Welcome to misalpav.com
लेखक: मोदक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

"द इन्हेरिटन्स ऑफ लॉस" नावाची किरण देसाई या लेखिकेने लिहिलेली बुकर पारितोषिकप्राप्त कादंबरी नुकतीच वाचली. अरविंद अडिगा नावाच्या मथ्थडाला बुकर मिळाल्यानंतर या पारितोषिकावरचा विश्वास उडाला होता. काही अंशी तरी तो परत आणण्याचं काम या कादंबरीने केलं. कालिम्पाँग या टुमदार हिमालयन गावात घडणार्‍या या कादंबरीला स्वतंत्र गोरखालँडच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. गोरखालँडसाठी पडद्याआडून सूत्रं हलवणारे चाणक्य आणि प्रत्यक्ष लढणार्‍या तरूणांचा भाबडेपणा असा छान पट मांडला आहे. त्या भाबड्या तरूणांविषयी लेखिका लिहिते:
Anyone could see they were still mostly just boys, taking their style from Rambo, heads full up with kung fu and karate chops, roaring around on stolen motorcycles, stolen jeeps, having a fantastic times. Money and guns in their pockets. They were living the movies. By the time they were done, they would defeat their fictions and the new films would be based on them...

आसमंत दाराशी सुरु होतो.पायाखालच्या सावळ्या मखमलीपासून नक्षत्रांपर्यंत असमंताच्या अविष्कारांकडे चौकस, संवेदनाक्षम नजरेनं पाहिलं तर थक्क करणारी अनोखी अंतरंगं उलगडतात. प्रतिमांच्या पलिकडचं दिसू लागतं. कविता आशयघन होतात. निसर्गाच्या सान्निध्यात ताणतणाव दूर होतात. विश्वात आपण क्षुद्र आहोत हे उमगतं. अहंकार लुप्त होतो. निरागस आनंद मिळतो. निसर्गनिरीक्षणातून सृष्टीच्या निर्मितीचा विचार अस्वस्थ करतो, आणि मनाला थेट परमेश्वरापर्यंत पोचवतो. निसर्गात आश्चर्यांचा साठा अमाप आहे.निसर्गाच्या लोभस प्रतिमा पहायला कुठं दूरदेशी जायला नको. मंतरलेला आसमंत आपल्या दाराशीच आतुरतेनं साद घालतोय. त्याच्या अविष्कारांचा वेध घेण्यासाठी तरल मनाची कवाडं उघडा.

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर? जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर? कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरुन जाते वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते? कळत जाते तसे कशा मूर्ती सार्‍या झिजून जातात पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात? कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात शब्द सारे मिटून कसे तळ्यामधेच पेंगू लागतात? कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात? कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव? - बा भ बोरकर.

पुढील उतारा माझ्याकडे टिपून ठेवलेला आहे.त्याचा काहीच संदर्भ मी लिहून ठेवलेला नाही. पण, त्यामध्ये जे लिहीले आहे ते अद्भूत आहे. ' यवत - पुण्याहून दक्षिणेकडे जाणार्‍या रेल्वेचे प्यासेंजर गाडीचे एक स्टेशन. जवळ सर्वत्र टेकडया. दिवे घाटातून गेल्यावर एका टेकडीवर भुलेश्वरची लेणी व दुसर्‍या छोट्या टेकडीवर कानिफनाथांची वस्ती व कानिफनाथांचे देउळ. देवळात गेल्यावर वेगळीच संवेदना होते.गरगरल्यासारखे, अंगावर चारही बाजूंनी वजन आल्यासारखे वाटते. फार वेळ थांबवत नाही, थांबताच येत नाही. बरोबर होकायंत्र न्यावे. ते पाहिल्यावर असं दिसतं की काटे गरागर फिरत आहेत. ते स्थिरच होत नाहीत. नाथांचा निदर्शक म्हणून एक फक्त जमिनीचा उंचवटा आहे. त्या उंचवट्यावरच असा अनुभव येतो. बाहेर आल्यावर यंत्राचे काटे पूर्ववत होतात. यंत्र पुन्हा आत नेलं तर काटे गरगरतात.बाहेर आल्यावर आपणहि पूर्ववत होतो.' ज्याला शक्य होइल त्याने हा अनुभव घ्यावा व मिपावर त्याचा वृत्तांत टाकावा.

या उंचवट्यावरच असा अनुभव येतो. बाहेर आल्यावर यंत्राचे काटे पूर्ववत होतात. यंत्र पुन्हा आत नेलं तर काटे गरगरतात.बाहेर आल्यावर आपणहि पूर्ववत होतो.'
तसं काही नसतं हो. कानिफनाथला गेलोय आणि तसा काहीही अनुभव आलेला नाही. बाकी कानिफनाथ आणि भुलेश्वर एकमेकांपासून बर्‍यापैकी लांब आहेत. भुलेश्वर यवत पासून जवळ तर कानिफनाथ बोपदेव घाट ओलांडल्यावर.

माणसाचे आयुष्य म्हणजे कर्म व दैव यांच्या एकत्रित परिणामाचा खेळ . त्यात कशाचा वाटा किती ह्याचे काही ठराविक गणित नाही. आपण क्यारम खेळताना विशिष्ट ठिकाणी स्ट्रायकर ठेवून सोंगट्यांचा व्यूह फ़ोडतो. अगदी शंभर वेळा समोरच्या दोनही भोकात सोंगट्या अगदी हुकुमीपणे गेल्या तर फ़ोडला जाणारा बोर्ड दरवेळी सारखा असतो काय ? नक्कीच नाही . म्हणजे आपले कर्म म्हणजे त्या दोन सोंगट्या जाणे जिथे काही अभ्यासाने कौशल्य प्राप्त करून परिणाम हवा तसा मिळविता येतो पण दरवेळी निरनिराळ्या आकृती बंधासह समोर येणार सोंगट्यांचा पसारा म्हणजे दैव .त्याचा कोणताही नियम कोणालाही सापडलेला नाही. --चौकटराजा