Welcome to misalpav.com
लेखक: मेघनाद | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ही तुमच्या स्वतःच्या बाबतीत घडलेली कथा आहे का? पहिल्या भागाला कोणीतरी हम आपके है कौन म्हटलं होतं. पण तसं नाही. त्या दोघांची ओळख एवढीच का राहिली?

ओ दादा " उपवर आणि उपवधु " या शब्दांच्या अर्थात तुमची बरीच गल्लत झाली आहे कन्या उपवर झाली या चा अर्थ ती वयात आली तिचे लग्न लावायला हरकत नाही असा होतो. "उपवधु " असा शब्द नाहिय्ये. तुम्हाला बहुतेक नवरदेव किंवा नवरी असे शब्द वापरायचे असतील

पुढील भाग येणार आहेत की कथा सम्पली आहे. पुढे काय झाले हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ते परत भेटले का ? त्यान्चे लग्न झाले का ?

त्यांनी लिहीले आहे की, एका सत्य घटनेवर आधारीत. ("खाली क्रमशः कुठे आहे?" हे वाक्य आणि आणि "नाटक कुठे आहे? तो म्हातारा तर नुसताच चहा पित आहे."हे वाक्य वेगळे असले तरी उद्देश सारखाच समजलात तरी चालेल.

असामी असामी...पूलं... फार मोठे वाक्य आहे... ता.क. खालील वाक्य पण अशीच आहेत... लेक्चर कुठे आहे? तो तर नुसताच बडबडतोय..... सौंदर्य कुठे आहे? ही तर प्रसाधनांची जाहीरात आहे.... प्रतिसाद कुठे आहे? हा तर नुसता खवटपणा आहे...

@ पैसा ताई : आता तुम्हीच समजून घ्या नां. कथा मीच लिहिली आहे ती पण इतक्या तपशिलासकट. ओळख वाढली नाही कारण त्या दोघांची नंतर कधी भेट झालीच नाही किवा ती होणारच नव्हती म्हणून. @ विजुभाऊ: तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मला नवरा-नवरीच म्हणायचं आहे. पण मला ते उगाचच खटकत होत, म्हणून हे शब्द वापरले पण त्याचे असे अर्थ होतात हे नक्की माहित नव्हत. माहिती बद्दल धन्यवाद. @ अग्निकोल्हा: वाचल्याबद्दल धन्यवाद, अजून माझी लिखाण प्रतिभा तेवढीशी प्रगल्भ झाली नाहीये. फार विचार करूनच शब्द सुचतात. @ मुक्त विहारी: वाचल्याबद्दल धन्यवाद, हो मी पण डोंबीवलीचाच आहे, पूर्वेला सावरकर पथ येथे राहतो. @ खट्पट्या: कथा संपली आहे, समाप्त लिहिण्यास विसरलो. @ aparna akshay: सगळीकडुन बॅकींग तर व्यवस्थित होते पण ती दोघं मनातले विचार एकमेकांकडे व्यक्त करू शकली नाहीत अगदी शेवटपर्यंत, म्हणून अव्यक्त. बराच वेळ विचार करून एकदाच हे नाव सुचंल.

मिपा वर लिहिलेलं लिखाण वाया जात नाही, त्या लिखाणाला वाचक मिळतातच. आणि लिखाण कसं झालंय याबद्दल आणि लिखाणातील मुद्द्यांबद्दल अगदी सडेतोड प्रतिसाद पण दिले जातात हेच मिपाच खरं यश आहे अस मला वाटतं.

"मिपा वर लिहिलेलं लिखाण वाया जात नाही, त्या लिखाणाला वाचक मिळतातच. आणि लिखाण कसं झालंय याबद्दल आणि लिखाणातील मुद्द्यांबद्दल अगदी सडेतोड प्रतिसाद पण दिले जातात हेच मिपाच खरं यश आहे अस मला वाटतं." हे ज्याला समजले तो खरा मिपाकर...तुमचे इथे जमणार बघा.... लिहीत रहा...