छान निरीक्षण.
पण हे प्रत्येक पीढीत घडतेच की!रेडीओ पीढीला अचानक टीव्हीचे भाग्य मिळाले ,त्यामुळे गप्पाटप्पा ,सोशल इन्टरॅक्शन कमी झाले.पत्र लिहणारे फोन घेऊ लागले, कुस्ती वगैर देशी खेळ मागे पडून क्रिकेट आले, देशी जाऊन विदेशी आली ,सायकल जाऊन जावा यझदी राजदूत आल्या, नंतर स्कूटर व एमेट्या, वगैरे वगैरे... परंतु ते ट्रान्सिशन आणि आताचे यांच्या वेगात मात्र बरीच तफावत आहे.
लोचा आहे खराच, आणि आम्हा १९५० नंतर जन्मलेल्या पोरांच्या लोच्यापेक्षाही जास्त सॉलिड वाटतो आहे, तुमच्या लेखावरून.
आम्ही तर बुवा अजून जवान आहोत, आणि करण्यासारखे खूप काही आहे, कदाचित त्यासाठी ऊर्वरित आयुष्य कमी पडेल, असे वाटत आहे. बालपणाच्या स्मृती रम्य खर्या, आणि त्यात रमून जाणे हा आवडीचा उद्योग, पण अजून पुढेही नाना गंमती करायच्या आहेत.
एक मात्र खरे, की लहानपणीचे मित्र तुटले न पाहिजेत, आणि जास्त सीरीयसली घेऊ नका राव आयुष्याला. सृजनशील रहा, आरोग्य जपा, काहीना काही नवीन शिकत रहा, मनापासून जे करावेसे वाटते, ते करत रहा, आणि आई-बाबा-आजी- आजोबा वगैरेंची नीट काळजी घ्या.
whats next ? असे वाटणे हा फार महत्वाचा टप्पा. वेगळी दिशा देऊ शकणारा.
लोचा आहेच पण तो काळाचा किंवा बदलाचा नाही... काळ सगळ्याच वेळी सगळ्याच पिढ्यांना तसाच बदलताना दिसतो. कारण बदल हीच एकुलती एक स्थायी गोष्ट या जगात आहे.
स्वतःभोवती गुंफलेल्या कोषापासून जरा दूर पाहिले तर या जगात भरपूर काही सापडेल जे करायला, पहायला, मजा घ्यायला एक आयुष्य नक्कीच कमी पडेल.
रसरशीत आयुष्य जगलेल्या नि आनंद सगळ्यांना वाटणार्या दोन उत्तुंग व्यक्तिमत्वांचा हा सल्ला अतिशय उपयुक्त असा आहे....
उगाच काही शिल्लक नाही म्हणायला आपली ध्येयं मिडिऑकर करुन ठेवणार्या व्यक्तींच्या मुस्कटात मारतील असे लोक वरचे दोघे आहेतच.
त्यांच्याबरोबरच थोडंसं आजूबाजूला पाहिलं तरी भरपूर सापडतील.
घर, गाडी, पोटभरु नोकरी, कोटभराचा बँक बॅलन्स (आपापल्या आवाक्यानुसार) झालं की झालं असं असेल तर बासच...! अप्पलपोटीपणाचा कळस.
बाकी ह्याच्च कारणाने आत्महत्या करणारांना परत जिवंत करुन गोळ्या घालाव्याशा वाटतात. भिकारचोट साले.
कुठेतरी काहीतरी लोचा आहे खास.
यात १९८० चा फार काही थेट संबंध नाही. What Next? हा प्रश्न काहींना पडतो, काहींना पडत नाही; मग ते १९८० चे असोत,१९५० चे असोत की २००० चे असोत.
असा प्रश्न पडणं ही एक चांगली गोष्ट ठरु शकते :-)
काय असेल प्रश्नाचं कारण? यू कांट इमॅजिन - संपन्नता!
या आधीची पिढी संपन्न होई तो उतरणीला लागलेली असायची त्यामुळे त्यांना Whats Next ? हा प्रश्न कधी पडलाच नाही. आणि स्थैर्य आल्यावर There was so much missed! त्यामुळे शरीर स्वास्थ्य आणि मनाची उभारी असली की झालं.. One can go on!
ऐंशी नंतरची पिढी तारुण्यातच संपन्न झाली आणि भोगून दमली! (अर्थात हे भाग्य सर्वांच्या वाटेला आलं नाही). आता मिळवण्यासारखं किंवा भोगण्यासारखं काही उरलं नाही. Now the life is just a repetition. And unfortunately with a heightened insecurity. Because the life-style may not be continued this way if something suddenly goes wrong! म्हणजे भोगून झालं, भोगाचं आकर्षण कमी झालं पण उद्या चित्र बदललं तर काय? ही अस्वस्थता कायम.
मला वाटतं ही पिढी अत्यंत भाग्यवान आहे. कारण ती क्रॉसरोडवर उभी आहे. तुम्ही नवनवी आकर्षणं निर्माण करुन जीव रमवू शकता. पण ते किती काळ करणार? यू हॅव अ वेरी लाँग वे टू गो.
किंवा मग मानवी जन्मातच निहित असलेल्या अस्वास्थ्याचं मूळ कारण शोधू शकता - That is Spirituality! मी मागे एकाला व्य. नि. तून म्हटलं होतं One needs Two things to turn Spiritual: Affluence & Maturity, both. काय आहे ही म्यॅच्युरिटी? तर हे समजणं की भोग आणि जीव रमवणं फार काळ चालत नाही. थोडी फुरसत मिळाली की पुन्हा अस्वास्थ्य वर येतंच. तुम्हाला `स्व' शोधायला हवा कारण ती `स्थिती' आहे. It is an unchanging permanent State. त्या स्थितीशी कनेक्ट होणं स्वास्थ्य आहे. मग Whats Next ? हा प्रश्नच रहात नाही. Then there is no future to think of, you enjoy the present. Because present is the only reality!
लेख चांगला लिहिला आहे. एका मोठ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा आहे. पण हा Whats Next? प्रश्न तुम्ही सकारात्मक पद्धतीने घेतलात तर करण्यासारखं खूप काही आहे, त्यातलं कोणतं आधी सुरू करू असाच प्रश्न पडेल. रामदासकाकांनी एका लेखात म्हटलं होतं, "एका कवितेचा अर्थ समजायला एक आयुष्य गेलं, मग बाकी सगळं समजून घायला त्या ८४ लक्ष योनी अपुर्या पडतील!" नुसती पुस्तकं वाचत बसलात तरी आयुष्य संपेल, पुस्तकं संपणार नाहीत! इतर गोष्टी लांबच राहिल्या!
मुक्तक आवडलं. नेमक्या शब्दात आशय मांडलाय.
मार्च मधे फायनल परिक्षा आहे. ज्यांनी एक वर्षाआगोदरच उन्हाळी वर्ग लावुन, वर्षभर ट्युशन क्लास मधे सराव करुन डिसेंबर पर्यंत परिक्षेची तयारी संपवली त्यांना 'व्हॉट नेक्स्ट ' हा प्रश्न नक्की सतावतो. परिक्षार्थी मोड मधुन बाहेर पडुन जे विद्यार्थी मोड मधे येऊ शकतात त्यांना नवे सुर गवसतात... पण अर्थात, परिक्षेचं भान सुटता कामा नये.
what is next अन अधून मधून why is next or kolaaveridi हे प्रश्न आजकाल फार सतावतात. स्थित्यंतर ज़रा जास्तच बघितली असे वाटते. म्हणून सुरुवात ही उमेदददायक वाटत नाही..
अनुभवाने व् कालासोबत प्रौढत्व आले पण इंस्टिंक्ट गमावला आहे. दुःख संकट भीतीदायक वाटत नाही पण जणू सुखाच्या अस्तित्वाला सुरुंग लागलाय.
गाढवाप्रमाने सध्या फ़क्त विनोदी चित्रपट अन साहित्याच वाचतोय कारण इतर ठीकाणी रामायाची कुवत मनाने कधीच गमावली पण सुखाचा हां मार्ग अतिशय उपरा वाटतोय... काहीतरी लोच्या आहे खर्च काहीतरी लोच्या आहे....
याच पिढीचा प्रतिनिधी असूनही, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर "what's next?" हा प्रश्न कधी पडला नाही बुवा. जेव्हा जेव्हा आयुष्यात "काहीतरी मिळालं, अचीवमेंट झाली" असं वाटणारे प्रसंग आले तेव्हा तेव्हा नवीन क्षितिजं समोरून खुणावत होती. मिपावरच्या आपला जॅक डनियल्स आणि इतर काही जिवलग मित्र आहेत त्यांचे उद्योग पाहिले तर "मला का नाही जमलं हे सगळं?" असं वाटणंच जास्त. त्यामुळे हा धाग्याच्या खालीच असणार्या चित्रगुप्त यांच्या "तुम्हाला उर्वरित आयुष्यात काय करायचेच आहे" या धाग्याशी जास्त रिलेट होऊ शकतो.
रॉबर्ट फ्रॉस्टची प्रसिद्ध कविता आहे. तो म्हणतो "The woods are lovely, dark and deep. But I have promises to keep,. And miles to go before I sleep,." ही प्रॉमिसेस आपणच आपल्याला केलेली असतात. ती पाळायची असं एकदा घट्ट ठरवलं की असा प्रश्न पडत नाही.
घर आणि गाड्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता मानली तर >>आता पुढच्या आयुष्यात काय करू यार? whats next ?
असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. विचार आणि भावनांमध्ये शुष्कता आली की आयुष्याचा परिघ आकुंचतो. पण शरीराला जशी आर्द्रतेची आवश्यकता असते तशीच विचारांना आणि भावभावनांनाही आर्द्रतेची गरज असते. भरपूर वाचन, श्रवण, आकलन आणि निसर्गाच्या निकट राहणं ह्यात न संपणारं सुख आहे. घर घेतलं, गाड्या घेतल्या पण कवितेचा आनंद घेतला? आशा, लता, हृदयनाथ, भिमसेन जोशी अशा दिग्गजांच्या न संपणार्या यादीतील गायकांच्या गाण्याचा आनंद घेतला? निसर्ग माथेरान, महाबळेश्वर, कासचे पठार आणि अगदी थेट हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत नुसताच पाहिला पण समजून घ्यायचा प्रयत्न केला? ६४ कलांपैकी कुठल्याही कलेला वाहून घेण्यात आनंद शोधला आहे? निदान आस्वाद तरी १०० टक्के घेतला आहे? करायला गेलं तर आयुष्यात भरपूर आहे. बाबा आमटेंसारखे समर्पित आयुष्यही जगता येते. गरजवंतांना, अपंगांना, गरीब विद्यार्थ्यांना, रुग्णांना मदत करता येते. पुढे काय? हा प्रश्नच का पडावा? विचारांची कमी किंवा आयुष्याबद्दलचा अभ्यास कमी.
आमच्या पिढीला (५०च्या दशकातील) शिक्षण, नोकरी, घरच्या जबाबदार्या ह्यातून स्वतःचे घर उभारण्यातच पाऊण आयुष्य गेले. आमच्या पिढीच्या मागची पिढी (आमच्या आई-वडिलांची) बहुतांश आमच्यावर अवलंबून होती/आहे. पण आमची पिढी तशी नाहीए. आपल्या मुलांवर अवलंबून नाही. तुमच्या पिढीला तिशीतच सर्व कांही मिळाले ह्याचा आनंद माना, इश्वराचे आभार माना. आमच्या सारखं दैनंदिन गरजा भागविण्यात आयुष्य नाही गेलं. तरणतलावावर, पाण्यात उडी मारण्यासाठी जी लवचिक फळी (जंपींग बोर्ड) असते ती तुम्हाला लाभली आहे. आहात तिथून अजून उंच उडी मारता येण्यासाठी आवश्यक ते सर्व कांही तुमच्या जवळ आहे. मग खंत कशाकरीता? ही अभद्र हताशा कशाकरीता? मन आणि मेंदू सतत घासूनपुसून लख्ख ठेवा आणि आयुष्याचा आनंद लुटा. इतरांना तो लुटण्यात मदत करा. शुभेच्छा..!
ह्याच धाग्यावरचे म्हणून हे किमान 'तिसरे'! :)
चित्रगुप्त, इस्पिकचा एक्का नि पेठकर काका!
पटापट नावं सापडतात....
पैसाताई, रामदासकाका, पिवळा डांबिस, प्रभू सर, प्रमोद देव काका, डॉ. खरे
एकेक नाव घेतलं तर खरंच सहज मान नम्रपणं खाली झुकते.
ह्यातल्या प्रत्येकानं एका टप्प्यानंतर नवी सुरुवात करुन यशस्वी झालेले आहेत असं माझं निरीक्षण आहे. अर्थात मी तोकडा आहे ह्याची मला जाणीव आहे.
पैसाताई आज मिसळपाव वर बरंच काही एकहाती करतात. वयाच्या ४५-४७ नंतर संगणक शिकून त्यात काही करणं हे चिकाटी नि लढाऊ वृत्तीच दाखवते असं माझ्या मर्यादित अनुभवावरुन मला जाणवलंय.
आम्हाला काय करायचं ह्याचा प्रश्न पडावा???
पण एक नम्र दुरुस्ती, तू बाकी नावं घेतलीस, त्यांच्या तुलनेत मी काहीच केलं नाहीये! आणि ४५-४७ नंतर या क्याटेगरीत मी अजून नाही! इतर काहीजणांचं खरंच कौतुक आहे. तशी माझी आई सुद्धा वयाच्या ६५-६६ व्या वर्षी संगणक वापरायला शिकली. अशांचे तर नक्कीच पाय धरावेसे वाटतात!
दुसरे म्हणजे मी तरी १९९६ पासून (१० जीबी हार्ड डिस्कवाला आणि डायल अप कनेक्शन वाला का होईना) संगणक वापरते आहे. त्यामुळे मला तसा लवकरच संगणक हातात मिळाला असं म्हणेन!
चलो तीर थोडातरी निशाने पे लागला म्हणा. मुलगी नाहीतर आईतरी.
मुद्दा जिद्द नि चिकाटी हा आहे.
अजून करण्यासारखं बरंच काही शिल्लक आहे मधला.
बाकी अशा वेळी 'जरा' थंड घ्यावं पैसाताई. नको तिथे प्रामाणिकपणा दाखवू नये. ;)
असं सगळेच नम्र झाले तर झाला का आमचा बल्ल्या! :P
म्या बी थोडा प्रामाणिक रे प्यारे. :)
च्यामारी या पिढीचे असून आम्हाला नाय ब्वा कधी प्रश्न पडला असा.
हातात पण बरेच आहे करण्यासारखे. अजुन नवीन करण्यासारखे पण लै आहे. प्रयत्न पण चालु असतात.
हपिसात बसले की भाषा शिकाव्या वाटतात, एखादे नवीन धाडस करावे वाटते व्यवसायात, हॉटेलात बसले कि नवीन नवीन डिश ट्राय कराव्या वाटतात. (खायला नाही, बनवायला).
अगदि मिपावर आलो तरी मालक म्हणतात ग्राफीक करतोस रे पण पीएचपी पण शिक जरा. वल्ली म्हणतो जरा लेण्या बिण्या फिरुन येऊ. थोडा परत अभ्यास करु कलेच्या इतिहासाचा. किसना म्हणतो जरा किल्ले वगैरे तर पाहायला येत जा. बॅट्या, पैसाताई म्हणतात लिहित जा जरा कथा नायतर अनुभव. चौराकाका म्हणतात बाकी सगळं सोडा लग्न करा.
तस्मात करण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. करु सवडीने आवडीने. :)
तूर्तास व्हॉटस नेक्स्ट इस सॅमसंग ;)
>>सगळं सोडा लग्न करा...... करु सवडीने आवडीने.
हे काही रुचलं नाही राव. लवकर करा. नाहीतर आज आई-बाबा तुमच्यासाठी 'मुलगी' बघताहेत. सवडीने करायला जाल तर तुम्हालाच शेवटी कोणी 'बाई' शोधावी लागेल.
अबे सवडीनं कर. काका आपले काळजीनं सांगताहेत पण शेवटी आपलं आपल्याला ठाऊक.
(जसं कै कुणाच्या सल्ल्याने अभ्याच्या निर्णयप्रक्रियेवर कै परिणाम होणारे पण स्टिल..)
बरोबर आहे पेठकर काका. माझ्यासारख्या १९६५ नंतरच्या पिढीतील लोकाना काही प्रश्न पडतात.
माझ्या वर्गातली बहुतेक जण डॉक्टर किंवा इंजीनीयर आहेत ( थॅन्क्स टू वसंतदादा पाटील : महाराष्ट्रात खाजगी इंजी. आणि मेडीकल कॉलेजेस ना परवानगी). बहुतेक जण परदेश वारी करून आलेले आहेत्.
मात्र बरेचजणानीसंगणकावर इमेल अकाउंट उघडलेले नाही. त्याना त्यामुळे काही फरक पडलेला नाहिय्ये.
माझ्या पिढीतल्याना वाटते की आपण जुन्या नव्याच्या बरोब्बर मधेच आलो. त्यामुळे जुन्यापिढीचा आदर जपत नव्या पिढीशी स्पर्धा करत दमछाक होते. नोकरी /व्यवसायाच्या बाबतीत हे खरे असेल आमच्यावेळेला कॉलेजात सेकंड इयर ला गेल्यावर संगणक पहायला मिळाला. मात्र पुस्तके वाचण्याच्या बाबतीक अक्षरशः चैन अनुभवली आहे.
आजीबरोबर कथाकीर्तनाचा आनंद उपभोगला आहे. वडिलांचा धाक अनुभवला आहे. ( हल्ली हा प्रकार दुर्मीळ झाला आहे)
नव्या आणि जुन्या दोन्ही टेक्नॉलॉजीचा अनुभव घेतला आहे.१०७२ च्या दुश्काळात टँकर चे पाणी मिळावे म्हणून धावपळ केली आहे तसेच टबबाथ मधे अंघोळीचा आनंद ही घेतला आहे.
नव्या पिढीला कदाचित दिश्काळ वगैरे माहीत पडणार नाहीत. शहरी पिढीला तर नक्कीच नाही.
रेशन दुकानात /सोसायटीच्या दुकानात कपडे साड्या मिळताना देखील पाहिले आहेत.
माझ्या पिढीत शाळेत वर्गात कोणाकडे गाडी वगैरे नसायची. बहुतेकजण रवीवारी दुपारी मैदानात खेळत असायचे.
ज्या कोणाकडे टीव्ही असे त्यांच्या घरात चांगल्या कार्यक्रमाना शेजापाजार्याना आवर्जून बोलावले जायचे. शेजार्यांकडचा फोन नंबर आपला म्हणुन दिला जायचा
पण नव्या भराभर बदलणार्या तंत्रज्ञानाला सामोरे जाताना लोच्या झाला वगैरे कधीच वाटले नाही.
पेठकर काका तुम्ही म्हणता तसे मागची पिढी उतारवयात आमच्यावर अवलंबून आहे. आम्ही मात्र पुढच्या पिढीवर अवलंबून रहाणार नाही. ही गोष्ट देखील तंत्रज्ञानाने साध्य झालीये. मात्र मागच्या पिढीप्रमाणे आमची पिढी स्वतःचे निर्णय मुलांवर लादणे शक्य नाही हे देखील तेवढेच खरे.
मी लहान असताना एखादे चांगले गाणे पुन्हा ऐकायचे तर त्यासाठी खूप आटापिटा करावा लागायचा. रेडीओ आणि ७८ नंतर टेपरेकॉर्डर हीच काय ती मनोरंजनाची साधने होती. आवडले गाणे घे डाऊनलोड करुन हे शक्य नव्हते. एखादे आवडते नाटक/ चित्रपट पुन्हा पुन्हा बघणे शक्य नव्हते. आवडते क्षण केवल मनात किंवा कॅमेर्यातच बम्दीस्त करणे शक्य होते. तम्त्रज्ञानाने हे सध्या अगदी लहानमुलाना सुद्धा शक्य करून दिले आहे.
प्रत्येक पिढी नव्या तंत्रज्ञानाला सामोरी गेली आहे. १९३० /४० च्या तुलनेत १९६० नंतरची पिढी थोड्या वेगाने सामोरी जातेय.
मला समाधान आहे की लक्ष्यकेंद्रीत नसल्यामुळे मी बालपण भरपूर आनंदात घालवलय.
पण माझ्या पिढीतल्याना नव्या तंत्रज्ञामुळे काही लोच्या झालाय असे मात्र काही वाटत नाही.
करण्यासारखे भरपूर आहे. लहानपणी / तरुणपणी जे शक्य झाले नाही ते पन्नाशी नंतर करतायेईल. अनेक टी व्ही / रेडीओ चॅनेल्स मुळे तेंव्हा होत्या त्यापेक्षा भरपूर संधी सध्या उपलब्ध आहेत्.साधने उपलब्ध आहेत. खरेतर ही कितीतरी चांगली गोष्ट उपलब्ध आहे.
जे शिकणे स्थळकाळा अभावी शक्य झाले नाही ते आंजा मुळे सहज शक्य झाले आहे.
व्हॉट नेक्स्ट हे शोधायचे नसते तर ठरवायचे असते. तेंव्हाच ते साध्य होते.
ते साल १९७२ होते की ७५ होता नक्की आठवत नाही. मी पहिलीत्/दुसरीत असेन.पण मिलो आनि हायब्रीड ची भाकरी चाम्गली आठवतेय. पेठेत पाण्याचा टँकर यायचा तेही आठवतय. मी घरातल्यांसोबत छोट्या बादल्या कळशा भरुन आणलेल्या आठवतय
पेठकर काका अगदी शब्दा शब्दाशी सहमत.
एकंदरीत सर्वच चर्चा आवडली. किती अंगाने आपल्या जगण्याकडे बघू शकतो हे या धाग्यात्तून छान उलगडले. 'पुढे काय?' या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर पुलं म्हणतात तसं 'हे जग मी सुंदर करुन जाईन.'
लेख उत्तम आहे आणि श्री पेठकरांचा प्रतिसाद विचारास चालना देणारा !! दोन्ही आवडले
८० च्या पिढीला जन्म देणारी पिढी त्यांचावर अवलंबून नाही हे सुदैव्य ८० ची पिढी आणि त्याला जन्म देणारी पिढी digest करू शकत नसल्याने दोन्ही पिढ्यांना तापदायक ठरत आहे
interdependance हा निसर्गनियम आहे
independant होणे हा ध्यास दोन्ही पिढ्यांना लागला आहे
विचार आणि भावना यात शुष्कता आल्याखेरीज independant होता येत नाही
आधार वाटणे , आधार देणे याकरता विचार आणि भावनेत ओलावा लागतो
आपण आपल्याला काही promises द्यावयाची आणि ती पूर्ण करण्याकरता आयुष्य वेचावे हे खरे असले तरी कोणत्या प्रकारची promises द्यावयाची हे कळले पाहिजे . नाहीतर पुन्हा लोच्या !!!
माझी बायको माझ्या कारने गृहप्रवेशासाठी येईल असे म्हणणारा पुढे कार बदलण्यासाठी नोकरी करतो असे दिसू लागते . त्याच्या समृद्धीचे दर्शन होते पण वाटेकरू कोणी झाल्याचे आढळत नाही
श्री राम मनोहर लोहिया यांनी नवा राजकीय पक्ष काढला तेंव्हा महात्मा गांधीचे आशिर्वाद मागितले
गांधी म्हणाले '' या जन्मी पूर्ण होणार नाही असे ध्येय ठेव ''
भावनेचा ओलावा टिकवणे हे जन्मभराचे काम आहे !!
अमोल, जे काही लिहीलंयस, तो लोच्या तर आहेच. ह्याच पिढीतला असल्याने ट्रंककॉल ते "व्हास्सप" हा प्रवासही केला आहे. आयुष्यात एक छोटंसं वर्तुळही पुर्ण केलंय. कधीकधी "व्हॉट्स नेक्स्ट"? हा प्रश्नही येतो. पण मग कळतं, की बरंच काही बाकी आहे. (माझ्याकडे स्वतःचं घर किंवा गाडी तशीही नाहीच आहे म्हणा.. ;-) सध्या सरकारकृपेकरुन..)
बरंच काही आहे यार अजून बघायला.. एकदा आधी अख्खा भारत बघायचाय, मग जमल्यास जग.. बारीक होऊन चांगला डान्स करायला शिकायचंय.. जमल्यास एकदोन वाद्यं शिकायचीयत. वयाच्या तिशीतच जर "रोटी, कपडा और मकान"चे प्रश्न पुरेपूर सुटले असतील आणि खिशात आणि बँकेत बर्यापैकी पैसा असेल तर बरंच काही आहे की करायला.. मागे एकजण भेटला होता. पोरंबाळं शाळा-कॉलेजात होती, आणि हा पठ्ठ्या बँकेतल्या गुबगुबीत नोकरीतून एका वर्षाची "सबॅटीकल" घेऊन बाईकवर भारतभर हिंडायला निघाला होता !
वर बर्याच ज्येष्ठ मिपाकरांनी लिहील्याप्रमाणे बरंच काही आहे करायला.. आपल्या मुला-बाळांसोबत मूल होऊन शिका- शिकवा. लहानपणी ज्या गोष्टी कराव्याशा वाटत होत्या, पण पैशांअभावी करु शकला नाहीत, त्या करा.. (मी पुस्तकं वाचतोय- अगदी "फास्टर फेणे" सकट :-)) हां, आता "पैसे कमावून कंटाळा आलाय, यार.. काय सडवायचा काय त्याला?" म्हणत, जरा कुठे मोकळेपणे भटकायचा चान्स मिळाल्यावर "स्साला, हे काम सोडून जाऊ शकत नाही, यार.. इन्क्रिमेन्टचा प्रश्न आहे !" असा लोच्या असेल तर मग जाने दो..;-)
(ढिसक्लेमर : प्रतिसाद वैयक्तिक नाही.)
वरच्या लेखाशी आणि त्यातल्या निरीक्षणांशी संपूर्ण सहमत असलो तरी 'व्हॉट नेक्स्ट' हा प्रश्न खरेच पडला नाही. उलट काही गोष्टी ज्या आता करतो आहे त्या थोड्या पूर्वी मिळाल्या असत्या तर जास्त मजा केली असते असे वाटते.
उदा. चांगली दुचाकी पुण्याबाहेर सफर करायला, चांगली ४ चाकी जेव्हा आमच्या मित्रांचा ग्रुप खूप घट्ट आणि एकत्र होता (आता एकत्र आहे, प्रत्येकाची गाडी आहे पण प्रपंचामुळे तितका घट्ट नाही, नाहीतर मस्तं ४ चाकी गाडीतून हिंडून दंगा केला असता तेव्हा), गाणं शिकण्यासाठी फीचे पैसे लहानपणी न परवडल्यामुळे गाणे शिकायला गेलो नाही ते आता शिकता येणार नाही असे वाटत असूनही प्रयत्न करतो आहे.
बाकी मला मात्र नेहेमी व्हॉट नेक्स्ट च्या नेमके विरुद्ध वाटते, कायम वाटते आता परत सायकले कोकणात जाणे जमणार नाही पूर्वीसारखे कारण वेळ आणि स्टॅमिना २न्ही नाही पूर्वी सारखा. आपल्याला चांगले ४ लोकात गाता येणार नाही असेही कायम वाटते. अर्थात या सगळ्या गोष्टी टूडू मधे आहेतच. तालमीतल्या आखाड्यातला दोर २ वेळा चढून उतारायचे उद्दीष्ट अजून सिद्ध व्हायचे आहे. १००० जोर मारायचे चॅलेंज अजून शिल्लक आहे.
पुढच्या जन्मासाठी पण बहुधा बरीच मोठी टू डू असणार आहे.
बर्याच दिवसांपासून मनात घोळणारा विषय चर्चेला आल्याचे पाहून आनंद झाला. वरील काही प्रतिसाद वाचले आणि चर्चा खोलवर न जाता वरवरची चाललेली आहे असे वाटते. करण्यासारखे बरेच असते हे सगळ्यांनाच माहिती आहे हो, पण आयुष्याचे ध्येय काय?
मागच्या पिढीच्या 'सिंपलमाईंडेडनेस' बद्दल मला वाईट वाटते आणि त्यातून निर्माण झालेल्या दुटप्पीपणाची कधीकधी चीड येते. त्यांना आजच्यासारखी माहिती वा ज्ञान सहजासहजी उपलब्ध नव्हते त्यामुळे व्यापक दृष्टीकोन नसणे समजू शकते. पण त्यामुळे आमच्या पिढीचा लोचा झाला हे मात्र खरे.
माझ्या आई-वडिलांच्या पिढीने तसे गरिबीत दिवस काढले. साधं स्वतःचं घर घ्यायला चाळिशी उजाडायची आणि ते सुद्धा कर्ज घेऊन घ्यावं लागायचं. त्यामुळे भरपूर पगार देणारी नोकरी, गाडी, बंगला हीच आयुष्याची ध्येयं बनवून त्यांनी आम्हाला शिकवलं. याला फार थोडे अपवाद असतीलच पण बहुसंख्यांनी असं केलं नाही असे म्हणणे खोटारडेपणा होईल. घर आणि गाडी व्हायला फार मोठ्या कर्तृत्वाची गरज नसून उद्द्योग-धंदे करणार्यांना मुक्त अवकाश देणे फक्त आवश्यक आहे हे कदाचित तेव्हा बहुतेकांना समजले नसावे.
तेव्हा साध्या स्कूटरसाठी पाच-पाचवर्षे वाट पाहणार्या समाजात आता खुली अर्थव्यवस्था आल्याने मनात येईल तेव्हा हवे ते जाऊन घेता येते. वरती कोणीतरी म्हटले आहे की तुम्हाला तिशीतच मिळाले याचा आनंद माना; पण ते मिळण्यात आनंद आहे हे सांगणेच मुळात चुकीचे आहे हे कोणाच्या लक्षात का येत नाही? घर आणि गाडी फुकटात येत नाही, त्यासाठी किंमत मोजावी लागते. अर्थव्यवस्था खुली झाली, पाश्चात्त्य कंपन्यांना फायदा होत राहावा म्हणून अधिकाधिक स्वस्त मनुष्यबळाची गरज भासू लागली म्हणून आपल्याकडे सुबत्ता आली. पण नुसतीच सुबत्ता आली आणि बाकी काही बदललं नाही असं नाही. मागच्या पिढीने शिकवलेल्या घर,गाडी, लग्न, मुले या स्वप्नांना मिळवण्यासाठी बहुतेकांनी सौदा केला आहे. आपल्या वेळेचा. माझ्या बरोबरच्या अनेक मित्रांनी दोन-दोन घरे, दोन-दोन गाड्या घेतल्या आहेत. नवरा-बायको दोघेही नोकर्या करतात आणि मुले मात्र पाळणाघरात. आठवड्यातून एक दिवस फक्त मुलांना देता येतो. चकाचक घरात आठवड्यातले पाच दिवस नोकर माणसे फक्त राहतात. म्हातार्या आई-बापांशी तर धड बोलायलाही फुरसत मिळत नाही. वर्षातून पंधरादिवस सुट्टी मिळते तीसुद्धा शेजार्यापेक्षा आपण कमी नाही हे दाखवण्याच्या नादात महागड्या ठिकाणी सहलीला जाण्यात जाते.
बारावीला आमच्या वर्गात असलेल्या काही हुशार-मुलामुलींचे तर तेव्हाच अमेरिकेला जाणे जवळजवळ निश्चित होते. बरं अमेरिकेला जायचे ते काहीतरी भव्य-दिव्य करून दाखवायला का? तर नाही. केवळ तिथे गाडी-बंगला सहज घेता येतो म्हणून. ज्या आई-बापांनी परदेशी जाण्याची स्वप्ने दाखवली तेच आता एकाकी केविलवाणी तोंडे घेऊन बसतात स्काईपसमोर.
'व्हॉट नेक्स्ट' हा "आता वेळ घालवायला काय करायचे" इतका सोपा प्रश्न नाहीय. ज्या समाजाने भौतिक सुखाची ध्येये ठरवून दिली आणि माणसाकडच्या खेळण्यांवरून त्याची किंमत करायला शिकवली, ती खेळणी तर आम्हाला मिळालीत; पण त्या भानगडीत आम्ही एका माईंडलेस कन्झुमरिझमच्या चक्रात अडकलोय आणि त्यात काही राम नाहीय हे कुठेतरी जाणवायला लागले आहे. त्यातूनच सतत घाईचे, सतत बदलणारे आयुष्य आणि त्यातूनच हा नॉस्टॅल्जिया (आणि प्रसंगी रिग्रेशन) निर्माण झाला आहे.
लहानपणी कुठेही हुंदडताना आई-बापांनी धरून आणून ज्या उज्ज्वल भविष्यासाठी बकोट धरून शाळेत बसवलं त्या भविष्यापर्यंत आम्ही फार लवकर पोचलो आणि आता 'व्हॉट नेक्स्ट' या प्रश्नाला "जा हुंदडा" हे उत्तर अत्यंत दुटप्पी आणि क्रूर वाटते.
'व्हॉट नेक्स्ट' हा "आता वेळ घालवायला काय करायचे" इतका सोपा प्रश्न नाहीय. ज्या समाजाने भौतिक सुखाची ध्येये ठरवून दिली आणि माणसाकडच्या खेळण्यांवरून त्याची किंमत करायला शिकवली, ती खेळणी तर आम्हाला मिळालीत; पण त्या भानगडीत आम्ही एका माईंडलेस कन्झुमरिझमच्या चक्रात अडकलोय आणि त्यात काही राम नाहीय हे कुठेतरी जाणवायला लागले आहे. त्यातूनच सतत घाईचे, सतत बदलणारे आयुष्य आणि त्यातूनच हा नॉस्टॅल्जिया (आणि प्रसंगी रिग्रेशन) निर्माण झाला आहे.
+१००००००
मला वाटते जास्त मोठा प्रश्न मनोधारणेचा आहे. आताच्या पिढीला बहुतेक उंदरांच्या शर्यतीत धावणे आणि इतर उंदीर जे मिळवतात ते म्हणजे गाडी/घर मिळवणे हे आयुष्याचे ध्येय वाटते. ते एकदा हातात पडल्यावर आता काय करावं हे कळत नाही त्यामुळे ही वैफल्याची भावना दिसते. माझे वडील आणि आई दोघेही नोकर्या करत होते पण ते आयुष्यभर मध्यमवर्गीयच राहिले. उच्चमध्यमवर्गीय सुद्धा नाही. माझ्या वडिलांच्या मालकीचा एक टीव्ही किंवा फोन सुद्धा नव्हता, की स्कूटर. घर तर दूरच राहिले. घर घ्यायचा त्यांनी आयुष्यात कधी विचारही केला नाही. पण ते आताच्या तुलनेत पाहता फार समाधानी आयुष्य जगले. आयुष्य चांगलं जगणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे त्यांनी आम्हाला शिकवले. त्यामुळे मी गाडी आणि घर या दोन्ही गोष्टी घेऊ शकले आणि आता पुरे झालं असं वाटताच नोकरी सोडूनही दिली. अजूनही मला काय करावं असा प्रश्न पडलेला नाही. चित्रं काढायची आहेत, भटकायचे आहे, गाणी ऐकायची आहेत, गावाला शेती करायची आहे, आणि वर म्हटलं तशी पुस्तकं तर वाचायची आहेतच! मुलांनाही हेच शिकवायचा प्रयत्न करते आहे की घर गाडी यामुळे आयुष्य अधिक चांगलं होतं, पण त्या काही बेसिक गरजा नव्हेत. पैसे मिळवणे, त्यासाठी आवश्यक ती मेहनत घेणे यात काही चूक नाही. पण घडामोडींचा वेग नियंत्रित करणे आपल्या हातात असते. तुमची शक्ती त्यात "बर्न आउट" होता कामा नये. आपला निदान काही वेळ तरी स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी खर्च केला पाहिजे. घर आणि गाडी या गोष्टी तर होतच असतात. पण ती "बाय-प्रॉडक्ट" आहेत; फायनल आऊटपुट नव्हेत हे लक्षात ठेवलं की पुरे. शर्यतीत किती वेळ आणि कोणत्या वेगाने धावायचे हे तुमच्या हातात आहे.
प्रश्न मनोधारणेचाच आहे आणि ती मनोधारणा कशी घडवली जाते त्याने फरक पडतो. आजच्या पिढीला ते ध्येय वाटते कारण ते मिळवणार्या व्यक्तीलाच कर्तृत्ववान समजले जाताना सतत पाहिलेले असते. आजही समजा माझ्याकडे गाडी नाही तर मला मिळणार्या वागणुकीत फरक पडतो. साध्या अंगावर घातलेल्या कपड्यांवरून माणसाची किंमत केली जाते.
'घर आणि गाडी' बाय-प्रॉडक्टच काय अत्यंत अनावश्यक गोष्टी आहेत अशी माझी मनोधारणा आहे पण तिला विचारतो कोण? आज एखाद्याने नोकरी सोडून साधं दोन खोल्यांच्या घरात राहावे आणि सायकलने फिरावे असे ठरवणे म्हणजे ज्या कम्युनिटीत आजवरचे आयुष्य घालवले त्यापासून विभक्त होणे आहे.
केवळ आपण राहतो त्या आपल्या मित्र-परिवारात आपल्याला सामावले जावे, मान मिळावा म्हणून प्रत्येकाकडून हे सगळे केले (खरं म्हणजे करवले) जाते. ज्यांना नोकरी सोडूनही तसे राहणे परवडते ते तसे राहतात. ज्यांना नाही जमणार ते आयुष्यभर चक्रात फिरत राहतात.
प्रतिक्रिया
छान निरीक्षण.
छान प्रकटन
+१
क्या बात है
लोचा आहे खराच
+१११
+१
रसरशीत आयुष्य जगलेल्या नि
एक्स्क्यूज मी
अप्पलपोटा म्हणजे फक्त
त्याला निगेटिव्ह कनोटेशन आहे
*****
छान व्यक्त'व्य!
बाकी
वा
अशक्य भारी निरीक्षण! +१०००
+१११११११११
+१११११११
छान लेख
लेखन आवडलं.
कुठेतरी काहीतरी लोचा आहे खास.
कुठेतरी काहीतरी लोचा आहे खास.यात १९८० चा फार काही थेट संबंध नाही. What Next? हा प्रश्न काहींना पडतो, काहींना पडत नाही; मग ते १९८० चे असोत,१९५० चे असोत की २००० चे असोत. असा प्रश्न पडणं ही एक चांगली गोष्ट ठरु शकते :-)Whats Next ? जबरदस्त प्रश्न आहे!
Whats Next?
व्हॉट नेक्स्ट ??
मनातलं बोल्ल्लात!
याच पिढीचा प्रतिनिधी असूनही,
नवलंच वाटले....
ह्याच धाग्यावरचे म्हणून हे
धन्यवाद रे!
चलो तीर थोडातरी निशाने पे
म्या बी थोडा प्रामाणिक रे
B Serious.
लवकर करा हो काका. लगेच करतो.
अबे सवडीनं कर. काका आपले
+१ है शब्बास!
छान प्रतिसाद.
बरोबर आहे पेठकर काका.
बापरे...
ते साल १९७२ होते की ७५ होता
सहमत.
शब्दा-शब्दाशी सहमत..
छान
लेख उत्तम आहे आणि श्री
लोच्या पटला..
अगदी मान्य.....
जन्म अपूरा पडणार असे वाटते.
बर्याच दिवसांपासून मनात
'व्हॉट नेक्स्ट' हा "आता वेळ
मनोधारणा
प्रश्न मनोधारणेचाच आहे आणि ती
Pagination