घातलायं!
छे हो. मी नाही त्यातला. बुवा आमचे मित्र आहेत. शिवाय आम्ही सख्खे शेजारी आहोत.

धन्या.................................................................!!!

http://www.sherv.net/cm/emoticons/bad/cowboy-shooting-gun-smiley-emoticon.gif ====================================== तू गाव मला मेल्या... http://www.sherv.net/cm/emo/laughing/evil-laugh-smiley-emoticon.gif मग आतली आणी बाहेरची अश्या दोन्ही कड्या लाऊन घेतो तुला...! http://www.sherv.net/cm/emoticons/guns/tommy-submachine-gun.gif =)) =)) =))

मग आतली आणी बाहेरची अश्या दोन्ही कड्या लाऊन घेतो तुला...!
=)) =)) =)) =)) =)) आत्मूस नक्की का? =)) =)) =)) =)) हे आकाशातल्या बापा, आत्म्याला क्षमा कर! (आत्मूस-तुमचा फुलटॉस "प्लेड" केला आहे नुस्ता, कांय समजलेंनीत ;) =)) =)) )

हा हा हा!! लोळतेय मी हसुन हसुन! आत्मुस कड्यांऐवजी गप पुस्तक वापिस करा. उसका पुस्तक दे दे रे बाबा! (परेश रावल स्टायल)

अक्षरशः बादशाही पासून १०० मीटर च्या अंतरावर जवळजवळ ७-८ महिने काढलेत . पण . दुर्दैव म्हणावं माझं . कधी जायचा चान्स नाही मिळाला . पुढच्या पुणे भेटीत दुपारचं " जेवण " इथेच फिक्श . लई भारी लेख आत्मे :)

मस्त लेख ! बादशाहीमध्ये एकदाच जेवलो आहे कारण आमच्या होस्टेल्पासून ते दूर होते. पण तेथे राहणार्‍या कॉलेजमधल्या विद्यार्थांच्या तोंडी बादशाहीचे नाव सदैव असायचे !

अशीच आठवण आली अलिबागच्या मोघे खाणावळीची. अजुनही ती खाणावळ आहे. व त्यांची आमटी हि खरच अप्रतिम. आज त्यांची तिसरी पिढि खाणावळ चालवते आहे. अ आत्मा साहेब मस्त लेख. फार सुंदर लेख

नरसोबा वाडीचे सोमण.. खानावळीतले साधे जेवण किती रुचकर असु शकते याचे उत्तम उदाहरण..इथली डाळीची पातळ आमटी म्हणजे स्वर्ग.