Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

काय? काल रात्रीच पाह्यली अन वाचली होती. पण जीवन्रावांच्या लेखाचा पहिला प्रतिसाद तुमचा ही परंपरा राखायची म्हणुन गप्प बसले.

एक विनंती(नम्र) पुढ च्या वेळेस मला पहिला प्रतिसाद देता यावा यास्तव आपण मला मदत कराल.

शुद्धलेखनात सुधारणा , एक पण आगाऊ प्रतिसाद(आतापर्यंत ) नाही . साईची क्रुपा का ? =))

मग़ मला वाटु लाग़ले,'भारताची दशा पाहता भारताला एखाद्या संताची ग़रज आहे, काय मी त्यासाठी लायक आहे?,'
लायक आहे म्हणजे? अरे आहेच..वादच नाही. कोण न्हाई म्हंतय बघतुच म्या. १ च फाईट वातावरण टाईट करुन टाकू.हाकानाका? जीवनभौ आगे बढो.. हम तुम्हारे साथ है.. --------- शिरियस्ली.. जाहीर पाठींबा कोंकोण देनार? ---------

होऊ दे खर्च !!! नाही …तर आली जीवनला लहर आणि केला साई बाबाची गोष्ट लिहून कहर … पृथ्वी गोल आहे कारण जीवन भाईचे विचार खोल आहेत ….

म्हणजे तो घोड्याचा मालक देव होता, असं का ? की त्याला त्या वेळी तिथे येण्याची बुद्धी देणारा देव? का त्या घोड्याला वाचवायला पाहिजे असे त्याला सूचविणारी बुद्धी म्हणजेच देव? काही कळत नाहीये ओम साई राम ||

कायपणा मना जीवनभाऊच्या सयंमाच कौतुका आहे आमाला . कौतीक ठाले तथास्तु

:D (हे 'गारवा' च्या चालीत वाचायचं हां).. ताँड स्वच्छ धुऊन घे.. क्रॉसकडे बघ.. येशू दिसणार नाही.. तु संत नाहीस हे लक्षात ठेव..आता आरशात पहा.. चप्पल, पँट, घोडा सSगळं विसरुन जा.. बघ साईबाबा दिसतात का.. (आजीवन-जीवन-पंखा..)

असंबद्ध कल्पना उमटत जाणं मनाच्या सैरभैर अवस्थेचं लक्षण आहे. ते लेखनातून प्रकट होतयं. वेळीच सावरा.

मागे एक सदस्य असंच अनर्गल लिहीत असे. पब्लिक त्याच्या लेखनात गहन अर्थ असल्यासारखे प्रतिसाद द्यायचं. आणि माझ्या प्रत्येक लेखावर कंपू येऊन धडकायचा. वास्तविकात स्वच्छ मन म्हणजे क्लॅरिटी - समोर आहे ते सुस्पष्ट दिसणं आणि आजूबाजूला चाललेलं व्यवस्थित ऐकू येणं. याला कृष्णमूर्ती That which is म्हणतात. ती मनाची शांत आणि स्थिर अवस्था आहे. या उप्पर तुमची मर्जी.

वाचायचीच राहिली. बहुतेक माझ्या स्व्च्छ मनाला दिसलीच नसेल! आजपासुन मी पण बेसवाँश मध्ये धुवुन आरशात पाहणार (चेहरा!). कथा डिट्टेल कशी लिहावि ह्याचं उत्तम उदाहरण......."म्हणुन मी खाली जाण्यासाठी पँट घालु लाग़लो,चप्पल घातले व ....." जीवनभौ अहो खाली जाताना तुम्हि काय काय घालता निदान ते तरी वगळत चला हो. बाकि कथा मनाला भीडली. शी बॉ आपल्याला असं कधी (च) लिहिता येणार नाय ह्याचा प्रचंड न्युनगंड आलाय!

@जीवनभौ अहो खाली जाताना तुम्हि काय काय घालता निदान ते तरी वगळत चला हो>>> =)) ह्या ह्या ह्या =)) पूर्णपणे वारल्या गेलो आहे! =))

थोटचा शॉट देणारा चित्रपट. श्हाण्याना आवडात नाय, येड्यान्ना समजत नाय... ना मला आवडला ना समजला... एका कोलसेंटर मधे फक्त बुरखा घातलेल्या स्त्रियाच फोन घेत असतात /काम करत असतात असा प्रसंग आहे. त्यामधून सरकार कसे अल्पसंख्यांकाना हाताशी धरून जनतेला वेठीस धरते हे सिम्बोलिक्पने दाखवायचे होते असे अनुराग म्हणाला होता.(या नंतर आमची काय अवस्था जाली असेल समजू शकता, निम्या लोकांनी वेडाचा झटका येउ नये म्हणून चित्रपट मध्यात सोडला होता अन आम्ही मात्र झटका आलाहोता म्हणून बघायला गेलो होतो) असा प्रत्येक प्रत्येक प्रसंग सिम्बोलिक बनवलेला व् देर इज नो एस्केप असा संदेश देणारा हा चित्रपट आहे.

अजूनही तो प्रसंग आठवला की मनात धडकी भरते ...हात पाय थर थर कापतात .. त्या रातीच्या काळ्याकुट्ट आठवणी .... मला तर काहीच कळत नव्हता ... मोरपिसे वले बाबा .. लिंबू वाले भगत ..आणि पिचू वाले वैद्य यांनी एकत्र उपाय केले तेव्हा जरा नॉर्मलला आलो होतो .. कोणावर सूड घ्यायचा असेल तर "तो" पिक्चर दाखवा ..

माहेरच्या साडीत किशोरी शहाणे???????? तुम्हाला अलका कुबल म्हणायचे आहे का? किशोरी शहाणे त्यावेळेस मराठी चित्रपटातून बाहेर पडली होती

होती कि......अजिंक्यची आयटम होती! "काल सपना मधी माझा सजणा गं माही पप्पी घेउन गेला" हे गाणं पण तिच्यावर चित्रित झालेलं.

माझा जीवनसाहेबांच्या साहित्यसंपदेशी फारसा परिचय नाही त्यामुळे ते नेहमी कसा विचार करतात माहिती नाही. पण वरिल लेखात उल्लेखलेल्या विचारांचा संबंध बायको माहेरी गेलेली असणे या गोष्टीशी आहे का?

वैचारीक मानसाला बायको आसो किंवा माहेरी ग़ेलेली आसो काही फरक पडत नाही तुम्हाला स्थितप्रज्ञ असे म्हणायचे आहे का? पुलं च्या तुझे आहे तुजपाशी मध्ये स्थितप्रज्ञाबद्दल काकाजी काय बोलतात ते पहा.