Welcome to misalpav.com
लेखक: उद्दाम | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अनुमोदन. इतिहासाची मोडतोड करायला आणि हवा तसा प्रसिद्ध करायला प्रज्ञावंत माणुस लागतो हे मात्र मान्य.

=)) हहपुवा. मेहेंदळे हे आरेसी बांडगूळ? बरं बरं. त्यांच्या संशोधनातील एक चूक दाखवा, त्यांना फोन लावून निषेध करतो, हाकानाका. नै म्हणजे नरके, सोनवणी व खेडेकरांनी आपल्या अमूल्य बिनबुडाच्या संशोधनात काय गरळ ओकलीये त्यात काहीतरी मिळेलच की. आता होऊनच जाऊदे. मेहेंदळे कुठे चुकले ते दाखवाच. आव्हान आहे.

>>> मेहेंदळे कुठे चुकले ते दाखवाच. आव्हान आहे. त्यांचे संशोधन काय तपासायचे? त्यांचे आडनाव हीच सर्वात मोठी चूक आहे. बाकी त्यांचे संशोधन वगैरे लक्षात घेण्याची गरजच नाही.

अगदी अगदी. या ब्रिगेडींना बाकी ब्राह्मणांची भीती का वाटते हे एक न उलगडलेले कोडे आहे. मुळातला फट्टूपणा असा उघडा पडतो की काय कोण जाणे.

धन्यवाद. पण तरीही यांची बिनबुडाची पोपटपंची काही बंद व्हायला तयार नाही.

पण तरीही यांची बिनबुडाची पोपटपंची काही बंद व्हायला तयार नाही.
+१ अहो त्यांना पण माहित आहे आपण असत्य पसरवतोय ते …. पण त्यांचा उद्देशच तो आहे. याचा फटका यापुढील इतिहास संशोधनाला बसणार आहे. खासकरून मराठा इतिहासाच्या बाबतीत . एकतर जास्त कोणी यावाटेला जाणार नाहीत अन गेलेच तरी एखादा वेगळा निष्कर्ष लोकांपुढे मांडणे त्यांना ब्रिगेडी गाढवांच्या दंडेली मुले शक्य होणार नाही.

(फक्त आणि फक्त )फुले ,आंबेडकर आणि शाहूंच्या ह्या पवित्र पुरोगामी महाराष्ट्रात ,महाराष्ट्र घडवायला ब्राह्मणांनी पण हातभार लावला असे म्हणणे पण महापाप आहे ! कुठे फेडाल हि पापे तुम्ही बॅटमॅन राव ? ---- विकांतला मिपावर वावरून "उपरोधनिझम" ची लागण झालेला

म्हणजे खडी फौज बाळगणारे युद्धातून धूम पळून गेले आणि बुणग्यांची फौज बाळगणारे अतुलनीय पराक्रम गाजवून धारातीर्थी पडले! >>> आणि होळकरांनी माघार घेतली त्याआधी सदाशीवभाऊ युद्धातुन पळुन गेले होते असेही इतिहासकार मान्य करतात. हरीयाणात भाऊंचे मंदीरही आहे. जिथे ते छुपे रहात होते.ते महाराष्ट्रात पळून आल्याचेही मानले जाते. असे कोणते इतिहासकार मान्य करतात? नरके का सोनवणी का ब्रिगेडचे महान संशोधक खेडेकर्/कोकाटे? ब्रिगेडींप्रमाणे तुमचा ब्राह्मणद्वेष आता अगदी किळसवाण्या पातळीला पोहोचला आहे. सर्व कायदेशीर, बेकायदेशीर मार्ग वापरून, इतिहासाची मोडतोड करून, यांच्या श्रद्धास्थानावर प्रहार करून आणि गुंडगिरी करूनसुद्धा ही जमात नेस्तनाबूत होत नाही आणि यांची उत्तरोत्तर प्रगतीच होत आहे या वैफल्यातून आणि नैराश्यातून तुम्ही अत्यंत असत्य विधाने करत आहात. रामदास स्वामी व दादोजी कोंडदेव हे आदिलशहाचे हेर होते व स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्रिटिशांचे हस्तक होते यांसारख्या अत्यंत हास्यास्पद आणि किळसवाण्या आरोपांइतकाच भाउसाहेब पेशव्यांवरील हा आरोपही अत्यंत हास्यास्पद आणि किळसवाणा आहे.

आणि निषेध!!!!! आमचा राजे नाही तर तात्या संपादकात असते तर आत्ता पर्यंत आयडी पुर्ण ब्लॉक झालेले असते. क्रु्.ह.घेउ नये

शिंदे होळकर पुढे आणले पेशव्यांनीच. पुढे ते स्वतंत्र झाले, पण त्यांचा मुख्य पराक्रम पानिपतोत्तर काळात जास्त दिसतो. त्याआधी अहमदिया करार वैग्रे गोष्टी आहेतच, पण त्यांनी आपल्या बुद्धी अन सामर्थ्याचे विशेष दर्शन पानिपतोत्तर काळात जास्त घडवले. तोपर्यंत उत्तरेत पेशव्यांचेही वर्चस्व होतेच. बाकी पोरखेळच काढायचे झाले तर दौलतराव शिंदे, नागपूरकर भोसले, इ. चे पोरखेळही तितकेच जबरी आहेत. 'पेशवाईच्या सावलीत' नामक त्र्यंबक शंकर शेजवलकरांचा लेख वाचल्यास समजून येईल. पेशवे एकटे तेवढे गंडलेले अन बाकी सर्वच भारी हे समीकरण चूक आहे. तसे उदात्तीकरण करण्याची लाट सध्या असली म्हणून चुकीची गोष्ट बरोबर होत नाही.

घ्या. त्र्यंबक शंकर शेजवलांकडे इतिहासाची कुठली डिग्री होती? केवळ ते शेजवलकर होते या अवगुणाच्या जोरावरच त्यांचे संशोधन बाद होते. पुढचे काय बोलता?

ते बी.ए. होते :) एम.ए चा थेसिस त्यातल्या वादग्रस्त मुद्द्यांमुळे युनिव्हर्सिटीने फेरफार करावयास सांगूनही त्यांनी न केल्याने एम.ए डिग्री मिळाली नाही. इतकेच कशाला, पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्राध्यापक होते इतिहासाचे. शिवाय काही पीएचडीच्या विद्यार्थ्यांचे गाईड होते. डेक्कन कॉलेजात त्यांची खोली अजून दाखवतात. माझे स्मरण बरोबर असेल तर आरमारविषयक थेसिस एकाने त्यांच्या मार्गदर्शनाखालीच लिहिलेला आहे.

धोतरबडवी सल्ले कोणी दिले, शत्रुच्या गळ्यात गळे घालुन मराठी साम्राज्याच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला ऐन युद्धातुन कोण पळुन गेले याचीही माहिती असेलच ना तुमच्याकडे? शिवाय शिवाजी महाराजांनी स्वतःहुन फार थोड्या लढाया लढल्या त्या नात्याने त्यांना त्यांचे श्रेय मिळायलाच नको नाही का? उलटपक्षी असाही निष्कर्ष काढता येउ शकतो की " मुरारबाजी सुलतानढवा करुन स्वतःच्या जीवाची बाजी लावत होता तेव्हा शिवाजी महाराज मिर्झाराजे आणि दलेरसिंगाच्या शामियानात पुख्खे झोडत होते" किंवा " बाजीप्रभु स्वतःच्या रक्ताने पावनखिंडीत रक्त सांडत असताना 'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे' या वक्तव्याचा आधार घेउन चक्क पळुन गेले". इतिहासाचा अर्थ चुकीचाच लावायचा म्हटल्यावर काय वाट्टेल ते थुंकता येते हो.

ज्या संस्थानिकांनी इंग्रजांना साथ दिली (१८५७ वा अन्य वेळी) त्यांच्या गढ्या, वाडे आणि नामाधारी संस्थानिकपद इंग्रजांनी कायम ठेवले. याउलट ज्यांनी इंग्रजांशी पंगा घेतला त्यांची वाट लावली. एक राज्यकर्ते ह्या दृष्टीकोनातून पाहिल्यास इंग्रजांचे हे वर्तन ठीकच. परंत्, आजच्या स्वतंत्र भारतातदेखिल पहिल्या प्रकारचे संस्थानिक आजदेखिल आपल्या (तेव्हा संस्थान असलेल्या) प्रजेची आपुलकी बाळगून आहेत. उलट दुसर्‍या प्रकारचे संस्थानिक आजही दुर्लक्षितच आहेत. असे का झाले असावे?

>>> १८५७ च्या लढ्यात महादजी शिंद्यांचे वंशज इंग्रजाना समर्थ देत होते. त्यांचा स्वतःचा दिल्लीतील वाडा हा इंग्रजांचा किल्ला म्हणून वापरात होता. त्यांचे वंशज आता केंद्रीयमंत्री म्हणून दोन्ही मोठ्या पक्षांतर्फे मिरवतात. म्हणजे १८५७ पासून आजतगायत या वंशजांचे भारताचे अनहित करणार्‍यांना समर्थन दिसते.

वाचायला मजा येतेय. प्रतिसाद पुराव्यानिशी असतील तर अजून मजा येईल. दुध का दुध पानी का पानी हो जायेगा. नरके चे भाषण तू नळीवर ऐकतोय…. कोण खरे कोण खोटे देव जाणे.

शिवछत्रपतींनी एक एक माणुस देउन आनी रक्ताच मोल देउन स्वराज्य उभे केले.पुढे शंभुराजांनी असामन्य विरतेने स्वधर्माचे रक्षण करण्याकरिता बलिदान दिले,त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातुन महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा पेटुन उठला व राजरानी महाराणी ताराराणी आणी संताजी धनाजीच्या अतिव पराक्रमाने हे स्वराज्य राखले.शाहुमहाराजांच्या दुरदृष्टीने व गुणग्राहकतेने बाळाजी विश्वनाथ व महापराक्रमी थोरल्या बाजीरावांनी याचा विस्तार केला.हा सर्वगुणसंपन्न पेशवा घरातल्या मुर्खांमुळे अकाली मरण पावला.नंतर नानासाहेब पेशव्याने प्रचंड घोडचुका केल्या त्यात सर्वात महत्वाच इंग्रजांच्या मदतीने दौलतीचे हिंदुस्तानातले सर्वात प्रबळ असे आरमार बुडवले.दुसरी घोड्चुक म्हणजे मराठयांची खरी युद्धनिती म्हणजे गणिमी कावा तो सोडुन मुख्य सरदारांचा विरोध असताना बाजारबुनग्यांसह मैदानी युध्ध करावयास भाउला पाठवले.मल्हाररावांचा योग्य सल्ला भाउंनी मानला नाही हे पाणिपताच्या मानहानीचे फार मोथे कारण होते.त्यानंतर महादजीबाबा शिंदेनी अतुल पराक्रम धाडस व अव्वल दरबारी राजकारणाने नाना फडवणविस्,पटवर्धन्,होळकर ,गायकवाड, भोसले यांच्या मदतीने परत मराठा साम्राज्याची घडी बसवली. जो पर्यंत नाना आणी महादजीबाबा होते.तोपर्यंत मराठा साम्राज्यात ढवळाढवळ करन्याची इंग्रजांची हिंमत नव्हती.पण ते गेल्यावर रघुनाथरावाने पेरलेल्या नादान बिजाने सगळ्या साम्राज्याचा सत्यानाश झाला,खर तर या उतरत्या काळातही यशवंतराव होळकरासारखा महापराक्रमी विर होउन गेला पण त्याला साथ द्यायला खंबीर पेशवा नव्हता. राज्य स्थापने पासुन ते नावरुपाला येउन परत अस्तंगत होई पर्यंत मराठा असो,ब्राम्हण असो ,धनगर असो वा इतर कोनीही प्रत्येकाचा प्रत्येक गोष्ठीत काहीना काही वाटा होता.शेकडो वर्ष मोगली अन्यायाने पिचलेल्या मनात स्पुलिंग पेटवुन स्वराज्य निर्माण करण्याचे महान कार्य शिवछत्रपतींनी केले. त्याकाळी प्रत्येकाने आपपल्या परीने त्याला हातभार लावला.त्याच्यापासुन काहीतरी शिकायच सोडुन उठसुठ जातीवर जाताना लाज नाही का वाटत. च्यायला पायाखाली साध झुरळ आल तर बेंबीच्या देठापासुन बोंब मारणार्‍याची आपली लायली.कोनी राज्य केले आणी कोनी बुडवल म्हणुन आता बोंबलत बसताय होय रे,थुत तुमच्या जिंदगाणीवर....

माझ्यासाठी मराठा म्हणजे,जो या महाराष्ट्रावर प्रेम करतो तो मराठा,या मातीशी इनाम राखतो तो मराठा,आई वडीलांचा सांभाळ करतो तो मराठा,गोरगरिबांच्या मदतीला धाउन जातो तो मराठा.अन्यायाला सरळ रस्त्यावर उतरुन प्रतिकार करतो तो मराठा. एखादा कितीही बलिष्ठ असला पण अन्यायाने,बळजबरीने वागत असेल तर त्याचे थोबाड फोडायची हिंमत दाखवतो तो मराठा.जो आजच्या काळात नांगर आणी तलावरीबरोबरच लेखनी आणी तराजु सारख्याच हिमतीने पेलतो तो मराठा. मग तो ब्राम्हण,कुणबी,माळी,यनगर किंवा अगदी एखादा शेख,खान किंवा आपला पाटील-देशमुख असु द्या. या माय मराठीवर प्रेम करणारा हा प्रत्येकजण शिवछत्रपती प्रणित मराठाच होय.

पुरंधरवर लढलेला मुरारबाजी मराठा , पावनखिंडीत पडलेला बाजीप्रभू मराठा, प्रतापगड रणसंग्रामात युद्धात मुत्सद्देगिरीची शिकस्त करणारे पंताजी गोपीनाथ बोकील मराठा, एका दिवसाचा शिवाजी होऊन धन्य पावलेला शिवा काशीद मराठा, औरंग्याच्या मगरमिठीतून राजांना सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा इमानी मदारी मेहतर मराठा, शिवराज्याभिषेक करणारे गागाभट्ट मराठा, शिवभारतकार कवीन्द्र परमानन्द मराठा, 'शेर शिवराज' म्हणणारा कवी भूषण मराठा, संभाजी राजांवर पुत्रवत प्रेम करणारे बाळाजी आवजी मराठा, 'मैत्री' शब्दाला खरा जगणारा कवी कलश मराठा , १८० किल्ल्यांचे प्रभू किल्लेदार हे हि मराठाच , मराठा आरमाराच्या सीमा बुलंद करणारा दौलतखान मराठा स्वराज्याचे शिवराय,संभाजीराजे,राजाराम,ताराराणी,शाहू असे ५ छत्रपति पाहिलेले हुकुमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य हि मराठाच

इथं समोर नस्तंय ना कुणी....! सगळ्यांना लई फुरफुरतं. लिहीतात भसाभसा. डोळ्यात डोळे घालून समोर बसायची वेळ येते तेव्हा तंतरते. स्वत:चा लॅपटॉप, स्वतःचा मोबाईल, स्वतःचे हात असं असलं की स्वतःचीच लाल. उगा आवया नुस्त्या.

अनुमोदन. महाराज प्रजाप्रतिपालक असेच होते.काही लोक त्यांना गोब्राह्मणप्रतिपालक उपाधी लावुन एका विशिष्ट जातीपुरते मर्यादीत करत आले आहेत.

आयला मग अभिमान पाहिजे की.... एका मराठ्याने बामनांना पोसलं म्हनून. हायेच बामन जात बांडगुळाची. फुडं? प्रॉब्लेम काय आहे? डबल ढोलक्या च्यायला. कुणी म्हणालं म्हणून राजा तसा झाला का? त्यांनी मराठ्यांना पण पोसलंच्च की. कुणब्यांना पण पोसलं. काशिदाला पण. मेहतराला पण. भिकारचोट साले. शिवाजी महाराज तिकडं डोक्याला हात लावून बसले असतील. :(

गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस बहुजनोद्धारक प्रौढप्रतापपुरन्दर राजा श्री शिवछत्रपतीं.येथे फक्त गोब्राम्हण प्रतिपालक नसुन्,क्षत्रियकिलवंतास आणी बहुजनोद्धारक हे दोन शब्दही आहेत.त्याचाही विचार करावा.इतिहास व वर्तमान कधीच बदलत नसते.जर बदलायचे असेल तर भविष्य बदलायची तयारी करा.मी पाटलाचा पोर्,स्वतःच्या आईसाठी मागच्या सातपिढ्यात कोनी न केलेला आयुर्वेदाचा व्यवसाय स्विकारला नव्हे तो अतिशय व्यवस्थित त्यात स्वतःला सिद्ध केले.त्या साठी मला स्वतःची पाटीलकी सोडुन ब्राम्हण बनायला लागल का ?अजिबात नाही.आजच जग तलावरीवर नाही चालत हो.शिक्षणावर चालतो.असही आपल्याला साल आरक्षण नाही.मग मागच्या गोष्टी उगाळत बसुन राहण्यांपेक्षा एक तर शिक्षणाने स्वतःला सिद्ध करत प्रगती करा अन्यथा बापजाद्यांनी सोडलेल्या पिढिजात जमिनींची वाढ करा.अन्यथा आपल्या रक्तातुन आलेला राजकरणाचा व्यवसाय म्हणुन स्विकार करा.हो कारण आजकाल राजकारण हा देखिल फुल्ल टाइम बिजनेस आहे.माझे कित्येक मित्र यातुन अफाट कमाई करत आहेत.आणी येथे तत्व सांगत बसणार्‍यांना नोकरीवर ठेवा.

पडुन आपला धंदा करतोय्.अजुनही मैत्री करताना कुठे जात आडवी आली नाही. कि आमच्या घरी कोणता जातीभेद होतो.पण साले फुकाचे भिकारचोट इथे इतके बोंबलतात कि आपण खरेच इतके जातियवादी आहोत का वाटायला लागते.

हा ह्हा ह्हा....अहो 'आम्ही जातपात मानत नाही' असे कानीकप्पाळी ओरडून आरडून सांगणारी जमातच कैकदा प्रत्यक्ष आचरणात जास्त जातीयवादी असते. अन जितका जास्त हुच्चभ्रूपणा तितका जातीयवाद 'क्लास'शी निगडित करून क्लासिझम करतात, म्हणजे तितके बोटही ठेवता येत नाही वर्तनावर.