गांधीबाबा अट्टल राजकारणी होता हे मानल्याशिवाय गांधीबाबा समजणारच नाही!
सदर वाक्याबद्दल थोडे अधिक स्पष्टीकरण.
गांधीवाद आणि काँग्रेस संघटना (आणि त्यातील राजकारण) हे दोन संपूर्णतः वेगळ्या गोष्टी होत.
कोंग्रेस संघटनेतील नेते जसे की नेहेरू, पटेल वा मौलाना आझाद हे कोणत्याही अर्थाने गांधीवादी नव्हते! (मात्र गांधी ह्या व्यक्तीवर त्यांची निष्ठा होती)
आणि सर्वार्थाने ज्यांना गांधीवादी म्हणता येतील अशा व्यक्ती जसे की, साने गुरुजी, विनोबा भावे वा दादा धर्माधिकारी यांना काँग्रेस संघटनेत काडीचेही स्थान नव्हते!!
या स्पाष्टीकरणामुळे नेहेरू, पटेल वा मौलाना आझाद हे राजकारणी होते असे सिद्ध होउ शकते मात्र गांधी पक्के राजकारणी होते हे सिद्ध होत नाही. शिवाय या स्पष्टीकरणामुळे तुमच्या "राजकारणी " या शब्दाला जरा वेगळाच वास येतो आहे त्या वाईट अर्थाने गांधीजी राजकारणी होते असे तुम्ही म्हणत आहात असे वाटते आहे. बाकी धुरंधर राजकारणी असल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवर कुठल्याही नेत्याला इतका एकजिनसी पाठिंबा लाभणे शक्य नाही हे मात्र मान्य.
तत्कालीन काँग्रेस संघटनेतील राजकीय निर्णय गांधींना विचारात घेतल्याविना होत नसत. सर्व राजकीय वाटाघाटी वा परिषदांना काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गांधीच जात असत. विविध राजकीय चळवळींची संकल्पना आणि नेतृत्व हे गांधींचेच असे (उदा दांडीयात्रा वा चले जाव).
या सर्व गोष्टी गांधी हे मुरलेले राजकारणी होते, हेच सिद्ध करतात.
मी "राजकारणी" हा शब्द वाईट अर्थाने वापरीत नाही. तसे वाटले असल्यास ती माझ्या लेखनीत त्रुटी समजावी!
बाकी धुरंधर राजकारणी असल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवर कुठल्याही नेत्याला इतका एकजिनसी पाठिंबा लाभणे शक्य नाही हे मात्र मान्य.
लेख आवडला.
तळागाळातल्या भारतीयांचा - दलितांचा - उद्धार व्हावा हे दोघांनाही वाटत होतं. मात्र 'हिंदू म्हणजे नक्की कोण?' या प्रश्नाबाबत त्या दोघांचा तीव्र मतभेद होता. गांधींचा कल दलित-सवर्ण सर्वांना एकत्र हिंदू म्हणू आणि त्यांच्यात समानता आणण्यासाठी जमेल तशा सुधारणा करत जाऊ. आंबेडकरांना अर्थातच हा सलोखा झाला काय अगर न झाला काय, दलितांचा उद्धार करणं हे अधिक महत्त्वाचं होतं.
गांधींच्या उपोषणापुढे मान तुकवून आंबेडकरांनी नाइलाजाने पुणे करार केला. त्यामागची राजकारणी चाल बाबासाहेब ओळखून असणार. गांधींनी स्वतःला अधिक व्यापक समाजाचा नेता म्हणून सिद्ध केलं, आंबेडकरांबरोबर करार करून त्यांना दलितांचे नेते म्हणून मान्यता दिली, आणि शिवाय तडजोडीत योग्य त्या मागण्या पूर्ण करून दिल्या.
गांधीबाबा अट्टल राजकारणी होता हे मानल्याशिवाय गांधीबाबा समजणारच नाही!
सहमत. कुरुंदकरांनी म्हणूनच त्यांना 'बॅरिस्टर महात्मा' म्हटलेलं आहे.
काही महिन्यांपूर्वीच आंबेडकरांवरचा जब्बार पटेल दिग्दर्शित सिनेमा पाहिला. तो काहीसा लांबलचक आहे, पण त्यांच्या जीवनाचं उत्तम चित्रण केलेलं आहे. त्यात पुणे करारावर बराच भर दिलेला आहे.
एकही पद ज्या व्यक्तीने भूषवले नाही त्याला अट्टल राजकारणी म्हणायचे हे जरा अतीच होतय.
समाजकारणातून आलेल्या मानसन्मानामुळे राजकारणी त्यांना भिऊन असायचे.
त्यामुळे ते अट्टल समाजकारणी होते.
निवडणूक लढवणारा नि पद भूषवणारा तोच राजकारणी अशी आपली व्याख्या असेल तर आपल्या ग्रेट थिंकींग ला पुन्हा एकदा सलाम!
कृष्णापासून चाणक्य ते अलिकडं राज ठाकरेंपर्यंत सगळे समाजकारणी असावेत. काश... ऐसाही होता. :)
"म्हणजे गांधीजी कोंग्रेसचे अध्यक्ष न्हवते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?"
बाकी नेहमी प्रमाणे...
आधीच्या मुळ शंकांचे काय?
प्रश्र्नाचे उत्तर तुम्हालाच द्यायचे आहे इ.इ.
गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते जरुर. परंतु त्यावेळी काँग्रेसचे स्वरुप राजकिय पक्ष असण्यापेक्षा independence movement organisation असे होते. ब्रिटिशांना घालवणे व देश स्वतंत्र करणे यासाठी कांग्रेसचे नेतृत्व गांधिंनी स्विकारले,
सुभाषचंद्र बोसांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद ३८ साली स्विकारले होते, आता त्यांना अट्टल राजकारणी म्हणायचे कि क्रांतिकारक?????
.
.
.
गणिताच्या पेपरला नागरिकशास्त्राचा अभ्यास करुन जाऊ नये.
"सुभाषचंद्र बोसांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद ३८ साली स्विकारले होते, आता त्यांना अट्टल राजकारणी म्हणायचे कि क्रांतिकारक?????"
इतका साधा प्रश्र्न पण तुम्हाला सोडवता येत नाही?
मुद्दाम विचार (अरे हो... गहन विचार) करून बवलेल्या गोळ्या आहेत त्या.
इतक्या सहजा सहजी मिळत नाहीत.आणि मिळाल्या तरी प्रत्येकाला पचतीलच अशी खात्री पण देता येत नाही.
तुम्ही हे असे मध्ये तोंड घालणार ते माहीतच होते.
म्हणूनच मी मुद्दामच विचार (गहन केलाच नाही बघा आम्हाला किंचीत पण पुरतो.) करून मी नांव दिले न्हवते.अहो नथूगुग्गूळाचा फायदा तुम्हाला होणार.त्यांना कसा काय होईल्?
कमी रक्त दाब असलेल्या रोग्याला , जास्त रक्त दाबाची तक्रार असलेल्या रोग्याची औषधे देवून चालेल का?
अर्थात तुम्ही अद्याप "नथुगुग्गुळ चुर्ण" चालू केलेले दिसत नाही. कारण ते "पोट साफ व्हायचे औषध नसून" वेगळ्या उपायावर आहे.अर्थात जो पर्यंत तुम्ही ते घेत नाही तोपर्यंत तुम्हाला उपाय पण समजणार नाहीच म्हणा...
आणि हो
बाकी नेहमी प्रमाणे....
उत्तर आपणच द्यायचे आहे वगैरे वगैरे..आता आपले निदान इतके तरी पाठ झाले असेलच.....
@ वेताळ,
आपल्या साठी लागणर्या औषधाचा व्य.नि. लवकरच करत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शिक्षणासाठी आणि दलित समाजासाठी अपरिमित कष्ट उपसले ह्यात काही वादच नाही. काँग्रेस च्या धुर्त सद्ग्रुहस्थांना (?) आणि त्यांच्या शेपट्यांना राजकारणामधे मोनोपॉली निर्माण करायची होती हे तर स्पष्ट दिसतचं आहे. आणि त्याची फळं आपण वेगवेगळ्या आघाड्यांवर भोगतोच आहोत. बाबासाहेबांच्या कष्टांची फळं दलित समाजाच्या नावाखाली कुठंला पक्ष भोगतोय ते आपण पाहातोच आहोत.
थोडसं अवांतर :
बाबासाहेबांनी कालसिमित आरक्षणाची मागणी केली होती दलितांच्या उन्नतीकरता. आज धुर्त सद्ग्रुहस्थांचा पक्ष वाढीव आरक्षणाच्या कुबड्यांची सवय आरक्षित समाजाला लावतो आहे. त्यांची झगडायची क्षमता मोडत आहे.
सावरकरांविषयी जे गरळ ओकतं आहेत त्यांचा जाहीर निषेध. त्यांनी ५० वर्षं अत्यंत प्रतिकुल परिस्थितिमधे कारावास भोगला. तरीही त्यांची देशावरची निष्ठा कमी झाली नाही.
>>> सावरकरांविषयी जे गरळ ओकतं आहेत त्यांचा जाहीर निषेध. त्यांनी ५० वर्षं अत्यंत प्रतिकुल परिस्थितिमधे कारावास भोगला. तरीही त्यांची देशावरची निष्ठा कमी झाली नाही.
मग त्यात काय विशेष? गांधी सुद्धा आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध होते, तरीही त्यांची देशावरची निष्ठा कमी झाली नाही.
गांधी बाबांना स्थानबद्ध केलं होतं फक्त. वेळेत अन्नपाणी मिळत होतं. चरखा चालवा, पुस्तकं लिहा वाचायचं स्वातंत्र्य होतं वीर सावरकरांना तेलाचा घाणा फिरवणे (घाणा फिरवताना बैलांचा जीव हैराण होतो), काथ्या कुटणे इत्यादी भयानक कष्टप्रद कामांना जुंपलेले होते. त्यातुन अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न-पाणी मिळायचं त्यांना. शिवाय प्रचंड मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागला. तुमच्या आमच्या सारखा सामान्य माणुस असता तर कधिच मोडुन पडला असता. माझी जन्मठेप वाचा एकदा.
स्वातंत्र्याचे खरे जनक वीर सावरकर, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव आणि ज्यांची नावं नादान लोकांच्या उदो-उदो च्या नादात इतिहासातुन पुसली गेली आहेत असे अनेक क्रांतीकारकचं आहेत. हे लोकं नसते तर कदाचित चित्र आजपेक्षा अजुन भयानक असतं.
अगदी खरंय, गांधीने केलंय काय देशाच्या स्वातंत्र्यासाठी???? खरे स्वातंत्र तात्याराव सावरकरांनी दिले देशाला!
गांधिजी आगाखान पॅलेसमध्ये आरामात राहायचे, रोज पक्वान्न खायचे ,चांगले काम करणार्या लोकांवर माथेफीरु सोडायचे...
ब्रिटीशांची गांधीने माफी मागितली होती ..रीतसर माफिनामा लिहून.. आणि माफीनाम्याचे वचन अगदी पतिव्रतेप्रमाणे १९६६ पर्यंत...माफकरा ४८ पर्यंत पाळले.वर तोंड करुन तो एक स्ट्रॅटेजिचा भाग होता असे निर्लज्ज गांधिभक्त सांगतात, अरे या देशाला काय मुर्ख समजता काय रे.. गांधीवाद्यांनो !
एकही इंग्रज ज्यांनी मारला नाही ते गांधीजी स्वातंत्रवीर मात्र हजारो इंग्रज मारणार्या तात्यारावांना मात्र या गांधीने व काँग्रेसने अपमानीत केले .
कलियुग म्हणतात तेच हेच असावे...! एखाद्याला मोठं ठरवण्याच्या नादात आपण धादांत खोटे लिहतो याची या लोकांना (गांधिवादी) कसलीही चाड नाही.
रोज पक्वान्न खायचे असं कुठे लिहिलं आहे मी जरा दाखवता का?
खरे स्वातंत्र तात्याराव सावरकरांनी दिले देशाला!
उपरोधातुन का होईना सत्य बाहेर पडलं हे काय कमी झालं का? त्यांचा मोलाचा वाटा होता. मी आजपर्यंत हजार वेळा लोकांना सांगुन झालयं आता परत सांगतो. उपोषण, सत्याग्रह ह्या गोष्टींचा स्वतःला त्रास होतो. जुलुमी राजवटीवर त्याचा काडीचाही परीणाम होत नाही (उदा: अण्णा हजारे आणि लोकपाल प्रकरण!! आज आण्णांचा आवाज का बंद झालाय? झालाय का केला गेलाय?). जे मागुन मिळतं ते स्वातंत्र्य नाही, ती भिक आहे. जो तुम्हाला पुर्ण लुटायच्या उद्देशानी आलाय तो तुमच्या उपोषण सत्याग्रहाला एन्टर्टेन करेल का तुमच्या डीफेन्स स्टान्स ला घाबरेल?
उपरोधानं का होईना सत्य बाहेर पडलं
उपरोधानं कशाला त्यांनी खरेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तात्यारावांनी एक हाक दिली कि आख्खा देश त्यांच्या पाठी एकवटायचा जगावर बंदुकींच्या जोरावर राज्य करणारे इंग्रज मात्र तात्यारावांना चळाचळा कापायचे कारण तात्यारावांकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रात्रे तात्यारावांकडे त्याकाळी भूमिगत असे किमान एकलाख खडे सैन्य होते इंग्रज म्हणाले कि सावरकरांनी जर आप्ल्यावर हल्ला केला तर आपले काही खरे नाही जागतिक सत्ता असलेल्या ब्रिटीशांनी सावरकरांना माफीनामा लिहून दिला व जीव मुठीत घेऊन देशाबाहेर पळ काढला इतके तात्याराव लोकप्रिय आणि धाडसी होते.
उलट गांधीला चारदोन कार्यकर्ते सोडले तर कोण ओळखायचं हो...
तात्याराव रत्नांगिरी राहयचे तिथल्या कोकणी लोकांचा धोतर आणि पंचा हा पोषाख गांधिने ढापला व मोठा झाला.
जय तात्याराव, जय तात्याराव ,जय तात्याराव.
(ही पोस्ट ज्याला उपरोधिक वाटेल तो तात्यारावांचा समर्थक असूच शकत नाही)
>>>> उपरोधातुन का होईना सत्य बाहेर पडलं हे काय कमी झालं का? त्यांचा मोलाचा वाटा होता. मी आजपर्यंत हजार वेळा लोकांना सांगुन झालयं आता परत सांगतो. उपोषण, सत्याग्रह ह्या गोष्टींचा स्वतःला त्रास होतो. जुलुमी राजवटीवर त्याचा काडीचाही परीणाम होत नाही (उदा: अण्णा हजारे आणि लोकपाल प्रकरण!! आज आण्णांचा आवाज का बंद झालाय? झालाय का केला गेलाय?). जे मागुन मिळतं ते स्वातंत्र्य नाही, ती भिक आहे. जो तुम्हाला पुर्ण लुटायच्या उद्देशानी आलाय तो तुमच्या उपोषण सत्याग्रहाला एन्टर्टेन करेल का तुमच्या डीफेन्स स्टान्स ला घाबरेल?
+११११११११११११११११११११......
हे सत्य दडपण्याचे आजवर असंख्य प्रयत्न झाले. अंदमान कारागृहात सावरकरांनी भिंतीवर कोरलेल्या कवितेच्या ओळींवर चुना फासून एका महामानवाची एक अभिमानास्पद स्मृती सुद्धा नष्ट केली गेली. आता अंदमान कारागृह पाडायची योजना आहे. सावरकरांनी देशासाठी जिथे ११ वर्षे अत्यंत जीवघेणा कारावास सोसला तिथल्या स्मृतीस्तंभावरून त्यांच्या काव्यपंक्ती काढून टाकून ज्या गांधींनी जिथे कधीही पाऊल ठेवले नव्हते अशांच्या ओळी कोरल्या गेल्या. सावरकरांचा काँग्रेसने अत्यंत दुस्वास केला व शक्य तिथे आणि शक्य तितकी त्यांची बदनामी करून त्यांच्या स्मृती नष्ट करण्याचाच प्रयत्न केला. अंहिसेने रक्ताचा एकही थेंब न सांडता गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिले असा तद्दन भंपक व खोटा इतिहास शिकविला गेला.
+९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९
आपली शाळेची पुस्तकं पण पाहा, क्रांतीकारकांवर थोडक्यात माहीती आणि गांधी बाबा आणि खांग्रेस वर उरलेली पानं.
खरं तर शाळेपासुन खरा इतिहास शिकवला गेला पाहीजे.
>>> आपली शाळेची पुस्तकं पण पाहा, क्रांतीकारकांवर थोडक्यात माहीती आणि गांधी बाबा आणि खांग्रेस वर उरलेली पानं.
अहिंसक आंदोलनामुळे स्वातंत्र्य मिळाले अशा प्रचारकी पुस्तकांनंतर काही वर्षांनी वद्रा हा स्वातंत्र्यसैनिक होता असा इतिहास सुद्धा वाचायला मिळेल.
वद्राला गुरु करुन नितीन माठकरीही तीच भूदान चळवळ चालवतोय ,हो की नै गिरीजा.
आणि महाजनही तेच करायचा, हंबानीकडून पैसा घ्यायचा आणि गोरगरीबांना वाटायचा... रॉबिनहुडच्याच औलादी ,नै का ?
>>> गांधी बाबांना स्थानबद्ध केलं होतं फक्त. वेळेत अन्नपाणी मिळत होतं. चरखा चालवा, पुस्तकं लिहा वाचायचं स्वातंत्र्य होतं वीर सावरकरांना तेलाचा घाणा फिरवणे (घाणा फिरवताना बैलांचा जीव हैराण होतो), काथ्या कुटणे इत्यादी भयानक कष्टप्रद कामांना जुंपलेले होते. त्यातुन अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न-पाणी मिळायचं त्यांना. शिवाय प्रचंड मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागला. तुमच्या आमच्या सारखा सामान्य माणुस असता तर कधिच मोडुन पडला असता. माझी जन्मठेप वाचा एकदा.
काँग्रेसचे तुरूंगात गेलेले बहुतेक जण राजकीय कैदी या दर्जाचे होते. त्यांना सक्तमजुरी मिळत नव्हती. लेखन करायची सोय व स्वातंत्र्य होते. तुरूंगात त्यांचा छळ झाला नव्हता. याउलट परिस्थिती अंदमानात होती.
||मना त्वाची रे पुर्वसंचित केले
तया सारखे भोगणे प्राप्त झाले||-समर्थ रामदास.
गांधी -राजकिय कैदी, सर्व सुख सुविधा ,आराम
सावरकर- अंदमानात कैदी,घाणा ओढणे ,कष्ट करणे, सक्तमजुरी
समर्थउक्तीप्रमाणे कोणाचे पुर्वसंचित चांगले असेल हो!..गांधी कि सावरकर..?
कि समर्थच काहीतरी चूकीचं सांगतायत?
सावरकर त्यांच्या मागच्या जन्मी सावरकर नव्हते. पण सावरकर जन्मात ते सावरकरच होते. तेवढे पुरेसे आहे तुमच्यासाठी,
संत वचनांचा तुम्हाला अजुन थोडा अभ्यास करणे गरजेचे आहे आणि त्याबरोबर थोडे डोके लावणे पण अपेक्षित आहे. दाऊन इब्राहिम सध्या मोठ्या सुखात जगतो आहे, बरेच राजकारणीही सुखात आहेत (आपल्या सगळ्यांचे लाडके नेते तर सुखात तरंगत आहेत) म्हणजे मागच्या जन्मात त्यांनी मोठी पुण्ये केली असणार असा जर अर्थ तुम्हाला समर्थांच्या वचनातुन काढायचा असेल तर त्याला बाकी पामर काय करणार?
>>> स्वातंत्र्याचे खरे जनक वीर सावरकर, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव आणि ज्यांची नावं नादान लोकांच्या उदो-उदो च्या नादात इतिहासातुन पुसली गेली आहेत असे अनेक क्रांतीकारकचं आहेत. हे लोकं नसते तर कदाचित चित्र आजपेक्षा अजुन भयानक असतं.
+११११११११....
या क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान कमी लेखून त्यांना दुर्लक्षित करण्याचे प्रयत्न व फक्त ठराविक व्यक्तींनाच महत्त्व देण्याचे प्रयत्न गेली ६६ वर्षे सुरू आहेत. सुदैवाने हे प्रयत्न अजूनपर्यंत पूर्णत्वाने यशस्वी झालेले नाहीत.
लालू अशाच लुटुपुटीच्या तुरूंगात आहे. त्याच्या तुरूंगातील खोलीत ए.सी., टीव्ही, बेड, मच्छरदाणी वगैरे सोयी आहेत. रोज घरून जेवण येते. रोज त्याला भेटायला अनेक कार्यकर्ते, आमदार वगैरे येतात. तो त्यांच्याबरोबर तुरूंग अधीक्षकाच्या केबिनमध्येच बैठका घेतो. लालूसारक्या गुन्हेगारांनी तुरूंगवास, गुन्ह्याबद्दल मिळालेली शिक्षा इ. ची चेष्टा करून टाकली आहे.
प्रतिक्रिया
गांधीवाद आणि काँग्रेस संघटना
या स्पाष्टीकरणामुळे नेहेरू,
थोडे पुन्हा स्पष्टीकरण
लेख आवडला.
गांधी अट्टल राजकारणी होते
निवडणूक लढवणारा नि पद
+ १
राजकडे पद नाही ...आँ!!
@ ग्रे.थि.
आम्ही परिक्षेला बसतच नाही.
होते गांधीजी अध्यक्ष होते...
गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते
बरं.
बरं.
म्हणजे आता तर हद्द झाली बघा.....
ग्रेटथिंकरांचे म्हणणे मला पटले....
साध्या गोळ्या चालत नाहीत त्या साठी....
नथुगुग्गुळ चुर्ण सकाळ,
@ ग्रे.थि.
.
साहेब
लेख आवडला.
प्रतिसाद
>>> सावरकरांविषयी जे गरळ ओकतं
गांधी बाबांना स्थानबद्ध केलं
अगदी खरंय, गांधीने केलंय काय
गांधिजी आगाखान पॅलेसमध्ये
उपरोधानं का होईना सत्य बाहेर
>>>> उपरोधातुन का होईना सत्य
गांधींनी अंदमानात पाऊल ठेवले
ऒ ग्रेट साहेब…. जर स्वाक्षरी
+९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९
थोडक्यात माहीती गांधींवर दिली
>>> आपली शाळेची पुस्तकं पण
वद्रा हा स्वातंत्र्यसैनिक
वद्राला गुरु करुन नितीन
>>> खरं तर शाळेपासुन खरा
काँग्रेसवाल्यांची दुकाने ...
>>> गांधी बाबांना स्थानबद्ध
||मना त्वाची रे पुर्वसंचित
.
सावरकर त्यांच्या मागच्या
काढायचा असेल म्हणजे???? तसाच
शहाणे आहात तुम्ही खुप
समर्थांनी जो अर्थ सांगितला
समर्थांनी मी दिलेल्या
>>> स्वातंत्र्याचे खरे जनक
लालू अशाच लुटुपुटीच्या
सावरकरांनी ५० वर्षे कारावास
माफ करा. जन्मठेपेची शिक्षा
Pagination