कथेतील (ही कथा आहे असे गृहीत धरल्यास) अनेक टोके (मुद्दे) मोकळेच सोडून दिल्यासारखे वाटून एक वाचक म्हणून वाचनाचा आनंद मिळत नाही.
आई च्या दृष्टीनी मी तिचं राग काढायचे हक्काची जागा होते .बाबांच्या दृष्टीनी मी चार चौघात नेण्यासारखी नव्हते कधीच ..सगळ्याच गोष्टीत सुमार असणाऱ्या पोरीला चार चौघात न्यायची त्यांना लाजच वाटायची.
एक तर हे पटत नाही. आई-वडिलांना आपल्या मुलांची 'लाज' वाटत नाही. इथे अजून बर्याच स्पष्टीकरणाची गरज आहे.
"तुझ्या बायकोशी खोटं बोलून येणार आहेस न तू ..मला तेच नकोय.तिला खूप वाईट वाटेल रे. आपण नाही भेटायचं कधीच ..जे काही सुंदर क्षण होते ते तसेच ठेवू या.काय झालं,कसं झालं हे सगळ्या प्रश्नांना आता काही उत्तर नाही . तू सुखात आहेस ,माझ्यासाठी तेच खूप आहे."
एवढा समतोल विचार करू शकणारी मुलगी, आई-वडीलांना 'लाज' वाटावी अशी आहे हा विरोधाभास पचायला कठीण आहे.
खूप कणखर झाले होते हळू हळू. आई रागावली कि डोळ्यातलं पाणी दिसू न देत हसायला शिकले .. निर्लज्ज झाले ..
अचानक तू आलास .आणि सगळं काही बदललं ..
सगळं बदललं म्हणजे काय? कणखर मनाची मुलगी मनाने दुर्बल झाली? की डोळ्यातील पाणी दिसू न देता हसायला शिकलेली मुलगी वरचेवर बारीकसारिक घटनांनी अश्रू ढाळू लागली? नक्की काय झालं? तपशिलाची गरज आहे.
एखाद्या लहान खोलीत जरा दोन-चार पाऊले चालल्यावर लगेच समोर भिंत यावी अशी भावना झाली.
ह्या सर्व त्रूटींमुळे, वरती पैसा ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे कथा अर्धवट राहिल्यासारखी वाटते आहे.
आई वडिलांना मुलांची लाज वाटते हे मी अनुभवलंय . जेव्हा दोन मुलां पैकी एक जण उजवा असेल तेव्हा तर जास्तचं.समतोल विचार वगैरे फक्त म्हणायला असतं काका .. माणूस कसा आहे हे त्याच्या दिसण्यापेक्षा तो समजून घेतला तर .. पण हे खूप कमी लोकांना कळत . श्री नी मीतू ला समजून घेतलं आणि मीतू बदलली .. social झाली .आपल्यासाठी कोणी आहे ..आपला कोणीतरी विचार करतंय ही भावना खूप महत्वाची असते .श्री साठी कदाचित तेच सगळं असेल म्हणून दोघांची मन जुळली ..
दोन मुलांमध्ये डावं-उजवं हे असतंच. लहानपणी आपल्याला वेगळी वागणूक मिळते आहे, डावललं जातय, आपण आई-वडिलांना नकोसे आहोत वगैरे भावना मनांत येतातच. पण त्या त्या कच्च्या वयाच्या मानसिक अवस्था असतात. त्या कायमस्वरुपी टिकत नाहीत. त्यांना थारा द्यायचाच नसतो. वैचारिक परिपक्वतेबरोबर त्या मागे पडतात, पडल्या पाहिजेत.
समतोल विचार हे बोलण्यावागण्यातून परावर्तीत होत असतात. आई-वडीलांना मुलाचं/मुलीचं अंतरंग कळून येतं. आई-वडीलांची मतं बदलतात. कथानायिकेच्या बाबतीत ती बदलली नसतील तर आई-वडिलच परिपक्व नाहीत असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. असो. कथेच्या अनुषंगाने लिहीले आहे. वैयक्तिक घेऊ नये, ही विनंती.
श्री आणि मितू जर समजून उमजून एकत्र आले असतील, एक्मेकांच्या प्रेमात असतील (असं मी गृहीत धरतो आहे) तर माशी शिंकली कुठे?
म्हणून म्हंटले आहे कथा फार त्रोटक वाटते आहे. अनेक मुद्दे स्पष्टीकरणाअभावी लोंबकळत पडले आहेत. विषय नीट हाताळला नाही असे म्हणावेसे वाटते. कथेच्या सुरुवातीला 'श्री - भाग पहिला' असे किंवा शेवटी 'क्रमश:' लिहीले असते तर कांही मुद्द्यांचे स्पष्टीकरण त्यातून होईल अशी आशा बाळगून प्रतिसादातून मतप्रदर्शन केले नसते. असो.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.
भाग दुसरा आहे?
मग ह्या कथेला 'श्री - भाग पहिला' असे नांव किंवा कथेच्या शेवटी 'क्रमशः' असे का टाकले नाही? ही वाचकांची दिशाभूल आहे.
ह्या कथेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे किंवा व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचे निरसन न करता कथेच्या पुढच्या भागाकडे वळणे, पर्यायाने आपल्याच वाचकवर्गास फाट्यावर मारणे कितपत समर्थनिय आहे?
"ह्या कथेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे किंवा व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचे निरसन न करता कथेच्या पुढच्या भागाकडे वळणे, पर्यायाने आपल्याच वाचकवर्गास फाट्यावर मारणे कितपत समर्थनिय आहे? "
असा काही हेतू नव्हता .कथा लिहायला वेळ लागला म्हणून उशीर लागतोय .मला असा वाटलं कि प्रश्नांची उत्तरे दुसर्या भागात मिळतील म्हणून त्याचे निरसन केले नाही .भाग २ असा टाकायचा राहिला त्याबद्दल माफी असावी . पुढच्या वेळे पासून काळजी घेईल .
>>>असा काही हेतू नव्हता .....मला असा वाटलं कि प्रश्नांची उत्तरे दुसर्या भागात मिळतील म्हणून त्याचे निरसन केले नाही.
असो. निदान प्रतिक्रियांची पोच देणं आणि पुढच्या भागात सर्व उत्तरे मिळतील असा 'निरोप' देणं आवश्यक असतं.
>>>भाग २ असा टाकायचा राहिला त्याबद्दल माफी असावी . पुढच्या वेळे पासून काळजी घेईल.
माफी वगैरे मागायची गरज नाही. तुम्ही मिपावर नव्याने लिखाण करता आहात म्हणून कथा लिखाणातील कांही 'मूलभूत आवश्यकतांचा' उल्लेख केला आहे. राग मानू नये.
खरच गैरसमज नसावा. लिखाणाला वाचक मिळावा आणि त्यांचा लेखकाला समृध्द करेल असा प्रतिसाद मिळावा हे भाग्य .. (हा प्रतिसाद तिरकस घेऊ नये हि विनंती ..मनापासून लिहिलंय )
खुलासा : मीता ह्यांनी मागे चिमण्यांच्या फोटो वेळी स्त्री आयडीने धागा टंकला म्हणून प्रतिसाद मिळाले वगैरे छापून स्वतःबद्दल असंशय व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने इथे त्यांना श्री. मीताभाऊ म्हणून म्हटले आहे. त्यांनाच जर खात्री नाही तर इतर वाचकांना कशी असेल बरे? ;)
बाकी स्नेहांकिता तैने म्हटल्याप्रमाणे लिखाण समजलेलं असलंच पाहिजे असा काही नियम नाही.
तसेच प्रा. डॉ. सरांचे धोरण नेहमीच मध्यम मार्गी असल्याने त्यांनी पुढचा भाग टाका असं म्हणून प्रोत्साहन दिलं. 'तशेच' ह्या भागात न समजलेले कथेचे पैलू पुढील भागात समजतील अशा अपेक्षेने पुढचा भाग टाका असं म्हटलं. तुम्ही आमचं म्हणणं न समजून घेता जो त्रिवार निषेध केला आहे त्यापैकी दोन निषेधांना योग्य जागा दाखवण्यात येत आहे. एक ठेवा.
-प्यारेकाका.
प्रथम मिपावर स्वागत. लेख काल्पनिक कि सत्यवादी हे तुम्हालाच चांगले ठाऊक. कथा असेल तर शब्द अपुरे पडले, कथा अर्धवट वाटते, जाणकार आपले मत देतीलच. एक व्यक्ती म्हणुन आपण जगताना आयुष्याचे निरनिराळे पैलु घेऊन जगत असतो. सगळेच पैलु लोकासमोर येतात असे नाही. सगळ्याच भावना लोकांना माहित असतात असे नाही. शेवटी जग हे आता पर्यंत पाहिलेल्या, जगलेल्या दृष्टिकोनातून समोरच्याला पाहत असतो. मला तरी तुमचा हा लेख कळला म्हणण्यापेक्षा भिडला. प्रत्येक गोष्ट प्रक्टीकॅलि नाही घेता येत. त्या कळायला कदाचित त्या रस्त्यावरून चालावेच लागते.
प्रतिक्रिया
कळलं नाही
क्ल्जी घेने
कुणाची ?
फारच त्रोटक.
थोडक्यात सांगते
विषय नीट हाताळला नाही.
ग्ग्ग
भाग २
निराशा झाली.
माफी असावी
वाचकांच्या दृष्टीकोनातून.
राग नाही
जरूर मिळेल.
खरच गैरसमज नसावा.
बदल केले आहेत.
धन्यवाद
हायला..
स्वागतार्ह.
हम्म
लगे रहो !
तै असं करु नका.
प्यारे भौ,प्रोत्साहन देणे
आता मी काय केलं?
प्यारेकाकी असच प्रोत्साहन
अब्या डब्या,
थान्क्यू.
धन्यवाद प्यारे काकी
त्रिवार णिषेध !!!
खुलासा : मीता ह्यांनी मागे
मिता,
धन्यवाद
मला
ठठो.......
ही स्मायली
स्मायलीं साठि
लवकर पुढचा भाग टाका..........