Welcome to misalpav.com
लेखक: जॅक डनियल्स | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मी या विषयातला तज्ञ नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक सापांवर त्यांच्या स्वत:च्या विषाचे परिणाम होत नाही. म्हणजे जर सापाने स्वत:ची जीभ चावली तर तो मरणार नाही. एक नाग दुसर्या नागाला चावला तर तो मरणार नाही तसेच जे साप दुसर्या सापाला खातात त्यांच्या वर पण भक्ष्याच्या विषाचा परिणाम होत नाही. म्हणजे नागराजावर धामीणच्या/ मण्यारच्या विषाचा परिणाम होत नाही. अर्थात चावणार्या सापाचे दात आणि दुसर्या सापाच्या शरीरात सोडल्या गेलेली विषाची मात्रा याचा पण विचार करावा लागेल. म्हणजे अजगर फुराशाला चावला तर फुरस जखमी होऊन मरेल. आणि फुरस्याने जर जास्त प्रमाणात विष अजगरात सोडले तर अजगर पण मरेल. एकाच भागामध्ये राहणाऱ्या सापांवर एकमेकांच्या विषाचा परिणाम होत नाही उदा. मण्यार आणि घोणस. दोन वेगवेगळ्या भूभागात राहणाऱ्या सापांच्या विषाचा परिणाम मात्र एकमेकांवर होतो म्हणजे मंबा साप जर नागराजावर सोडला तर शक्यता आहे कि दोघेही मरतील. परत एकवार, मी या विषयातला तज्ञ नाही. मिपावर नवीन आहे. चुकल-माकल असेल तर धाकल म्हणून सोडून द्या.

परत एकवार, मी या विषयातला तज्ञ नाही.
माझी तुम्हाला एकच विनंती आहे की जर १००% खात्री नसेल तर चुकीची माहिती देऊ नका, हा असा विषय आहे की अंधश्रध्दा पसरायला वेळ लागत नाही. सापाच्या त्याच्या विषाचा परिणाम या वरती मी आधीच्या लेखांच्या प्रतिसादामध्ये सखोल माहिती दिली होती, म्हणून परत उत्तर देणे टाळत होतो. पण एक "विषारी" साप जर दुसऱ्या कुठल्या पण सापाला चावला तर त्याचा परिणाम होतो. फक्त तो परिणाम विषाची मात्रा, जहालता, चाव्याची जागा इ. वरती अवलंबून असतो. म्हणजे जर मण्यार(विषारी) जर नागाला(विषारी ) चावली तर नाग मारतो. खूप वेळा मण्यार नागाला खाते पण, सोपे खाद्य म्हणून मण्यार जास्त करून बिनविषारी सापांना (धामण, पाण साप इ.) यांना खाते. मंबा हा साप "नागाच्या" कुटुंबातील आहे (Elapidae), त्यामुळे मी एका लेखात लिहिल्याप्रमाणे त्यांच्या विषामध्ये साधारण सारखेच घटक असतात, त्या वर भूभागाचा काही संबध नाही.

सापाच्या विषाचा स्वजातीय सापावर परिणाम होतोच. नागराज हा त्याच्या क्षेत्रात राहणाऱ्या मादीने जर दुसर्या नागराजाशी संबंध ठेवला आणी गरोदर झाली तर तिला चावून तिचा जीव घेतो आणी काही वेळा खाऊन सुद्धा टाकतो. सापाचे विष हे पाचक रस असते आणी कोणताही पाचक रस हा त्याच्या संपर्कात येणाऱ्या अवयवाचे पचन करणारच त्यामुळे मानवी स्वादुपिंडाला जर सूज आली(ACUTE PANCREATITIS) तर आपल्या स्वादुपिंडातील पाचक रस स्वादुपिंड फुटून बाहेर पडतात आपल्याच पोटातील अवयव अक्षरशः विरघळवून टाकतात. हा आजार अतिशय गंभीर आहे आणी प्राणघातक पण ठरणारा आहे हा प्रकार दारू पिणार्यात किंवा पित्ताशयात खडे असणार्या लोकात जास्त आढळतो. या नात्याने सापाला स्वतःचे विष सुद्धा बाधते. एवढेच आहे कि साप चुकून स्वतःला चावला तर तो विष सोडत नाही. विष सोडणे हि एक क्रियाशील (ACTIVE) प्रक्रिया आहे. विष आपोआप सुटत नाही. साप आत्महत्या करत नसावेत( स्वतःच स्वतःला चावून) असे मला वाटते.

जे. डी. साहेब माहिती साठी खुप आभार! माझ्याकडे जी माहिती होती ती मी दिली,त्या विषयातला तज्ञ नसल्याने मी तसे सुद्धा सांगितले. यापुढे मी अधिक काळजी घेईल.