Welcome to misalpav.com
लेखक: हुप्प्या | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

कसं काय सापडतं बुवा तुम्हाला असं ? आमाला तर बुवा अच्यर्य वाटुन ऱ्हायले. ड्वाले खाडकरून उघडले पघा ! अजून बी उघड्ल्येल्येच हायेत,मिटायला तयारच न्हाईत.

सोनीयाजींची संपत्ती किती आहे आणि त्यांनी ती कशी मिळवली, या संदर्भात माझा प्रतिसाद बघू नये... पण काहीतरी गडबड आहे या बातमीत... हफिंग्टन पोस्टच्या मूळ बातमीत सोनीया गांधींचा उल्लेख किमान मला तरी दिसला नाही. पण भारतातील सर्वच माध्यमात ही बातमी हफिंग्टन पोस्टचा उल्लेख करून झळकलेली दिसत आहे. याचा अर्थ हफिंग्टन पोस्टने ती बातमी नंतर बदललेली असावी असे दिसते. आता ती बदलायचे कारण त्यांच्या मूळ बातमीत चूक/खोडसाळपणा होता हे आहे की त्यांच्यावर दबाव आणला गेला आहे, हे सत्य कधी बाहेर येईल असे वाटत नाही. :(

Editor's Note: Sonia Gandhi and the former emir of Qatar Hamid bin Khalifa al-Thani has been removed from this list. Gandhi was originally included based on a listing on a third party site which was subsequently called into question. Our editors have been unable to verify the amount, removed the link, and regret any confusion. Sheikh bin Khalifi was succeeded by his son Tamim in 2013. सिब्बल ने फोन मारला असेल लगेच !

ती वेबसाईट ही आहे: http://www.celebritynetworth.com/richest-politicians/sonia-gandhi-net-worth/ छ्या! हा धागा वाचून असे गर्वाने भरून आले होते म्हणून सांगतो... पण हफिंग्टनपोस्टने यकदम भ्रमनिरास केला! ;) मलातर वाटते आहे की ही भारताला कमी लेखण्याची कॉन्स्पिरसी असावी... जाउंदेत... डालर आणि पाउंडात श्रीमंत इतरत्र असतीलही, पण काय करायचे आहे असले कागदी श्रीमंत घेऊन? मनाची श्रीमंती फक्त आमच्याच बाईसाहेबांकडे आहे...त्याची सर कुण्णाकुण्णाला येण्णार नाह्ही! म्हणूनच तर अन्नसुरक्षा बिलाच्या नावाने (स्वतःचे नाहीतरी जनतेचे) पैसे मुक्तहस्ताने उधळू शकल्या! ;)

.त्याची सर कुण्णाकुण्णाला येण्णार नाह्ही! म्हणूनच तर अन्नसुरक्षा बिलाच्या नावाने (स्वतःचे नाहीतरी जनतेचे) पैसे मुक्तहस्ताने उधळू शकल्या! हॅहॅहॅ... बाई मोठ्या मनाच्या हायेत बघा ! पैका जनतेचा असला तरी काय झाल ? इधळायला देखील मोठ मन आणि काय म्हणतात ते हं अंतरात्मा की आवाज वगरै सुद्धा ऐकु यावा लागतो. ;)

हेच म्हणतो ! निवडणूक आयोग आणि प्राप्तीकर विभाग काय बुच मारून बसलेत कि काय? चायला आम्हाला मात्र पेनल्टी आणि ह्यांना मात्र कल्टी ? जय हो सोनियाजी ! अवांतर : "जाणत्या " राजाचे काय मत आहे ह्याबद्दल?

हि बातमी जर खरी असेल तर विरोधी पक्ष का गप्प बसलाय? गप्प बसले कारण त्यांना माहित आहे बातमी खोटी आहे. जर बातमी खरी आहे ह्याची खात्री असूनही ते गप्प बसलेत तर मात्र ते विरोधी पक्षातच बसण्याच्या योग्यतेचे आहेत

सच्ची...................न सच्ची................न !!!(मी सध्या वान्खेडेवर उभारलोय !)

बातमी खोटी असल्याचा खुलासा झाला आहेच , पण तरिही सोनीया गांधींकडे खच्चुन पैसा असल्यास आश्चर्य वाटायला नको. नेहरु घराणं पिढीजात श्रीमंत आहे...त्यातला काहि वाटा सुनबाईंच्या नावे आला असेलच... आणि अर्थतज्ञांची फौज असेल दिमतीला तर पैसा मल्टीप्लाय होणं काहि अवघड नाहि.

तवा चांगला तापला होता. मंडळी कणकेचे गोळे लाटतच होते. आणि तुम्ही तव्यावर थंड पाणी ओतलेत :(

पैसा मल्टीप्लाय होणं काहि अवघड नाहि.
अगदी अगदी... त्यासाठी अर्थतज्ञांची फौज कशाला हवीय हो? इंदीरा विकास पत्र आणि नॅशनल सेव्हिंग सर्तीफिकेट्स मधे, पैसे ठेवले असतील दर पाच/सहा वर्षांनी दुप्पट! ;)

हे म्हणजे अगदी सुब्रम्हण्यम स्वामींच्या कॉन्स्पिरसी थिअरीजसारखेच झाले हे वरचे प्रतिसाद पाहीले तर लक्षात येईल... :)

ंअसेही शक्य आहे की महाराणीजीनी आपले अफाट धन वापरुन मूळ बातमी खोटी असल्याची ष्टोरी बनवली आणि ती यशस्वीरित्या सगळ्यांच्या गळी उतरवली. लगेच आपल्या लाडक्या पक्ष वा नेत्यावर आगपाखड करायची गरज नाही.

मायनेता.इन्फो वर सर्वांची निवडणू़क आयोगास दिलेली माहिती आहे. ती खरी धरल्यास, २००४ साली सोनीयाजींकडे साधारण ८५ लाख रूपये होते जे २००९ मधे १.३ कोटी झाले तर राहूल गांधींकडे अनुक्रमे त्याच काळात आधी ४५ लाख होते ते २.९ कोटी झाले!

हे सगळे आकडे हे म्हणजे ज्या मालमत्तेच्या मालकीचा इन्कार करणे अशक्य आहे त्याची मोजदाद. मला खात्री आहे की कुठल्याही वरच्या नेत्याकडे ह्यापेक्षा कितीतरी जास्त जिचा मागमूस लागू शकणार नाही अशी संपत्ती आहे. किंबहुना अशा मार्गाने मिळवलेली संपत्ती कुणाला सुगावा लागू न देता योग्य स्थळी ठेवणे हे एक अत्यंत प्रगत शास्त्र आहे आणि आपले तमाम वरिष्ठ राजकारणी त्यात पारंगत आहेत.

गेल्या ६० वर्षात पाठ्यपुस्तकातील एक वाक्य बदलले नाही की, भारत हा विकसनशील देश आहे ... पण याच भारतात राहून यांची संपत्ती खरबोंनी वाढली ... हे कसे काय हो ... ---- confused भारतीय

शेवटी काय हो, आपण एका 'मता'चे धनी, संपत्तीचा मालक निराळाच !!! :)

देशाकरता इतका त्याग करुनही स्वतःची इतकी भरभराट करु शकणार्‍या ह्या देवतासमान विभूतीला आपण आपल्या देशाचा लगाम पुन्हा एकदा दिला तर ती देशाचीही अशीच भरभराट करेल ह्याविषयी मला तरी शंका नाही.>>>>> अगदी खरे हुप्प्याजी देशाचा लगाम कॉंग्रेस लाच मिळणार तुम्ही चिंता करू नका

काँग्रेस अगदी संसदेतुन हद्दपार करायची तुमची इच्छा अत्यंत अवास्तव आणि कोड्यात पाडणारी आहे. लोकशाहीत विरोधीपक्ष अत्यंत महत्वाची भुमीका बजवतात. तुम्ही काँग्रेसला त्याकरताही नालायक ठरवुन त्या पक्षावर फार अन्याय करताहात.

विरोधी पक्षात बसण्याची कॉंग्रेसची लायकीच नाही. कॉंग्रेस हा पक्ष सत्तेवरच आला पाहिजे. देशाचे भले करण्याची ताकत असलेला एकाच पक्ष भारतात आहे तो म्हणजे कॉंग्रेस. कॉंग्रेसला विरोध म्हणजे देशाच्या विकासाला विरोध.

काँग्रेसने अनेक दशकं सरकार चालवलं आहे, शिवाय काहि वर्ष विरोधिपक्ष देखील राहिला आहे. त्या पक्षाबद्दल एव्हढं सार्कास्टीकली लिहीण्याचं काहि कारण नाहि.

आपल्या डोळ्यांवरचा काँग्रेसविरोधी चश्मा काढा. थोडंफार अधिक-ऊणे प्रत्येक पक्षात असतं... पण म्हणुन सरसकट काँग्रेसच्या नावाने बोटं मोडणं योग्य नाहि.