सहमत आहे. गंमत म्हणून कोणी काय लिहावे याला थोड्या मर्यादा हव्यात. एखाद्या कारकूनाने लिहिले असते तर ठीक होते. डो़टरच्या तोंडी शोभत नाही. "पाणी नाही तर आता काय मुतु का?" हे एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या तोंडी शोभत नाही तसेच. असो. तो वेगळा मुद्दा. एका डो़क्टरसाठी संवेदनाहीन असला तरी त्यांनी विनोद करायचा प्रयत्न केला होता हे स्पष्टीकरण ग्राह्य धरुन सोडुन देउयात.
बाकी दहन करण्याच्या पद्धतीतत लाकडे वाया जातात हा प्रॉब्लेम आहेच. त्यासाठी दफन सुरु करणे हा रोगापेक्षा इलाज जालीम प्रकार वाटतो. भारताची लोकसंख्या आणि जागेचा अभाव लक्षात घेता १० वर्षांनी तीच जागा परत वापरता येइल असे गृहीत धरुनही प्रचंड जागा लागेल. ते बॉर्डर मधले "इतनी लाशी गिरा दुंगा की तुम्हारे देश की जमीन कम पडेगी" वगैरे डायलॉग आठवला. हे असले उफराटे उद्योग करण्यापेक्षा विद्युत दाहिन्यांची सोय करणे जास्त योग्य राहिल.
शिवाय ब्यांमॅ म्हणतात त्याप्रमाणे हस्तिदंती शवपेटी, लाकडी शवपेटी, प्लॅटिनम शवपेटी वगैरे असले प्रकार सुरु होतील. शिवाय मोठ्या माणसांच्या मढ्यांचे चोचलेही मोठे याप्रमाणे त्यांच्यासाठी खाजगी दफनभूमी, एक बेडरुमचा बंगला वगैरे प्रकार सुरु होतील (पिरेमिड त्याचीच पुढची आवृत्ती).
दफनाचा अजून एक प्रॉब्लेम म्हण्जे मोठ्या लोकांच्या दफना नंतर समाध्या बनायला लागतील, परत जे पुतळ्यांच्या बाबतीत होतय आजकाल तसंच कबरींबाबतही होण्याची शक्यता आहे; मग त्यावरून दंगे, मारामार्या ; महागड्या शवपेट्यांत काही ऐवज सापडतो का ते बघायला चोरांकडून शवपेट्या उचकणे; इ. गोष्टींसाठी कबरींना संरक्षण इ. इ.
मी राहते तिकडे चर्चच्या दफनभूमीत दफन करण्यासाठी त्यांची जीवन्भर त्या चर्च्मधे मेंबर्शिप घेतलेली असते आणि मृत्यूनंतर जवळच्या नातवाईकाला पुढील ३५ वर्ष त्या कबरीची काळजी ( स्वच्छता, फूलं वगैरे ठेवणं दर रविवारी इ. )घेणं बंधनकारक असतं. आणि ही जागा ३५ वर्ष वापरण्यासाठी दरमहा काही रक्कम जीवनभ्र द्यावी लागते. हे फार खर्चिक आहे ( दफन किंवा दहन काहीही असलं तरी शवपेटी असतेच ); त्यामुळे ख्रिश्चन लोकंसुद्धा आजकाल दहनच करतात इकडे आणि मग नातेवाईक मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार उरलेली रक्षा घरात दिवाणखान्यात सुबक भांड्यात ठेवतात अथवा आवडत्या जागी नेउन विखुर्तात.
जाळण्यापेक्षा पुरणे हा उपाय तुलनेत कमीतकमी टप्प्यांमधे निसर्गाला शरीरातली मूलतत्वे परत देणारा उपाय आहे. पण जागेचा प्रश्न आहेच.
पण समजा मृत्यूनंतर काही संवेदना शिल्लक राहात असेलच (बाहेरुन मोजता येणारी किंवा दिसणारी नसली म्हणून आतून नसेलच असं ठाम म्हणता येत नाही आणि ते जिवंतपणी कळणं अशक्य.) अशा वेळी पूर्णपणे अंत होणे असं काही व्हायला वेळ लागत असेल तर जे आहे ते लवकर जाळून मोकळं केलेलं बरं.
आमचे सासरे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी जळणाच्या गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली विकसित करून ती बर्याच सरकारी स्मशानभूमी मध्ये बसविली आहे. यात पनवेल, लातूर बार्शी इ महापालिका येतात. यात एका माणसाला पूर्ण जाळण्यासाठी एका सिलिंडर चा खर्च येतो. व्यवसायिक सिलिंडर साधारण नऊशे रुपयात मिळतो.(सरकारने जर सबसिडी चा सिलिंडर दिला तर हेच काम ४४० रुपयात होऊ शकेल) यात एकावेळेस आठ ते बारा सिलिंडर वापरले जातात म्हणजे मध्येच गैस गेला आणि पार्थिवाचे अर्धवट दहन झाले असे होत नाही.
या खर्चात धूर काजळी न होता कमीत कमी प्रदूषणात स्वच्छपणे हे काम होते. आपल्याला किती पातळीपर्यंत जाळायचे आहे त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवता येते. पूर्ण भस्म करायचे कि अस्थि शिल्लक ठेवायच्या ते आपल्यावर आहे. तसे लिहून दिल्यावर अस्थि मिळण्याची व्यवस्था होते.
यात अजूनही सर्व लोक सहभागि होत नाहीत. बर्याच लोकांना लाकडाच्या तिरडीवर जाळणे पसंत आहे. असो समाज प्रबोधन केल्यावर त्याला जास्तीत जास्त मान्यता मिळेल.
दफनभूमी मध्ये दफन करण्यासाठी याहून जास्त खर्च येतो. याचे कारण शहरात दफनभूमी साठी जागा कमी पडत आहेत. सर्वसाधारण दफन भूमीतील पार्थिव विशिष्ट कालावधी नंतर उकरून काढले जाते आणि त्या जागी दुसर्या पार्थिवाची सोय केली जाते. जर आपल्याला आपल्या नातेवाईकाचे थडगे उकरू नये वाटत असेल तर त्या धर्माच्या दफनभूमी ट्रस्ट ला पैसे मोजावे लागतात.
जर हिंदू लोकांनी दफन करायला सुरुवात केली तर सर्वच लहान मोठ्या शहरात अशी परिस्थिती उद्भवेल असे वाटते.
वाचना नुसार विद्युत दाहिनी हा सर्वात कमी खर्चिक प्रकार आहे आणि वर एका प्रतिसादात म्हट्ल्या प्रमाणे तो जर सौर उर्जेवर चालवला तर अजुनही खर्च कमी होण्याची शक्यता आहे.
@जळणाच्या गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली विकसित करून ती बर्याच सरकारी स्मशानभूमी मध्ये बसविली आहे. >>> वैकुंठ स्मशानभूमी(पुणे) इथे निकतीच अशी दाहिनी कार्यान्वित झाली आहे. पण ती बहुतेक गोबरगॅसवर आहे.
गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली तयार करणारे बरेच लोक भारतात आणि जगात आहेत.शिवाय त्यात एक तासात मृताच्या नातेवाईकांना अस्थि देता येतात. त्यात मृताच्या नातेवाईकाला स्वतः अग्नी देता येतो. (हि सोय विजेच्या प्रणालीत आहे काय हे मला माहित नाही). दोनही प्रणाल्या एक हजार सेल्सियस पेक्षा जास्त तापमानाला चालत असल्याने कोणताही धूर आणि प्रदूषण होत नाही. फक्त कार्बन डाय ओक्साईड आणि वाफ हा हवेत ३ मीटर उंचीवर धुराड्याने सोडला जातो(प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमाप्रमाणे).
एल पी जी वर चालणारी प्रणाली हि विजेवर चालणार्या प्रणाली पेक्षा बरीच कमी खर्चाची आहे. एल पी जी वर चालणारी प्रणाली हि १२ ते १४ किलो गैस वापरते म्हणजे सहाशे ते सातशे रुपये खर्च येतो. हा खर्च दफनापेक्षा खूपच कमी आहे.
दफन करण्याचे नक्की काय कायदे आपल्याकडे आहेत ते माहित नाही परंतु फारसे कोणी खोलवर दफन करीत नाहीत. त्यामुळे संसर्गजन्य रोगांचे जंतू आणि प्रदूषण करणारी द्रव्ये( कीटक नाशके इ) भूजलात(ground water) मिसळून प्रदूषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर नदीकाठी किंवा विहिरींच्या जवळ पुरत असतील तर हि शक्यता अगदी नक्कीच आहे.
हा सर्व विचार वास्तववादी आहे पण एखादया माणसाच्या धार्मिक श्रद्धांपुढे खर्च हा मुद्दा अतिशय गौण आहे. दहनासाठी ६०० व दफनासाठी अगदी सहा हजार जरी खर्च येत असेल तरी माणसाच्या आयुष्याच्या किमतीपेक्षा हि किंमत काहीच नाही.
(एक दिवस हॉटेलात राह्लात तरी एवढा खर्च येतो.)
चर्चेतील प्रश्न एकतर्फी आहे. वर आधी एका प्रतिसादात त्या संदर्भात म्हणलेले आहेच. पण जर एखाद्या मुस्लीम अथवा ख्रिस्ती व्यक्तीस दहन करायचे असेल तर ते भारतात शक्य आहे का? कदाचीत याच्या मुळाशी पण समान नागरी कायदा नसणे हे असू शकेल. आज अमेरीकेत अनेक ख्रिस्ती (गोरे) लोकं अगदी त्यातील कॅथलीक्सपण दहन करणेच पसंद करतात, कारण कदाचीत खर्च असेल आणि तसेच काहींच्या बाबतीत पर्यावरणवादी असणे देखील असेल.
जर कोणी मुस्लिम किवा ख्रिश्चन त्यांच्या नातेवाईकांचे दहन करू इच्छित असेल तर तर त्यांना कोणी अडवेल असे वाटत नाही. कारण बहुतेक स्मशान भूमी स्थानिक महापालिकांच्या ताब्यात आहेत. आणि तिथे फक्त हिंदुनीच यावे असा नियम असेल असे वाटत नाही.
१.पेतांची जाळून अन्तक्रिया करणे ही सर्वात उत्तम विधी आहे. स्मशानात एका प्लेटफार्म (१०x १० फूट) वर वर्षात ८० - १०० प्रेतांची अन्तक्रिया करता येते. जर हिंदुधर्मात दफन विधी असती तर दफन भूमी साठी जागा उपलब्ध करणे अशक्य प्राय झाले असते. कल्पना करा दरवर्षी ८०-१०० प्रेतांसाठी किती जागा लागेल.
२. लाकडांची कमी जास्त झाडेलाऊन पूर्ण केल्या जाऊ शकते. विजेवर चालणारे स्मशान ही बांधता येतील. एकट्या दिल्लीतील ५० लाख वाहने एका महिन्यात जेवढे पेट्रोल जाळतात. तेवढ्या उर्जेवर देशातल्या सर्व प्रेतांची अन्तक्रिया होऊ शकते.
३. दफन साठी जागेची मागणी वाढत चालली आहे. शिवाय समाजातले श्रीमंत आणि उच्च लोक थडगी ही बांधणारच. दफनभूमीच्या जागेसाठी आपल्या देशात पुष्कळ ठिकाणी वाद होतात. त्यात बहुसंख्यक समाजाने ही प्रेतांना दफन करणे सुरु केले तर निर्माण होणार्या परिस्थितीची कल्पना करणे अशक्य.
४. युरोप मध्ये विशेषत: UK इथे आता लोक जागेच्या कमतरतेमुळे प्रेतांना जाळू लागले आहेत.
५. शिवाय प्रेतांची चोरी इत्यादी प्रकाराना जाळल्या मुळे आळा बसतो.
६. संपूर्ण शरीर दान दिले तरी ही, गरज नसलेल्या शरीराच्या भागांना जाळूनच नष्ट केल्या जाते.
७. शेवटी दफन करण्याचा खर्च जाळण्यापेक्षा कित्येकपट जास्त असतो.
८. आरोग्याच्या दृष्टीने ही जाळणे उत्तम.
व्यावहारिक बाजू (जागा/खर्च/पर्यावरण) वगैरे हा एक भाग झाला ..
परंतु हिंदू अन्त्यासंस्कारांचा जो दृश्य परिणाम आहे तो मी आधी म्हटल्या प्रमाणे 'भेसूर' वाटतो...भडक्क वाटतो ..
मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांचे वियोगाचे दुखः + इतक्या सार्या प्रोटोकोल चे ओझे अति होत असावे..त्यात काही बदल करणे धुरिणांना शक्य नही का?
त्या मानाने ख्रिश्चन अंत्यसंस्कार (३ इदिओत , प्रहार सिनेमात बघितलेले) फार सौम्य आणि दिलासा दायक वाटतात.
माझ्या एका जैन मित्राच्या आईच्या अंत्यसंस्कार प्रसंगी पहिले कि १ -२ हार घालून घरून तडक विद्युत दाहिनीत नेले..सर्व उपस्थित 'नमो अरीहान्ताय' मंत्र पुटपुटत होते..बस्स इतकेच..तिथेही औपचारिकता कमी असल्याने ताण कमी जाणवत होता...
आजकाल निदान मुंबईतल्या मराठी सुशिक्षित वर्गात तरी असेच करतात. मृत व्यक्तीला बिछान्यावरून उचलून खाली चटईवर किंवा चादरीवर ठेवतात. (अलीकडे नुसत्या जमिनीवर ठेवत नाहीत.) आंघोळ वगैरे घालीत नाहीत. सर्व नातेवाईक आले आणि खाली तिरडी बांधण्याचे काम पूर्ण झाले की प्रेत खाली आणून थोडा वेळ तिरडीवर ठेवतात. घरात कोणाचे हार वगैरे घालायचे राहिले असतील तर इथे घालतात. शेवटचा नमकार वगैरे घरातच होतो. तिरडी लगेचच उचलली जाते. स्मशाने दूर असतात आणि रस्त्यावरच्या गर्दीतून अंत्ययात्रा नेणे कठीण असते, म्हणून शववाहिका बोलवली जाते. स्मशानातले विधीही आटोपशीर असतात. धनिक कच्छी दात्यांच्या कृपेने आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईतली पुष्कळशी स्मशाने स्वच्छ आणि सुविधायुक्त असतात. बाग असते, हिरवळ असते, बसायला बाके असतात, आंघोळीसाठी स्नानगृह, स्वच्छतागृहही असते. शंकराचे छोटेसे देऊळ असते, कुठेकुठे दशक्रियाविधीसाठी छोटासा हॉल किंवा चौथराही असतो. प्रसन्न वातावरण असते.
मी दहावीचा अभ्यास पाचगणीच्या हिंदू स्मशानभूमीत केला आहे.
लई भारी आहे. खरंच प्रसन्न वाटतं.
- दहावीला ८९ टक्के मिळून नंतर एक्स्पोनेन्शियल डिके कर्व्ह वाला ;) प्यारे
सामान्यतः दहावीत गुण मिळवणारे हे बारावी किंवा अभियांत्रिकीला जोरात आपटतात !
----दहावीत ७९ गुण मिळवून बारावीत व अभियांत्रिकीला असेमटोटिक कर्व्ह वाला --बालक
तुम्हाला बहुतेक दहावीच्या पेपरात कोण्या पिशाच्या ने मदत केली असेल
पुढे पण तुम्ही तिथेच अभ्यास करायला हवा होता :)
सामान्यतः दहावीत गुण मिळवणारे हे बारावी किंवा अभियांत्रिकीला जोरात आपटतात !
----दहावीत ७९ गुण मिळवून बारावीत व अभियांत्रिकीला असेमटोटिक कर्व्ह वाला --बालक
निदान भेसूर तरी नसते. मृताच्या जवळच्या नातेवाईकांचे दु:ख हलके होईल इतपत प्रसन्न वातावरण असते. आणि तसेही, अगदी जवळचे नातेवाईक सोडून बाकी गर्दीमध्ये गांभीर्य नसतेच. आपल्याकडे लोक शांततेने उभे राहू शकत नाहीत. त्यांना काही ना काही तरी बोलायला/चघळायला हवे असते. फक्त ती हलकी कुजबूज असते इतकेच. एखादा बरासा तरूण मुलगा दिसला तर कोण,कुठला अशी स्थळविषयक चौकशीसुद्धा होते. 'स्मशानशांतता' हा शब्द आता कालबाह्य होऊ घातला आहे.
स्मशानशांतता आता तशी गेली आहे. जवळचे नातेवाईक मित्र तेवढे दु:खी असतात बाकीचे औपचारिकता किंवा हजेरी लावणारे असतात तसे ते बळजबरी आल्यासारखे वाटतात. बाकी,स्मशानात आता फुलझाडे, आरामशीर टेकून बसायला बाके वगैरे असतात तेव्हा प्रसन्न वातावरण असते याच्याशी सहमत. हलक्या फुलक्या गप्पा, लक्षात येईल असे खदखदुन हसणारेही पाहिले आहेत.
-दिलीप बिरुटे
आत्मा मोक्ष मुक्ती वगैरे वगैरे खुळचट(??) कल्पनांमधून सर्वच समाज (मग तो कोणत्याही धर्माचा असो) एकाचवेळी बाहेर पडू शकत नसल्याने असे पर्यायी मार्ग सुचले तरी ते अंमलात किती प्रमाणात येतील हा एक प्रश्न किंवा अडसर असल्याने शेवटी हि चर्चा कागदावरच राहणार.
माझे म्हणाल तर माझ्या मरणाच्या वेळी समाज आजच्यास्थितीपेक्षा फार पुढे गेला नसेल तर माझा देह दान करायलाच आवडेल. त्यातून जे मिळेल ते मिळेल, त्याउपर त्याची विल्हेवाट कोणीही कशीही लावली तरी माझा आत्मा तळमळणार नाही.. किंबहुना तळमळायचे नाही असे मी आधीच स्वताच्या आत्म्याला बजावले आहे.
आमच्यात म्हणे बायका स्मशानभुमीत जात नाहीत. कदाचित प्रिय व्यक्तीचा विरह, स्त्री तिच्या कोमलस्वभावामुळे बघु शकत नाही ही धारणा असावी.पण आपली व्यक्ती दुर जाताना दारातुनच इतरांच्या खांद्यावर सोपवताना आपणही अजुन थोडावेळ त्याच्या पार्थिवदेहाकडे बघावे वाटतेच ना.आणी त्या व्यक्तीच्या देहाला अग्नी द्यायला बाईला अधिकार नाही.त्या वेळी भांडण्यापेक्षा दारातुन निरोप घेणेच इष्ट असे वाट्ते.असो. काहीसे अवांतर आहे हे.पण.... बाईचे मंगळसुत्र काढुन त्यातला मणी तिच्या नवर्याच्या तोंडात घालतात.आपले माणुस गेल्याचे दु:ख आणी त्यात या विधींचे अवडंबर....... नको वाटते हे सर्व.......
ती एक मूर्खपणाची प्रथा आहे. समजा कुणा स्त्रीला जावे वाटले तर गैर काय त्यात? जायला नको वाटत असेल तर ठीके पण वाटत असेल तर इतरांनीही बाऊ करता कामा नये.
अवांतरः स्मशानात गेल्यावर काय वाटते हे शब्दात सांगू शकत नाही- विशेषतः मृतदेहाची राख पोत्यात भरताना. इतकी वर्षे आधार म्हणून वाटत असलेल्या व्यक्तीच्या देहाची राख अशी सावडताना मृत्तिकेत्येव सत्यम् हे जाणवत राहते पदोपदी. काळाप्रमाणे अर्थातच हा सुन्नपणा पुढे कमी होतो पण आठवणी राहतात खर्या.
मलाही लहानपणी असंच वाटायचं , मग नंतर काही वेळा स्मशानात जायचा 'योग' आला ... एकदातर अगदी माझ्या वयाच्या मित्रासाठी :(
तेव्हा स्मशानवैराग्य हा काय प्रकार असतो ह्याचा अनुभव घेतला आहे ...
कदाव्हित हे असे स्मशानवैराग्य येवु नये म्हणुन बायकांना मनाई असावी बहुतेक ...
स्मशानात मीही गेलेलो आहे. एकदा नैतर दोनदा. पण मनाई करण्यात कै अर्थ नाही असेच वाटते अजूनही. ते पाहून जो कै शॉक बसेल तो हँडल करण्याइतक्या समर्थ नक्की असाव्यात बैका.
विशेषतः गुलाबबाई अमृतलाल त्रिपाठी या महिला किरवंतांबद्दल वाचून तर वरील विचार अजूनच पक्के झाले. वडील किरवंत होते त्यांच्या पश्चात त्यांनी हा व्यवसाय सुरू ठेवला-प्रचंड विरोध सोसून. लै खंबीर स्त्री.
ते एक सोडा, अगदी तेवढे नसले तरी असले बिनबुडाचे नियम तरी किमान काढावेत असे वाटते.
@ विशेषतः मृतदेहाची राख पोत्यात भरताना. इतकी वर्षे आधार म्हणून वाटत असलेल्या व्यक्तीच्या देहाची राख अशी सावडताना मृत्तिकेत्येव सत्यम् हे जाणवत राहते पदोपदी. >>> अगदी सहमत आहे...
सहमत.
तुम्ही सांगितलेल्या आणि इतर बर्याच बिनबुडाच्या प्रथा प्रत्येक समाजात धर्माच्या नावाखाली वेळोवेळी घुसडल्या गेलेल्या आहेत. पण त्या केवळ प्रथाच असतात. अनिष्ट अथवा केवळ वेडगळ प्रथांना विरोध करून त्या दूर करणे आपणच करायला हवे. हे काम नातेवाईक किती अंधश्रद्धाळू आहेत त्याप्रमाणे कमीजास्त कठीण आहेच. पण सुरुवात केल्याशिवाय ते आपोआप निश्चित होणार नाही.
एका नुकत्याच इंजीनीअरींग पूर्ण केलेल्या एका पंजाबी मुलीचे वडील वारले. अंतयात्रेच्यावेळी मुलीची आई बेशुद्ध पडली. मुलीने आईला उचलुन पलंगावर झोपवलं. वडीलांचा अंत्यसंस्कार स्वतः केला, चितेला अग्नी दिला. ( पुढेही अत्यंत हिमतीने त्या मुलीने प्रचंड कष्टाने लहान-सहान नोकर्यांपासुन सुरुवात करत हळुहळु आपलं करीअर व्यवस्थीत सेटल केलं, आपल्या बहिणींच्या शिक्षणाची सोय केली) तिच्या याच गुणांवर एक मराठी मुलगा फिदा झाला व आपलं सर्व आयुष्य तिच्या हाती सोपवुन स्वतः टगेगिरी करायला मोकळा झाला.
आज ति मुलगी अर्धवटराव आणि ज्यु. अर्धवटराव अशा दोन टग्यांना सांभाळत आहे :)
सौ रॉक्स.
आयला... म्हणजे आमचं काहि कौतुकच नाहि होय ??? आपल्याला बिन्धास उडाणटप्पुपणा करायचा असेल तर अशी खंबीर जोडीदारच पाहिजे सोबतीला, हे आम्हि अगदी व्यवास्थीत ओळखलं होतं ;) ... स्वतःच्या पारखी नजरला अगदी दाद देतो मी :D
शिवाय वाघिणीसोबत संसार करणं सोपं नाहि महाराज... :P
प्रतिक्रिया
.
महानुभाव
सहमत आहे. गंमत म्हणून कोणी
दफनाचा अजून एक प्रॉब्लेम
जाळण्यापेक्षा पुरणे हा उपाय
गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली
माझ्या
@जळणाच्या गैसवर मृतदेह
हो! आणी मी सुद्धा दहन'च योग्य
येकदम सहमत
गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली
एकतर्फी प्रश्न
जर कोणी मुस्लिम किवा ख्रिश्चन
१.पेतांची जाळून अन्तक्रिया
अतिशय चान विचार...
व्यावहारिक बाजू विरुद्ध भावनात्मक बाजू.
असेच करतात
प्रसन्न वातावरण असते.
मी दहावीचा अभ्यास पाचगणीच्या
सामान्यतः दहावीत गुण मिळवणारे
तुम्हाला बहुतेक दहावीच्या
किती हि प्रखर ज्ञानलालसा
अहो कसलं काय?
आत्मे कावतील
होय
सहमत.
पोचली प्रसन्नता.
सगळ्यात नावडता प्रकार म्हणजे
आत्मा मोक्ष मुक्ती वगैरे
छान.
आमच्यात म्हणे बायका
भाग्यश्री....
ती एक मूर्खपणाची प्रथा आहे.
स्मशानवैराग्य
स्मशानात मीही गेलेलो आहे.
विशेषतः गुलाबबाई अमृतलाल
@ विशेषतः मृतदेहाची राख
....
सहमत.
आपोआप निश्चित होणार नाही.
असंही असतं...
तुमच्या सौं चे मनःपूर्वक
+१
अरे वा!
एक्का साहेब, विकास,
स्वतःच्या पारखी नजरला अगदी
+१
ओहो क्या बात है.
तुमच्या सौंच्या पायाची प्रिंट
खिखिखि
Pagination