कुठचाही आकडा तपासून न बघता लोकं 'भारत जिंकला पण क्रिकेट हरलं' वगैरे गड आला सिंह गेला स्टाइलचं भावनिक काहीतरी कसं बोलू शकतात हे मला नेहमीच कोडं पडलेलं आहे. १८० च्या वरचा स्कोअर हा कायमच महत्त्वाचा राहिलेला आहे - ८० चं दशक असो, ९० चं की २००० चं.
पहिल्या बॅटिंग करणाऱ्या टीमने १८० पेक्षा अधिक धावा केल्यावर त्यांनी किती मॅचेस जिंकल्या आणि हरल्या याची आकडेवारी खाली दिलेली आहे. विन/लॉस रेशो पहा. १.३२, १.४२, १.४१ . म्हणजे ८० च्या दशकात १८० पेक्षा जास्त रन केल्या तर तुमची जिंकण्याची शक्यता ९० किंवा २००० च्या दशकापेक्षा कमी होती! उग्गाच आपलं काहीतरी रडगाणं कशाला गायचं?
Span ........Mat Won Lost Tied NR W/L
1980-1989 388 216 163 2 7 1.32
1990-1999 752 429 302 10 11 1.42
2000-2009 1119 637 450 7 25 1.41
(आकडेवारी क्रिकइन्फोवरून साभार)
>>> ८० च्या दशकात १८० तर ९०च्य दशकात २३० धावा एक आव्हान म्हणून प्रतिस्पर्ध्याला वाटायच्या
२००० साली हेच आव्हान २७५ पर्यंत पोहोचले व गेल्या काही वर्षात हेच आव्हान ३०० ते साडे तीनशे असे झाले
इतक्या दशकात क्रिकेट मध्ये गोलंदाजाचे हे अवमूल्यन आपल्या रुपयाच्या जोडीने झाले,
पूर्वीचे गोलंदाज सरस होते की आजकालचे फलंदाज सरस आहेत हेच कळेनासे झाले आहे .
अजून काही वर्षात ४०० धावा फळ्यावर लागल्या की आव्हान शाबूत आहे असे म्हणण्याची नौबत येईल ,पण क्रिकेटची अब्रू शाबूत आहे का
फक्त भारतातच अशी वाईट परिस्थिती आहे. ऑस्ट्रेलियात २०१२ च्या फेब्रु-मार्च मध्ये खेळल्या गेलेल्या भारत्-श्रीलंका-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेत अनेक सामन्यातून २३०-२४० च्या आसपास धावा होत होत्या. एका सामन्यात श्रीलंकेने २३६ धावा केल्यानंतर भारताने देखील २३६ केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. अजून एका सामन्यात श्रीलंकेच्या २३८ विरूद्ध ऑस्ट्रेलियाला फक्त २३० च करता आल्या होत्या. अजून एका सामन्यात अशाच २३० च्या आसपास असलेल्या धावसंख्येचा भारताने यशस्वी पाठलाग केला होता. अंतिम ३ सामन्यात सुद्धा २ सामन्यात २४० च्या आसपास धावा झाल्या होत्या. इतकी कमी धावसंख्या असून सुद्धा सामने थरारक होत होते.
भारतात मात्र ३०० धावा झाल्या तरी जिंकण्याची खात्री नसते.
भारतात मात्र ३०० धावा झाल्या तरी जिंकण्याची खात्री नसते.
कालचीच म्याच पहा ! एका ओव्हर मधे ३० धावा ! आता सगळ्याना पटेल की महान काय आहे ? खेळाडू ? फलंदाज? गोलंदाज ? अंपायर, आयसीसी बीसीसीआय ... काही ही नाही ! महान आहे क्रिकेट खेळाची रचना ! इतर कोणत्याही मैदानी
खेळात असा गुण नाही. कोणता तो गुण.....ते जिम लेकर, हिरवानी, यजुवेंद्र सिंग ,कुंबळे, ब्रॅडमन, रिशीकेश कानिटकर, जावेद मियांदाद, बौचर, क्लाईन, मकाय, नाना जोशी, ही नावे आठवून पहा !
आता त्याला नखं काढलेला वाघ म्ह्णयाचं की वाघाचं कातडं पांघरलेला (एकही यॉर्कर न टाकता येणारा) गाढव समजयाच? आंतरराष्ट्रीय स्तरावर असा बिनडोक गोलंदाज भारतातून खेळतोय याची लाज वाटतेच!
उपास जी तुमच्या भावनेशी सहमत
सचिन द्रविड , सौरभ ह्यांच्या निवृत्ती नंतर आता पुढे काय असा प्रश्न फलंदाजी मध्धे आला नाही ,जंबो च्या निवृत्ती नंतर आपल्या कडे कोणत्याही खेळपट्टी वर खडूस गोलंदाजी करणारा अजून निर्माण झाला नाही आहे , जहीर न एकही काळ आशा पल्लवित केल्या हो त्या पण सध्या तो दुखापतग्रस्त जास्त असतो ,
अर्थात जंबो निवृत्त झाल्याची सचिन , द्रविड एवढी चर्चा चेपू वर झाल्या नाहीत ,
बिचारा
पाटा खेळपट्टी बनविणाऱ्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचा प्रतिस्पर्धी संघांच्या उरात धडकी भरवेल असा जलदगती गोलंदाज निर्माण होणे हे भांगेत तुळस दिसण्या एवढे दुर्मीळ आहे.
ह्या सामन्याच्या आधी तीनशेचा टप्पा पार करू भारत जिंकला होता ,
मुळात येथे कोण जिंकते व हरते हा मुद्दाच नाही आहे ,
एकदिवशीय सामन्यात ६०० पेक्ष्या धावा निघणे व त्याचवेळी कसोटी चार दिवसात आटोपण्याचे प्रमाण वाढणे
हा विरोधाभास क्रिकेटचा घसरलेला. दर्जा दर्शवितो,
मी जे लेखात लिहिले तेच थोड्या फार फरकाने काही दिवसानंतर इयान ने लिहिलेले पाहून मला बरे वाटले ,
त्याला गोलंदाजांचा कैवार का घ्यावासा वाटला हे विकीपंडित किंवा गुगलपंडित जरुर ह्यांनी शोधून काढावे ,
इम्रान च्या आत्मचरित्रात त्याने पाटा खेळपट्यांवर तोडगा म्हणून चेंडू कुरतडणे सुरु केल्याचे म्हटले.
आणि अशी खेळपट्टी इशांत सारख्या गोलंदाजाला चेपू व इतर सोशल नेट्वर्किंग साईट वर चेष्टेचा विषय बनवते
उद्या भारतीय युवा खेळाडूंनी गोलंदाज होण्यासाठी आदर्श म्हणून कोणाकडे पहायचे.
नो दादा; नो क्रिकेट
दादा बाहेर गेल्यापासून क्रिकेट ची मॅच कधी आवर्जून बघावीशी वाटली नाही. युवराज, कोहली, बरे वाटतात कधी कधी बघायला. पण बातम्यांमधल्या हायलाईट्स मध्येच.
निनाद, तुझी कळकळ समजू शकते पण इशांत शर्माच्या त्या ओव्हरच्या बाबतित खेलपट्टीला दोष देण वेडेपणाचंच ठरेल. त्याच विकेटवर जॉन्सनने टिच्चून मारा केला ते.. मॅग्रा, अक्रम टाकायचे ते.. तुम्हाला शेवटच्या ऑव्हर्सेमध्ये ट्प्प्प, दिशा ठेवता येत नसेल, दबावाखाली खेळता येत नसेल तर खेळपट्टीला दोष कसा द्यायचा..
ऑन लार्ज स्केल, गोलंदाजांवर अन्याय होतोय भारतिय उपखंडात हे विदित आहेच, साहेबांना काही सुचलं ह्यातून तरच काहीतरी घडू शकतं, शेवटी खेळाचं बाजारीकरण झालच आहे, अर्थकारण नियमांना वळवते आणि तदनुरुप प्रत्येक दशकात खेळ त्याचे स्वरुप बदलणारच. भारतिय उपखंडातून खेळात पैसे येतात आणि लोकं विकेट बघण्यापेक्षा धावा पहायला येतात त्यामुळे मागणी तसा पुरवठा असं साधं समीकरण आहे! त्याउप्पर, घरच्या खेळपट्ट्या कशा ठेवायचा ह्याचा अधिकार कर्णधाराला असल्याने तो त्याच्या बलस्थानानुरुपच त्या बनवणार, पाहुण्यांच्या नाही.. नाहीतर त्याची काही धडगत नाही :)
उपासजी
भारतात गोलंदाजाचे नशीबच फुटके आहे ,
इशांत शर्मा हा क्रिकेट विश्वात काही पहिला गोलंदाज नाही आहे ज्याला शेवटच्या षटकात मार पडला ,
चेतन शर्मा म्हटला की लोकांना शारजाचा विजयी षटकार
आठवतो , मात्र त्याची हॅटट्रिक आठवत नाही.
ह्याउलट भोपळ्यांची माळ लावणारा एखादा फलंदाजाने मग तिहेरी धावसंख्या गाठली की त्याचा उदो उदो सुरु होतो.
थोडक्यात भारतीय क्रिकेट विश्वात फलंदाज म्हणजे बिझनेस क्लास व गोलंदाज म्हणजे वर्किंग क्लास आहेत
किंबहुना पूर्वी शेवटच्या षटकात गोलंदाज व फलंदाज ह्यांना समसमान संधी असायच्या ,
आजकाल भारत असो किंवा प्रतिस्पर्धी संघ
शेवटच्या षटकात एखादा गोलंदाज जरी फलंदाज म्हणून खेळायला आला तरी पाटा खेळपट्टी वर तो सामना जिंकून देईल
गोलंदाज हतबल होतात.
भारतीय क्रिकेट बोर्ड हे डॉलर मिया व पुढे श्रीनिवासन ते राजकारणी माणसांच्या कडे आले आणि खेळाचा खेळखंडोबा झाला
आणि भारतात पाटा खेळपट्टी हि भारतीय संघ जिंकण्यासाठी
होत असेल असे मला वाटत नाही ,
इयन ने लिहिले त्या प्रमाणे येथे तंत्रा पेक्ष्या ताकद महत्त्वाचं जी प्रतिस्पर्धी संघात सुद्धा असते ,
पण ह्या खेळपट्टी वर धावांचे डोंगर उभे राहिले तरं फलंदाजांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजणाऱ्या त्यांच्या प्रायोजक कंपन्यांचे उखळ पांढरे होते.
खेळाडूंच्या प्रायोजक कंपन्या व त्यांचे क्रिकेट मधील हित संबंध हा एक वेळच रंजक विषय आहे.
सध्या मुंबई क्रिकेट बोर्डाची निवडणुकीचे उमेदवार पहिले तरं महाराष्ट्राच्या विधान व लोकसभेच्या निवडणुकीची आठवण येते.
पाटा खेळपट्टीला असा सरसकट दोष देता येणार नाही. माझ विश्लेषण -
१. भलतच फास्ट आउटफील्ड - फार कमी फटके झेप मारुन अडवले गेलेत बॉन्ड्रीवर, इतक्या वेगात चेंडू सीमापार होतोय की तीन रन धावायची वेळ येतच नाहीये, बॅट्समनला तुलनेने कमी धावायला लागतय, त्यामुळे होणारी दमछाक कमी.
२. गोलंदाजांना बदलत्या नियमांशी जुळवून घेता येत नाहीये. किती प्लेयर्स सर्कलच्या आत असणारेत कधी ह्याचा नविन नियमांप्रमाणे डोक्यात सराव ठेवून त्याप्रमाणे फिल्डींग आणि त्याला अनुकूल बॉलिंग असं होत नाहीये. लेग स्टंपवर टप्प ठेवलात तर मार मिळाणारच. सगळेच बॉलर डचमळताना दिसतायत. अर्थात ज्या रितीने युवराजला बोल्ड केले मिशल जॉन्सन बरेच चाम्गले चेंडू टाकतोय.
३. जडेजा पण टिच्चून टाकतोय की गोलंदाजी अगदी इकॉनॉमिकल टाकली त्याने पलिकडल्या मॅचमध्ये. पोवर प्ले मधे अन्याय होतो हे मान्य केलं तरी तो खेळाचा एक भाग / नियम आहे म्हटल्यवर त्याप्रमाणे तंत्रात बदल केलात तरच टिकाव लागेल बॉलरचा!
उपास जी दुर्दैवाने तुमच्या मताशी विजेता संघाचा कर्णधार धोनी व मग कोहली सुद्धा सहमत नाही आहेत. त्यांनी गोलंदाजांच्या बाजूने केलेले विधान पहिले तर त्यांच्या माझ्या मूळ लेखाशी नाळ जोडता येईल.
प्रतिक्रिया
कुठचाही आकडा तपासून न बघता
>>> ८० च्या दशकात १८० तर
श्री गुरुजी ह्यांच्याशी सहमत
हे पहा
कालचं फेसबुक वरचं एक स्टेटस.
बापरे म्हणजे लोक अजूनही
इंशात शर्मा..
उपास जी तुमच्या भावनेशी सहमत
बोलर बंड करतील!
परवाच्या सामन्यात त्यांनी ३ ०
ह्या सामन्याच्या आधी तीनशेचा
नो दादा; नो क्रिकेट
हं..
उपासजी
निनादराव आज परत तुमच म्हणने खर ठरल.
काल पुन्हा एकदा भारत जिंकला
+१०००
गोलंदाज..
आता ‘बोलिंग मशिन’च बसवा! , महेंद्रसिंग धोनीने
Pagination