Welcome to misalpav.com
लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

प्रेयसी बायको होई पर्यंत समजूतदार असते , पुढे पत्नी झाल्यावर ....... कथा आवडली. दुनियादारी सिनेमा मधील एक वाक्य आठवले. नाका तोंडात पाणी जायला लागल्यावर आपण जगण्याची जी धडपड करतो तशी आपल्या आयुष्यातील प्रेम मिळवण्यासाठी का नाही करत .

(एका-दुसर्याला घास भरवत खाण्याचीही गम्मत फक्त प्रेम करणार्यांनाच कळू शकते).
क्या बात है! इथच कथेने मनात घर केलं.... अन निव्वळ कल्पनेत प्रेम करणारा हे लिहुच शकत नाही. परवा बालमैत्रिण (?)भेटली. अशीच हुरहुर अनुभवली..... घटस्फोट घेतेय म्हणाली. मी निशब्द.

खरेय, मला कुठे हॉटेलमध्ये एखादे जोडपे (विवाहित असो वा अविवाहीत) वेगवेगळे अन आपापले मेनू खाताना दिसले तर काय बावळट आहेत असेच वाटते.. बाकी जेवल्यावर कोणीतरी आपल्या "आ" केलेल्या तोंडात बडीशेप टाकण्यातही एक मजा असते..

लेखाबद्दल बोलायचे झाल्यास थांबवायचे होते राव, बोलून घ्यायचे.. न बोलता लागलेल्या रुखरुखीपेक्षा बोलून काही खपल्या निघाल्या तर निघू द्यायच्या.. मला फेसबूकावर अन आता वॉस्सअपवर जुना क्रश भेटला तरी तिची चौकशी करून आधी ती सुखात नांदतेय हे कन्फर्म करतो, आणि मग बिनधास्त सांगतो की मला तेव्हा तू आवडायचीस, पण आता मी सुद्धा सुखात आहे तर डोण्ट वरी, मागे नाही लागणार तुझ्या परत.. :)

च्यायला , रायसीना पर्वतावर गेल्या ३० वर्षांपासून तपस्या करतोय तरी ही 'धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी' या दोन शब्दांचे अर्थ कळला नाही.

तुमची बायको समजूतदार आहे हे चांगलेच पण अशी व्यक्ती की जी, सोडताना नीट मनमोकळं बोलणं तर जाउंद्या पण काहीही निरोप न घेता गायब होते, ते ही वर्षानुवर्ष, तुमच्या आयुष्यात पुढे आली नाही हेच बरे! Few people come in our life for season and very few for reason! सिझन संपल्यावर तुमची मैत्रिण गायब झाली ह्यातच काय ते समजा. गंमत म्हणजे, ३० वर्षांनीही पुन्हा तेच केले नि तिने तुमच्या हातात मात्र गजरा..! - (पृथ्वीतत्त्वाचा) उपास