त्या १०+ अब्ज लोकांच्या नाड्या कुठे ठेवल्या आहेत याचा पत्ता लागू न शकल्याने फाईलवर "मिसींग" असा शेरा मारून ती बंद करण्यात आली आहे. शिवाय त्या दिलेल्या १० पट्ट्यांवरील मजकूर आपोआप बदलत असल्याने (त्या प्रेझेंटेशनमधल्या सुद्धा पट्ट्यांवरील मजकूर बदलत होता असे नंतर कोणीतरी म्हणत होते) त्यावर नक्की केव्हा काम सुरू करायचे हे न समजल्याने त्यासुद्धा गुंडाळून ठेवण्यात आल्या आहेत. अशा तर्हेने विषय मिटलेला आहे.
अनेक व्हीडीओ तयार केले गेलेत. शिवाय आजकाल जो आपले नाडी भविष्य पाहतो त्याला मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढायला परवानगी द्यायला नाडी केंद्रांनी सुरवात झाली आहे...
होय. अभ्यास चालू आहे. पण तमिळभाषा प्रेमी पुढे आले तर हे काम जोरात चालू राहील. शाळा कॉलेजातील पगारी नोकरदार वेळ मिळत नाही ना म्हणून टाळाटाळ करताना दिसतात...
योगविवेक जी,
मिसळपाववर आपले स्वागत. नाडीग्रंथांवरील सध्या होत असलेल्या अभ्यासकार्याची मिपाकरांना माहिती असावी अशा विचाराने आपण हा धागा सादर केला असावात. त्याबद्दल आपले अभिनंदन.
तमिळनाडूमधील तंजावूरच्या तमिल विश्वविद्यालयात भेट देताना आपणास आलेल्या अनुभवाचे साद्यंत वर्णन केलेले वाचून त्या आठवणी जागृत झाल्या. मराठी टंकलिखाणाची विशेष सवय नसूनही त्या सहलीतील प्रत्येक घटनेची नोंद असावी म्हणून अशा घटनांची रीतसर लेखी नोंद आपण करत आहात हे योग्यच आहे.
मिसळपाववर नाडीग्रंथांवर लेखन सादर होऊन अनेक वर्षे झाली. कोणी अभ्यासपुर्ण लेखन करून सादर केले तर काही वाचनांची त्या लेखनाकडे पहायची दृष्टी पुर्वमतांमुळे समानतेची नसते. आपल्याला नावडत्या धाग्यावर टिंगलटवाळी करून वा त्याला हिणकस ठरवून काहींना समाधान मिळत असल्याचा आभास होतो.
आपल्याला माहित आहे की हवाईदलात असल्यापासून नाडीचा विषय मी आपणहून काढत नाही. मिसळपावही अपवाद नाही. नाडीग्रंथांवर टिप्पणी करणारा धागा इथे वाचनात आला म्हणून मिपावरील सदस्यांना या विषयाची तोंडओळख व्हावी म्हणून माझ्यातर्फे लेखन केले गेले. नाडीग्रंथ हा विषय ज्याचा त्याने अनुभव घेण्याचा असल्याने मी तसे विषद करत असतो.
नाडीग्रंथांवरील माझे विविध धागे या विषयाची व्याप्ती व महत्व सांगणारे होते. ज्यांचा जोतिष या विषयावर रोष आहे त्यांच्याकडून नाडीग्रंथातील भविष्य कथनामुळे स्वाभाविकपणे विरोध होऊन उलटसुलट टिप्पणी होत राहतील याची मला जाणीव होती पण म्हणून त्यांच्या टीकाटिपणीकडे दुर्लक्षकरून, तर कधी पर्वा न करता त्यांना समर्थ उत्तरे देऊन ज्यांना या विषयात रस आहे त्यांच्यासाठी मी धागे वेळोवेळी सादर करत होतो. असो.
नाडी ग्रंथांवर जे लोक अभ्यास करून त्यांचा पाठपुरावा करू इच्छितात, त्यांच्यासाठी आपल्यासारख्या नाडी ग्रंथप्रेमींच्या प्रयत्नांमुळे कार्यशाळेचे संचलन करायचे काम योग्य त्या गतीने होत आहे. अभ्यासकार्य कोणी करत असेल तर त्यास नामोहरम करायला सरसावयाचे. विरोध दाखवायला पुरावे द्यायचे नाहीत, जमले तर विषय भरकटवून, खुरपटे काढून वाचकांच्या मनात संभ्रम उपस्थित करायचा उपद्व्याप करायला काहींना रस असतो. हे आपण जाणताच.
आपण सादर केलेला धाग्याचा विषय असाच आहे. पण प्रत्यक्षात नाडीविरोधात पुरावे सादर करायची वेळ आली की आपण त्या गावचे नाही असा साळसूदपणाचा आव आणला जातो. आपल्या समोरच तमिल भाषेचे व त्यातल्या त्यात ता़पत्रावरील प्राचीन तमिल भाषा व लिपीच्या दोन अभ्यासकांनी ती क्लिप पाहून थक्क होऊन झाल्यावर या विषयाची महती जाणली व तसे शोधकार्य हाती घ्यायचे मान्य केले. या सर्वाला आपण साक्षी होतात. यामुळे अन्य ज्योतिष विरोधी लोकांचे नाडी पट्टीतील लिखाणावर काय मत पडते, याला किती किंमत द्यायची हा आपण ठरवायची गोष्ट आहे.
आपल्याला माहित असेल की 1996च्या आसपास इंडिया स्केप्टीक नावाच्या कै. बी प्रेमानंदांच्या मसिकातून नाडीग्रंथांवरील त्यांच्या अनुभवाच्या दाव्याला उद्धेशून कै. मा.स. रिसबुड नामक पुण्यातील विचारवंतांनी, - जे नाडीविरोधक संस्थेचे या कामासाठीचे विभागप्रमुख म्हणून हिरीरीने काम पहात असत - बराच पत्रव्यवहार केला होता. त्यात त्यांनी 'बुद्धिवाद्यांचे नेता' - बी. प्रेमानंदांनी हातचलाखी करूनही नाडीग्रंथातून अचुक माहिती मिळाल्याचे' असे एका लेखातून धडधडीत म्हणाल्याने शेवटी प्रेमानंदांनाही कोणी चोरावर मोर गाठ पडला याचे वाईट वाटून आले. जे नेहमीच विरोधकांशी नाना चलाख क्लृप्त्या करून विरोधकांचा खोटेपणा उघड करतात अशा प्रमुकाने हातचलाखी करूनही नाडीपट्टीत त्यांचा उल्लेख अचुक आला हे म्हणणे खचितच शोभादायक नव्हते असे वाटून खरेखोटे काय याचा साक्षमोक्ष लावायला पत्रव्यवहार केला असावा. त्यांच्या त्या विधानावर चकीत होऊन आपणासारखा प्रखर विरोधकच नाडीग्रंथातून माहिती अचुक आली असा उल्लेख कसा करू शकतो? असा असा प्रश्न विचारून या विषयाला वाचा फोडली होती. आपण स्वतः खोटेपणा करूनही नाडीवाचकांने नाडीग्रंथांच्या ताडपट्टीत त्या त्या व्यक्तीचे नाव लिहिलेले असते हे खरे असेल तर तुम्ही ते वाचायचा का प्रयत्न का करत नाही? असे विचारून त्यांना जाम फैलावर घेतले होते. त्याला उत्तर म्हणून बी. प्रेमानंदांनी रिसबुडांना उलट पक्षी, ‘तुम्ही माझे लेख नीट वाचत नाही. आमची माहिती त्याने आमच्या नकळत काढून तीच आम्हाला ताडपट्टीतून मिळवत असल्याचा बहाणा केला' असा मी जो निष्कर्ष काढला त्याच्याकडे आपण साफ दुर्लक्ष केलेले दिसते’ असे म्हणून रिसबुडांवर - त्यांच्या अभ्यासू वृत्तीवर - टीका करून त्यांची हेटाळणी केली होती. तरीही रिसबुडांनी तो प्रश्न पुढे रेटून लावल्यावर ‘तुम्ही माझ्या एका पुस्तकाचे सहलेखन आहात तरीही असे प्रश्न कसे उपस्थित करता? आपल्या वरिष्ठतेचा व ज्ञानाचा आदर म्हणून मी हे नाडीप्रकरण इतक्या विस्ताराने लेखातून पुन्हा हाताळतोय अन्यथा माझ्यादृष्टीने हा विषय केंव्हाच संपलेला आहे. याची जाणीव असू दे’ असे काहीसे खडसावल्याचे स्मरते. काहीशा वैतागाने त्यांनी रिसबुडांना आपल्याकडे नाडीपट्टीच्या फोटोचा पुरावा असल्याचे म्हणता तर मग तो मला पाठवावा त्यातील मजकूर वाचून त्यात नावाचे उल्लेख कसे नसतील असे मला ताबडतोब दाखवता येईल. पण आपण असा पुरावा पाठवतो म्हणून ही अद्याप सादर केलेला नाहीत. इतःपर हा विषय माझे लेखी संपला आहे. त्यावरून रिसबुडांनी तो फोटोचा पुरावा काही कारणांनी प्रेमानंदाना पाठवला नसावा किंवा प्रेमानंदांशी यापुढे अर्थपुर्ण विचारमंथन होणे शक्य नाही असे उमगून पत्रव्यवहार थांबवला असावा. मात्र प्रेमानंदांनी झिडकारले म्हणून तरी कै. रिसबुडांनी आपणहून त्या फोटोतील नावाचा मजकूर खरा कि खोटा याची शहानिशा करायचा प्रयत्न केला नाही. वर कडी म्हणजे तमिलभाषेची बाराखडी, कूटलिपीची व देवनागरीतील अक्षरांची सांगड घालणे आम्हाला शक्य नाही असे साळसूदपणे म्हणून शाब्दिक हार कबूल करून एका अर्थाने ताडपट्टीतील लेखनाची शहानिशा करायच्या बाबीवर शेवटपर्यंत मौन साधले. कै रिसबुडांची खासियत अशी की एका बाजूला ते प्रेमनंदांच्या पाणउताऱ्याला टक्कर देत होते की नाडीपट्टीत नाव लिहिलेले असते असा दावा केला जातो आहे म्हणून तर दुसऱ्याबाजूने माझ्याशी व नंतर प्रा. अद्वयानंद गळतगे यांच्याशी पत्रव्यवहार करून नाडीग्रंथांवर सडकून टीकाटिप्पणी करताना नाडीपट्टीवर कूट तमिळ तर सोडाच, काहीही मजकूर नसतो असे छाती ठोकून लिहित होते. प्रश्न असा उरतो की जो फोटो रिसबुडांनी मिळवल्याला आव आणला जात होता व जो बी प्रेमानंदांना पाठवायला त्यांनी टाळले, तो होता कोणाचा फोटो? त्यात काय लिहिलेले होते? त्याच्याकडे तो आला कसा? असा सवाल कै. रिसबुडांना कोणी केला नाही.
कदाचित त्यांनी तो फोटो कै.प्रेमानंदाना पाठवला ही असेल. फोटोतील मजकूराला वाचून नाडीपट्टीत व्यक्तीचे नाव खरेच कोरून लिहिले असते हे उघडपणे मान्य करायला अशक्य वाटल्याने त्या दोघांनी किंवा दोन्ही संस्थांनी हया विषयातील रस अचानक एकदम बंद करून गुलदस्तात ठेवला असेल तर नवल वाटायला नको. किंवा रिसबुडांनी त्यांना कदाचित एक फोटोचा पुरावा काय मागताय? प्रेमानंद, आपण खुद्द तमिळनाडूच्या इतके जवळ राहता मग फोटो माझ्याकडे मागायच्याऐवजी आपण सरळ एखाद्या नाडी केंद्रातून का मिळवत नाही? शिवाय जर आपल्याला तमिळभाषा समजते असा आपण दावा करता तर मग आपणच त्याचा साक्षमोक्ष लावायला नाडीपट्ट्या मिळवून का तपास करत नाही? असा प्रश्न ही त्यांना केला असावा. असो.
हे इथे लिहायचे कारण असे की दिलेल्या पुराव्याकडे दुर्लक्ष करायचे व ‘हे काहीच नाही- आणखी सादर केलात तर यावर विचार करू’ असे मानभवीपणे म्हणायचे ही फार पुर्वीपासून चालत आलेली खेळी आहे. जसे कसाबच्या संदर्भात भारताने पुराव्यांची थप्पी पाकिस्तानाला सुपूर्त करूनही ‘ही काय रद्दी आणलीत! यातील पुराव्यात काहीच दम नाही’ म्हणावे. तसे एखाद्या आज्ञाधारक आशाळभूत श्वानाने मालकाची आज्ञा पाळल्यावर शेपटी हालवत मालकाकडे पहायचे व आता तरी मालक खूष होऊन खायचे ताट पुढे करेल असे पाहत राहायचे पण हाडकाची हूल हेऊन पुन्हा त्या श्वानाला पळायला लाऊन मजा पहायचे काम करत राहायचे. ओकांना दमवत नाडीची मजा पहायला बसलेल्या लोकांच्याकडे दुर्लक्ष करून आपण हा ‘लाल निळ्या रंगाचा इंगा’ सादर केलात याचे पुन्हा कौतुक करतो.
यानंतर कोणी नाडीग्रंथांवरील विषयात आणखी वाचायला मिळावे असा अभिप्राय व्यक्त केला तर सवडीने आपण काही भाग जरूर सादर करावा. विशेषतः २०१२ च्या नाडी ग्रंथावर आधारित दिवाळी अंकातील काही लेख. माझ्याकडून काही मदत हवी तर मी आनंदाने ती करीन.
ता.क. वरील धाग्यात उल्लेख केलेल्या क्लिपची निर्मिती ज्यांनी कष्टपुर्वक केली त्यांचे मत अशा सार्वजनिक ठिकाणी ती न दर्शवलेली राहावी असे आहे. फक्त ज्यांना नाडी ग्रंथांतील भाषा व लिपीच्या शास्त्राची जाण आहे अशांनाच अभ्यासकार्यात मदत व्हावी म्हणून तिचा वापर केला जावा असे त्यांना वाटते. मला ही नेमके तसेच वाटते. असो.
श्री. ओक हे अतिशय तळमळीने त्यांचे अंगिकृत कार्य अथक उत्साहाने करत आहेत, हे फार कौतुकास्पद वाटते. याकामी त्यांना योगविवेक व अन्य मिपाकरांचा साथ मिळत आहे, हेही उत्तम.
त्यांच्या या कार्यातून लवकरच काही गोमटी फळे चाखायला मिळून नाडी विषयाबद्दल संभ्रम दूर होईल अशी आशा वाटते.
आधीच ठरवून कोणतीतरी एक बाजू न घेता डोळस निष्पक्षपणे हे सर्व प्रकरण हाताळले जावे, अशी अपेक्षा करणे वावगे ठरू नये.
वरील प्रतिसादातील बी. प्रेमानंद आणि कै. रिसबूड यांचे दरम्यान नेमके काय घडले, हे कळले नाही, हा एकादी गोष्ट समजून घेण्याच्या माझ्या वकूबाचा कमकुवत पणा असावा.
मागे आम्ही श्री. ओक यांना त्यांनी नाडीकेंद्रात प्रवेश केल्यापासून नाडीवाचनापर्यंतच्या सर्व घटनांचे व्हिडियो शूटिंग करून ते वाचकांना उपल्ब्ध करून द्यावे, अशी विनंती केली होती. आता योगविवेक यांच्या सहय्याने त्यांनी पुन्हा एकदा ते मनावर घ्यावे, असे सुचवतो.
वाचकांनी स्वतः नाडीकेंद्रात जाऊन अनुभव घ्यावा, हे खरे, परंतु तितका उत्साह, निकड, वेळ आणि खर्चाची तयारी बहुतेकांची असणार नाही. त्यामुळे हे कार्य त्यांनीच करणे योग्य ठरेल.
असा प्रयत्न जर कुणा मिपाकराने केला असेल, तर त्यांना काय अनुभव आले, हे वेगळा धागा काढून लिहावे.
असे व्हिडियो जर तूनळी वगैरे वर आधीच टाकलेले असतील, तर त्यांचे दुवे द्यावेत, ही विनंती.
पुढील कार्यासाठी शुभेच्छा.
धागे सोडायची मला प्रॅक्टीस नाही. पुर्वी या धाग्यावर मी बरेच खपून लेखन केले होते. त्या नंतर अधून मधून मिपावर मी चक्कर मारायला येतो पण लेखनाचा कंटाळा म्हणून वेळ लागतोय
भृगुसंहितेच्या शोधात मी व ओक सर नेपाळ व उत्तर प्रदेशातील काही केंद्रांना भेटी देऊन आलो. विविध अनुभव मिळाले. ते एकत्र करून सादर करायला पाहतोय...
प्रतिक्रिया
****
:)
आत्ता पर्यंत आपण
बर मग पुढे ?
पुढे? सोपं आहे.
असे लाल निळे आता तर
आवडला
पुढे काय झाले?
+१
तमिळभाषा प्रेमी पुढे आले तर हे काम जोरात चालू राहील
लवकर त्या जांभई देणार्या
योगविवेकजी, अभिनंदन...!
व्हिडियो शूटिंग
तू नळीवर जाऊन पाहा ना...
नेपाळ व उत्तर भारतातील भृगुसंहितेच्या फलादेशाच्या शोधयात्रा
लाल आणि निळा रंग प्रतीक
+१
मान्य करुन टाका यार
नको ती कटकट
शिर्षक वाचुन मला वाटले की
इंगा लाल मिळ्या रंगाचा...