प्यारे काका,
आता तुम्हीच असे हतोत्साहित होउन पुढील लिखाण बन्द करणार का? हे काही बरे नव्हे अहो आम्च्यासार्खे सामन्य लोकाना हा विषय एव्हड्या सोप्या भाषेत सान्गणे हे अत्यन्त कठीण काम आपण खूप उत्तम करत आहात तेव्हा कोणाच्या प्रतिक्रीया काहिही असोत्,आमच्यासाठी तुम्हाला लेखन हे करावेच लागेल्,वर कोणी सान्गितले आहे ती श्री दत्त महाराजन्ची आरती आता श्रीदत्त जयन्तीच्या मुहुर्तावर धागा होउन जाउदे,अशी तुम्हास नम्र विनन्ती आहे.
साहेब,
मी माझं लिखाण बंद केलेले नाही, इतक्यात करेन असं वाटत नाही.
वरील लेखात आपल्याला काही अडचण वाटत असेल तर जरुर सांगा. माझ्या कुवतीनुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.
दत्तात्रेयांच्या आरतीबद्दल निश्चितच लिखाण करण्याचा प्रयत्न करेन.
अवांतरः काय ना मी अल्जिरियाला असतो. (जाहिरात नाही) निघताना कधी मुंबईवरुन निघतो कधी पुण्याहून.
कधी दुबईमार्गे, कधी कतार मार्गे, कधी जॉर्डन, इस्तंबूल, इजिप्त असे बरेच मार्ग आहेत. कधी थेट, कधी व्हाया. समुद्रमार्गे आलो नाही कधी पण कुणास ठाऊक कधी वेळ पडलीच तर ते ही होईल. तसाही मार्ग आहे. सगळे मार्ग पोचवतात हो!
मागच्या वेळी मुंबईमध्ये एकजण भेटला. म्हणाला दुबईमार्ग हाच बेस्ट मार्ग. दुसरा मार्ग चुकीचाच आहे. अल्जिरियाला पोचतच नाही. प्लेन भारी, सुविधा भारी, एअर होस्टेस भारी सगळं भारी नि हे सगळं दुबईमार्गेच भारी.
मी म्हणालो 'बरं'. नंतर समजलं तो कधी असा प्रवास केलेला प्रवासी नव्हताच मुळी. कधीतरी स्वप्न पडलेलं म्हणतात!
मी त्याला देखील 'बरंच' म्हणालो.
देव कोपतो अथवा रागावतो ह्या कल्पनेसारखी खुळचट कल्पना नाही. वर लेखामध्ये असं काहीही म्ह्टलेलं नसताना संजय क्षीरसागरांनी कसं काय हे विधान ह्यामध्ये आणलं ते समजत नाही.
महिषासुरमर्दिनीचा देवता म्हणून हात असू शकत नाही कारण कधीतरी सुरु झालेल्या कर्माच्या चक्रामध्ये आपण अपरिहार्यपणे अडकलेलो असतो नि वासनांनुसार कर्म नि पुन्हा कर्माचं फळ म्हणून नवीन वासना असं चक्र सुरुच राहतं.
इथे ही ईश्वर म्हणून कार्य करणारी एक व्यवस्था म्हणून बघावी लागते.
दुसरीकडं देवता म्हणून बघताना त्या देवतांना एकेका शक्तीचं उपास्य म्हणून बघितलं जातं नि त्या दृष्टीतून देवीला आठ हात दिलेले आपल्याला दिसून येतात. इथं देवीचा सगुणावतार अपेक्षित आहे.
प्रतिमा, सगुणावतार, ईश्वर नि ब्रह्म असे चार प्रकार मानले आहेत.
संजयजी उपलब्ध लोकशाहीतल्या विचारस्वातंत्र्याचा तरी आदर बाळगावा माणसानं. थोडा जरी वेगळा विचार केला तरी अगदीच गाढव समजू नये माणसाला. नाई का?
थोडक्यात पण महत्त्वाचं. ही उपासनापद्धत असो की आणखी कुठलीही. तिचा वापर करुन जर माणसाला 'रिझल्ट' हाती येत नसेल तर तिचा काडीमात्र उपयोग नाही.
सुख, समाधान, शांती, तृप्ती ही त्या प्राप्तव्याची चिन्हं आहेत, लक्षणं आहेत. ह्यातलं एक जरी नसेल तरी काही मिळायचं , मिळवायचं बाकी आहे असं मानावं.
>देव कोपतो अथवा रागावतो ह्या कल्पनेसारखी खुळचट कल्पना नाही. वर लेखामध्ये असं काहीही म्ह्टलेलं नसताना संजय क्षीरसागरांनी कसं काय हे विधान ह्यामध्ये आणलं ते समजत नाही.
= तुम्ही काय लिहीलंय ते वाचलंत बरं होईल :
एक घर आगीत भस्म झाल्याची बातमी येते, आपण शांत असतो, शहराचं नाव ऐकलं की कान टवकारतात, विभाग ऐकला की चौकशी सुरु होते नि माझाच पत्ता ऐकला की धक्का बसतो, अन्नपाणी सुटतं. माझेपणा आला की प्रतिक्रिया येते नि ती तशी आली की बंधन आलंच. बातमी तीच, मात्र प्रतिक्रिया बदलली. प्रतिकूलसंवेदनात दु:खम. पश्चातबुद्धीनं परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायला आपण जास्तच कारणीभूत ठरतो. मात्र देवीच्या भक्त म्हणवणारानं असं असून चालत नाही. सगळ्या सृष्टीच्या निर्मात्याला निर्माण करणारी अंबा, दुर्गा, भवानी माता ही जर माझं आराध्य दैवत असेल तर एका घराच्या जाण्यानं असं काय हळहळ करायची? ते तसं माझ्याच बाबतीत का होतं ह्याचा विचार कर्माचा सिद्धांत ह्या एका 'अझम्शन' ने सुटतो. इथं लक्षात घ्यावं की दुसर्याच्या नावानं खडे फोडण्यात आपला मनस्ताप वाढतो, तसं न करता'योग्य निर्णय घेऊन आपल्यावर आलेला कुठलाही प्रसंग आपल्या कर्माच्या फळाच्या स्वरुपात आला असं मानणं व्यावहारिक शहाणपणाचं ठरतं. इथं कुठलाही निराशावाद नाही. हा कर्माचा विचार नि बरोबरच मी आनंदरुप असल्याचा विचार हे 'गणितं' सोडवण्यापुरते वापरावेत नि नंतर अलगद बाजूला सारावेत.
= तुम्ही कुणाला उल्लू बनवतायं? एकीकडे म्हणायचं देव सगळ्याचं कारण आहे आणि फटका बसला की ती आपल्या कर्माची फळं?
महिषासुरमर्दिनीचा देवता म्हणून हात असू शकत नाही कारण कधीतरी सुरु झालेल्या कर्माच्या चक्रामध्ये आपण अपरिहार्यपणे अडकलेलो असतो नि वासनांनुसार कर्म नि पुन्हा कर्माचं फळ म्हणून नवीन वासना असं चक्र सुरुच राहतं. इथे ही ईश्वर म्हणून कार्य करणारी एक व्यवस्था म्हणून बघावी लागते.
= म्हणजे मग कर्मप्रक्रिया नक्की कुणी सुरु केली? तुम्ही की महिषासुरमर्दिनीनी?
आणि मूर्ख कुणाला बनवतायं? वासना? कसली वासना? कुणी निर्माण केली वासना? घर बांधलं किंवा घेतलं ही वासना? आणि ते भस्म झालं तर आपल्या वासना चक्राचं फळ? मग काय करायचं? उघड्यावर राहायचं?
तुम्हाला तुम्ही काय लिहीतायं ते समजतंय का? एकीकडे म्हणायचं ईश्वर ही कार्य करणारी व्यवस्था आहे आणि स्वत:चं घर भस्मीभूत झाल्यावर म्हणायचं ते आपल्या कर्माच फळ आहे.
दुसरीकडं देवता म्हणून बघताना त्या देवतांना एकेका शक्तीचं उपास्य म्हणून बघितलं जातं नि त्या दृष्टीतून देवीला आठ हात दिलेले आपल्याला दिसून येतात. इथं देवीचा सगुणावतार अपेक्षित आहे. प्रतिमा, सगुणावतार, ईश्वर नि ब्रह्म असे चार प्रकार मानले आहेत.
= कल्पनेला अंत कुठे आहे? आठ काय आठरा हात द्या आणि सगुणाचे चार काय चारशे प्रकार माना. शब्द तुमचे आणि कल्पनाही तुमच्या!
संजयजी उपलब्ध लोकशाहीतल्या विचारस्वातंत्र्याचा तरी आदर बाळगावा माणसानं. थोडा जरी वेगळा विचार केला तरी अगदीच गाढव समजू नये माणसाला. नाई का?
= तुम्ही माझ्या लेखांवर इतके भंपक प्रतिसाद दिलेत तरीही केवळ तुमच्या पहिल्या प्रतिसादाला मान देऊन मी लिहायचा थांबलो होतो याची दखल घ्या. माझ्याबाजूनं विषय मिटला होता. आता तुम्ही पुन्हा सुरुवात केली आहे.
थोडक्यात पण महत्त्वाचं. ही उपासनापद्धत असो की आणखी कुठलीही. तिचा वापर करुन जर माणसाला 'रिझल्ट' हाती येत नसेल तर तिचा काडीमात्र उपयोग नाही. सुख, समाधान, शांती, तृप्ती ही त्या प्राप्तव्याची चिन्हं आहेत, लक्षणं आहेत. ह्यातलं एक जरी नसेल तरी काही मिळायचं , मिळवायचं बाकी आहे असं मानावं.
= काय ज्योक मारतायं? तुमची स्वत:ला उल्लू बनवण्याची मेथड आणि ही प्रक्रिया :
असं हळूहळू करत गेलं की आपोआप पाश सुटतात. भव म्हणजे संसार. नि अशा प्रकारे भवपाश सोडवायला अंबा मदत करते. अशा ह्या जगद्जननी अंबेच्या चरणी तद-लीन,तल्लीन होण्यामध्ये खरं भूषण आहे.
जर शांती आणि समाधान देईल असा भ्रम असेल तर तो महिषासुरमर्दिनी या भ्रामक कल्पनेनी तुम्ही स्वत: भोवती विणलेला कोष आहे. अशी कुणीही देवी नाही आणि कोणत्याही प्रसंगात ती काहीही मदत करत नाही. या आरत्या वगैरे करुन फक्त वेळ जातो आणि भ्रम सघन होण्यापलिकडे काहीही होत नाही.
चला सोडून देऊ! पण तुम्हा भक्तीमार्गीयांशी संवाद साधताना एक ज्योक आठवतो त्यानं सांगता करतो :
एकदा पंडित जवाहरलाल नेहरु एका मेंटल हॉस्पिटलला भेट द्यायला जातात. तिथला अधिकारी सर्वांना ओळख करुन देतो : " आज भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आपल्या हॉस्पिटलला भेट द्यायला आलेत."
एक त्यातल्या त्यात समंजस पेशंट शांतपणे उठून पंडितजींजवळ जातो आणि विचारतो " नांव काय म्हणालात सर आपलं?"
नेहरू चकित होतात आणि म्हणतात " मी पंडित जवाहरलाल नेहरु!"
यावर तो अत्यंत समजावणीच्या सुरात म्हणतो : " काही हरकत नाही, मी पण सुरुवातीला असंच म्हणायचो.... आता आलात ना इथे, व्हाल बरे हळूहळू!"
अहो ते मी तुमच्याबद्दल कुठे म्हटलंय???
साक्षात भगवंतानं गीतेत सांगितलय ते.
त्याचं झालं काय की त्याने अर्जुनाला आधी सांख्य योग सांगितला, त्याने काही विचार्या अर्जुनाचं समाधान होईना, मग सांगितला कर्मयोग तरी अर्जुनाच्या शंका आल्याच परत. मग त्या बिचार्याने त्याला ज्ञानकर्मसंन्यासयोग समजावून सांगितला तरी त्या अर्जुनाला कैच समजेना. अहो मग त्या कृष्णाने एकेक करत त्याला ध्यान योग, ज्ञान विज्ञान योग, अक्षर ब्रह्म योग, राजविद्या-राजगुह्य योग असे अजूनही कितीक योग समजावून सांगितले पण त्या अर्जुनाच्या टकुर्यात कायबी शिरंना. मग विश्वरूप दाखवून झालं तरी ह्याच्या शंका अजूनही आहेतच. तरी अजूनही तग धरून त्या भगवंताने मग भक्तीयोग, पुरुषोत्तम योग वैग्रे समजावून सांगितले तरी अर्जुन आपला ठोकळयासारखा तसाच.
मग वैतागला तो विचारा कृष्ण, तो तरी किती अजून सहन करणार. मग शेवटी दाखवलान् त्याला 'मी' मार्ग. तेव्हा कुठे समाधान झालं त्याचं. मग तो अर्जुन म्हणाला बघा
नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव ||
त्या कृष्णाला हातपाय गाळून बसलेल्या अर्जुनाला कसाही युद्धाला उभा करायचा होता, म्हणून "सगळं माझ्यावर सोडून दे" म्हणाला. त्याला जर माहिती असतं की काही हजार वर्षांनी मिसळपाव नामक संस्थळावर त्याचा असा उपयोग होईल, तर तोच म्हणाला असता ना,
पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी
बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही !
धोंड्यात जावो ही लढाई | आपल्या बाच्याने होणार नाही
समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके
काखे झोळी, हाती भोपळा | भीक मागूनि खाईन आपला
पण हा वाह्यातपणा कुठला | आपसात लट्ठालठ्ठी
या बेट्यांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग
लेकांनो! होऊनिया रोग | मराना का!
लढाई का असते सोपी? मारे चालते कापाकापी
कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.'
सर्व, ज्याच्या मर्जीविना झाडाचे पानही हलत नाही त्याला ही चर्चा मिपावर २०१३ साली होणार याची गंधवार्ताही नाय म्हनल्याबद्द्ल तुमचा टीव्र णिशेढ !
उलट अश्या चर्चेने मिपाकराची पापे धुवून निघाली नाही (कारण त्याबाबत शंका आहे) तरी त्यांना खळखळून हसवून एकदोन क्षण त्या पापांच्याबद्दल होणार्या शिक्षेची आठवण विसरायला लावण्याची ही व्यवस्था खुद्द भगवंतांनीच केली आहे... (असे नारदमुनी मिपावर टंकताना स्वप्नात पाहिल्याचे अंधुकसे आठवते आहे).
आम्हाला कोणताही सुमार्ग वर्ज्य नाही... हॅ हॅ हॅ ... म्हणजे असं आहे की प्रत्येक मार्गाबद्दल आम्हाला येवढे यक्षप्रश्न पडतात की आमची अल्पबुद्धी त्यांची उत्तरे देऊ शकत नाही. पण तरीसुद्धा माझ्या मार्गाने न येणारे सगळेच चुकलेले वाटसरू आहेत असे नक्कीच वाटत नाही :)
छे, छे !!! आम्ही कसले गुरू... प्रश्नांची उत्तरे शोधतानाच रिटायर्ड व्हायच्या अगोदर टायर्ड व्हायला होतंय !
म्हणतातच ना की, "शास्त्रिय संशोधनाने मिळालेले प्रत्येक उत्तर १०० नवे प्रश्न बरोबर घेऊन येते." आमच्या नशिबी शेवटपर्यंत विद्यार्थी राहणेच आहे ;)
भगवदगीता इतक्या शॉर्ट अँड स्वीट फॉर्ममध्ये कुण्णी म्हणजे कुण्णीच सांगितली नसेल.
इस बातपे मी तुझ्यासोबत शाजीत पराठे खायला तयार आहे किंवा अगदी भुलेश्वरलाही यायला तयार आहे. :)
आपल्यावर आलेला कुठलाही प्रसंग आपल्या कर्माच्या फळाच्या स्वरुपात आला असं मानणं व्यावहारिक शहाणपणाचं ठरतं.
व्हॉट इज कर्मा ? अ कॉझ दॅट हॅज नॉट फाउंड इट्स एफ्फेक्ट येट.
आता हे कळालं असेल तर
म्हणजे यात महिषासुरमर्दिनीचा काहीएक हात नाही!
वोव, हे म्हणजे वस्तुमानाच्या वजनात गुरुत्वाकर्षणाचा काहीएक हात नाही मानण्याइतके अवैज्ञानीक आहे. हा शहाणपणा न्हवे, हे बघा तुम्हि शहाणे आहात.
इतकं सगळं कार्य दोन हातातून करता येणं शक्य थोडीच आहे असा विचार करुन तिला अष्टभुजा बनवली नि तिच्या प्रत्येक हातात एक एक वस्तू दिली.
या हातातिल विवीध वस्तुंमुळेच तिची कार्यओळख चटकन मनामधे स्थापित होते. फार सुरेख लिहलय.
याला म्हणतात गोलमाल लॉजिक. ते स्वचा उलगडाही होऊ देत नाही आणि भोंगळ विनम्रतेला निरहंकारिता म्हणून मिरवायला मदत करतं.
बोंबला! अनुभव घेण्याची क्षमता असलेली प्रणाली या पलिकडे "स्वतः" चा आणखि काही कोठे उलगडा अस्तित्वात आहे काय ? आता तो अनुभव काय असावा हे जाउदेना दुनियादारीत. तुम्हाला कशाला अनुभव अमुक अमुकच असावा तरच तो सत्य वगैरे वगैरे वर नियंत्रण हवय ? तुम्हि शहाणे आहात विसरु नका, हे फार महत्वाच आहे.
अर्थात, अशांचाच भरणा भारंभार असल्यानं पब्लिक भावभोळ्या आरत्या करून भवसागर पार होईल अशी आशा करतं.
पुन्हा सांगतो तुम्ही अनुभवाची सक्ति रेटु शकत नाही.. केवळ उदाहरण म्हणून म्हटलं तुम्हाला गाढवपणात आनंद आहे तर कोणाला मद्यपानात आहे, लता मंगेशकरला गाणे म्हणन्यात आहे तर कोणाला समागमामधे आहे कोणाला परिक्रमेमधे आहे कोणाला विपश्यनेमधे आहे कोणला कशाचे अन तुम्हाला शहाणपणाचे असे विवीध अनुभव हे उपभोगण्याची क्षमता असणे यालाच "मी" म्हणतात. थोडक्यात हा "मी" सक्तिरुप कधिही असता कामा नये. डों फर्गेट य आर जिनीअस!
कधि पुण्यात आलो तर मग त्याला नक्किच भेटेन. फारच मिजासखोर, घमंडी कार्ट आहे ते, असं कानावर आलयं, तो काय म्हणतोय हे म्हणे इतरांना कळतच नाही, अन त्यावेळी तर तो म्हणे त्याचे म्हणने/मानणे तर कधिच बदलत नाही, आता भेटला तर देतोच दोन टप्पू ठेवुन अन समजावतो त्याला सगळ्यासमोर गीता वाचलिच पाहिजे असा अट्टहास धरु नये.
इफेक्ट झालाच नसेल तर तो जाणीवेच्या कक्षेत कसा येईल? आणि ज्या गोष्टीची जाणीव नाही त्यासाठी करुणेची आरती कशाला करायची? स्वतःच्याच काय वाट्टेल तश्या व्याख्या करायच्या आणि काथ्या कुटत राहायचा.
करेक्ट! झुली बदलल्या तरी बैल बदलत नाही!! आता हे वाक्य पाहा:
हा हा हा ! तुम्ही म्हणे एकेकेकाळी समान झुल बाळगणार्या दोन वेगवेगळ्या बैलांना चक्क एकच बैल समजुन बराच काळ जगत होता.. सरपंच व अख्या पंचायतीसमोरही हा दावा केला होता पण सत्य समोर आल्यावर पंचायत तुमची झाली होती हे कधि आलं नाही तुमच्या लिखाणात ? जगता तेच लिहता ना ?
इफेक्ट झालाच नसेल तर तो जाणीवेच्या कक्षेत कसा येईल? आणि ज्या गोष्टीची जाणीव नाही त्यासाठी करुणेची आरती कशाला करायची?
जाणिवेच्या कक्षेतील परिणामांकडे निव्वळ प्रक्रिया आहे म्हणून दुर्लक्ष करायला सांगुन स्वतः ३१ जुलैच्या भ्रामक कामात गुटुंन जाणार्यांना इफेक्ट झालाय हेच लक्षात येत नाही त्याला इफेक्ट झाला नाही कसे म्हणनार ?
स्वतःच्याच काय वाट्टेल तश्या व्याख्या करायच्या आणि काथ्या कुटत राहायचा.
एक प्रष्ण आहे,आपल्या म्हनण्या प्रमाणे समजा असे मान्य करुया की भक्तिमार्ग भोन्गळ आहे,कर्म मार्ग सुद्धा त्याच तोडीचा आहे,योग मार्ग त्या बद्दल मी पूर्ण अज्ञानी आहे,मग आपला मार्ग कुठला आहे जो सहजसुन्दर आणि सर्वसमावेषक आहे?जो माझ्या सारख्या अतिसामान्य व्यक्तीने अवलम्बला म्हणजे त्याला 'स्व'चा बोध होइल?
असे एखाद्याला अडवुन त्यान्ची मते लाटण्याचा प्रयत्न करु नये,हा जर त्यानी आपल्याला वकिलपत्र (प्राणी तसेच पक्षीनामक आयडीला घाबरुन्)तर मात्र बोलणेच खुन्टले.
प्यारे बुवा,
साष्टांग दंडवत.
आरती म्हणताना अर्थाकडे लक्ष द्यायला कुठे वेळ असतो? निम्म लक्ष प्रसादावर आणि बाकिचे..... जाउदे
या पुढे निदान सुखकर्ता दुखहर्ता आणि दुर्गे दुर्गट या दोन आरत्या म्हणताना तरी तुम्ही शिकवलेला अर्थ लक्षात घेउन आरती म्हणु.
अजुन एक आरती सुचवावीशी वाटते " त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्त हा जाणा" बघा कधी जमेल तेव्हा.
मस्त... :)
बाकी दुर्गेचे 'प्रसनावदना' रुप ऐकून मला आमच्या गोव्यातील 'शांतादुर्गे'चीच आठवण येते. शिव आणि विष्णू यांच्या युद्धात मध्यस्थी करणारी, त्यांना शांत करणारी शांतादुर्गा हे खरोखर मनोहर रुप आहे दुर्गेचे.
प्रतिक्रिया
मला प्राण्यांची नावे आवडत
भारी....
काय हे
साहेब,
हा हा हा
देव कोपतो अथवा रागावतो ह्या
देव कोपतो अथवा रागावतो?
जाऊ द्या हो संजयजी.
मस्तच!
सिंव्ह चावत नस्तो
अबे
महिषा सुराच्या एका रक्षकाला .
@ वल्ली : जाऊ द्या हो संजयजी....
हाहा.
नाही का? उत्तम!
अहो ते मी तुमच्याबद्दल कुठे
बिच्चारा!
(No subject)
भारी!
सर्व, ज्याच्या मर्जीविना
अरे देवा!
आम्हाला कोणताही सुमार्ग
एक नक्की
छे, छे !!! आम्ही कसले गुरू...
अगदि अगदि
काय रे
(No subject)
भगवदगीता इतक्या शॉर्ट अँड
कधी जायचे बे?
सांभाळून ! बिल कोण भरणार याचा
@संजय क्षीरसागर
पांडुरंग पांडुरंग!
प्यारेकाका तुमचाही वेळ जात
आजचाच दिवस रे.
कल जुम्मा है ।
संजय,
मान गये...
हम्म!
तुमचे प्रतिसाद वाचल्यानंतर आमचा सख्खा शेजारी आत्मशून्यची
करेक्ट! झुली बदलल्या तरी बैल
सन्जयजी
त्याला 'मी' मार्ग असे म्हणतात
वल्लीजी
(No subject)
उत्तम
आपला अर्थ अधिक सयुक्तिक आहे.
साष्टांग दंडवत.
मस्त...
आई राजा उदे उदे
(सध्या फक्त तुळजापुरातील
Pagination