Welcome to misalpav.com
लेखक: एच्टूओ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

म्हणूनच म्हणतात की कायदा गाढव आहे... पण खरी गोष्ट अशी आहे की असा कायदा बनवणारे गाढव असतात आणि त्यांना निवडून देणारे आपण मतदार महागाढव असतो. जर जास्त चांगले रोजगाराचे साधन मिळाले तर कोण कशाला गारुडी बनेल? ही गोष्ट, जी तुमच्या आजीला सारासार विवेकाने गोष्ट समजली, त्यासाठी लागणारी बुद्धी आपण गहाण टाकलीय. म्हणून आपण साप साप म्हणत भुई धोपटत बसतो आणि आपण इकडे गुंतलो आहेत हे पाहून चलाख बोके लोणी खाऊन पसार होतात. काहीतरी काल्पनीक कारणे सांगून भलत्यालाच दोषी ठरवण्याची टूम गेल्या काही दिवसात मिपावरच्या लेखांमध्येही दिसते आहेच !

खरे आहे आजीचे. रोज लाखो कोंबड्या, बकरे इ. खाण्यासाठी ठार मारले जातात, त्याचे काय? मेनका (की मनेका) गांधी इकडे लक्ष घालतील काय?

पण गारूड्यांना तुरूंगात का डांबल?
साप गारुड्यांच्या परडीत (शब्द चुकला वाटतं) नेहमी बंद असतात, त्याची फिलिंग काय आहे ते गारुड्यांना जाणवून देण्याकरिता कायद्यात तसं प्रावधान आहे. बाय द वे, सापांचे इतर अनेक उपयोग आहेत (antidote, etc), तिथे साप वापरणार्‍यांचे काय करणार? गारुड्यांचा नक्की गुन्हा काय आहे? पर्यावरणात ढवळाढवळ? मनुष्य इतके प्राणी वापरतो, त्यात साप एक अजून. कि तेही exstinct होऊ लागलेत?

मनुष्य इतके प्राणी वापरतो, त्यात साप एक अजून. कि तेही exstinct होऊ लागलेत?
भारतासारख्या शेतीप्रधान देशात उंदरांमुळे धान्य नासाडी होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. आता ते आकडे हाताशी नाहियेत पण डोळे फिरवणारे आकडे आहेत. साप मोठ्या प्रमाणात उंदीर-घुशी खात असल्यामुळे सापांचं महत्व आहे. वाढत्या शहरीकरणामुळे सापांची संख्या खूप कमी होउ लागली आहे. याशिवायही इकोसिस्टम मध्ये सापांचं मह्त्व आहेच.