Welcome to misalpav.com
लेखक: तिरकीट | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

असं आयत्यावेळी लिहून स्वये श्रीरामप्रभू तयार झालं यावर पटकन विश्वास बसणार नाही पण गदिमांच्या बाबत ते शक्य आहे. मस्त आठवण!

या चित्रपटाचीही सगळी गाणी गदिमांनी एका बैठकीत लिहून काढली होती अशी पुलंनी त्यांची आठवण सांगितली आहे.

सुंदर मालिका. मजा येते आहे वाचायला. पण गदीमा आणि बाबुजींमध्ये असा गोंधळ का आणि कसा झाला?

@पैसा: असं आहे खरं..१-२ ठिकाणी तर असं वाचनात आलंय की, रागावलेल्या गदीमांना चक्क खोलीत बंदीस्त करून ते गाणं त्यांच्याकडुन लिहुन घेतलं गेलं... @पेठकर काका: नक्की कारण समजणं अवघड आहे, पण कदाचीत कामाच्या व्यापामधे म्हणा, वेळेच्या गडबडीमधे म्ह्णा हे झाल्याची शक्यता आहे miscommunication...(मराठी शब्द??)

आयत्या वेळी असं सुंदर गाणं लिहिणारे गदिमा आणि त्याला तेवढ्याच कमी वेळात स्वरबद्ध करणारे बाबूजी आणि इतर कलाकार . सगळेच ग्रेट . पुढील भागाची वाट बघतोय

खूपच छान आठवण.. आज संगीततंत्रज्ञानाने कितीही प्रगती केलेली असली तरीही त्या काळातली हि गाणी आज हि हृदयात घर करून आहेत... वाचते आहे.. येऊ द्यात ... :-)

मागे तात्यांनी बाबुजींच्या आठवणीचा एक धागा टाकला होता मिपावर. तात्या बाबुजींकरता झुणका भाकरी घेऊन गेले होते व तिथे गप्पांचा फड रंगला असा काहिसा धाग्याचा विषय होता. गदिमा आणि बाबुजींमधे कितीतरी वर्षे कटुता होती पण तात्यांशी गप्पा मारताना बाबुजी गदिमांबद्दल अत्यंत गहिवरुन बोलले होते अशी तात्यांची आठवण आहे. हा गीतरामायण प्रसंगाचा आणि या कटुतेचा काहि संबंध असावा काय? तर्काला वाव आहे. असो. थोरामोठ्यांच्या गोष्टी तेच जाणोत. आपण गीतरामायणाचा आनंद घ्यावा. गदिमांना एकदा रामायणावर पद्यरचना करायची अत्यंत उत्स्फूर्त ऊर्मी आलि व त्यांनी त्या भारावलेल्या अवस्थेत गीतरामायण लिहीलं असं कुठेसं ऐकलं होतं... ति दंतकथाच म्हणायची तर. अर्धवटराव

तात्या म्हणजे विसोबा खेचर का ? ही आठवण मी पूर्वी कधीतरी त्यांच्याकडूनच ऐकली आहे. आम्ही फार पूर्वी असाच एक निरुपद्रवी धागा एका गाण्याबद्दल टाकला होता त्यातून लोकांच्या मनात ठिणगी पडली आणि युद्ध सुरु झाले. काही सभासदांची हद्दपारी झाली. जुन्या गोष्टी: मिसळ नव्हतीच पण ऑर्कुट जीमेलदेखील तेव्हा जन्मले नव्हते.

ग दि मा ना खोलीत बंद करून ठेवले होते आणि त्यानंतर त्यांनी एका तासाच्या आत संपूर्ण गाणे लिहिले हि आठवण श्री सुधीर फडके यांनी स्वतः सांगितलेले मी दादर माटुंगा कल्चरल केंद्रात ऐकले आहे. (पण ते गाणे स्वये श्री रामप्रभू ऐकती हेच आहे का ते मला आठवत नाही) त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गदिमांना असे वाटले कि त्यांनी गाणे दिले परंतु बाबूजींना ते मिळाले नव्हते म्हणून असे घडले असावे असे बाबूजी म्हणाले.