Welcome to misalpav.com
लेखक: मृत्युन्जय | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मस्त रे मृत्यो! बाकी >>>नसीरुद्धीन शाह (राजाराम), फारुख शेख (बासु भट) इथे नेमका क्लिन बोल्ड झाला. पोस्टरवरुन नेमका उलटा अंदाज केलेला. फारुख शेख नि भ्रमर????(चष्मेबद्दूर नि इतर चित्रपटातला साधा भोळा आठवला!) बघायला हवा चित्रपट.

ते दोघेही एवढे पोचलेले कलाकार आहेत की हाच चित्रपट पुन्हा एकदा एकमेकांशी भुमिका बदलून नव्याने केला असता तरी पहिला डोक्यात आला नसता.... यात दिप्ती नवललाही जोडा.. चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास फार आधी लहानपणी पाहिलेला, त्या वयातही आवडलेला, फारूख शेख खास आवडीचा होताच, तसे दिप्ती नवल सुद्धा.. लेखही मस्तच, ससा आणि कासव या अँगल भारीच..

लहानपणी हा सिनेमा दूरदर्शन ला ३/४ वेळा पाहिला आहे. त्यामुळे माहित होताच.पण ससा/कासव रुपकात उलगडून दाखवल्यामुळे सर्व वाचत गेलो. आणी मजा आली. :) अतिशय छान लिहिले आहे. हल्ली हे साधे-सरळ चित्रपट हिंन्दी वाहिन्यांवर मुळीच दाखवत नाहीत. साल्यांना तमिळ्/तेलगू-लिप्यंतरीत-हिन्दी--मधले भयंकर चित्रपट दाखवता येतात. :-/ पण हे स्वच्छ-निर्मळ शिनेमे अठवणीतच फक्त! :)

मी थोडासा पाहिला होता हा पिक्चर.. चांगला आहे, तुम्ही आज इथे लिहील्यने शेवट काय ते कळालं. पण मला सतत खुप वैताग येत होता की कधी ह्या बासुचे भांडे फुटणार / कधी ह्या राजारामला अक्कल येणार. ती शेवट पर्यंत येत नाही हे कळाल्याने वाईट वाटले. मला बासुला अद्दल घडेल असं वाटत होतं पण ही कथा तर रिअल लाईफ निघाली.

ससा -कासवाची कथा आणी ह्या चित्रपटाची कथा ही तुलना आवडली . चित्रपट पाहीला नाही पण लवकरच पाहीन .

व्वा ! मस्त आठवण काढलीस ...आणि परीक्षण ही छान लिहीले आहेस ... अगदी निवांत वेळ असला की सई परांजपे ने केलेली सर्व काही बघतो ..तिच्या सिरीज ही ...त्यात सगळ्यात हाईट म्हणजे चष्मेबद्दुर ...व्वा .!! हि यु ट्य्ब ची लिंक

सुंदर चित्रपट होता. यात सर्वात जास्त खटकलेली गोष्ट म्हणजे सई परांजपे ची मुलगी "विनी जोगळेकरपरांजपे" तिच्या इतके बोजड दिसणारे व्यक्तीमत्व न भूतो न भविष्यती.........

परत एकदा बघावा असा चित्रपट. असे चित्रपट नेहमीच आल्हाददायक अनुभव देतात असं माझं मत आहे. मनामध्ये जास्त काळ रेंगाळणारे म्हणुन जर कोणते चित्रपट असतील ते वरण्,भात्,साजुक तुप वालेच. -मयुरा.

तसाच्या तसा आठवणारा चित्रपट! ते समोसे स्टोव्हवर गरम करुन देणारा नसीरुद्दीन अन बोटात किल्ली फिरवणारा फारुख शेख! शेवटी मुलांना गोष्ट सांगणारी दिना पाठक अन कासवाच्या हातात मुरझलेला पुष्पगुच्छ! आयुष्य अस दिखाव्यावर भुलुन वाया जाऊ नये अस सांगायचा प्रय्त्न वाट्तो थोडासा पण जाणवतो तो विरोधाभासच.

क्या बात, क्या बात! माझ्या लाडक्या शिनेमांपैकी एक... या चित्रपटाचा शेवटच असा आहे - आज्जी नातवाला गोष्ट सांगत असते. तीत कासव जिंकतं. नातू खूष होतो. पण आज्जी म्हणते - वो जीत भी क्या जीत थी? या सिनेमांवरही लिहिणे: - छोटी सी बात - बातों बातों में - चष्मेबद्दूर - गोलमाल अवांतरः सई परांजपेची "हम पंछी एक डाल के" नावाची मालिका तूनळी वगैरे वर आहे का?

ससा कासवाची कथा नव्या रूपात आणि नव्या ओळखीसह बघताना अगदी हेच प्रश्न पडतात! सिनेमातील नासिरुद्दिन आणि फारुख शेखबद्दलचे अभिषेकचे निरीक्षण एकदम बरोबर आहे. दोघेही काहीही करू शकणार्‍यांपैकी! दीप्ती नवल पण गोड वाटते. अगदी चाळीतली शेजारी रहाणारी मुलगी. ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी मस्त सिनेमाची मस्त ओळख.

कलाकरांच्या सहज अभिनयामुळे लक्षात राहीलेल्या चित्रपटाची आटवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद!

सई परांजपे यांचे सगळेच सिनेमे आवडतात -- चष्मेबद्दूर, कथा आणि जाने भी दो यारो.. सुहास म्हणाला तसे फार काही बोअर होत असेल तर कुठला तरी एक पाहतो.. शक्यतो चष्मेबद्दूर.. कथा मधली एक आठवण म्हणजे ती चक्क जास्वंदाची फुलं डोक्यात घालते आणि इतक्या सोज्वळ छान चेहर्‍याला ती पण शोभतात :) (पहा २२:४५ वरच्या तुनळी च्या दुव्यावर)

काल सुट्टीचा दिवस सार्थकी लावला. सई परांजपेंचं दिग्दर्शन सगळ्यात भारी वाटलं. राजारामच्या आईवडलांच्या फोटोचा वेगवेगळ्या प्रसंगातला वापर भन्नाट. बुटाची जाहीरात मस्त. (हल्लीच्या दीड तासात फिनिशच्या काळात मात्र सिनुमामा संथ वाटतो.)

एकदम मस्त हलका फुलका चित्रपट. कितीही वेळा पाहिला तरी परत बघावासा वाटणारा. सई परांजपे खरच ग्रेट बाई होती. वर उल्लेख न झालेला "स्पर्श" हा चित्रपट सुध्दा असाच सुंदर आहे. जाने भी दो यारो हा सुध्दा नसिरुद्दीन शहा आणि रवी वासवानीचा असाच एक वेगळा चित्रपट. पण तो बहुतेक कुंदन शहांचा होता सई परांजपेंचा नाही

मिपावरच मागे एका धाग्यात ह्या चित्रपटाचा उल्लेख वाचला होता आणि त्यानंतर डाऊनलोड करून पाहिला होता. त्याही धाग्यावर असेच भरपूर कौतुक चालले होते ह्या चित्रपटाचे. चित्रपट चांगला वाटला, पण बऱ्यापैकी कंटाळा आला. म्हणजे जितका भारी भारी म्हणून वाचले होते तितका काही खास वाटला नाही.

नविन ओळख आवडली. चित्रपट पहाताना काही कळत नाही पण शेवटाला आपण ससा होउन जगायचे की कासव होउन असा प्रश्न पडल्यशिवाय राहत नाही.