Welcome to misalpav.com
लेखक: बाप्पू | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

फार ज्ञान नाही इतिहासाचं मला, त्यामुळे पाजळणार नाही. पण लई भारी काहीतरी झालं असतं संभाजी महाराजांना उदंड आयुष्य लाभलं असतं तर.

जर संभाजी राजे जर पकडले गेले नसते तर राजाराम छत्रपति झाले नसते आणि महाराणी सोयराबाईची इच्छा अपूर्ण राहिली असती . बाकी स्वकीयांनीच (त्यांचे सक्खे मेव्हणे गणोजी शिर्के) शंभू राजांना पकडवून दिले . मात्र कोकणातून देशावर नेत असता त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत असेच दिसते. यामागे स्वराज्यातील दुही तर नसावी अश्या प्रकारची चर्चा आंतरजालावर मागे वाचली होती. थोरले महाराज हयात असतानाच शेवटी दरबारामध्ये शेवटी संभाजी राजे आणि सोयरा बाई / राजाराम अशी विभागणी झाली होती. पूर्वी संभाजी राजे एकदा स्वराज्याविरुद्ध मोगलांना जावून मिळाले होते यामुळे सुद्धा काही दरबारी त्यांच्या विरुद्ध होते.जगातील इतर सत्तांप्रमाणेच स्वराज्यामध्येही भाऊबंदकी उफाळून आली होतीच.

संभाजी राजना दगा-फटका झाला, ते कैद झाले. भावनेच्या वश न जाता स्पष्ट म्हणेल -ज्या राजाची गुप्तचर यंत्रणा कुचकामी असेल, जो आपल्या विरोधकांविरुद्ध षड्यंत्र करून त्यांना नष्ट करण्यास कचरत असेल (सख्खा भाऊ का असेना) तो राज्य सुख भोगू शकत नाही. म्हणून म्हंटले आहे. गरुड हा पक्ष्यांचा राजा होतो. राजहंस नाही.

मालोजीराजे कुठे गेले म्हणायचे?? त्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत... बाकी सध्या विश्वास पाटलांचं 'संभाजी' वाचतोय. लई म्हणजे लईच्च भारी वाटतंय.!!

राजेश घासकडवी तुमच्या मताशी सहमत अहे. संभाजी राजांचा पराक्रम सांगितला असता तर बरं झालं असतं . पहिले ३ प्रतिसाद सोडून बाकीचे सगळे प्रतिसाद लेखाशी विसंगत आहेत असं वाटतंय .

माझ्या मते सम्भजीराजे हे फार बुध्हिमान होते.तसेच त्यांचे राजाराम वर प्रेम ही होते.त्या मुले त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी राजे स्वत :च पकडले गेले असावेत.

संभाजी राजांप्रमाणेच मिपा वर या विषयावर चर्चा करणाऱ्या या सगळ्या ज्येष्ठ आयडी ना थोडं अधिक सक्रिय आयुष्य मिळालं असतं तर?