चांगला उपयोगी विषय आहे. आता धागालेखकाने हापिसाखेरीज घरगुती संभाषणे, मित्रांमधील गप्पा, लहान मुलांशी बोलणे, वृद्ध आई-वडिलांशी, सासू-सासर्यांशी, शेजार्यांशी वगैरे सकारात्मक कसे बोलावे, याची उदाहरणेही द्यावीत, म्हणजे लेखाला परिपूर्णता येईल.
कल्पना चांगली आहे. कदाचित आपण उगीच जास्त नकारात्मक तर बोलत नाही ना हे तपासून पाहायला याची मदत होईल.
पण दरवेळी स्पष्ट चूक दाखवून देणे (एखादी व्यक्ती वारंवार त्याच चुका करत असेल तर टीम लीडरला असे बोलावे लागतेच; व्यवस्थापनात 'नरो वा कुंजरो' जास्त घोटाळा घडवून आणते) अथवा स्वतःच्या मर्यादा मान्य करणे या गोष्टी नेहमी नकारात्मक असतात असं नाही. उलट अनेकदा त्याचे सकारात्मक परिणाम होताना दिसतात. (आता हा परिच्छेद नकारात्मक वाटत असल्यास सकारात्मक कसा लिहायचा याबद्दल जरुर कुतूहल आहे - आणि मी हे उपरोधाने लिहित नाहीये.)
जवळ्पास याच विषयावर गेल्या आठवड्यात लोकसत्तामध्ये एक सुंदर लेख आला होता.डॉ.अल्बर्ट एलीस यांच्या विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीवर. त्यातही सकारात्मक दॄष्टीकोन दिला आहे. पूर्ण लेख माझ्याकडे आहे. लिंक मिळाल्यास डकवीन.
डॉ.अल्बर्ट एलीस यांचेवर एक पुस्तक(आत्मचरित्रात्मक)बाजारत उपलब्ध आहे. डॉ. अंजली जोशी यांनी मराठीत अनुवाद केलेले. ते मी वाचले आहे. यात विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती बद्दल विश्लेषणात्मक विचार मांडले आहेत.
ते खरेच छान आहेवाच्लेले पाहिजेत.
पुस्तकाचे नांवः मी अल्बर्ट एलिस
त्यामुळे भाषा बदलून परिणाम साधत नाही. हेतू निखळ असला की काम झालं!
भाषा संयोजनात खरं तर माणूस दुटप्पी होतो. म्हणजे त्याला राग आला असेल तर उगीच शब्दयोजनेत अडकल्यानं भावना व्यक्त होत नाहीत; ते निष्कारण सफोकेटींग होतं. वन लूजेस हिज ऑथेंटिसिटी.
स्वतःविषयी नेगटिव बोलणं ही तुमच्या मनात असलेल्या स्वप्रतिमेची बाह्याविभक्ती आहे. जोपर्यंत आपण स्वतःबरोबर कंफर्टेबल नाही तोपर्यंत बाह्योपचाराचा विषेश उपयोग होत नाही.
ते थोडक्यात असं आहे : शुद्ध हेतू > आंतरिक एकवाक्यता > क्लिअरकट अभिव्यक्ती > हवा तो परिणाम > आणि (परिणाम साधला नाही तरी कधीही) पश्चात्ताप नाही!
कार्यालयीन कामकाजात एखाद्याव्यक्तीला न दुखावता त्याच्या चूकांची जाणीव करुन देणे अतिशय महत्त्वाचे आहे असे मला वाटते.
प्रत्येक वेळेला कोण चूक किंवा कोण बरोबर हा वाद घालणे श्रेयस्कर नसते.
प्रत्येक कर्मचार्याला हेच वाटत असते की आपण आपल्या संस्थे करता काहितरी योगदान देत आहोत. त्याने केलेली चूकही त्याच भावनेच्या भरात झालेली असते. सकारात्मक बोलण्याने कर्मचार्याच्या या भावनेचा आदर ठेवत त्याला त्याची चूक समजावता येते.
त्या पुढेही जाउन कर्मचार्याला आपणहुन झालेली चूक कबुल करायला लावणे हेच खर्या व्यवस्थापकाचे कौशल्य आहे. दुसर्याने दाखवुन दिलेली चुक सर्वसामान्य कामगारांना नेहमीच अपमानास्पद वाटते. चूक कबुल केल्या नंतर सुध्दा ती गोष्ट परत कशी होणार नाही या साठी उपाय योजना करणे चूकीची शिक्षा देण्या पेक्षा जास्त महत्वाचे असते.
या उलट जर त्या कर्मचार्याला त्याचा व्यवस्थापक सतत चूकांची जाणिव करुन द्यायला लागला तर तो कर्मचारी एका कोशात जाउन काम करु लागतो. (ठेचलेल्या बैला सारखे वागु लागतो) व त्याच्या कडून काहि सृजनशील काम करुन घेणे अशक्य होते
आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीला (मग ती कोणीही असो) न दुखावता सांगता आले तर ते केव्हाही श्रेयस्कर असते
संक्षिंनी जे सांगितले आहे, ते अगदी यथायोग्य वाटले. परंतु बहुशः बोलण्याची पद्धत ही लहानपणापासून ऐकलेल्या पद्धतीची नक्कल असते. हेतु वा स्वभाव वाईट नसूनही निव्वळ सवयीमुळे अयोग्य बोलले जात असते. अश्या वेळी असे प्रयत्न उपयोगी ठरु शकतात. यासाठी सतत जागरूक राहणे आवश्यक ठरते. असे सजग बोलणे फक्त कामाच्या जागी, घरी आल्यावर पुन्हा येरे माझ्या मागल्या, असे घडू नये.
सदा स्वरूपानुसंधान, हे मुख्य साधुचे लक्षण, जनी असोन आपण, जनावेगळा.... समर्थ.
प्रतिक्रिया
चांगला उपयोगी विषय आहे.
कल्पना चांगली आहे. कदाचित
सहमत
उत्तम लेख
डॉ.अल्बर्ट एलिस वद्दल ---
निमिष, भाषा हेतूची दासी आहे
कार्यालयीन कामकाजात
सहमत
हेतू निखळ असला की काम झालं!
सहमत
खरे आहे