Welcome to misalpav.com
लेखक: सूड | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

पूजा ताईंना बहुतेक एक्जाक्टली म्हणायचे असावे. त्याचे स्पेलिंग विंग्रजीतून लिहील्याने हा घोळ झाला असावा. आता यावर जर तुम्हाला परत एक्जाक्टली म्हणाय्चे असेल तर इथलाच एक्जाक्टली शब्द कॉपी-पेस्ट करावा. उगाच तो अगम्य शब्द नका लिहू. :)

पण हा अनुभव आहे की कथाकथन कळलं नाही. अनुभव असेल तर लगेच पुढचे प्रश्न तयार आहेत!

एकच अनुभव घेऊन थांबलास का? सीसीडीमधे गेलास का नाही कधी? आणखी कोणी भेटली नाही का? लाडू कधी? -क्रमशः

शक्यतो स्वत:च्या लग्नाची बोलनी स्वत: करु नये कमीत कमी नात्यातील स्थळ आले तर करुच नये, पुढचा कडवटपना टाळता येतो, बाकि आन्भव लिहलाय मस्त :-)

"का म्हणजे? मी काय खेळणं आहे का? विचारलं तुम्ही, नकार तुम्ही दिलात, परत होकार देताय" या सगळ्या अनुभवातून गेलेली असल्याने सांगते कि जेवढ्या लवकर "अरेंज लग्न " हा एक बाजार आहे हे मान्य कराल तेवढा त्रास कमी होइल. पूर्वी हा फक्त मुलींसाठी बाजार असायचा, मुलगा येउन बघून जाणार, चालून दाखव गाऊन दाखव सांगणार, आणि तो (किंवा त्याच्या घरचे) होकार नकार ठरवणार. हल्ली हा दोघांसाठी पण बाजारच आहे, किमान लग्न लागेपर्यंत तरी. तुम्ही असा विचार करा कि एखाद्या मुलीशी तुमची बोलणी चालू आहेत, तुम्हाला ती आवडलीये पण काहीही नक्की झालं नाहीये, त्याचं वेळी दुसरं स्थळ बघितलत, ती पण मुलगी चांगली आहे पण पहिली जास्त चांगली आहे, तर तुम्हाला दुसऱ्या मुलीला सरळ नकार देण्यापेक्षा थोडं लांबवत ठेवावं आणि पहिलीचा नकार आला तर उत्तर द्यावं असं नाही वाटणार का? अवांतर : नकारासाठी "योग नाही" हे एक उत्तम कारण मी ऐकलं होतं, उगाच कोणालातरी नावं ठेवण्यापेक्षा मला तरी हे कारण आवडलं :D

हे किंवा पत्रिका जुळत नाही हे कारण चांगले आहे. आमच्या मामासाठी(तो डॉक्टर आहे) मुलगी पाहून झाल्यावर आमच्या आजोबांनी पत्रिका जुळत नाही सबब योग नाही असे कळविले होते त्यावर वधूपित्याने दूरध्वनी करून त्यांना विचारले अहो तुम्ही इतके सुशिक्षित आणि पत्रिकेवर विश्वास कसा ठेवता ? इतके अंधश्रद्ध असला असे वाटले नाही. यावर आमचे आजोबा त्यांना शांतपणे म्हणाले कि त्याचे असे आहे कि आम्हाला तुमची मुलगी अजिबात पसंत नाही पण मुलीच्या मनाचा विचार करून आम्ही तसे कळविले होते पण आता तुम्ही आम्हाला शिव्या घालता तर स्वच्छ सांगतो कि मुलगी ठेंगणी आणि स्थूल आहे आणि आमच्या मुलाच्या मानाने काहीच नाही आणि मुख्य म्हणजे मुलाला अजिबात पसंत नाही. सबब आपला योग जुळणे नाही. तरीही मुलीच्या मनाचा विचार करून तिला पत्रिका जुळत नाही हे सांगावे.

@नकारासाठी "योग नाही" हे एक उत्तम कारण मी ऐकलं होतं, उगाच कोणालातरी नावं ठेवण्यापेक्षा मला तरी हे कारण आवडलं>>> या सगळ्या कारणांन्ना(खरोखर)-पुरुन,उरणारं कारण देता येत...आणी ते सर्रास देतात. ते म्हणजे (अता) पत्रिका जुळत नाही...आंम्ही त्या दुसर्‍या ज्योतिषाला दाखवली!(आणी त्याच्या कडून,पहिली "जुळणी" तोडून'ही घेतली)

एक किस्सा सांगते , आमच्या हापिसातला एक कलिग त्याने किमान ५० एक मुली पाहील्या अस्तील एकही आवडत नव्हती, हीचे काय ही काळी आहे , तिचे काय ती जाडी आहे, अमुकला चष्मा आहे, तमुक ठेंगणी आहे ,हिचे शिक्षण कमी , तिचे माझ्यापेक्षा जास्त ,अशा नानाविध कारणाने मुली नाकारत गेला शेवटी एक त्याचे आइ बाबा अन घरचे इतके वैतागले की स्थळ आले की त्याला एकट्यालाच जा म्हणायचे मुलगी पाहयला , कारण दगदग, सुट्ट्या , प्रवासखर्च इइ वैतागुन गेले होते बिचारे अन वरतुन मुलगी आपल्या दिवट्याला नाही पसंत पड्ली तर नकार कळवण्याचा अजुन एक ओझ मनावर शेवटी आइबाबानी स्पष्ट सांगितले कि नुसत दिसण्यावर जाण्यापेक्षा गुण/ संस्कारपण बघ मुलीचे शेवटी नाही - हो करत एक मुलगी पसंद पडली तर म्हणतो कसा " हिच्यापेक्षा अमुकतमुक छान होती का ग आइ ? " आइला मुलीची इत्यंभुत माहीती होती म्हणुन शेव्टी आइने पुढाकार घेउन स्थळाला होकार कळवला अन एक आठ्वड्यात साखरपुड्यातच लग्नही उरकले, आता स्वारी मजेत आयुष्य जगतेय कारण बायको खुप छान अन गुणी आहे त्याची ,आता म्हणतो ", खरेच हिला गमावले असते मुर्खपणामुळे , आता समजले आइ-बाबांनी भरपुर उन्हाळॅ पावासाळे पाहिलेत त्यांच म्हणन ऐकुन घेतल ते बर झाल ,नाय तर नुसत आपलच घोड दामटवत बसलो होतो"

निरिक्षणाने मी एक गोष्ट नक्की सांगतो , लग्नाच्या बाबतीत आई- वडिलांचा निर्णय शिरसावंद्य मानावा ! आपली(मुलगा अथवा मुलगी) नेमकी कशी आहे हे त्यांना बरोब्बर माहीत असते ! सहजीवनासाठी अत्यंत आवश्यक असे उभयताण्चे स्वभाव , आवडी - निवडी जुळायला आणि त्या १००% जुळल्या नाहीत तर ते सहन करायची आपल्या अपत्याची क्षमता त्यांना पुरेपूर ठाऊक असते. आप्ल्यापेक्शा आपण आपल्या आई- वडिलांना अधिक चांगले माहीत असतो - निदान त्या वयात तरी! अगदी प्रेम विवाह जरी केला तरी, त्यांना विश्वासात घेणे अत्यंत महत्वाचे असते. निर्णय बरोबर आला तर आपण्च सुखी होऊ.समजा निर्णय चुकला तर ते तुमच्यामागे ठामपणे उभे राहतात,कठीण प्रसंगी आपल्या माणसांसारखा आधार नाही. अयशस्वी विवाहात प्रेम विवाहांचे प्रमाण जास्त आहे असे ही माझे निरिक्षण आहे ! ( सॅम्पल फ्रोम - मध्यमवर्गीय मराठी कुटुंबे, अर्थात अपवाद असतीलच )

वीणा३ व विटेकरांशी सहमत. पूर्वी हा लग्नाचा बाजार फक्त मुलींसाठी होता आता मुलांसाठीही झालाय त्यामुळे गोष्ट पचवायला जड जातय. पूर्वी मुलांकडून दिसायला, शिक्षणाला, स्वभावाला एक चाम्गली मुलगी असली तरी दुसरी यापेक्षा चांगली मिळतीये का (काहीजण जास्त हुंडा मिळतोय का)यासाठी पहिल्या स्थळाला ताटकळत ठेवणे सर्रास असे. शिवाय मुलीच्या नाकाचा कोन इतके अंशात नाही, किंचित सावळी असली खुस्पटे काढली जात असत. चष्मा असणे हेही कारण असे. आता मुलांनाही ते ऐकून घ्यावे लागते एवढेच! मग पत्रिका जुळत नाही हे सांगणे बरे असते. घरातील ज्येष्ठांना आपल्या स्वभावाचा पुरेपूर अंदाज असतो म्हणून ते योग्य मुलगी/मुलगा आपल्यासाठी पसंत करण्याची शक्यता असते. (१०० टक्के म्हणत नाही). कठीण काळात आपल्याला नक्की कोणती मदत लागेल हे त्यांना त्यामु़ळेच समजते. सूड, दोन प्रतिसाद दिलेत तुझ्या धाग्याला. लक्षात ठेव. ;) जे काही घडले आहे हे फक्त तुझ्याच बाबतीत झालेय असे अज्जिबात नाही. बरेचदा मध्यस्थांचे कन्फ्यूजन, मोठेपणा देण्या घेण्याची गरज यात मुलामुलींची मने दुखावतात. तुझ्यासारखे हजारोजण आहेत हे लक्षात घेतलेस की त्रास कमी होईल. झाल्याप्रकारात मुलीचा दोष कितपत आहे कोणास ठाऊक? तुलाच खरे काय ते माहित. निदान फोटू तरी बघायचास. न जाणो एक खरच चांगली मुलगी मिळाली असती. तुला संसार मामीशी करायचाय की मुलीशी? यापुढे जी मुलगी आवडेल तिची मावशी चांगलीच असेल कश्यावरून?

तुला संसार मामीशी करायचाय की मुलीशी? यापुढे जी मुलगी आवडेल तिची मावशी चांगलीच असेल कश्यावरून?
हे बाकी १००% पटले.

ववसुमं आणखी कोणाला खरंखुरं वाटायच्या प्रतिसाद द्यावा म्हटलं. तर, सगळ्यात आधी लेखात नक्की काय म्हणायचंय हे बर्‍याचशा लोकांनी समजून उमजून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. या सगळ्या प्रकारात खटकलेल्या गोष्टी: १) सगळ्या प्रकरणात आपल्याला बाव्हल्यासारखं नाचवलं गेलं ही जाणीव (अर्थात होकार दिला असता तर न जाणो पुढेही तेच घडलं असतं). २) ज्या व्यक्तीचा आपण अगदी आदर करत होतो त्या व्यक्तीने असं वागणं. ३) बरीचशी सूत्र आपण हलवूनसुद्धा शेवटी माझा अपमान झाला हे सांगत सुटणं. बरेच लोक म्हणले की मुलीचा फोटो बघायचा कदाचित पसंत पडली असती, झाला प्रकारच इतका मनस्ताप देणारा होता की आता ती मुलगी अगदी मदनाची पुतळी असली तरी नको असं झालं होतं. नकार पचला नाही असंही काही जणांचं मत पडलं. जसा मला नकार द्यायचा अधिकार आहे तसा तो समोरच्या व्यक्तीलाही आहेच की!! आपलं दिसणं, कामाचं स्वरुप, उत्पन्न, कौटुंबिक पार्श्वभूमी असं काहीही खटकू शकतं समोरच्या व्यक्तीला. ते खटकणं मनात न ठेवता सरळ नकार द्यायला गट्स लागतात ज्या त्यांनी सुरुवातीला दाखवल्या, त्यात काहीही वावगं नव्हतंच. प्रश्न हा होता की एकदा नकार आणि पुन्हा अगदी दोन दिवसांनी होकार. ज्याचा अर्थ ती मंडळी स्वतःच्या निर्णयावर ठाम नाहीत. न जाणो ह्या डळमळीतपणामुळे त्यांनी अगदी लग्नाच्या आदल्या दिवशीही मत बदललं असतं. आता त्यांनी दिलेला नकार कोणीही पचवायचा पण त्यांना कोणाचा नकार पचनी पडत नसेल तर मग काय म्हणावं. असो. झाला प्रकार एकंदरीतच हात दाखवून अवलक्षण पैकी होता. जे यातून गेलेत, जे जातायेत सगळ्यांचेच प्रतिसाद उपयोगी पडतीलच!! धाग्याचं काश्मीर न करता समजून उमजून प्रतिसाद दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. इति लेखनसीमा!! :)

पंत अहो मुलीचा काय दोष होता त्यात ? फोटो बघुन , भेटुन ती स्वतहा स्वताहाच्या मतावर किती ठाम राहु शकते हे बघायचं होततना गावाला एवढं महत्व कशाला देत बसायचं

पुजा इज राइट ! अहो कधी कधी आपण ईतरांच्या( अती) हस्तक्षेपामुळे मुलीचा अथवा मुलाचा काही दोष नसताना सरळ बघण्याआधी नकार कळवतो जे चुकीच आहे अशाने बरीच चांग्ली स्थळ हातची जातात . ( स्वानुभवानी शहाणी झालेली पियु )

प्रतिसादही धाग्या इतकेच रोचक आहेत; पण एखाद्याने एखादा निर्णय घेऊन कृती करून झाल्यावर तू असं करायला नको होतं असं म्हणणे मला थोडंसं क्रूर वाटतं. उगाच त्या माणसाच्या मनात चुकचुक होत राहते. कथानायकाने जे केलं ते योग्यच होतं.