Welcome to misalpav.com
लेखक: जॅक डनियल्स | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तुम इधर कभी आनेवाला है.... मस्त लेख... हे साले असले काही वाचायला मिळते म्हणून तर मिपा आहे... जिओ...

इथे नागीणऐवजी धामण हा शब्द खरा शोभला असता असे माझे मत आहे. धामण आजपर्यंत कधी स्वतः पकडायच्या भानगडीत पडलो नाही. (माझ्या वजनाचे रहस्य ;) कोण एवढी धावाधाव करणार ना! :-)) ) आणि कशाला पकडायची म्हणा. बिनविषारी, सो एकदम सेफ. तिचा तो अशक्य चपळपणा आणि विशेषतः जाळीदार नक्षी असलेली शेपटी बघतच रहावीशी वाटते. काय ती अदा आणि काय तो वेग. बैठकीच्या लावणीत बाईंनी फेकलेला कटाक्ष किंवा जगजीतच्या गझलेतील कातर तान... बस. काहीकाही साप खरंच प्रचंड सुंदर असतात. धामण, तस्कर, उडता सोनसर्प, घोणस हे आपल्याकडचे साप फार आकर्षक दिसतात. आमच्याइकडे धरणात पोहताना कित्येकदा ही अगदी जवळून सळसळत जाते तेव्हाही नवख्या माणसाची भीतीने पाण्यातच उडणारी गाळण पाहून धो धो हसायचोही. उंदरांचा काळ आहे धामण. पण माणसांना ते कळत नाही. दरवर्षी उंदीर २०% अन्नधान्याची नासाडी करतात. वर शैलेन्द्र यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच धामण आणि घुबडांचे आभार मानावेत तेवढे कमीच. माणूस एवढा आंधळा झालाय की निसर्गातील त्याचे मित्र संपवत चाललाय आणि पर्यायाने शत्रू मात्र ढीगाने पैदा होताहेत. पण त्याला त्याची पर्वा कुठली. असो. बाकी तुमचा लेख कसा झालाय हे सांगणे बंदच करत आहे कारण माझ्याकडील शब्दसंग्रह संपुष्टात आला आहे. पण जेडी, तुम्ही एकतरी लेख माझ्या सर्वात आवडत्या सापावर, सापांमधल्या तेंडल्यावर म्हणजे नागराजावर लिहा अशी आग्रहाची विनंती.

हो नक्की लिहीन, मला स्वतःला त्याचा अनुभव नसल्यामुळे लिहायचे टाळत होतो. पण माझा पण आवडता साप असल्यामुळे नक्की टाकीन लेख.

साप बिनविषारी म्हणून बिनधास्तपणे पकडायला जाऊ नये. कारण बिनविषारी साप सुद्धा चावतात आणि ते स्वसंरक्षणासाठी करकचून चावतात. बिनविषारी सापांना दात असतात ते चावण्यासाठी नव्हे तर भक्ष्य तोंडात घट्ट धरता यावे, पळून जाऊ नये यासाठी. शिवाय नाग आणि धामण यातील गल्लत जीवावर बेतू शकते. मुळात आपण उंदीर तरी हातात पकडतो का? कारण तो पण करकचून चावतो. मी परत हेच म्हणेन कि साप म्हणू नये धाकला.

सेफ म्हणजे नाही पकडला तरी तिथल्या लोकांना त्यापासून काही धोका नाही अशा अर्थाने म्हणायचे होते मला. बाकी उगाच परिस्थितीची गरज नसताना निसर्गात हस्तक्षेप करू नये हे खरंच आहे.

सापाचे विष हे एक प्रथिनांचे मिश्रण असते. घोणस आणि फुरसे या जातीच्या सापाच्या विषात एक तर्हेची विकरे(enzymes) असतात जी आपल्या उतीच्या मधील संयोजक/बांधक (सिमेंट)ला अक्षरशः वितळवून टाकतात.त्यामुळे आपले स्नायू, रक्तवाहिन्या, सांधे इ ला भोके पडून अंतर्गत रक्तस्त्राव होतो. तसेच नाग आणि मण्यार यांची विषे सुद्धा एक तर्हेची प्रथिने असतात जी आपल्या मेंदूकडे आणि मेंदूकडून येणाऱ्या संदेशवहनात अडथळा आणतात. त्यामुळे शरीराच्या अवयवातून मेंदूकडे संदेश जात नाही आणि मेंदूकडून श्वसन आणि हृदयाला जाणारे संदेश बंद झाल्याने माणूस श्वास घेऊ शकत नाही आणि बेशुद्ध पडून मृत्यू मुखी पडतो. हि प्रथिने अगदी थोड्या प्रमाणात( ज्याने घोड्याला फारशी इजा होणार नाही) घोड्याला टोचतात. घोड्याचे शरीर या प्रथिनांविरुद्ध प्रतिद्रव्य/ प्रतिपिंड(ANTIBODY) तयार करतात. हळू हळू त्या विषाचे प्रमाण वाढवत नेतात म्हणजे घोड्याच्या शरीरात(रक्तात या प्रतिद्रव्य/ प्रतिपिंड चे प्रमाण वाढू लागते. या नंतर घोड्याचे रक्त काढून त्यातील लाल आणी पांढर्या पेशी रक्तद्रवापासून(प्लास्मा) वेगळ्या काढतात आणी घोड्याला परत करतात. उरलेल्या रक्तद्रवाचे बाष्पीभवन करून तयार झालेले चूर्ण/पूड हि प्रतिविष म्हणून बाटल्यात भरून पाठवले जाते. जेंव्हा एखाद्या घोड्याला केवळ एकाच तर्हेच्या सापाचे( उ. फक्त नागाचे) विष टोचून प्रतिपिंड तयार करतात त्याला monovalent (एकसंयुजी) प्रतिविष म्हणतात. हे केवळ त्याच जातीच्या सापाच्या विषबाधेवर वापरता येते. पण जर घोड्याला वेगवेगळ्या जातीच्या सापांची विशे थोड्या थोड्या अंतराने टोचली तर घोडा त्या सर्व सापन्विरुद्ध प्रतिविष तयार करतो. आणी अशा घोड्य़ापासून तयार केलेले प्रतिविष तेवढ्या जातीच्या सापांच्या विषबाधेवर उपयुक्त ठरते.याला polyvalent (बहु संयुजी) प्रतिविष म्हणतात. भारतात नाग, मण्यार, फुरसे आणी घोणस हे चार विषारी साप बहुतेक सर्पविष बाधेस जबाबदार असल्याने भारतात मिळणारी बहु संयुजी सर्प विष प्रतीबंधके हि या चार सापावर उपयुक्त ठरतील अशी असतात. जेंव्हा रुग्णाला कोणता साप चावला आहे ते माहित नसते किंवा डॉक्टर ला त्याच्या माहितीबद्दल संशय असतो तेंव्हा असे बहु संयुजी प्रतिबंधक वापरले जाते.

>>>भारतात नाग, मण्यार, फुरसे आणी घोणस हे चार विषारी साप बहुतेक सर्पविष बाधेस जबाबदार असल्याने पकपकपकाक नावाच्या चित्रपटात नाना पाटेकर भारतात सापडणार्‍या विषारी जाती पाच म्हणतो. टीपिकल नाना स्टाईल.... नाग, मण्यार, फुरसे, घोणस आणि माणूस!

धन्यवाद् डॉ.! खूप मस्त आणि सोप्या शब्दात माहिती दिली आहे, मला स्वतःला जास्त प्रतिविष विषयी जास्त शास्त्रीय माहिती नाही, त्यामुळे तुमची माहिती खूप उपयोगी पडते आहे.

>>>> " बिनविषारी साप- वेळ आली की विषारी बनतात का ?" असे फक्त मनुष्यजाती मध्येच घडू शकते. हे भारीच.....

जॅक, ति साप पकडायची काठी विकत कठे मिळेल , माझ्या भावाच्या घरी खुप साप निघतात, एक प्राथमिक गरज मह्णुन घ्यायची आहे.

सर्वच साप कात टाकतात, ती निसर्गाने दिलेली त्यांना देणगी आहे. सरपटणारे प्राणी असल्यामुळे अंगावरची कातडी मध्ये काही अडकून किंवा त्याला काही संसर्ग होऊन जीवास त्रास होऊ नये म्हणून ही देणगी दिली असावी.

सापाची कातडी(त्वचा) हि अतिशय लवचिक असते.साप त्वचेवरच सरपटत असल्याने या लवचिकतेची आवश्यकता असतेच . सततच्या वापरण्याने या त्वचेचा लवचिकपणा कमी होतो. त्वचेची ताणले जाण्याची क्षमता परीसीमेला पोहोचली कि त्वचा त्याहून अधिक ताणली जाऊ शकत नाही. फार ताणला गेलेला मोजा जसा ढिला किंवा लेचापेचा होतो तशीच या जुन्या त्वचेची गत होते. मानवी त्वचे सारखी ती सूक्ष्म प्रमाणात झडून जाऊन नवीन त्वचा येत नाही तर आतमध्ये संपूर्ण नवी त्वचा आलेली असते. त्यामुळे साप जुन्या त्वचेला डोक्याजवळ घासून एक भोक पाडतो आणि त्या भोकातून एखाद्या बिळातून बाहेर पडल्यासारखा बाहेर पडतो. त्यामुळे एखादे वेळेस आपल्याला डोक्यापासून शेपटी पर्यंत अक्खी कात दिसते. तसेच सापाची वाढ झाल्याने त्याचे अंग आतमध्ये आखडले जाते.त्यामुळे पिल्लाची वाढ होत असताना त्याला जास्त वेळा कात टाकावी लागते. आणि पूर्ण वाढ झालेला साप कमी वेळा कात टाकतो. पहा MOULTING -http://en.wikipedia.org/wiki/Moulting जुनि त्वचा टाकून देण्याच्या अगोदर त्याची लवचिकत कमी झाल्याने साप मंदगती होतो आणी निस्तेज व अनाकर्षक दिसतो. आणी तेच कात टाकल्याने तो चपळ तजेलदार आणी चमकदार दिसतो. म्हणूनच मराठीत एखाद्या गोष्टीचा काया पालट झाला असे आपण म्हणतो किंवा त्याने कात टाकली म्हणतो.

नेहमीप्रमाणेच छान लेख! पुढील भागाची वाट पाहतो. धामण आणि नाग यांतील फरक कसा ओळखावा, ही माहिती अपेक्षित आहे. धन्यवाद!

निमविषारी साप पण असतात का? http://www.loksatta.com/vruthanta-news/new-snake-in-sanjay-gandhi-national-park-279935/ या लेखात मांजर्‍या हा साप निमविषारी असल्याचा उल्लेख आहे म्हणून

निम विषारी साप म्हणजे जे चावल्यामुळे चावलेल्या भागाला सूज वगैरे येते पण त्यामुळे माणूस मरत नाही. त्यामुळे अशा सापाच्या चावल्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयात देखरेखीसाठी चोवीस तास पर्यंत ठेवतात आणी विषबाधेची कोणतीही लक्षणे कमी झाली कि औषधोपचार करून घरी पाठवले जाते.