Welcome to misalpav.com
लेखक: सचीन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

गेल्या साठ वर्षात आम्ही गुलामीचेच आयुष्य नव्याने जगत आहोत. एकवीस टक्के मते मिळविलेला माणूस आमचा नेता होतो व शंभर टक्यांचे भवितव्य ठरवितो. अशा अजब लोकशाहीने जनता मूठभर राजकारण्यांची गुलाम झाली आहे. पाच वर्षातून एकदा मतदान करायचा अधिकार तो सुद्धा वरील पद्धतीने. आपली लोकशाहीच मुळात सत्ताधारी व विरोधी पक्ष अशी विभागून उभी राहिली आहे. पर्यायी पक्ष असे त्यास नाव का असू नये? विरोधी पक्ष हे घातक नाव कशासाठी ? दोन भावात एकाने घर चालवायचे असेल तर दुसरा भाउ विरोधी असतो काय? निवडणूक म्हणजे क्रिकेटचा सामना असतो काय ? एक जि़ंकला की बाकीच्यांना मत देणार्‍यांचा मताला काहीच किंमत नाही ? मग ते ७० टक्के का असेनात ! म्हणून कायदा करण्याच्या प्रक्रियेत सगळ्यानाच ( हरणार्‍याना देखील) सामील करावयाचे असेल तर proportionate voting power मिळाली पाहिजे तरच कायद्यामध्य लोकांच्या आकांक्षेचे खरे प्रतिविंब दिसेल ! बाबासाहेब त्यासाठी पुन्हा जन्म आपणच घ्यावा ही सादर विनंति !

चौरा मस्तच ! लोकशाहीतील त्रुटी बरोब्बर मांडली आहे. घटनाकारांनी घटना लिहिलि तेव्हा चे राजाकारणी इतके हलकट नव्हते , निवड्णूका फेअर होत्या . नंतरच्या कॉग्रेसी राजाकारणाने लोकशाहीचे मातेरे केले. बाबासाहेबांनी जन्माला यावे नपेक्षा ,भरातातील लोक अधिक प्रबुद्ध व्हावेत , जाणते व्हावेत आणि प्रजासत्ताक आचंद्रसुर्य नांदो अशी प्रार्थना करीन. दरवेळी महात्मा जन्माला येईल आणि या मेंढरांना हाकलून धक्क्याला लावेल .. ये नही चलेगा ! औषध रोगापुरते नाहीतर औषढानेच समाजपुरुषाचे शरीर पोखरले जाते.. . आणि मग क्रांतीसारखी प्रतिजैविके .. जी कधी कधी हानीही करतात ! निरामय समाज पुरूष या राष्ट्राच्या नशिबातच नाही का ?

लोकशाहीतील त्रुटी बरोब्बर मांडली आहे. पूर्वीच्या राजेशाहीत संस्थानशाहीतही हेच होत होतं .

आलात ? उत्तम , अपेक्षितच होत. पण तुमचा आक्षेप खालील वाक्याला असायला हवा. नंतरच्या कॉग्रेसी राजाकारणाने लोकशाहीचे मातेरे केले. असो. इथे वाद नको. "भारतीय राजकारणातील/ लोकशाहीतील काँग्रेसचे योगदान" असा धागा काढा. तिथे बोलू.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र श्रद्धांजली. आजच द आफ्रिकेचे महामानव नेल्सन मंडेला यांचे देहावसान व्हावे आणि दोन्ही युगपुरुषांचा महापरिनिर्वाण दिन एकच व्हावा हा नियतीचा कसला खेळ ? मंडेला यांनाही विनम्र श्रद्धांजली

आंबेडकरांसारखे अलौकीक व्यक्तीत्व एकदाच जन्म घेते ...यालाच धर्मात अवतार असे संबोधत असावेत.बाबासाहेब आधुनिक बुद्धच होते.. जय भीम!

अवतार जर समाजाच्या उत्थानाचं कार्य करत असतील तर प पू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अवतार म्हणावं लागेल. मात्र निव्वळ जयजयकार करुन आपलं कर्तव्य संपलं असं आपण सामान्य नि अनुयायी दोघेही आजच्या वाईट परिस्थितीला तेवढेच जबाबदार ठरणार आहोत. (हे सगळ्या समाजप्रवर्तक, सुधारक नि नेत्यांच्या बाबत लागू आहे.) समयोचित लेख नि आढावा. (सगळंच मान्य नाही मात्र ही वाद घालण्याची जागा नाही.) चौकटराजांचा प्रतिसाद देखील चिंतनीय आहे. महापरिनिर्वाणदिनानिमित्त मानवंदना!

वैचारिक वारशाची कसोटी..हा आजचा लोकसत्तामधील महापारीनिर्वान दिनाबाद्दलचा लेख . युरोपातही बाबासाहेबांचे नाव गाजत आहे त्यांच्या नावाची संघटना आहे. हा त्यांच्या विचारांचा प्रभाव आहे. http://www.loksatta.com/vishesh-news/mahaparinirvana-day-of-dr-b-r-ambed...

खरं तर असं श्रद्धांजली करणं मला पटत नाहि. श्रद्धांजली मृत व्यक्तीसाठी असते ना (बहुतेक)... बाबासाहेब केवळ एक विचार नव्हते, एक शरीर तर नव्हतेच नव्हते... ते एका मूलभूत समस्येचं तेव्हढंच सखोल समाधान मिळवण्याचा धाडसी प्रयत्न होते. जोवर हि समस्या आहे तोवर बाबासाहेब काळाच्या पडद्याआड जाऊ शकत नाहित.