Welcome to misalpav.com
लेखक: धन्या | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ते यनावाला ते हेच का?
ते अजूनही गुलदस्त्यात आहे.
तुम्ही सुद्धा असला लेख फाट्यावर मारण्याऐवजी इथे देऊन आणखी त्यावर काकू काढून नेमकं काय साधलं ? असो.
मिपावर जवळपास साडे-तीन वर्ष काढूनही तुम्हालाही हा प्रश्न पडावा ना. असोच.

काय झाले? यादी मिळाली का? --- ( ८४ लक्ष) योनीवाला उर्फ उद्दाम

नेहमीप्रमाणे, तुम्ही तुमच्या पुर्वजांचा फोटो पाठवला. असो, स्वतःची ओळख स्वतःच करून दिल्या बद्दल धन्यवाद.

मुक्त विहारी आण्णा, ग्रेट्याचे उत्तर अगदीच चुकीचे नाही, जवळपास बरोबरच आहे. पुल नी तुज आहे तुजपाशी या नाटकात स्थितप्रज्ञ माणसाला गाढवाची उपमा दिलेली आहे. कारण मिठाई आणि उकीरड्यावरचा कागद ते एकाच भावनेने चघळते. स्थितपरज्ञ होणे ही मोक्षाची सुरुवात असावी कदाचित. त्यामुळे मोक्षाला गेलेल्या आत्म्याची अवस्थाही यापेक्षा फार वेगळी नसावी.

एक प्रसिद्ध वाक्य आहे, कुणाचं ते माहिती नाही. - किर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही आणि तमाशाने तो बिघडला नाही. दुसर्‍याच्या उपदेशाने, मग ते किती का सकारात्मक विचार असेनात माणूस सुधारत नाही. कारण माणसाच्या विचारांची झापडं अगदी घट्ट असतात. यदाकदाचित तो माणूस दाणकन कुठे आपटला, ती विचारांची झापडं फाटली तर त्याला वास्तव दिसतं आणि तो माणूस भानावर येतो. अन्यथा नाही. कारण ती विचारांची झापडं ही त्याची स्वतःच निर्माण केलेली खोटी प्रतिमा असते. ही स्वतःबद्दलची खोटी प्रतिमा त्याचं आतील तुटलेपण जगासमोर उघडं पडण्यापासून वाचवत असते. *हे सारं कुणा एका व्यक्तीला उद्देशून नाही.

"किर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही आणि तमाशाने तो बिघडला नाही." थोडी भर, "लाथा खावून पण गहन विचार करणे सोडले नाही आणि ट्रोल नांव पडले तरी प्रतिसाद देणे थांबवले नाही," असो,

मी माणुस नाही ,मी गाढव आहे. स्थितप्रज्ञ गाढव!. मिपावर एक निराकार गाढव देखिल आहे. कधी कधी तर मला माणूस झाल्याची दुस्वप्न पडतात.

मी माणुस नाही ,मी गाढव आहे. स्थितप्रज्ञ गाढव!. मिपावर एक निराकार गाढव देखिल आहे. कधी कधी तर मला माणूस झाल्याची दुस्वप्न पडतात.

+०.०००००००००००००००००००००००००००००००००००००२ अजुन नगू घ्या.... थोडा थोडा फरक पडत आहे... पण थोडे पथ्य पण पाळा..... हे औषध घेतांना टंकनश्रम टाळावे लागतात...

हा धागा अध्यात्म आणि विज्ञान यावरची चर्चा आहे की कोंबडयांची झुंज हेच कळेनासे झालंय. या सोत्रींना काम नव्हतं. उगाचंच पातऴ चिखलात दगड मारला.

या सोत्रींना काम नव्हतं. उगाचंच पातऴ चिखलात दगड मारला.
हायला, ह्ये म्हंजे माझ्यावर अन्याय आहे. आता ह्याची दाद कोणाकडे मागा़यची? संमंकडे गेलो असतो पण तेही कंपुबाजांना मदत करतात असा 'विद्युत' वेगाने साक्षात्कार करुन दिला गेल्याने तोही मार्ग बंद. च्यामारी, तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था झाली ही तर :( - (अन्यायग्रस्त) सोकाजी

बाकी कोणाचं म्हैत नै. पण इथली विचारप्रवर्तक चर्चा वाचून माझे डोळे दिपले. डोळे खाडकन उघडले, डोळे मिटले. आणि सदेह मोक्षप्राप्ती झाली. आता कोणाला मोक्ष मिळालेल्यांची यादी किंवा मुक्ती म्हणजे काय याचा अर्थ हवा असेल तर इच्छुकांनी मला व्यनि करावा. त्या आयडीला मोक्ष देण्यात येईल.

बाकी हा धागा माझ्या सारख्या मोक्ष वगैरे सोडून ईतर क्षुल्लक गोष्टीत गुंतून राहणार्‍यासाठी नाहि. चीअर्स टू यू!! टाईम फोर अ लार्ज ऑण द रॉक्स ;)

पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर.
यनावाला ही यांची जालीय आयडि. यांच्या लेखनाशी परिचय असल्यावर हे शंभर टक्के उपहासच आहे, हे तुमच्या चटकन लक्षात यायला हवे होते. उपक्रमावर यनावालांचे भरपूर लेख होते.

ते पत्र स्वतंत्रपणे वाचलं तर उपहास नक्कीच वाटत नाही. ज्यांना यनावाला यांची वैचारीक भुमिका माहिती आहे, त्यांची लेखनशैली माहिती आहे त्यांनाच हा उपहास आहे हे कळू शकलं असतं.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची गरज जास्त असते.हे दाभोलकरांनी वारंवार सांगितले आहे. अंनिस च्या उत्साही कार्यकर्त्यांकडून ते दर वेळी होतेच असे नाही हा भाग वेगळा. यनावालांच्या पत्रा ठासून उपहास भरला आहे हे फक्त जाणकाराला कळते. पण तो उपहासाचा उत्तम नमुना आहे हे मात्र निर्विवाद.

यनावालांच्या पत्रा ठासून उपहास भरला आहे हे फक्त जाणकाराला कळते. पण तो उपहासाचा उत्तम नमुना आहे हे मात्र निर्विवाद.
माझा या मताला आक्षेप आहे. त्या पत्राला "यनावाला" यांच्या जालीय लेखनाचा संदर्भ लावला नाही तर पत्राचा मसुदा उपहासाचा आहे हे कळायला काहीच मार्ग नाही. रच्याकने काका तुम्हाला भेटायचं आहे. कधी जमू शकेल?

त्या पत्राला "यनावाला" यांच्या जालीय लेखनाचा संदर्भ लावला नाही तर पत्राचा मसुदा उपहासाचा आहे हे कळायला काहीच मार्ग नाही.
हे बरोबर आहे. माझी बायको देखील हे पत्र वाचल्यावर चक्रावली. तिने अगोदरचे यनावालांचे सगुण निर्गुण मधील लेख वाचलेले असुन सुद्धा! मला जाणकार म्हणजे यनावालांच्या लेखनाला जाणणारा अशा अर्थाने म्हणा्यच होत. बाकी कवा बी! भेटू तुपल्याला सुटी आसन तव्हा!

@धन्या -
अध्यात्माने ज्या गोष्टी पूर्णता नवीन समजल्या अशा फक्त तीन गोष्टी सांगा.
अश्या गोष्टी सांगता आल्या असत्या तर त्याला 'आत्मज्ञान' म्हणायची गरजच काय होती? स्वतच स्वताला स्वताबद्दल झालेलं ज्ञान त्याला आत्मज्ञान म्हणतात . त्यालाच मुक्ती, मोक्ष , आत्मसाक्षात्कार , ईश्वर साक्षात्कार असा म्हणतात . आत्मज्ञान हे कोणीही कोणालाही सांगू, देवू शकत नाही ते आपल आपल्यालाच मिळवाव लागत . ते मिळवण्याचा फक्त मार्ग दाखवता येतो. दुसरी गोष्ट अशी कि ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्याची टिंगल , टवाळी करणार्यांपुढे ते जाहीर करायला मुळीच परवानगी नहि. ( (उदा: मि. पा . वर) वरील वाक्य तुम्हांला नहि. टवाळ खोरांसाठी अहे.

ज्ञान वाटल्याने वाढते असा म्हणतात त्याचं काय करावं मग ? टिंगल टवाळ्या करणारे अनेक भेटतील तेवा ज्ञानाचं प्रदर्शन न करून त्याचं काय लोणचं घालणार का ?

बलिशेठ या गोष्टी तुम्हला नाही कळायच्या. त्यासाठी आत्मज्ञान किंवा साक्षात्कार वगैरे व्हावा लागतो.
जे जे आपणांसी ठावे । ते ते दुसऱ्यांसी सांगावे । शहाणे करुन सोडावे । सकळ जन ।।
हे समर्थांचे वचन फक्त दासबोधाचे पारायण करताना वाचायचे असते. आचरणात आणायलाच हवे असे काही नाही.

दुसरी गोष्ट अशी कि ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्याची टिंगल , टवाळी करणार्यांपुढे ते जाहीर करायला मुळीच परवानगी नहि. ( (उदा: मि. पा . वर)
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२|| असं ज्ञानदेव ज्ञानेश्वरीच्या पसायदानात म्हणतात. आता टींगळ टवाळी करणार्‍यांना जर हे सर्वश्रेष्ठ ज्ञान दिलं नाही तर त्यांच्या वाईट विचारांचा नाश होऊन त्यांच्या मनात चांगले विचार निर्माण होणार कसे?

हे तुमचं विवेचन म्हणजे गीतेतल्या श्लोकाला बरोबर ठरवण्यासाठी केलेली सारवासारव वाटली.. एका अर्थाने हेही ग्रंथप्रामाण्यच की!!
गीतेतल्या श्लोकाला बरोबर , चूक ठरवणारे आम्ही कोण? गीता हि काय एखादी कविता आहे का? आणि ती सांगणारा एखादा सामान्य मनुष्य आहे का?

ते पूर्ण पोचलेले आहेत त्यामुळे त्यांना काssssssही फरक पडत नाही... हो की नाही थिंकरकाका ('क'च लिहिला आहे, 'ल' नाही आणि एकच आहे जोडाक्षर नाही) ! :)

गीता हि काय एखादी कविता आहे का?
तांत्रिकदृष्ट्या उत्तर हो असंच आहे. गीता ही महाभारत या महाकाव्याचा भीष्मपर्वातील भाग आहे. त्यामुळे गीता या भागाला महाकाव्याच्या छोटया भागाला काव्य किंवा कविता नक्कीच म्हणता येईल.

माझ्याकडे मनाच्या श्लोकांच्या दोन सीडीज आहेत. एका सीडीतील श्लोक अनुराधा पौडवाल यांनी गायले आहेत तर दुसर्‍या सीडीतील श्लोक सुरेश वाडकर यांनी. कव्हर्सवर त्या त्या गायकांची चित्रे आहेत.

माझी खात्री होत चाललीय की द्वैतात घेतलेले अतिसामान्य ज्ञानाने आम्ही मंदबुद्धी आहोत.जरा कुठल्या सरितेकिनारी किंवा वृक्षातळी पथारी पसरावयास हवी होती. भेंडी काय चाल्लय अनं काय नाही हेच कळेनासे झालयं! (हे चारमिनार अ‍ॅस्बेसटॉसच्या पत्र्याच्या जाहिराती सारखे वाचावे....कसला विचार करतोस रामय्या......)

काय ठरलं? उपहास, विरोधाभास का टाईमपास? ;) १९९. अब द्विशतक के लिये केवल एक रन की आवश्यकता. -प्यारेमदनलाल