Welcome to misalpav.com
लेखक: श्रीगुरुजी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

माणूस आहात का ढोल ? सोडला तरी शिव्या धरला तर कम्युनल ! विचारांमध्ये स्पष्टता आणण्यासाठी वाचन करून अभ्यास वाढवा असे नम्रपणे सुचवतो ;)

ते भाजपावाल्यांना इचारा. रामाला वाळीत त्यानी टाकलं. किमान आत्तापर्यंतच्या कागदोपत्री तरी आपले विधान चुकीचे आहे असे म्हणावे लागत आहे. २००९ च्या Party Manifesto मध्ये पृष्ठ क्रमांक ३ वर खाली "Defending the Civilisation" मध्ये "The BJP remains committed to the construction of a grand Ram Mandir at Ayodhya." असे लिहीले आहे. आता २०१४ चा Party Manifesto अजून जाहीर होयचा आहे. त्यात काय म्हणतात ते पाहूयात आणि मग बोलूयात.

काँग्रेसकडे सीताराम (केसरी) तरी होते.
यावरून मिपावरच मागे लिहिलेली एक गोष्ट आठवली. ती परत एकदा लिहितो. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांनंतर अटलबिहारी वाजपेयींचे सरकार सत्तेवर आले. मार्च १९९८ च्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर लोकसभेत चर्चा चालू होती. रामविलास पासवान: ये भाजपावाले बोलते है की उनके पास राम है. उनके पास राम कहा है? राम तो यहा है जनता दल मै (स्वतःला उद्देशून) त्यावर शिवसेनेचे ठाण्याचे खासदार प्रकाश परांजपे म्हणाले: अरे ये तो विलासी राम है. सच मे राम हमारे यहा ही है (राम नाईकांकडे बोट दाखवत). यावर सगळ्या सभागृहात हशा पिकला. स्वतः रामविलास पासवानांनाही हसू आवरणे कठिण गेले.

चांगला हजरजबाबीपणा दाखवला प्रकाश परांजपे यांनी... बाकी निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे.

अहो कोकणी माणूस अस्तोच हजरजबाबी ! आणि वेळेवर काका-पुतण्याचा सोगा प़कडून हृद्यसम्राटांना अपशकुन केला ती समयसूचकता ही कौतुकास्पदच म्हणायला हवी !

९०च्या दशकात, वाजपेयी विरोधीपक्ष नेते असताना, "हम वो बदलेंगे, ये बदलेंगे..." अशा थाटात "बदल" करण्याची भाषा जोरात करत होते. तेंव्हा त्यांना एका काँग्रेसच्या मंत्र्याने/खासदाराने थांबवत (उपहासाने) विचारले, "लेकीन आप तो 'अटल' हो"... वाजपेयींनी मिष्कीलपणे त्यांच्याकडे बघत उत्तर दिले, "हां लेकीन मै बिहारी भी हूं!" दोन्ही बाजूंनी एकदम हशा पिकला!

या निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात येईल की काँग्रेसमध्ये अजिबात 'राम' राहिलेला नाही. निकाल लागल्यावर लगेचच काँग्रेस 'हे राम' म्हणून शेवटचा 'राम' म्हणणार. अर्थात व्यक्ती गेली तरी तिचे विचार मरत नाहीत. तसेच काँग्रेस पक्ष संपला तरी काँग्रेसची "भ्रष्टाचार, लूटमार, गुन्हेगारी, देशद्रोह, जातीयवाद" इ. विचार व तत्वे राष्ट्रवादी, समाजवादी, बसपा इ. इतर पक्षांच्या माध्यमातून जिवंतच राहणार.

भारतीय टीनपॉट पार्टीला फोन केला होता.. अनेक वर्ष जनतेने प्रत्येक इलेक्शनमध्ये त्यांना प्यॅक करुन त्यांच्याच घरात मूव्ह केले.. त्यामुळे त्यांनीच हा धंदा सुरु केलाय...

नमो नमः हुच्च विचारवन्त..... ---------^--------- *new_russian* \m/ \M/ आपली सिग्नाचर लाइन अशीच हवी हो :- आपले मत एक-धर्मनिरपेक्ष, पुरो-पुरोगामी, अती-भ्रष्टाचारशिरोमणी व सर्वात लूटारू पक्षालाच द्या.....!!!! कसे ????..... *biggrin* :-D :D +D =D :biggrin: विनोद१८

>>> भारतीय टीनपॉट पार्टीला फोन केला होता.. हा काय चावटपणा आहे? तुम्ही कधी काँग्रेसला काँग्रेस म्हणता, कधी भारतीय टीनपॉट पार्टी म्हणता, कधी भारतीय जमालगोटा पार्टी म्हणता तर कधी भारतीय झंगड पार्टी म्हणता. १२८ वर्षे जुन्या असलेल्या अशा वयोवृद्ध पक्षाची अशी हेटाळणी बरी नव्हे. एक काहीतरी म्हणा.

128 वर्ष जुना पक्ष पोलाद असला पाहीजे ..त्याला टीनपॉट कशाला कोण म्हणेल?.. ज्या पक्षाला फक्त २८च वर्षे झालीत आणि ज्या पक्षात सगळेच अपना हाथ जगन्नाथ पंथाचे आहेत त्यांनाच मी टीनपॉट म्हणालो...

>>> ज्या पक्षाला फक्त २८च वर्षे झालीत आणि ज्या पक्षात सगळेच अपना हाथ जगन्नाथ पंथाचे आहेत त्यांनाच मी टीनपॉट म्हणालो... हे वर्णन फक्त "इंदिरा काँग्रेस" म्हणजेच काँग्रेस (आय) या पक्षालाच लागू पडते. हा पक्ष तुम्ही म्हणता तेवढाच जुना आहे व "हात (दाखवून अवलक्षण)" हे त्यांचे चिन्ह असल्याने त्या पक्षात सगळेच "अपना हाथ जगन्नाथ आणि मतदारांना घाला लाथ" या पंथाचे आहेत. म्हणजे तुम्ही काँग्रेसला टिनपाट असे म्हणता तर. अगदी यथार्थ वर्णन आहे.

एबीपी न्यूज च्या सर्वेक्षणानुसार दिल्लीत शीला दीक्षीत केजरीवालांविरूद्ध निवडणूक हरण्याची शक्यता आहे. दीक्षीतांना ३१ टक्के व केजरीवालांना ३६ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. दिल्लीत काँग्रेस हरणार यावर विश्वास ठेवता येईल पण प्रत्यक्ष शीला दीक्षीत पडतील असे वाटत नाही. सुदैवाने तसे झालेच तर त्या राजकारणातून कायमच्या हद्दपार होतील व आआपला बहुमत न मिळतासुद्धा केजरीवाल 'मॅन ऑफ द मॅच' ठरतील.

कृपया हा धागा निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत म्हणजे निदान ९ डिसेंबर २०१३ पर्यंत तरी वाचनमात्र करू नये किंवा नष्ट करू नये ही नम्र विनंती. धागे बंद पाडणार्‍या काही नेहमीच्याच यशस्वी कलाकारांनी या धाग्यावर आपल्या नेहमीच्या शैलीत प्रतिसाद द्यायला सुरूवात केली आहे. असे प्रतिसाद देऊन त्यांनी यापूर्वी इतर अनेक धागे यशस्वीरित्या बंद पाडले आहेत. तसेच इथे होऊ नये ही अपेक्षा आहे.

>>> मोडी प्रधानमंत्री होवो कि शहानवाझ हुसेन वरचष्मा संघाचाच राहणार राहू देत की. संघासारखी गेली ८८ वर्षे देशाकरता सर्वस्व देणारी संघटना देशहिताचेच मार्गदर्शन करणार. "१०, जनपथ" किंवा जामा मशिदीतून होणार्‍या मार्गदर्शन वजा आदेशापेक्षा संघासारख्या देशप्रेमी संघटनेचा वरचष्मा देशहिताचा आहे.

मोदी(फेकू) हे जातीने तेली आहेत, तेली तांबोळी विधीमंडळात जाऊन तागडी तोलणार आहेत काय?, असा जातीयवादी प्रश्न टीळकांनी विचारला होता..हारेसी मानसिकता त्याच पठडीतली आहे.. प्रतिगामी हारेसेस मोदींना वापरुन ओबिसींची मते लाटू पहात आहे,मोदींना चायवाला असे प्रोजेक्ट करुन श्रमकर्यांची मते मिळवण्याचा प्रयत्न आहे ,अंतिमतः सत्ता ही तेल्या तांबोळ्यांपेक्षा साडेतीनटक्क्यांकडेच कशी राहीले हे आरेसेसवाले बघणार ..ओबिसिंनी असल्या जातीयवादी पक्षाला मतदान करु नये...

साडेतीन ट्क्केवाल्यांनी ( यु.पी. तलं प्रमाण १० %) सर्वात जास्त काळ प्रधानमंत्री पद उपभोगुन देखील त्यांचं समाधान होत नाहि...

कोणत्याही पक्षाची बाजू न घेता लोकांच्या बाजूने विचार केला की सरळ दिसते. कॉंग्रेस काय किंवा भाजपा काय कोणत्याही पक्षाचा उमेदवार हा स्वच्छ आणि निर्दोष नसणार ही नामुष्की आपल्यावर आली आहे, कोणताही पक्ष सत्तेत आला तर भ्रष्टाचार हा होणारच. ह्या वृत्तीचा बिमोड इतक्यात तरी होणार नाही. निवडणुकांत एवढा पैसा लावायचा, तो निवडून आल्यावर कसातरी वसूल करावा लागणारच. हे चित्र आपल्याला विधानसभांच्या, लोकसभेच्या आणि इतर निवडणुकांमध्ये देखील दिसते. म्हणून बदलाची गरज आहे. लागोपाठ तीन वेळा कॉंग्रेस इतर पक्षांबरोबर हात मिळवणी करून सत्तेवर आली. भारताची प्रगती काय, हे साऱ्यांना स्वच्छ दिसत आहे. मग जर विचार करा काहीही करून, पुन्हा कॉंग्रेस सत्तेवर आली, तर जो मतदार / नागरिक आज एवढा निराश आहे तो कॉंग्रेसच्या त्या विजयानंतर किती निराश होइल. त्याचा भारतीय निवडणुकांवर, शासनावर आणि यंत्रणेवर असणारा विश्वास उडणार नाही? पुन्हा काय म्हणून तो मत द्यायला जाईल? आणि कॉंग्रेस सारख्या पक्षाचं काय? आज त्यांची मजल जे अनेक वाईट धंदे करण्याकडे आहे ती मजल त्या पुढे किती जाईल त्याची कल्पनाच करवत नाही. भाजपची सत्ता येवो ना येवो पण निदान कॉंग्रेसला अद्दल घडविण्यासाठी तरी आणि लोकशाहीची तत्वे शाबूत राहण्यासाठी तरी कॉंग्रेसची सत्ता गेली पाहिजे.

आयबीएनच्या मतदानोत्तर चाचणीनुसार दिल्लीत अशी परिस्थिती असेल. भाजप - ३२ ते ४२, आम आदमी पक्ष - १३ ते २१, काँग्रेस - ९ ते १७ काँग्रेस तिसर्‍या क्रमांकावर असेल. एकंदरीत बरीच संदिग्ध परिस्थिती दिसत आहे. भाजपला बहुमत मिळेल किंवा सर्वात मोठा पक्ष असेल. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस किंवा आआप असेल. दिक्षित आज्जी पडण्याची शक्यता आहे. आआपच्या मतदारांना मुख्यमंत्रीपदी केजरीवाल हवे आहेत तर पंतप्रधानपदी मोदी हवे आहेत. पप्पू आणि त्याची मम्मी कोणाच्या खिजगणीतही नाही. दिल्लीत निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट येणार बहुतेक.

काँग्रेससाठी अत्यंत खालावलेली परिस्थिती दिसत आहे. या पार्श्वभूमीवर २०१४ साठी काँग्रेस आपल्या ठेवणीतल्या यशस्वी युक्त्या बाहेर काढणार. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मतदारांना राखीव जागा, स्मारके, नामांतर, सवलतींचा वर्षाव, कर्जमाफी इ. अफूच्या गोळ्या निवङणुकीच्या तोंडावर मतदारांना चारून मते मिळविली जातात व नंतर पुढील चार साडेचार वर्षे मतदार त्याच धुंदीत असतात. आता पुढील काही महिन्यात मराठा, गुज्जर, जाट, मुस्लिम इ. साठी राखीव जागांचे गाजर दाखविले जाईल; आंबेडकर, अण्णाभाऊ साठे इ. ची स्मारके; पुणे विद्यापीठाचे नामांतर; आयकरात सवलती; सेवाकरात सवलती; पेट्रोल्/डिझेल/गॅस इ. भावात घट; सरकारी नोकरांना महागाई भत्त्यात वाढ; शेतकर्‍यांना कर्जमाफी इ. अफूच्या गोळ्या वाटल्या जातील. आंध्राचे विभाजन करून निदान तेलंगणातील १७ जागा तरी मिळाव्यात याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आंध्रात दंगलीचा भडका उडून आपल्या पोळ्या भाजण्याची काँग्रेसला आयती शेकोटी मिळणार. पण सर्वात भयंकर कृती म्हणजे हैद्राबादला दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी करणे (जे दोन्ही राज्यांना मान्य होणार नाही व एक नवीन धगधगता प्रश्न निर्माण होईल) आणि दोन्ही राज्यांना ३७१ वे कलम लागू करणे ज्यामुळे इतर कोणत्याही राज्यातील लोकांना तिथे स्थायिक होता येणार नाही व तिथे स्थावर मालमत्ता घेता येणार नाही. हे कलम आधीच काश्मिर व हि.प्र., ईशान्येकडील राज्ये यांना लागू आहे व त्याचे दुष्परिणामही दिसलेले आहेत. त्यात आता अजून या २ राज्यांची भर पडणार. हैद्राबादमध्ये जागतिक व भारतातील अनेक आयटी कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. हे कलम लागू झाले तर त्यांना बाहेरून कर्मचारी आणता येणार नाहीत किंवा गाशा गुंडाळून दुसर्‍या राज्यात जावे लागेल. अंतिमतः या २ राज्यांनाच त्याचा तोटा होईल. निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाउ शकते, अगदी देशाचे अहित होत असले तरी काँग्रेस त्याची पर्वा करत नाही.

अहो ते अफुची गोळी वगैरे दूर राहूंदेत. पण तुम्ही जे इतरांच्या विरोधात लिहीता ते खरे असते का खोटे त्या प्रश्नाचे उत्तर देयचे का टाळत आहात?

तुम्ही म्हणताय तसे उपाय करुन काँग्रेस आपले बुडत्याचे पाय आणखी खोलाकडे नेणार नाहि. त्यापेक्षा काँग्रेसची सारी भिस्त आता भाजप, त्यातल्यात्यात मोदी, काहि मोठी चुक करतील काय यावर असेल. शिवाय, कर्मधर्मसंयोगाने एखादी "त्यागाची" लाट निर्माण करणे शक्य असल्यास काँग्रेस तेही पडताळुन पाहिल. आता काँग्रेसची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे काँग्रेस वगळता इतर सर्व पक्ष, इन्क्लुडींग एन.सी.पी आणि रा.ज.द., काँग्रेसचं जास्तीत जास्त नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. निवडणुकीपुरतं तरी काँग्रेस वि. नॉनकाँग्रेस असा सामना असेल. दूरदृष्टीने पाहता हे राहुल गांधींच्या पथ्यावर पडेल आणि त्याची जाण सोनीयाजींना निश्चित असेल. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली अस्थीर कोईलेशन सरकार बनवण्यापेक्षा काँग्रेस समर्थीत तीसरी आघाडी किंवा राहुल गांधीच्या अविरोध नेतृत्वात प्रमुख विरोधीपक्ष अशी भुमीका सोनीया गांधी पत्करतील. त्यांचे पुढील प्रयत्न याच दिशेने असतील.

>>> तुम्ही म्हणताय तसे उपाय करुन काँग्रेस आपले बुडत्याचे पाय आणखी खोलाकडे नेणार नाहि. त्यापेक्षा काँग्रेसची सारी भिस्त आता भाजप, त्यातल्यात्यात मोदी, काहि मोठी चुक करतील काय यावर असेल. शिवाय, कर्मधर्मसंयोगाने एखादी "त्यागाची" लाट निर्माण करणे शक्य असल्यास काँग्रेस तेही पडताळुन पाहिल. बरोबर आहे. अजून एक कृती म्हणजे स्वतःची रेघ मोठी करण्यापेक्षा दुसर्‍याची रेघ पुसणे. गेल्या अनेक वर्षांपासून मोदींना कोणत्यातरी खटल्यात अडकविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. अजून तरी त्यात यश आलेले नाही. श्रीकुमार, संजीव भट्ट, प्रदीप शर्मा अशा तुरूंगात असलेल्या अनेकांना अभय देऊन व त्यांच्याकडून मोदिंविरोधात प्रतिज्ञापत्रे घेऊन मोदींना अडकविण्याचे आजवर असंख्य प्रयत्न झाले. आता काँग्रेस ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आपल्याकडील गुप्त माहिती कोब्रापोस्ट, गुलैल इ. टॅब्लॉईड संस्थांना लीक करून मोदींची बदनामी करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. पुढील काही महिन्यात हे प्रयत्न वाढतील, बेसावध असलेल्या भाजप नेत्यांविरूद्ध तहलकासारखी स्टिंग ऑपरेशने करून भाजपची रेघ लहान करण्याचा प्रयत्न राहील.

अटलजींच्या भाषणाच्या दोन छोट्या फिती आत्ता जे काही राजकारण होणार आहे त्यावर भाष्य करतात असे वाटले...

भाजपा निवडणुकीच्या टायमाला राममंदिराचा मुद्दा काढतो ते काय अफूचा गोळा. निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाउ शकते, अगदी देशाचे अहित होत असले तरी काँग्रेस त्याची पर्वा करत नाही.>>>>>>कॉंग्रेस च्या ऐवजी भाजपा वाचावे काय ?

>>> कॉंग्रेस च्या ऐवजी भाजपा वाचावे काय ? नाही. काँग्रेस ऐवजी "राष्ट्रवादी काँग्रेस", "बसप", "समाजवादी", "कम्युनिस्ट" असे वाचले तरी चालेल.

काही आय.डी मिपावरील वातावरण मुद्दामून बिघडविण्यासाठी खोडसाळपणा करत आहेत.अशा तत्वांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे असे आवाहन इतर सर्वांना करत आहे.आपल्या आडाणीपणाचा इतरांवर काही परिणाम होत नाही हे लक्षात येऊन तरी असे प्रकार ही मंडळी बंद करतील अशी अपेक्षा.

विटेकरकाकांच्या या प्रतिसादामुळे मुव्हर्स आणि पॅकर्सवाल्या बॉटला या धाग्यात मुव्हर्स आणि पॅकर्सविषयी चर्चा चालू आहे असा गैरसमज झाला असावा म्हणून तो बॉट हे प्रतिसाद द्यायला लागला आहे :)

बॉट प्रतिसाद देऊ शकतो. परंतु त्यासाठी आधी सदस्यनाम मिळवावे लागेल. बॉटने सदस्यनाम कसे मिळविले असावे? बॉटने अजून एका नवीन सदस्यनामाने ४-५ नवीन धागे तयार केले आहेत. संकेतस्थळाची सुरक्षाव्यवस्था वाढविली पाहिजे.