Welcome to misalpav.com
लेखक: उद्दाम | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

चर्चा वाचली. त्यात एक मुद्दा जाणवला की दफन करायला फार जागा लागते. भारतातल्या सगळ्या हिंदु लोकांनी दफन करायचे ठरवले तर जागा कमी पडेल. इथे आपण गृहित धरतोय की मृतदेह आडवा जमिनीत दफन करायचा. त्या ऐवजी जर त्याचे उभ्याने दफन केले तर? जागा कमी लागेल. त्यातही जमिनीत खोल बोअर मारुन एकावेळी एका पेक्षा अधिक मृतदेह कमीत कमी जागेत दफन करता येतील. या पर्याया मुळे दहना ऐवजी दफन पर्यावरण पुरक ठरेल का?

त्यातही जमिनीत खोल बोअर मारुन एकावेळी एका पेक्षा अधिक मृतदेह कमीत कमी जागेत दफन करता येतील.
बोअर मारल्यावर पाणी लागले तर ?

बरं आहे की . आधी ५० वर्षे पाण्यासाठी बोअर वापरायची. मग हाडं कुजुन त्याचं तेल होईल. मग तीच बोअर तेलाची विहिर म्हणून वापरायची.

मग हाडं कुजुन त्याचं तेल होईल.आयला, इतकं डोंबलाचं सायन्सचं अज्ञान आहे तर वैचारिक धागा काठायचा आव काय म्हणुन? सरळ जोक, विनोद, टिंगलटवाळी आसा विषय या धाग्याला द्यायचा ना, हाकानाका :)

आमचा धागा चितळे मास्तरच्या शिकवणीगत असतो. इथे गोदीच्या पदरापासून एलफिस्टनच्या स्पेलिंगापर्यंत सगळं ज्ञान- अज्ञान खुलेपणाने चर्चायची परवानगी आहे.

देहदानासाठी निरोगी शरीरापेक्षा मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स अस्तील तर विद्यार्थ्यांना जास्त ज्ञान मिळते का ?

नॉर्मल आणि अ‍ॅबनॉर्मल दोन्हींसाठी दोन स्वतंत्र विषय असतात. दोन्हीकडे त्याप्रमाणे अवयव लागतात.

माझ्या माहितीनुसार मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स असणारे, कुपोषित 'बेवारशी' मृतदेह मिळतात पण आरोग्यसंप्पन्न, व्यवस्थित पोषण झालेले देह आणि पर्यायाने आतील अवयव जसे यकृत, हृदय, फुफ्फुसे, मुत्रपिंड इ.इ.इ. महत्त्वाचे शारीरिक भाग प्रत्यक्ष अभ्यासण्यासाठी उपलब्ध होत नाहीत.

दफन सुरु करणे हा रोगापेक्षा इलाज जालीम प्रकार वाटतो.
सहमत आहे .
पण समजा मृत्यूनंतर काही संवेदना शिल्लक राहात असेलच (बाहेरुन मोजता येणारी किंवा दिसणारी नसली म्हणून आतून नसेलच असं ठाम म्हणता येत नाही आणि ते जिवंतपणी कळणं अशक्य.) अशा वेळी पूर्णपणे अंत होणे असं काही व्हायला वेळ लागत असेल तर जे आहे ते लवकर जाळून मोकळं केलेलं बरं.
कुठेतरी वाचलं होतं . शरीराचा मृत्यू झाला तरी वासनादेह शरीर भोवतीच काही काळ घुटमळत असतो . जाळल्यामुळे तो लवकर पार्थिव देहापासून मुक्त होतो आणि पुढच्या प्रवासाला जातो . म्हणून हिंदू धर्मात जाळण्याची पद्धत आहे

हाच नियम लावायचा झाला, तर सगळे प्राणीही जाळून टाकायला नकोत का? खाण्यासाठी कोंबडी कापली, प्रेत जाळायला झाड कापले तर त्यांच्या आत्म्याचे काय होते?

मृतदेह जाळण्यात वृक्ष संपत्तीचा र्‍हास होतो. पुरण्यामुळे जमीन कमी पडेल, जंतू संसर्गाचा धोका आहेच. अवयव दान केले तरी बाकीच्या देहाची विल्हेवाट लावावीच लागते. विद्युत दाहिनीस भयंकर प्रमाणात वीज लागते. आधीच वीजेच्या कमतरतेने ग्रस्त महाराष्ट्रास उच्च दाबाची वीज वापरणे जरा कठीणच आहे. गॅस दाहिनी प्रणालीनुसार माणशी एक सिलेंडर, नातेवाईकांनी आपापल्या घरून आणला तरच शक्य आहे. तेंव्हा सध्यातरी......

मरना मना है।

खाण्यासाठी कोंबडी कापली, प्रेत जाळायला झाड कापले तर त्यांच्या आत्म्याचे काय होते?
कोंबडीच शरीर लगेच नष्ट होता नाही का? लगेच त्याला धुवून बिवून शिजवला जातं . पुरलेल्या मृतदेहाच काही लगेच विघटन होत नाही . वासना देह हा मनुष्यात strong असतो . कारण वासना मनुष्यांना अस्ते. प्राण्यांना , झाडांना नहि. झाडांच्या संवेदना अतिशय क्षीण असल्यामुळे त्यांना अतिशय कमी वेदना होतात . तसेच हि प्रथा जेव्हा सुरु झाली तेव्हा वाळलेली झाडं विपुल प्रमाणात होति कारण हिरवं झाड विनाकारण तोडू नये असं हि हिंदू धर्म शास्त्रांमध्ये सांगितलेल अहे.

म्हशे, अगं कोंबडी हे फक्त उदाहरण म्हणून होते. रस्त्यावर मांजर मेले, गाडीखाली बेडूक मेला, कावळ्याने चोचीने उंदीर फाडला ... इथे तर ही शरीरे लगेच नष्ट होत नाहीत. मग त्यांच्या आत्म्याचे काय होते?

हिंदु लिंगायतांच्यात शरीर पुरतातच की. त्यांचा आत्मा घुटमळत नाही का? एकाच हिंदु धर्मात लिंगायतांना एक पद्धत आणि इतरांना दुसरी प्द्धत , असं डिस्क्रिमिनेशन का आहे ?

इथे तर ही शरीरे लगेच नष्ट होत नाहीत. मग त्यांच्या आत्म्याचे काय होते?
सांगीतल ना वासना मनुष्यांना अस्ते. प्राण्यांना , झाडांना नहि. अश्या प्राण्यांचे देह लगेच पुढच्या जन्माला जातात. प्राण्यांना चांगलं वाईट कळण्याची बुद्धी नसल्यामुळे त्यांना पाप पुण्याची भानगड नस्ते.

+१ मनुष्य शरीर सोडून इतर सगळ्या भोगयोनी आहेत.

ते मरु देत. डू आयडींनी जालीय आत्महत्या केली तर त्यांचा आत्मा घुटमळतो का?

आत्महत्याच काय, खून किंवा वध झाला तरी घुटमळतो, मोक्ष लाभत नाही. एकतर पुनर्जन्म किंवा ह्या लोकावरुन त्या लोकावर.... जाणकार सांगतात ब्वा! आम्हाला माहिती नश्शे! =))

वासना असणं नसणं ही एक गोष्ट आहे. पाप पुण्याची जाणीव ही वेगळी गोष्ट आहे. प्राण्यांना , झाडाला वासना नसते असं कुणी सांगितलं? वासना असो वा नसो, आत्मा तर असतोच ना?

म्हशे, तुझे हे विचार वाचून एक अभद्र शंका उचमळली बघ .. तू म्हणतेस शरीर नष्ट नाही झालं की आत्मा घुटमळतो. वर काही लोक अवयवदानाचा आग्र्ह करताना म्हणाले आहेत.. की ते मेल्यावर सात अवयव दान करु शकतील म्हणून ... मग असे जर कुणी केलं तर मग त्यांचा आत्मा सात ठिकाणी घुटमळणार का? :)

डास झुरळे ढेकुन , देवीचे जम्तु , शेतातली कीड याचंया आत्म्याचे काय होते?
त्यांच्या अतृप्त आत्म्यांचे भूत होत असावे. पण जसे माणसाचे भूत माणसालाच झपाटते, दिसते, त्रास देते, इतर प्राण्यांना नाही; तसेच कोंबडी, बकरा यांचे भूत पण कोंबडी, बकरा यांनाच बाधत असावे. याबद्दल एखाद्या कोंबडी, बकर्‍याचे मत, अनुभव जाणून घेण्यास उत्सुक आहे. :)

आपण जसे आपल्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याविषयी धागे काढून वाद्/चर्चा करतो, तसे कोंबडी, बकरा असे प्राणी काय करत असावेत? त्यांनाही नैसर्गिक मृत्यू यावा असे वाटत नसेल का? :)

वासना असणं नसणं ही एक गोष्ट आहे. पाप पुण्याची जाणीव ही वेगळी गोष्ट आहे. प्राण्यांना , झाडाला वासना नसते असं कुणी सांगितलं? वासना असो वा नसो, आत्मा तर असतोच ना?
आत्मा असणं आणि वासना असणं ह्या २ वेगळ्या गोष्टी आहेत . आत्म्याचं मूळ स्वरूप हे शुद्ध , पवित्र ,वासनारहितच अहे. वासना आली कि तिथे पाप आलं . असो हा विषय वेगळा आहे . पण प्राण्यांना वासना असतात हे जर उदाहरणासह सांगाल काय?

म्हशे, अजुन एक डब्बल अभद्र शंका उचमळली बघ. एकाच्या शरीरात दुसर्‍याचा अवयव दान करुन बसवला आहे. काही वर्षे जगून तोही मेला. तर त्याच्या शरीराभोवती दोन आत्मे घुटमळतील का? :) :)

मग असे जर कुणी केलं तर मग त्यांचा आत्मा सात ठिकाणी घुटमळणार का?एकाच्या शरीरात दुसर्‍याचा अवयव दान करुन बसवला आहे. काही वर्षे जगून तोही मेला. तर त्याच्या शरीराभोवती दोन आत्मे घुटमळतील का?
हे त्या आत्म्यावर depend आहे त्याने किती ठिकाणी घुटमळायच . घुटमळनं काही compulsary नहिये. कसं असतं, बराच वेळ मेलेल्या माणसाला कळतच नाही तो मेलाय म्हणून . आणि कळल्यावर मग त्याला दुख होत. आयुष्यभर माझ माझ म्हणून ज्या गोष्टींवर आपल फार प्रेम असतं ती गोष्ट तुटली , फुटली , हरवली कि आपल्याला दु:ख होता न. मग इतकी वर्ष ज्या शरीराने साथ दिली त्या शरीराला सहज सोडायला आत्मा तयार नसतो. म्हणून तो तिथे घुटमळतो. म्हणून ते शरीर लवकर नष्ट करून टाकणं आवश्यक असत म्हणजे त्याला जास्त त्रास होत नाही . एखादी गोष्ट तुटली कि आपण त्याला पुन्हा जोडून वापरण्याचा प्रयत्न करतो . पण ती खूपच damage झाली तर तिला फेकून देवून आपण विसरून जतो. साधारण तसच