अभ्यासपूर्ण लेख आवडला. मार्क्सच्या कळकळीशी सहमत होऊनही बाबासाहेबांना त्याच्या मार्गाविषयी (आर्थिक वर्गांमधल्या संघर्षातून - क्रांतीतून - तळागाळातल्या वर्गाचा विजय) शंका होती ही माहिती कळली. तसंच दलित पॅंथरच्या फुटीविषयी साधारण माहित होतं, पण त्यामागची तात्विक, वैचारिक पार्श्वभूमी माहित नव्हती.
Modern industry, resulting from the railway system, will dissolve the hereditary divisions of labor, upon which rest the Indian castes, those decisive impediments to Indian progress and Indian power.
हे मार्क्सचं निदान नक्की कुठे चुकलं ते समजावून सांगाल का? जातीव्यवस्था आजकाल फक्त रोटीबेटी व्यवहारापुरती राहिलेली आहे. आज अमुक जातीने अमुकच काम करावं हा आचारच काय, विचारही पूर्ण मोडून पडलेला आहे. आज पंच्याण्णव टक्के मुलं शाळेत जातात. सर्व व्यवसायांमध्ये सर्व जातींचे लोक दिसतात. इथपर्यंतचा हा प्रवास मार्क्सला अपेक्षित मार्गाने झाला नाही, म्हणजे पददलित, कामगार आणि शेतकरी यांनी केलेल्या क्रांतीतून झाला नाही हे खरं आहे. त्याबाबतीत त्याचं निदान चुकलं म्हणता येईल. पण उत्क्रांतीची प्रक्रिया चालू आहे. तुम्ही दिलेल्या उदाहरणाचंच बघा - एके काळी अस्पृश्य असणारांना आज कापड गिरणीतली नोकरी त्यांच्या जातीपायी दिली जात नाही असं होतं काय?
शेवटच्या परिच्छेदातली विचारवंतांवरची झोड अस्थानी वाटली. आज मार्क्सवादाची भलामण करणारे फारसे शिल्लक नाहीत असं मला दिसून आलेलं आहे. तुम्हाला तशी प्रतिष्ठित उदाहरणं माहित असतील तर सांगा.
राजेशजी, आपलं म्हणणं मान्य आहे परंतु काहीशी असहमतीदेखिल आहे.
जातपात ही दृश्य स्वरुपात (शहरात) गेली असली तरी तिने सुक्ष्म स्वरुप धारण केले आहे असे माझे मत आहे. मुंबईतील एका मोठ्या कॉलेजमध्ये मी ही घटना पाहीली. लायब्ररीयन खालच्या जातीतील आणि तिच्या हाताखालील कर्मचारी तथाकथीत उच्चवर्णिय. ते जेवायला एकत्र बसत मात्र तिने दिलेलं काहीही खात नसत. अस्पृश्यता पारंपरिक स्वरुपात दिसत नसली तरीही ती नाहीशी झाली असे म्हणवत नाही. तिचे स्वरुप बदलले आहे. गावाकडे आजही खैरलांजी भीषण सारखी प्रकरणे होतात. तेथेही टीवी चॅनल्स असतील, लोकांकडे मोबाईल असतील. शाळा असतील. आधुनिकतेचे वारे वाहात असतील म्हणुन मार्क्सने म्हटल्याप्रमाणे या घटना संपलेल्या नाहीत.
शेवटच्या परिच्छेदातली विचारवंतांवरची झोड अस्थानी वाटली. आज मार्क्सवादाची भलामण करणारे फारसे शिल्लक नाहीत असं मला दिसून आलेलं आहे. तुम्हाला तशी प्रतिष्ठित उदाहरणं माहित असतील तर सांगा.
हा मुद्दा मी शैक्षणिक क्षेत्रासाठी मांडलेला आहे. प्राध्यापकांमध्ये, विशेषतः समाजशास्त्राच्या प्राध्यापकांमध्ये मार्क्सवाद हे चलनी नाणं आहे हे नक्की. फार काय, काही विभागच्या विभाग किंवा विद्यापीठांवर या तत्त्वज्ञानाची दाट छाया अजुनही आहे. हे चांगले की वाईट या बद्दल चर्चा करता येईल. पण तुम्ही कुठल्याही विद्यापीठाचा समाजशास्त्राचा अभ्यासक्रम पाहिलात कींवा तेथील प्राध्यापकांशी चर्चा केलीत तर मार्क्सवाद अगदी चीवटपणे तेथे मुळ धरुन आहे. इतक्या चिवटपणे की इतर काही गोष्टींना वावच मिळत नाही. आणि तेथुनच आपले उद्याचे आधारस्तंभ बाहेर पडत असतात.
हे अर्थातच मान्य आहे. सुंभ जळला तरी पीळ गेलेला नाही हे खरं आहे. मात्र प्रवास चालू आहे. आणि त्याची सुरूवात ही शैक्षणिक आणि आर्थिक सबलीकरणातून झाली. टीव्ही चॅनेल्स, मोबाईल, शाळा आहेत हे माझ्या मते काहीसं गौण आहे. टीव्ही, मोबाइल विकत घेण्याची क्षमता, आणि शाळेत जाण्याची परवानगी या अधिक महत्त्वाच्या आहेत. दीडशे वर्षांपूर्वी, जेव्हा मार्क्स लिहीत होता, तेव्हा तुम्हाला भारतातल्या शाळा कॉलेजात अस्पृश्य माणूस शिकवताना दिसला असता का? शिकवणं सोडा, शिकताना दिसला असता का? जातीव्यवस्थेद्वारे मोठ्या समाजावर 'तू हे काम करायचं नाही!' असा दंडक घालून तो अमलात आणण्याची शक्ती शून्यवत झाली आहे.
राजेशजी आपण याबाबत आशावादी आहात. मी देखिल आहे. पण यांत्रिकीकरणाच्या रेट्यामुळे अस्पृश्यता नाहीशी झाली काय? स्वातंत्र्य आणि त्यानंतर संविधानाने आणि कायद्याने जो रेटा आणला त्याचे काहीच महत्त्व नाही?
पण यांत्रिकीकरणाच्या रेट्यामुळे अस्पृश्यता नाहीशी झाली काय? स्वातंत्र्य आणि त्यानंतर संविधानाने आणि कायद्याने जो रेटा आणला त्याचे काहीच महत्त्व नाही?
स्वातंत्र्य आणि घटनेने दिलेले अधिकार यांमुळे सगळ्यात मोठा बदल झाला आहे हे मान्य. मात्र मार्क्सने म्हटलेलं त्याआधी शब्दशः लागू आहे. यांत्रिकीकरण-शहरीकरण-रेलवे हे हातात हात घालून जातात. शहरात रेलवेमध्ये शेजारी असणाराला 'कोणाचा रं तू' असं विचारायला वेळ नसतो, सोय नसते, त्यामुळे अनेक बंधनं गळून पडली. त्यामुळे पुढची चळवळ यशस्वी व्हायला एक मोठी पार्श्वभूमी तयार झाली.
या चर्चेमुळे मी मार्क्सवादी किंवा मार्क्सचं सगळंच बरोबर असं म्हणणारा आहे असं वाटेल, तर ते बरोबर नाही. माझं म्हणणं आत्ता एकाच विधानापुरतं आहे.
"गुलामाला तो गुलाम असण्याची जाणीव करुन द्या म्हणजे तो बंड करुन उठेल" असा अत्यंत मूलगामी विचार मांडणारे आंबेडकर मृत्युपश्चातही उपेक्षीतच राहिले काय? श्रीकृष्ण असो वा बुद्ध, शिवाजी असो वा आंबेडकर... त्याला निळ्या-भगव्या वेष्टनात गुंडाळुन ठेवणारी व्यवस्थाच खर तर सर्व समस्यांचं मूळ असावं...
प्रत्येक महान माणसाच्या शिकवणुकीचा पराभव त्याचे अनुयायीच करतात. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र धर्म बदलूनही दलितांची परिस्थिती एकदम बदलली किंवा सुधारली असावी असे काही वाटत नाही.
आताच्या मार्क्सवाद्यांबद्दल काय बोलावे? वृंदा कारत यांचा मेक अप आणि साड्या आम्हा मध्यमवर्गीयांना सुद्धा न परवडणार्या असतात. स्वतः साधे रहाण्यापेक्षा साधी राहणी आणि गरिबी यावर अशोक हॉटेलमधे सेमिनार घेणे जास्त सोपे असते.
या विषयावर लिहावं अशी पात्रता आणि त्याहून अभ्यास अजिबातच नाही. लेख वाचून आणि आजवर जे काही मत झालं असेल ते मांडतो.
कुठलाही वाद टाकाऊ नसतो. त्याचं मरण हे अनुयायांनी तय केलेलं असतं. मार्क्सवाद रशियात मृत्यू पावला, पण चीनमधे बदल सामावून घेत तो तगला. बदलांना सामोरं जाण्यासाठी बाळगलेली लवचिकता हा फरक ध्यानात घ्यावा लागेल.कुठलंही झाड कुठेही उगवत नाही. मार्क्सचं रोपटं भारतात रूजेल कि नाही या शंकेला मार्क्सवाद थोपवून आणि सारवासारवी करून उत्तर देता येत नाही. डाव्यांना त्यांच्या टार्गेट ऑडीयन्स पर्यंत पोहोचण्यात डॉ आंबेडकर डोकेदुखीच ठरलेत म्हणून त्यांनी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला असावा. पण वर्ग आणि वर्ण हा वाद आला कि पोथीत मान खुपसून बसल्याने ते व्यवहारी टरले नाहीत. तस्मात प. बंगाल आणि केरळ इथेच त्यांना जमीन मिळाली. तिथेही आंबेडकरी तत्त्वज्ञान पोहोचल्यास पोथी गुंडाळून ठेवावी लागेल.
नेहमीप्रमाणेच लेख आवडला. बाकी बोलायचे तर माझ्या अनुभावात आलेले अधिकांश मार्क्सवादी खात्यापित्या घरचे असतात. भरपूर अनुदाने खाऊन सेमिनार इत्यादी भरवितात. आंग्ल भाषेत खरडतात. यांच्या घरी नौकर चाकर ही असतात. शेवटी प्रत्येकाने स्वत:च्या (व्यक्ती असो व समाज, जाती इत्यादी) हिमाकीने जगायचे असते. दुसर्याचे हिसकून घेण्याचा विचारचे समर्थन करणार्याला काय म्हणायचे.
प्रतिक्रिया
सुरेख
वाचतेय हळूहळू.
अभ्यासपूर्ण लेख आवडला.
राजेशजी, आपलं म्हणणं मान्य
या घटना संपलेल्या नाहीत.
राजेशजी आपण याबाबत आशावादी
पण यांत्रिकीकरणाच्या
आंबेडकर देखील...
सुन्दर विवेचन
लेख आवडला
उत्तम लेख.सोप्या भाषेत
या विषयावर लिहावं अशी पात्रता
नेहमीप्रमाणेच लेख आवडला. बाकी
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक
सु रे ख
लता मुरुगकरांचा प्रबंध कुठे