Welcome to misalpav.com
लेखक: आशु जोग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लेख छानच आहे पण थोडा धूसर वाटत आहे एका भागात लिहिण्यापेक्षा ५/६ भागात लिहिले असते तर अजून जास्ती माहिती आली असती.

हा प्रश्न युनोत नेण्यासाठी नेहरुची हतलबता का होती ह्याबद्दल नवीनच माहिती कळाली. बाकी खाजगीतले उत्तर आम्हाला पाथवली तर बरे होइल.

हं ... अजून जरा मागे फ्लॅशब्याक न्या. पानिपतच्या लढाईपत्तुर मागे जा. काही उत्तरे मिळतील .... १७६० / ६१ ला पानिपताची लढाई झाली. पेशवे हरले काश्मीरवर अब्दालीची सत्ता आली. त्याकाळात धर्मांतर झाले. पुढे १८२०-३० च्या आसपास शिखांकडे सत्ता आली. तेंव्हा काश्मिरातील मुसलमान बोलले, आम्हाला पुन्हा हिंदु करा. शीख राजानी ते मान्य केले. पण हिंदु धर्मातील ठेकेदारानी असे झाले तर आम्ही राजाला असहकार्य करु. असे सांगून ते धर्मांतर रोखले आणि मग दोन धर्मातील तेढ सदासर्वकाळ राहिली.. खरे आहे का हो हे? संस्थान विलीन करणे हे कोण ठरवत होते? हाय्द्राबादच्या निजामाला पाकिस्तानात जायचे होते. पण जनतेला भारतात यायचे होते. तिथे जनतेचा निर्णय मान्य केला. तर काश्मीरबाबत काय अवस्था होती? जनतेला कुठे जायचे होते? आणि राजाने घेतलेला निर्णय मात्र फायनल केला गेला. सैन्याने केलेले अत्याचार इ. मुद्दे कुणी काढेल तर त्याला अतिरेक्यांनी हिंदू स्त्रियांवर केलेल्या अत्याचाराचा जाब विचारावा. अतिरेक्यांना दिलासा पॅकेज, या बलात्कार्‍यांना जम्मू-काश्मीर पोलिसमधे नोकरी कशासाठी ? अग्गोबै ! किती हो तुमची आकडेवारी पक्की !!!! जम्मू काश्मीर फ्रंटवर आपली जम्मू काश्मीर बटालियन लढते. त्यात ६० % मुसलमानच असतात आणि शहीद होणार्‍यातही त्यांचीच संख्या लक्षणीय असते.. नेटवर शोधून जरा हीही आकडेवारी लिहायची की !

जम्मू काश्मीर फ्रंटवर आपली जम्मू काश्मीर बटालियन लढते. त्यात ६० % मुसलमानच असतात आयला म्हणजे ते काश्मीरी जनतेवर अत्याचार करणारे आणि मुसलमान बायकांवर बलात्कार करणारे सैनिक मुसलमानच असतात होय? नाही म्हणजे असले प्रकार तिथे होतात असे तिथले लोक म्हणतात म्हणुन विचारले.

अवो उद्दामसायेब, आपल्याला आपला अजून बराच मागे फ्लॅशब्याक न्यावा लागेल हं बर का ..... अगदी अकबरापर्यन्त, केवळ सोयीचा इतिहास नको. काश्मिरवर आक्रमण करुन ते सम्पूर्णपणे जिकणारा तो पहिला मोगल, तोपर्यन्त काश्मिरवर कोणात्याही मोगलाला पुर्णपणे सत्ता आणता आली नाही, त्याच्या राजवटीतच काश्मिरमध्ये इस्लाम फैलावला, तोपर्यन्त तरी लढाऊ काश्मिरी लोकान्नी किल्ला लढवला होता, धर्मांतर त्यानन्तर झाले तलवारीच्या जोरावर, ह्रदये जिन्कुन नव्हे हा इतिहास आहे.
१७६० / ६१ ला पानिपताची लढाई झाली. पेशवे हरले काश्मीरवर अब्दालीची सत्ता आली. त्याकाळात धर्मांतर झाले. पुढे १८२०-३० च्या आसपास शिखांकडे सत्ता आली. तेंव्हा काश्मिरातील मुसलमान बोलले, आम्हाला पुन्हा हिंदु करा. शीख राजानी ते मान्य केले. पण हिंदु धर्मातील ठेकेदारानी असे झाले तर आम्ही राजाला असहकार्य करु. असे सांगून ते धर्मांतर रोखले आणि मग दोन धर्मातील तेढ सदासर्वकाळ राहिली.. खरे आहे का हो हे? संस्थान विलीन करणे हे कोण ठरवत होते? हाय्द्राबादच्या निजामाला पाकिस्तानात जायचे होते. पण जनतेला भारतात यायचे होते. तिथे जनतेचा निर्णय मान्य केला. तर काश्मीरबाबत काय अवस्था होती? जनतेला कुठे जायचे होते? आणि राजाने घेतलेला निर्णय मात्र फायनल केला गेला
आपला अभ्यास जर पक्का नसेल तो प्रामाणिकपणे मनापासून करावा आणि हे असले प्रश्ण की दावे करुन तुम्हाला काय सुचवायचे आहे ??? स्वतन्त्र भारताने हैदराबादला एक व काश्मिरला दुसरा न्याय लावून त्यान्च्यावर अन्याय केला असे वाटते काय ??? किती हैदराबादी व काश्मिरी तुमच्याकडे त्याबद्द्ल तक्रार घेऊन आले होते ??? मला वाटते त्यान्च्यापेक्शा तुम्हालाच याचे अतीव दुखः झालेले दिसते, तुमच्या प्रतिक्रियान्चा रोख हा अतिशय कमअस्सल आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते. उथळ प्रतिसाद देवून कोणत्याही लेखाचे / धाग्याचे गाम्भीर्य कमी करू नये तसेच नव-इतिहासकार होण्याचा प्रयत्न सुद्धा. तूर्त एवढेच. विनोद१८

अवो विनोदसायेब, आपल्याला आपला अजून बराच मागे फ्लॅशब्याक न्यावा लागेल हं बर का ..... अगदी रिंचनपर्यन्त, केवळ सोयीचा इतिहास नको............. चौदाव्या शतकात कश्मिरमध्ये हिंदू राजा सहदेव याचे राज्य होते. शेजारच्या लडाखमध्ये एक बौद्ध घराणे राज्यकर्ते होते. लडाखमधील राजघराण्यातील कौटुंबिक रणधुमाळीत राजपुत्र रिंचन कश्मिरमध्ये पळून आला. सहदेवाने त्यास आश्रय दिला. लवकरच मंगोल टोळ्यांनी काश्मिरमध्ये हल्ला केला. घमासान लढाई झाली. मंगोल निघून गेले परंतु सहदेवाचा मात्र मृत्यू झाला आणि रिंचन गादीवर आला (आता रिंचन गादीवर कसा आला हे अवांतर आहे!) रिंचन याने सहदेवाचा महामंत्री रामचंद्र याची कन्या कोटाराणी हिच्याशी विवाह केला. पुढे रिंचन याने इस्लाम धर्म स्वीकारला (हे अशोकाने युद्धात विजय मिळाल्यानंतरही बौद्ध धर्म का स्वीकारला, याइतकेच गूढ आहे). आता राजानेच इस्लाम धर्म स्वीकारल्यावर प्रजेनेही मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले. मुघल येईस्तोवर बहुसंख्य प्रजा इस्लामधर्मिय झाली होती.

अग्गोबै, हे नवीनच समजले. पण खरे आहे असे वाटते. http://en.wikipedia.org/wiki/Rinchan

ते जर सत्य असेल तर ते मान्य करावेच लागेल... मी सधारणपणे काही वर्षापूर्वी एका लेखात अकबराच्या कश्मिर आक्रमणाबद्दल वाचले होते ते लिहिले, मला त्याबद्दल काही म्हणायचे नाही, इथल्या काथ्याकूटाने इतिहास काही बदलणार नाही, तुम्ही लिहिलेत तसे सुद्धा असू शकेल. परन्तु माझ्या प्रतिसादाचा रोख निराळा आहे, काही अस्तनीतले निखारे हे जाणीवपूर्वक पन्चमस्तम्भीयान्सारखे लिहितात त्याना जेथल्या तेथेच ठेचले पाहिजे असे माझे मत आहे, माझा प्रतिसाद पुन्हा वाचा म्हणजे ते लक्षात येइल. विनोद१८

जम्मू-काश्मीरच्या निवडणूकीचे काय... कसे असतील निकाल आणि अनेक प्रलंबित विषय सुटायला सुरुवात होइल का

सध्या मुझफ्फर नगर, संभाजीनगर (२/३ दिवसांपुर्वीच घडलेले रोशनगेट प्रकरण) , आझाद मैदानातील शस्त्र मुंब्र्यतून हस्तगत करण्यात आलेले अपयइ, ही प्रकरणे हॉट आहेत.

तेच तर!!! काश्मीर, बापूबाबा, नथुराम, ५५ कोटी .. हे सगळे चघळून चोथा झालेले विषय आहेत. मी http://www.misalpav.com/node/26095 इथं सगळ्याच संस्थानांची कुंडली मांडून बसलोय , तर तिथे शुकशुकाट आहे. यान्ना नुसत्या एका काश्मीरवर टीआरपी हवा आहे. :)

१.सगळी परिस्थिती समजाऊन सांगितल्या नंतर खुद्द महात्मा गांधी नी भारताचे सैन्य काश्मीरमध्ये पाठविण्यास संमती दिली होती. २.नेहरुंना mountbaten यांचेशी चर्चेत ठाम भूमिका घेणे कधीच शक्य न्हवते . कारण त्यांचे त्याच वेळी governor जनरल च्या बायकोशी प्रेमचाळे चालले होते. governor च्या गुप्तहेर जाळ्याने त्याला हि खबर दिली नसेल असे शक्य नाही. ३. नेहरू हैदराबाद राज्याच्या बाबतीत जसे वागले त्यावरून नेहरू यांची असली वृत्ती लक्षात येते.म्हणजे ते GJ च्या दबावा मूळे युनो मध्ये गेले असे मानण्याचे कारण नाही. युनो च्या security council मध्ये गेले कि general असेम्ब्लीत गेले हा फरक महत्वाचा नाही. दोन शेजारच्या राष्ट्रांचा वाद, स्वत:ची बाजू जोरात असताना, चावडीवर नेला हि त्यांची घोडचूक आहे. ४.वल्लभभाई पटेल यांना एकदा कुणीतरी विचारले कि त्यांना देशातला सर्वात मोठा राष्ट्रीय मुसलमान कोण वाटतो यावर त्यांनी एका शब्दात उत्तर दिले -जवाहर.

ब्वॉरं अजून काही मुद्दे असतील तर तेही सांगून टाका. तेवढाच टैम्पास ;)

नेहरु कोण होते हे सांगायला दुसर्‍या कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. स्वत: नेहरुनीच लिहून ठेवले आहे. By education I am an Englishman, by views an internationalist, by HEART a Muslim, and I am a Hindu only by accident of birth…' - JAWAHARLAL NEHRU

हे घ्या तुमच्या टैम्पास साठी- १. गोवा मुक्त करायचे ठरल्या नंतर भारतीय सेनेच्या तुकड्या गोव्यात शिरल्या व प्रगती करत असताना नेहरूंनी त्यांना परत फिरण्याचा हुकुम केला. तेन्ह्वा त्या तुकड्यांचे नेतृत्व करणार्या अधिकार्याने आता आम्ही अशा स्टेज ला पोचलो आहोत कि आता आम्हाला माघार घेणे अशक्य आहे असे उत्तर पाठविले आणि गोवा मुक्त झाला व भारताचा घटक होऊन प्रगती करत आहे. त्या सेना अधिकार्याने नेहरूंच्या आदेशास वाटाण्याच्या अक्षता लावल्या नसत्या तर कदाचित गोव्याचे सुधा काश्मीर सारखे भिजत घोंगडे झाले असते. या खेपेस नेहरूंच्या वर mountbaten किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा दबाव न्हवता. २. नेहरूंच्या कालखंडा नंतर सिक्कीम चे भारतात १९७५ साली निर्विघ्नपणे विलीनीकरण झाले.

येऊदे अजून!!!!! बादवे, पटेलांच्या अंत्ययात्रेला नेहरू गैरहजर हा मुद्दा सांगायचा राहिला वाट्टं ;)

नेहरु शेख माउंटबॅटन यापलिकडे काही माहिती असेल तर सांगा

इंग्रजांच्या काळात भारतात कित्येक संस्थाने होती. त्यामुळे भारताचा काही भाग संस्थानांच्या अधिपत्याखाली(Princely states), तर इतर भाग थेट इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता. जम्मू-काश्मीरचे महाराजा हरीसिंग यानी सामीलनाम्यावर सही केली आणि भारताने तो स्वीकारला तिथेच हा प्रश्न निकालात निघाला. कारण, भारत वा पाकिस्तानात सामील होताना संस्थानातील प्रजेच्या मतावर काहीच अवलंबून नव्हते. संस्थानिक हवा तो निर्णय घेऊ शकणार होते. इथेच मेख होती. यानिमित्ताने भारतात खूप अनागोंदी माजेल, जेवढी संस्थाने तेवढी भारताची शकले होतील असा इंग्रजांचा अंदाज होता. पण भारताच्या नेत्यांनी विलीनीकरणाची जबाबदारी कुशलतेने हाताळली. अगदी जंजिर्‍याच्या सिद्दीनेही हैद्राबादच्या निजामाच्या मार्फत पाकिस्तानशी संधान बांधण्याचा प्रयत्न केला होता. पण अलिकडेच निधन पावलेल्या मोहन धारीयांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या तत्परतेने जंजिरा स्वराज्यात दाखल झाला.

निवडणूकीच्या वेळी पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या जागांसाठीही भारताकडून नोटीफिकेशन जारी केले जाते

३७० कलम ही एक महत्त्वाची बाब आहेच. आज केंद्र सरकारने पारीत केलेली बिले तिथल्या विधानसभेच्या संमतीशिवाय लागू होवू शकत नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारच्या सर्व योजना दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देशाच्या इतर भागात झाला. पण जम्मू - काश्मीरमधे ३७० मुळे ते होवू शकले नाही. दुर्बल घटक म्हणजे महिला व मागास घटक.