Welcome to misalpav.com
लेखक: मृत्युन्जय | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात!

समजुन घेणार की लेखकाला फाट्यावर मारून हिडिसतेचा नंगानाच दाखवणार याचे कुतुहल आहे.

पण जे चांगले नाही त्याला सुध्दा छान म्हणतात. म्हनुनच लेखकावर अनावश्यक पुण्याचा उल्लेख करायची नामुष्की आली व् अमुक तमुक हिकड़े नाय आवडलं तर तिकड जाऊंन खा म्हणावे लागले. इतर शहरात असे ऑप्शन देणारे नसतात तिथे अमुक ठिकाणी छान असते असे सांगतात तेव्हां ते छानच निघते उगाच त्याच पदार्थासाठी दुसर होटेल ट्राय मारावे लागत नाही

पुण्याचा उल्लेख पुणेकर कधीही नामुष्कीने करणार नाही. अभिमानानेच करेल. मी रुढार्थाने पुणेकर नाही ते वेगळे. अनेक पर्याय देण्यामागचे कारण असे की वेगवेगळ्या चवींचे अनेक पर्याय पुण्यात उपलब्ध आहेत. प्रत्येकाने स्वतःच्या आवडीप्रमाणे निवडावे. उदाहरणच द्यायचे झाले तर मी नगरातल्या लस्सीचे दिले. मला अजिबात नाही आवडली. कोल्हापुरची फडतरे मिसळ अशीच माझ्यासाठी हुकलेली होती. त्याप्रमाणे एखाद्याला बेडेकर नाही आवडणार तर अजुन अनेक पर्याय आहेत. शक्यता आहे की एखाद्याला काहिच नाही आवडणार. पण असा एखादाच असेल.

मला असा वाद ऐकला वाचला की राहून राहून मुंबई पुणे मुंबई हा सिनुमामा आठवतो. सारसबागेतली भेळ खाताना (पुणेकर असून देखील) स्वप्निल जोशी म्हणतो : भेळ! कुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, लिंबू, कोथिंबीर.... भेळ! त्या पदार्थाला अस्मितांचे टॅग न लावता खा की! फॉर दॅट मॅटर सगळ्याच गोष्टी तशा अस्मितांचा टॅग न लावता एन्जॉय करा की! आणखी मजा येईल. आनि लई बारीक बगायचंच म्हनलं तर बाईला बी मिशा दिसत्यातच की! तेला काय शीमा हाय व्हय मग?

भेळ! कुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, लिंबू, कोथिंबीर.... भेळ! त्या पदार्थाला अस्मितांचे टॅग न लावता खा की! आयला प्यारे हेच लिहायचे होते रे. त्यासाठी एक लेख खर्ची पाडायला लागला. छ्या.

हा हा हा, नेमके!!!! उचकणारे असले की उचकवणारे भेटतातच! बरं मजा अशी की दुर्लक्षिलेलेही चालत नाही =)) धरलं तर चावतंय आणि सोडलं तरी परत जवळ येतंय =))

हाण्ण तेच्या! शंभर घाव एक तुकडा अर्धा पांगळा अर्धा वाकडा!! (गैरसमज नको, मला सौ बात की एक बात म्हणायच आहे. जरा पद्यात म्हंटल)

बालिशपणा! नगरच्या लस्सीवाल्याच्या लस्सीला नावं ठेवली म्हणून आम्हाला राग येत नाही; पण हा असला बालिशपणा पाहून करमणूक मात्र होते. :-)

हे हे हे, आम्ही दिल्लीची लस्सी उत्कृष्ट मानतो नगरची काहीच नाही त्यापुढे. अजुन पंजाबला जायचा योग आला नाही पण तिकडची अजुन बेस्ट असेल असे वाटते.

लुधियाणात ४-५ दिवस होतो तेंव्हा रोज लस्सी प्यायचो. आपल्याकडे मिळणारी आणी तिकडची लस्सी यात फरक आहे. इथे लस्सी खुप दाट असते. तिकडे तितकी दाट नव्हती. तिथल्या स्विट अन साल्टी दोन्ही मस्त वाटल्या. खाण्याच्या -(पिण्याच्या सुद्धा ;) ) बाबतीत चंगळ होती. पण एके दिवशी कांदे-पोह्यात पनीर पाहीले अन एकदाच ठरवलं की, व्हेन यु आर इन पंजाब, पंजाबीच खा. (हे इतरत्रही लागु पडावे असे वाटते) उगाच आमच्या महारष्ट्रात असले पोहे मिळतात असे सांगण्यात काही अर्थ नाही ना. ;)

पुण्याबाहेर रहणार्या मझ्या सारख्याच्या माहितीसाठी मस्तानी हा कोणता खाद्य पदार्थ आहे ते सांगाल का ?

मस्तानी हा खाद्य्/पिद्य पदार्थ आहे, घट्टश्या दुधात, कस्टर्ड, फ्लेवर, आइस्क्रीम व चवीपुरते जिन्नस टाकुन स्टृऑ/ चमच्याने खातात.. पोटभर पिण्यासाठी मात्र तुम्ही बाजीरावच हवे..

थोडे पाणचट चवीचे फ्रूट सॅलड ग्लासात भरून, त्यावर आंबट अननसाची चकती खोचून, व वर थोडी टूटीफ्रूटी उर्फ रंगीत साखरेच्यापाकातल्या भोपळ्याच्या बारीक फोडी टाकल्या, त्याला अव्वाच्या सव्वा किम्मत लावून ओव्हरहाईप केले, की जे बनते, त्याला पुण्यात मस्तानी म्हणतात.

गोपाळराव, मलाही मस्तानी आवडत नाही पण तुम्ही म्हणताय तितकी वाईट्ट नक्कीच बनवलेली नसते. उगीच नावं ठेवताना कै च्या कै नको.

पुण्यापासून शेकडो मैल लांब असल्याने सर्व वर्णने वाचून थोडा त्रास झाला पण जी खास पुणेरी तळमळ दिसली - की जे जे उत्तम उदात्त उन्नत च्या चालीवर
जे जे चविष्ट खमंग रूचकर ते ते मनापासून खा ना लेको!!
ती विलक्षण आवडली. पण तरीही नगरची लस्सी चांगलीच आहे. जरा कालमानाप्रमाणे थोडी दर्जात घसरली आहे. तरी एका विधानाचा सूड घेण्यासाठी दुसर्‍या पदार्थात पार बेगॉन (बॅगोन नव्हे) घालण्यापर्यंत जाणं हे शेवटच्या परिच्छेदाशी जुळलं नाही.. बाकी आनंदच वाटला जरा अस्सल आपल्या खाद्यकुळीतला पाहून :)

पुणेकरांना घुसडल्याबद्दल निषेध, पण आय डी नेमका आपलाच असल्याने ;) ....लेख अतिशय समतोल आणी प्रामाणीक . माझे ही होते असे , चेन्नईल एकदा सांबर, रस्सम, ईडलई ;) , वडाई ;) , दोसाई ;) आणि उथ्थप्पम खाल्ले की दुसरी कडे (अगदी जगात ) खायला जरा त्रास च होतो ....आमच्या पुनमला मिळणारी दाल -खिचडी मी बाहेर कुठे ही खावु शकय नाही .......तसेच नोएडा/दिल्ली ला गेलो की लस्सी , कुलचे , तंदुरी याची चव तोंडार रेंगाळत असते ...

चेन्नईल एकदा सांबर, रस्सम, ईडलई Wink , वडाई Wink , दोसाई Wink आणि उथ्थप्पम खाल्ले मुरुगन रे मित्रा मुरुगनची आठवण झाली. कासावीस झाला रे जीव. मला ते सर्वणा भवन एवढे आठवत नाही पण मुरुगन म्हटल्यावर जीव जातो.

आम्ही बेडेकरांची सो कॉल्ड गोड मिसळ खाउन तृप्त आहोत.
एकदम चपखल !! हेच वाटतं बेडेकर मिसळ खाल्लीकी... लेख फक्कड !!

खरयं , म्हणोन आमची चक्कर दर शनिवारी सकाळी बेडेकरांकडे ! अगदी गेल्यी जन्मीचे देणे असल्यासारखे. मधे त्यांनी कमिन्स कॉलेजच्या गलीत ब्राण्च काढली होती पण तिथे ती " अस्मिता " की कायशी नव्ह्ती ( त्यांना तुसडेपणा म्हणायचा असावा !) त्यामुळे पुन्हा गावातल्या चकरा सुरु झाल्या ! हल्ली फार महाग झालीय पण बेडेकर मिसळ ! चाळीस रुपये घेतात आणि पुन्हा स्वंय्-सेवा( शेल्फ सर्विस) पण मजा येते हां ! लेख छानच ! बा़की अस्मिता वगैरे ठीक आहे , पण बा़कीच्या गावांत चांगले पदार्थ मिळ्तात. मागे एकदा धाराशिव ( उस्मानाबाद ) ला एका मुस्लिम होटेल मधून आणलेले गुलाब जामून खाल्ले होते ! अप्रतिम ! एवढ्या दुष्काळी गावात ( तेव्हा महिन्यातून दोनदा पाअणी येते होते शहरात ) असला जबराट मेवा मिळाला ! फार प्रसिद्ध आहेत म्हणे हे गुलाब जामून.

पण सुरुवातीला जेवढा देतात तो रग्गड असतो मिसळीला. काही लोक यक्ष्ट्रा स्लाइस घेउन फुकटच्या तर्रिबरोबर हादडायचे. त्यांचा वांदा.

विटेकर साहेब 'उस्मान' असे नाव आहे त्या हॉटेल (त्याला हॉटेल म्हणणे म्हणजे मांजरीला वाघ म्हणण्यासारखे आहे)चे. बाकी तिथे बसून गरमागरम, भल्या मोठ्या आकाराचे गुलाब्जाम (तिथे असाचं उच्चार होतो) खाण्याची मजा निराळीचं.तिथे पुरी भाजी सुद्धा अप्रतिम मिळते..पुरी सोबत येणारी तिखट जाळ बटाट्याची भाजी खाल्ल्यावर रामनाथ आणि चिंचवडातला नेवाळे मिसळवाला सुद्धा लाजेल..

धन्यवाद गणामास्तर ! आमच्या बहिणाबाईनी तृप्त केले होते ते गुलाबजामुन खायला घालून ! पुरी -भाजी खाण्याची वेळ आली नाही पण रस्सा हादडयचा म्हणजे पाण्याची सोय मस्ट आहे हो !

हा मुरुगन काय प्रकार आहे? चेन्नैतच आहे की पुण्यात पण आहे??? (पुण्यात राहूनही रोज एकवेळ आंध्रा मेसमध्ये जेवून तृप्त होणारा) बॅटमॅन.

मुरुगन चेन्नैतले एक उच्च शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. तिथे केळीच्या पानावर पदार्थ वाढतात, सांबारासकट सग्ळे. सांबार चटणीसाठी वेगळ्या वाट्या नसतात. तर मिनिटाला येउन पानात वाढुन जातात. मद्रासी स्टाइलने ओरपायचे. दाक्षिणात्य पदार्थांसाठी निव्व़ळ सुख