Welcome to misalpav.com
लेखक: गजानन५९ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तुमचं प्रवास वर्णन पाठवा त्यांना. एका अतृप्त आत्म्याचा प्रवास वाचून कदाचित ते तृप्त होतील.

आत्माजी खरे तर मला तुमची मदतच लागणार आहे ( आणि हे खूप गंभीरपणे सांगत आहे मी, बाकी तुमची मर्जी )

आशा करतो कि माझ्या प्रतिसादानंतर तरी तुम्हाला माझ्यातील तळमळ जाणवेल :(

गजानन 59, तुमची आधिची कथा थरार चा दुसरा भाग का नाही टाकला ? ति आणी ही दोन्ही कथेचे वातावरण एकच दिसतय .

तथास्तुजी बरोबर आहे तुमचे पण पाहिजे तसे सुचतच नाहीये ( अर्धा भाग तयार आहे पण...) त्यामुळे जेव्हा सुचेल तेव्हा टाकेल नक्की. बाकी आत्ता जे मी लिहिणार आहे ती कथा नाहीये त्यातील बरेचसे खरे आहे पण मी वर बोलल्याप्रमाणे त्यामागे नक्की काय कारण आहे हेच मला जाणून घ्यायचे आहे खूप विचार करूनच हा धागा इथे चालू केला आहे ( गेल्या दीड वर्षात २ जवळच्या व्यक्ती मला सोडून गेल्या आहेत) त्यामुळे हा धागा माझ्यासाठी फ़क़्त एखादे समोरच्याचे मनोरंजन करायचे साधन नाहीये उलट काही गोष्टींचा उलगडा मला होऊ शकतो ( जर माझ्या डोक्यात मी काही खुळचट गोष्टी भरून घेतल्या असतील तर)

गजानन५९ साहेब, तुमच्या लेखाच्या प्रतिक्षेत आहे. नक्की तुमचे अनुभव लवकर येऊ द्यात. त्रयस्थ व्यक्तिने ते अनुभव वाचले तर ते तुमच्या अनुभवांची कारण मिमांसा अतिशय अचुकपणे करु शकतील. व उपाय सांगु शकतील.

नक्की निश, तुम्हाला एक संगी इच्छितो खरे तर मी काही लेखक नाहीये त्यामुळे अनुभव शब्दबद्ध करताना खूप अडचणी येत आहेत आणि बराच वेळही लागत आहे ( माझा तोच प्रोब्लेम आहे मनात जे असते ते नेमकेपणे उतरवणे कधी जमलेच नाहीये मला ) तरीही लवकरच पुढील भाग टाकू शकेन असे सध्यातरी वाटत आहे,

गजानन५९ साहेब, जे मनात असेल तेच लिहायच असेल तर आधी जे मनात आहे ते लिहायची वेळ यायच्या आधी जे मनात आहे ते तुम्ही ऐका कागदावर संक्षिप्त स्वरुपात लिहा. म्हंजे थोडक्यात मुद्दे काढा व जेव्हा तुमच मन आनंदी असेल व लिहावस वाटत असेल तेव्हा त्या मुद्दांच सविस्तर लेखात विस्तारीकरण करा.

अनुभव लिहुन टाकाच त्याशिवाय मनाची तगमग कमी होणार नाही,लोक हसतील याचा विचार करु नका,मन मोकळे झाल्याने कदाचीत शान्तता मिळेल मनाला असे वाटते.

+१ काय असेल ते लिहून मोकळे व्हा! 'नंतर' भटकत राहील ना त्या अतृप्त आत्मा सारखा तुमचा आत्मा पण! - लायटर (हलका नि पेटवणारा पण ) मोड

च्यायला ह्या आत्म्याला तर काही कळतच नाही. अरे त्यांनी लिहू दे का नको???????? का न लिहीताच.......????? प्रोस्ताहन म्हणतात त्याला प्रोस्ताहन. (येसवायजी तो शब्द बरोबरच लिहीलाय. ;) तुमच्यासाठी काय पण! ) समजलं?

नक्कीच आपण विवंचना करत असणार. कोणीही प्रिय व्यक्ती अकस्मात असे नाहीशी होणे मनाला मोठा धक्का देऊन जाते. दुःख, नैराश्य, अस्थिरता , भीती, क्वचित प्रसंगीआपण काही करू शकलो असतो काय असा अपराधी पणाची विचीत्र टोचणी निर्माण करणारा अनुभव व् टाळता न आलेल्या क्लेशदायक घटनेने निर्माण होणारे प्रश्न...प्रश्न अन फक्त अनुत्तरित प्रश्न व्यक्त करण्यात कसलाही संकोच नको.

तुम्ही निवांत लिहा हो, आम्ही गंभीरपणे वाचू. विज्ञानवादी असल्यानेच अगदी ओपन माईंड ठेवून वाचू. कारण ह्या जगांत अनेक अतर्क्य गोष्टी आहेत यावार माझाही विश्वास आहे. इथे थोडीफार चेष्टा होईलही, पण मनावर घेऊ नका. इथली मंडळी तशी चांगली आहेत. - (अनुभवी सदस्य) तिमा उर्फ तिरशिंगराव माणूसघाणे

चेष्टेला किंवा गमतीला मी नाही घाबरत हो मालक, पण साला वाईट इतकेच वाटते कि मिपावरील सदस्यांना (सरसकट बोलत नाहीये मी) गंभीर विषयसुद्धा चेष्टेवारी घ्यायचे कारण मात्र मला समजले नाही कारण मी वरती २/३ दा विनंती सुद्धा केली कि मंडळी मला इथे गंभीरपणे काही गोष्टी मांडायच्या आहेत वाटल्यास त्या मांडल्यानंतर माझी खिल्ली उडवली असती तरी चालले असते पण विषय पूर्ण व्हायच्या आधी इतका गोंधळ आणि इतका बालिश पणा? हे म्हणजे खूप अति झाले हो मंडळी. असो बाकी कुणी कुणाला काय प्रतिसाद द्यावा ह्यावर कुणाचे बंधन नाही हे मलाही मान्य आहे पण ज्या सदस्यां विषयी मनात आदर होता त्यांनी पण असे वागावे ह्या उपर दुखं ते काय. आता इथे मी माझे अनुभव मांडले काय अन नाही काय काही फरक पडणार नाहीये आणि हे मी मनात कुठलाहि कटूपणा न ठेवता बोलत आहे.

सहमत आहे. अहो इतकेच काय, प्रामाणिक मत व्यक्त केले तरी चांभारचौकशा करून पगार काढणारे दांभिक लोकही याच मिपावर आहेत. इतरवेळी मारे आध्यात्मिक डोस पाजतात, पण वेळ आली की पितळ उघडे पडते.

माझं नाव लिहीलंय म्हणून. मी माझा पहिला प्रतिसाद काय लिहीलाय ते वाचता का एकदा? इथे प्रतिसाद न देत बसता तुम्ही तुमचे अनुभव टाका. वाट पाहत आहे. असं लिहीलेलं. त्याचं काय झालं? तुम्ही लेख लिहा की. लोकांना आवडेल तरी नाहीतर नाही आवडणार तरी. तुम्ही लेख न लिहीता आम्ही वाट पाहत बसावी अशी अपेक्षा असेल तर आम्ही 'अशा' प्रकारे वाट बघत बसलोय.

इथे प्रतिसाद न देत बसता तुम्ही तुमचे अनुभव टाका >>>>>>>>>>>>>>>> @ प्यारे जी इथे प्रतिसाद द्यायचा कि नाही द्यायचा हे मला ठरवू द्या हि विनंती आहे तुम्हाला तुम्ही लेख लिहा की. लोकांना आवडेल तरी नाहीतर नाही आवडणार तरी. तुम्ही लेख न लिहीता आम्ही वाट पाहत बसावी अशी अपेक्षा असेल तर आम्ही 'अशा' प्रकारे वाट बघत बसलोय. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> मला वाटते कि मी वरती कंसात जे लिहिले ते तुम्हाला दिसले नसावे अथवा दिसून न दिसल्य्प्रमाणे करीत आहात मी वर स्पष्ट लिहिले आहे कि मी हे विधान सरसकट नाही केलेले ज्याला लागायचे त्याला लागेल कि मामा तुम्ही का त्रागा करून राह्यलाय ? आणि मी आधीच स्पष्ट केले आहे कि मी काही लेखक नाहीये मी इथे फ़क़्त काही गोष्टी सांगला आलो आहे तुम्हाला आणि त्या तुम्ही कशा ऐकता ते तुम्हालाच माहित चांगले नाही का ? आणि तुम्ही कशी का वात बघाना मला काही त्याचे सोयरे सुटक नाहीये बाकी इतका प्रतिसाद बास आहे तुम्हाला नाही का ?

कन्फ्युजन कन्फ्युजन! तुम्ही माझं नाव घेतलं ना दादा? म्हणून मी बोललो. इथे कालापव्यय न करता लेख शांतपणे लिहावा असं म्हणायचं होतं. बाकी आपली मर्जी. लेख चांगला वाटला तर प्रतिसाद मिळेलच. बाकी चालू द्या.

नाही हो प्यारेजी मिपावर आत्ता जरी मी दिसत असलो तरी खूप दिवसांपासून मी मिपावरील उत्तम लेख, साहित्य वाचत आलो आहे (उदा- स्पा/ इस्पिक एक्काजी/ जयंत सर/ आत्माजी यांचा करंट मिसळ लेखाचा तर मी पंखा आहे/ गवी दादा असे बरेच आहेत ज्यांचे लेख मनाला आनंद देत आले आहेत, आणि येथील चर्चे मधून ( म्हणजे मिपाव्कारांच्या ) इथल्या खेळकर वातावरणाचा अंदाज पण आहे मला पण मनस्थिती ठीक नाहीये म्हणून २/४ उणे शब्द बाहेर पडले बाकी तुम्ही मनात काही ठेवू नका मी पण नाही ठेवत. बाकी तुमचे हि चालू द्या ( खरा मिपावकर होत आहे मी पण बहुतेक साला )

तुमचे अनुभव असतील तर तसे स्पष्ट सांगा म्हणजे मस्करी होणार नाही आणि शक्य असेल तर निदान भावनिक आधाराची मदत तरी कोणी करू शकेल. तुमच्या प्रतिसादांवरून तुमची मनस्थिती ठीक नाही असे वाटले. जवळच्या माणसाच्या जाण्याने माणूस सैरभैर होतोच. त्रास होणार असेल तर जरा थांबून लिहा पण मनातलं मनात कोंडून ठेवू नका.

आत्म्याचा प्रवास कुणालाच उलगडून सांगता आला नाहीये, माणसाचे मृत्युनंतरचे जीवन अथवा आपण असे म्हणू कि त्याचे मृत्युनंतर नक्की काय होते हेही कुणाला सांगता आलेले नाहीये, मग बरेच जण आपल्या कल्पनेचे वारू सैल सोडतात आणि बऱ्याचदा अशा गंभीर विषयाचा विचका होतो.
काही अंशी हे बरोबर अहे. प्रत्यक्ष अनुभव नसताना किवा कशाची माहिती नसताना कल्पना करून , ह्याच्या त्याच्या सांगण्यावरून हे लोक मनोरंजनात्मक काहीतरी लिहितत. परंतु हिराभाई ठक्कर याचं 'मृत्युनंतरचे जीवन' ह्यात लिहिलेल्या गोष्टी खर्या वाटल्या. परमहंस योगानंद च 'योगी कथामृत ' ह्या पुस्तकात युक्तेश्वर जी पार्थिव देहाचा त्याग केल्यावर पुन्हा येतात आणि मृत्युनंतरच्या प्रवासाचं वर्णन करतात . देवी भागवत , एकनाथी भागवत मध्ये मृत्युनंतरच्या जिवनाच वर्णन अहे. दिल्लीहून प्रकाशित होणार्या 'कल्याण ' नावाच्या मासिकात उच्च कोटीच्या साधकांनी त्यांचे अनुभव लिहिले आहेत हि सगळी पुस्तके काल्पनिक गोष्टींवर आधारलेली नहित. त्यामुळे माझा ह्या गोष्टींवर पूर्ण विश्वास अहे. आपण जरूर पुढचा लेख लिहा . अजूनही प्रतिक्रिया द्यायची आहे पण पुढचा लेख वाचल्यावर देईल . अनिरुद्ध प च्या मताशी सहमत