Welcome to misalpav.com
लेखक: चौकटराजा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

काय ओ काका.. फरक फक्त तीनच? का म्हणुन हा अन्याव? लिहा की बच्चन मधे ३ अक्षरे, तेंडुलकर मध्ये ५. सचीन मधे किती, अमिताभ मधे किती? :)

बिग बी आणि टिंगू टी असे नाव हवे होते लेखाचे, पण साम्य वाचताना जाम हसायला आले. फरक वाढवता येतील नक्कीच, एक मी जोडतो, सचिन पेप्सी या शीतपेयाची जाहिरात करतो तर अमिताभ .. ते जोर का झटका धीरे से लगे कोणते?? अवांतर - प्रथमदर्शेनी वाटले अमिताभ बच्चन यांना पण भारतरत्न पुरस्कार घोषित झाला की काय.. ;)

साम्य दोघांचाही लोकसभा मतदार संघ एकच. फरक एकजण पूर्व(वांद्रे पूर्व) तर एक जण पश्चिम(विलेपार्ले पश्चिम)

अजुन एक साम्य : दोघांच्या पिताजींनी दोन लग्नं केली होती आणि हे दोघेही आपापल्या पिताजींच्या द्वितीय पत्नीचे सुपुत्र आहेत!

नितीन,अजित आणि सविता ही सचिनची सावत्र भावंडे होत(आणि मावस सुद्धा!.रमेश तेंडुलकर यांनी पहिली पत्नी निधन पावल्यानंतर आपल्या मुलांच्या मावशीबरोबरच (रजनी) लग्न केले आणि मग सचिन जन्मला असे मागे वाचले होते. तेजी बच्चन यांना अमिताभ आणि अजिताभ ही मुले झाली. अमिताभ येॅना सावत्र भावंडे होती किंवा काय हे माहीत नाही.

प्रथम अशी तुलना पटली नाही. पण चर्चा चालूच आहे तर एक फरक म्हणजे अमिताभ एका नटीच्या लफड्यात गुंतला होता. पण सचिनचे चारित्र्य वादातीत आहे.

आणखीन एक साम्य दोघेही काँग्रेसमुळे खासदार झाले .

काय कशाचे साम्य आनि कशाचा फरक? साम्य म्हणायचे तर दोघांच्या वंशाची नाळ थेट अ‍ॅडम आणि ईव्ह पर्यन्त जाते. दोघेही भारतात जन्मले. दोघेही पुरुष आहेत. दोघेही चहा पितात. दोघेही सकाळी दात घासतात. भांग पाडतात. (अमिताभ ला हल्ली विग वापरत असल्यामुळे हे शक्य होत नसेल) दोघे शर्ट प्यान्ट घालतात. दोघानाही रेखा आवडते. दोघेही श्वास घेतात, पाणी पितात, भात खातात. असे कायच्या काय वाट्टेल ते लिहीता येईल......... ( बघा अजून कोणाला सुचताहेत साम्ये) अवांतरः दोघेही सकाळी ***ला जातात. .

विजुभौ ....माझ्या पेक्षाही तुमच्याकडे येळ रिकामा अधिक दिसतोया ! काय निरिक्षण आहे !!!!! वा वा !!!! दोघांच्याही यशाची नाळ अ‍ॅडम इव्ह पेक्षाही दूर म्हणजे बिग बँग पर्यत्न जाते. ( ही ख्या ख्या करीत दुरूस्ती ! )

व्हॉट्स अ‍ॅप बाधलेल दिस्तय... काही दिवस फोन / इंटरनेट संन्यास घ्या. बघा काही फरक पडतोय का??

एक मिनिट. तुम्ही क्रिकेट आणि बुद्धीबळाची जी तुलना केली ती अमान्य आहे. बुद्धीबळाच्या एका पटावर जी लाखो व्हेरियेशन्स होतात ती लक्षात ठेवुन त्याप्रमाणे चाली करणे हे केवळ अशक्य आहे. त्यामुळे त्यासाठी जो जास्त वेळ मिळतो तो योग्यच आहे.

दोघेही मायबोलीदेखील वचत नाहीत. दोघे नवाकाळ देखील वाचत नसावेत.