Welcome to misalpav.com
लेखक: चेतनकुलकर्णी_85 | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मी याचा कधी विचारच केला नव्हता. खूप चांगल्या विषयाबद्दल माहिती दिली आहे. खरच या छोट्या गोष्टी वर खूप लक्ष दिले पाहिजे. हल्ली खूप वेबसाईट वर (पहा आणि बनवा !) वाचून माझ्यासारख्याला पण इलेक्ट्रॉनिक सर्किट सोडवता येईल.

आँ ???? भारतातील सगळी मतदान यंत्रे ही नरेंद्र मोदींच्या गावात म्हणजे अहम्दाबादेत तयार होतात. आता मोदींच्या निगराणीखाली तयार होऊनही ही यंत्रे मॅनिपुलेट होतात किंवा वर्षानुवर्षे फक्त काँग्रेसला निवडून आणत असतील, तर ते मोदींसाठी लज्जास्पद नाही का? त्यामुळे इथे काथ्याकूट करण्यापेक्षा डायरेक्ट मोदीनाच संपर्क करावा.

सांगलीच्या विलिंग्डनच्या एका विद्यार्थ्याचे आमच्या गल्लीत चणे विकण्याचे दुकान आहे. त्याने त्यात भयंकर गलथानपणा केला असल्याची गल्लीवाल्यांना शंका आहे. आम्ही विलिंग्डनच्या प्राचार्यांना थेट तक्रार केली आहे. तिचा काही फायदा झाला नाही. तेव्हा सबब विषयी मी इथे मीपाकरांशी काही काथ्याकूट करू इच्छितो.

आता मोदींच्या निगराणीखाली तयार होऊनही ही यंत्रे मॅनिपुलेट होतात किंवा वर्षानुवर्षे फक्त काँग्रेसला निवडून आणत असतील उद्दाम साहेब, मी वरील लेखात कुठेही असा उल्लेख केलेला नाहीये कि कॉंग्रेस ह्या यंत्रान मध्ये फेरफार करत आहे. भारतातील सगळी मतदान यंत्रे ही नरेंद्र मोदींच्या गावात म्हणजे अहम्दाबादेत तयार होतात. होत असतील ! पण वर म्हटल्या प्रमाणे ज्या दोन नवरत्न कंपन्या भारत इलेक्ट्रोनिक्स व इलेक्ट्रोनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया ह्या अनुक्रमे रक्षा मंत्रालय व अणुउर्जा मंडळ ह्यांच्या कडे आहेत ज्या रक्षा मंत्री व खुद्द पंतप्रधान यांच्या देखरेखी खाली येतात अनुक्रमे. आणि सध्या तूर्तास तरी मोदी ह्या दोन्ही पैकी कोणत्याही पदावर नहित . त्यामुळे तुमच्या विधानानला काडीचीही किंमत नाहीये! बाकी काही विशिष्ट्य धागे मिपा वर आले कि कुत्राच्या छत्री सारखे आगा -पिच्छा नसलेले आयडी कसे दिसू लागतात ह्याचा उलगडा आता होउ लागलेला आहे!

आमचा आगा पीछा तुमच्या जवळच आहे साहेब ! म्हणजे तुम्ही सांगलीच्या वालचंद कॉलेजात शिकलात आणि मी तुमच्या समोरच असलेल्या विलिंग्डन कॉलेजात. :) मशीन कोणत्याही मिनिस्ट्रीत तयार होत असले तरी ते तयार होते मोदींच्याच राज्यात. म्हणून मी तुम्हाला सुचवलं त्यानाच गाठा. यात तुम्ही का दुखावले गेलात हे समजले नाही.

म्हणजे,मशीन कोणत्याही मिनिस्ट्रीत तयार होत असले तरी ते तयार होते मोदींच्याच राज्यात केन्द्र सरकार्,फक्त वरवर मोदी विरोध करते पण हे काम मात्र गुजरात सरकारला मात्र मोठ्या विश्वासाने,देते असा अर्थ निघतो.

सर्कार मशीनचे काम मोदींच्या गावात देते. विश्वासाने. आणि मोदींच्या फेवरमधले लोक मशीनवर अविश्वास दाखवतात.

मशीन कोणत्याही मिनिस्ट्रीत तयार होत असले तरी ते तयार होते मोदींच्याच राज्यात. परत तेच… तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचला नाहीये असे दिसत्येय …. यात तुम्ही का दुखावले गेलात काय संबंध ?

अवांतरः भारतात इलेक्ट्रॉनिक पॉलीसी वैगेरे काही नाही. आपल्याकडे इतके रिसोर्स असतांनाही आपल्याकडे बेसीक ५५५, ७४सिरीज च्या आयसी व्यतिरीक्त काहीच बनत नाही. जी काही इलेक्टॉनीक वस्तू बनतात त्या असेंबल होतात. स्र्कू ड्रायव्हर किंवा कॉपी पेस्ट टेक्नॉलॉजी.

आपल्याकडे इतके रिसोर्स असतांनाही
रिसोर्सेस म्हणाजे काय? प्रचंड लोकसंख्या असल्यामुळे नावालाच डिग्र्या घेतलेली लोकं का?

रिसोर्सेस म्हणाजे काय? प्रचंड लोकसंख्या असल्यामुळे नावालाच डिग्र्या घेतलेली लोकं का? रिसोर्सेस म्हणाजे असणारे संसाधने, जसे पीसीबी बनवायला लागणारा कच्चा माल, सिलीकॉन वेफर बनवायला लागणारा कच्चा माल आदी आदी. अन लोकसंख्या अन नावालाच डिग्या घेतलेली माणसे ही देखील रिसोर्स होवू शकतात. ही लोकसंख्या अन नावालाच डिग्या घेतलेली माणसे उत्तम मजूर बनू शकतात. चीनमध्ये सगळीच माणसे उत्तम डिग्य्रा घेतलेली असू शकत नाही. तरीही पुर्ण जगाला ते इलेक्र्टॉनीक वस्तू पुरवत आहेत. आताच्या घडीला आपण साध्या साध्या इलेक्र्टॉनीक वस्तू बनवू शकत नाही. इलेक्र्टॉनीक वस्तूंच्या मेटल कॅबीनेट, केबल्स आदी सुद्धा आपण बनवत नाही. सरकारने इलेक्र्टॉनीक वस्तू बनविण्यासाठी परदेशी कंपन्यांना निमंत्रण देवून बोलावले पाहीजे. पाहिजे त्या सुविधा, टॅक्स सवलत, १००% गुंतवणूक करण्याची सवलत दिली तर अशक्य काहीच नाही. पण आपले पुढारी फक्त उद्घाटने करतात अन लॅपटॉप वाटतात.

सहमत्,पण तसेच आपल्या लोकान्ची मनसिकता सुद्धा याला जवाबदार आहे,आपल्या ईथे काही गोष्टी जरुर खूप चान्गल्या तयार होतात्,पण Finishing मध्ये मार खातात्,तसेच लेबर सुद्धा महाग पडते आणि ट्याक्स ने कम्बर्डे मोडते,त्या तुलनेत चीन चा माल खूपच स्वस्त पडतो,पण तो टिकावु नसतो,वरती कोणाच्या प्रतिसादात गुजरातचा उल्लेख वाचला,माझ्या माहीती प्रमाणे,गुजरात येथे सर्वात कमी कर आकारणी आहे,म्हणुनच वरिल प्रकल्प गुजरात मधे चालवला जात असावा.

माहितीपुर्ण लेख. मतमोजणी ऐवजी मतदान केंद्रातच जर यंत्रणेतील लोकांनी रिझल्ट बटन दाबले तर? लोक मॅनेज होउ शकतात.

चांगली माहीती आहे. यातील फेरफार हि केवळ शक्यता आहे का अश्या काही घटना घडल्या आहेत? मी गुगलुन पाहीले, पण काही विशेष मिळाले नाही.

बाकी भूज च्या भूकंप च्या वेळी एका पाश्चात्य देशाने मदत म्हणून दिलेल्या ब्लांकेंत्स मध्ये इलेक्ट्रोनिक मायक्रो चिप्स दडवलेल्या सापडल्या जेणे करून कछ्छ भागातील सैनिकी हालचाली जमिनीतील कंपना द्वारे टिपता येतील असे कानावर आलेले होते. गोबेल्स लोकांचे हेच तर वैशिष्ट्य. ढीगभर लिहायचे आणि मग कानावर आले असा शेवटी साप जोडायचा. ( नै, असेलही खरे ते. पण काही इतर माहितीही द्या. )

सहमत. ब्ल्यांकेट मध्ये चिपा टाकून जमिनीतील कंपनाद्वारे सैनिकी हलचाली टिपणं म्हणजे कै च्या कै आहे राव.

अहो कंच्या तरी सौथ पिच्चरमध्ये असेल दाखवलेलं
अश्या तर्काने तर प्रत्येक होली वूड चा सिनेमा हा सौथ वरून घेतलेला असावा नै!! होली वूड शिणेमांचा सर्वात मोठा पंखा

जरा "Tactical unattended ground sensor" किंवा "Unattended ground sensor" हे अंतर जालावर तपासून पहा … काहीशी संबधित माहिती मिळेल …. हा संदर्भ द्यायचा उद्देश्य हाच होता कि अश्या देशाचे दशा व दिशा ठरवणाऱ्या गोष्टी बाबत एवढी जोखीम घेणे योग्य आहे का ?

ज्याला सेन्सर पेरायचाच असेल तो कागदी मतपत्रिकेच्या बॉक्समधूनही पाठवू शकेलच नै का? हा संदर्भ द्यायचा उद्देश्य हाच होता कि अश्या देशाचे दशा व दिशा ठरवणाऱ्या गोष्टी बाबत एवढी जोखीम घेणे योग्य आहे का ? अगदी अगदी . सत्यनारायण घालणारा भटजीही अशीच भीती घालत असतो, माझं नै ऐकलेस तर तुझी नाव बुडेल बघ! तुमच्या वाक्याला तसा वास येतोय. कुणीतरी सेन्सर पेरेल म्हणून निवडणूक प्रक्रियेतून मशीनच बाद करणे म्हणजे आनंदच. थंडीच्या दिवसात ब्लँकेट तरी वापरता का? का त्यात सेन्सर असेल म्हणून तेही दिलेत फेकून?? --- वाकळ पांघरुन सत्यनारायणाचा शिरा खाऊन निवांत झोपणारा. उद्दामराव वाकळे

समोरचा काय म्हणतोय ह्याच्या कडे सोयीस्कर कानाडोळा करून आपलेच गाढव दामटणे फारच छान जमते तुम्हाला . ह्या हिशोबाने तुमची महाविद्यालयातील एक्सटरनल ची "ओरल " फारच दीर्घ काल चालत असेल नै? बाकी वायफळ प्रश्न विचारून मिसळपाव चे खास बाग मैदान कशाला बनवताय राव ?

एकूणच प्रतिसाद देतानाचा उद्दामपणा आणि लिहायची पध्दत यावरून मिपावर पूर्वी गझनीचा महंमद उर्फ धम्मकलाडू या नावाने लिहिणार्‍या पूर्वीच्या एका आय्.डी ची आठवण आली. त्या आय्.डी ची साईन होती-- 'तुझे वाचन किती तू बोलतोयस किती. तुझा पगार किती तू बोलतोयस किती'. म्हणजे तो आय्.डी किती उद्दाम होता हे कळेलच. आता स्वतःला उद्दाम म्हणणवारी आय्.डी ही त्याच गझनीच्या महंमदाची डुप्लिकेट आय्.डी आहे असे वाटायला लागले आहे :)

चांगली परंतु काहिशी जुनी माहिती :) आता नवी मशीन्स येत आहेत ज्यात तुम्ही दिलेल्या मताचे प्रिंट बाहेर पडेल ते तुम्ही बॅलट बॉक्समध्ये टाकायचे. जर उमेदवारांनी मागणी केली तर पडताळणीसाठी प्रत्यक्ष प्रिंटसची मोजणी होईल ज्यामुळे यातील बहुतांश तृटिंवर पायबंद बसेल पटकन शोधल्यावर ही जुनी बातमी सापडली. कर्नाटकाच्या व इतरही बाय इलेक्शन्ससाट्।ई काही केंद्रांवर ही यंत्रे वापरातही आली आहेत

आता नवी मशीन्स येत आहेत ज्यात तुम्ही दिलेल्या मताचे प्रिंट बाहेर पडेल ते तुम्ही बॅलट बॉक्समध्ये टाकायचे. जर उमेदवारांनी मागणी केली तर पडताळणीसाठी प्रत्यक्ष प्रिंटसची मोजणी होईल ज्यामुळे यातील बहुतांश तृटिंवर पायबंद बसेल म्हणजे..परत येरे माझ्या मागल्या!

नै काय आहे, पूर्वी निवडणुका झाल्या, मद मोजणी झाली की ताशा, गुलाल, मिरवणूक, मारामार्‍या वगैरे व्हायचं. मग गावात दोन बोर्ड लागायचे. जिंकणारे म्हणायचे -- आभार. हरणारे म्हणायचे --- भौतिक विजय त्यांचाच असला तरी नैतिक विजय आमचाच आहे. :) आजकाल , निवडणूक हरुन मग असे नैतिक विजयाचे बोर्ड लावाय इतका वेळ नाही कुणाकडे. मग आता गेली दहा वर्षे झाली, बघतोय, निवडणुका आल्या की ज्याना हरण्याची भीती असते ते लोक आधीच बोर्ड लावतात ... 'मशीनमध्ये गोंधळ नसेल कशावरुन?'

माझा आक्षेप शेवटी मतमोजणीच्या वेळी जोडतात त्याला आहे .एकेक जोडून मतविभागणी दाखवल्याने कोणत्या भागाने (उदा: अमुक नगर)कोणत्या पक्षाला मते दिली ते कळते .तसे न करता सर्व यंत्रे (उदा:मुंबई दक्षिण मतदार संघाची) जोडून फक्त एकत्रित निकाल दाखवा .