Welcome to misalpav.com
लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
कु. सुमार केतकर यांचे व्यक्तीमत्व रजनीकांथ आलोकनाथ इतके उंच आहे. ( नावात थ अक्षर नसले म्हणुण काय झाले?) त्यांच्या बद्दलची काही नव्या उजीलाटा ( उचलली जीभ लावली टाळ्याला ) १) कु सुमार केतकर जे लिहीतात त्याला भविष्य कालीन वर्तमान इतिहास म्हणतात. २) कु सुमार केतकर यांचे व्यक्तीमत्व इतके उत्तुंग आहे की चिमण्या कबुतरे तिथे शिटण्या अगोदर विचार करतात ३) कु सुमार केतकर हे जेंव्हा काही लिहायला घेतात तेंव्हा त्यांच्या मनात विचार येण्या अगोदर कागदावर उमटतो ४) कु सुमार केतकर जे लिहीतात त्याला विचार असे म्हणतात ५) कु सुमार केतकर याम्ना युवरांज्याबद्दल इतके प्रेम आहे की त्यानी त्यांच्या घरातील सर्वप्रीय प्राण्यांची नावे युवराज अशीच ठेवली आहेत. उदा: युवराज झुरळ , युवराज उंदीर , युवराज ढेकुण.ई. ६) कु. सुमार केतकर जेंव्हा एखाद्या वाईट म्हणतात तेंव्हा त्याचा अर्थ चॅनल साठी बाईट असा होतो ७) कु सुमार केतकर जेंव्हा पेन वापरतात तेंव्हा पेन कागदावर फ्रिअण्याऐवजी कागदच पेनाखाली फिरतो. ८) कु. सुमार केतकर यांच्यासाठी कोणताही दिवस हा सोनियाचा दिवसच असतो.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

नाड्यांच्या (विजारीच्या नव्हे भविष्यवाल्या नाड्या) भाषेत वाचा "सुमार केथकर" म्हणजे हे सुद्धा साम्य आहेच...

कु सुमार केतकरानी भिंतीवर लिहीतायावे म्हणून चिनी सम्राटानी भिंत बांधून दिली. कु सुमार केतकराना लिहीताना एकदा खोकला आला त्याचे पडसाद इराक मधे उमटले

सुमार केतकरचं नुस्तं नाव घेतलं तर पवारच काय पण मौजे वडींगे बुद्रुकचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा इटलीचा पंतप्रधान होऊ शकेल.

कुसुमारकेतकरांचीवटमिपावरएवढिआहेकीत्यांच्याविरुद्धलिहिलेलेप्रतिसादऊडवलेजाताततसेचधागावाचनमात्रहोतोलैडेंजरमनुक्ष.

यांच्या बद्दलची काही नव्या उजीलाटा ( उचलली जीभ लावली टाळ्याला )
:-)) या उजीलाटांच एक मात्र बर असत की आपली लायकी किंवा क्षमता कोणी विचारत नाही! :)

सहमत आहे. हेच टाळ्या वाजवणार्‍यांना पण लागू होते का विचार मनात आला.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>टाळ्या वाजवणारे निष्पाप असू शकतात. त्यात कोणाचे कौतुकही असू शकते.उजीलाटांच तस नसत मारकुटे काका!

हल्ली लायकी किंवा क्षमता कोणी विचारातच घेत नाही. कोणीही माणूस फक्त "लांगूलचालन करणे" या एकमेव गुणावर संपादक होतो मग त्याला साहित्य संमेलनात व्यासपिठावर बोलावतात. अर्थातच तो काहीही बरळतो आणि मिपावर धाग्यावर धागे निघतात. हे सर्व होतं फक्त लायकी किंवा क्षमता विचारात न घेतल्याने...

ही मळमळ नाही ही ओकारी काढलेली आहे. केतकरांसारखा चौफेर लिहणारा आणि व्यासंग असणारा संपादक आज राज्यात नाही ,केतकरांच्या विचारात थोडेतरी तथ्य असणारच. केतकर परखड आहेत हे खरे...किप इट अप केतकर सर

अरे ज्येष्ठ पत्रकाराविषयी काय बोलत आहात, विचाराला विचाराने खोडून काढता येत नसेल तर निदान गप्प तरी बसावे ,बदनामी कशाला?

बदनाम होगा तो क्या नाम ना होगा???? - कृष्णमौक्तिकाचा कप्तान जॅक स्पॅरो. तदुपरि
दुष्टारी देतो फिअर, फिलोसॉफर इन टॉप गिअर.!
गांधीस कुणा पडता मार, केवढी कतक कर जमेल तैशी त्वां; औषध वेडघरचि तुम्हां, मोपेड फिलॉसॉफर व्यक्तिमत्त्वां.

हे तरी पटवुन द्या.सरांसारखे उटायचे व एका व्यक्ती विषयी गळा काढुन बसायचे ह्यात कसले विचार?नरेंद्र मोदी इतका हलकट असता तर त्याला ५८% लोकानी पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला नसता.सरांचे म्हणणे खरे मानायचे तर जवळ जवळ ६०% लोकाना वेडे म्हटले पाहिजे.तुमच्या सरांची थिअरी काय आहे? बर प्रस्तापितांच्या विरुध्द बोलुन इतक्या वर्षात सरांनी काय उजेड पाडला आहे? त्याची दर्जेदार कामे तरी इथे सांगा.

नरेंद्र मोदी इतका हलकट असता तर त्याला ५८% लोकानी पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला नसता कधी ? कुठे ? कसा ? survey चे आकडे देऊन असली बेधडक विधान करत अस्ताल तर तुम्हाला कंबरेत झुकून कुर्निसात

काय आहे, आता केजरीवाल आले आहेत ,त्यामुळे मोदींचे आऊट ऑफ फोकस जाणे मोदीभक्तांना रुचलेले नसावे. त्यामुळे आकडे फूगवुन सांगण्यात येत आहेत.

मागील एक दोन आठवड्यात हा सर्वे झाला होता. त्यात केजरीवालांना २५% व राहुल बाबा ला १४% मतदारानी पसंती दिली आहे.

मराठी लेखनाला सहाय्य करणारे सॉफ्ट्वेयर चांगले काम करु लागल्याचा हा पुरावा. किंवा मग तुम्ही फारच प्रतिभावान दिसता.

तरी अंमळ गंडलेच. केतकरांइतके सुमार लिहिता येत असेल कुणाला असे वाटत नाही. पण नै, तो चे(उकार पाहिजे होता)त्या भगत देखील तितकेच सुमार लिहितो.

अगदी अगदी सुमारांची यादी फार मोठी आहे.. अग्दी नेमाडे सुद्धा त्याच लायनीत येतात

मागे आमच्या एकामैत्रीणीने असेच एक विधान केले होते
कुमार केतकर आणि संत तुकाराम समान दर्जाचे महापुरुष आहेत , कारण तुकारामही हिताचे पण लोकांचा पचायला जड असे बोलायचे आणि आमचे कुमार सरही तसेच बोलतात
=))

केतकर सरच काय तुकाराम महाराजांशी कुणाशीही तुलना होवू शकत नाही. मात्र एक खरे सध्याच्या काळातले अभ्यासू, परखड, लोकमताची पर्वा न करता जे सत्य आहे ते परखडपणे सांगणारे केतकर सरांसारखे व्यक्तिमत्व विरळाच.

मात्र एक खरे सध्याच्या काळातले अभ्यासू, परखड, लोकमताची पर्वा न करता जे सत्य आहे ते परखडपणे सांगणारे केतकर सरांसारखे व्यक्तिमत्व विरळाच.
अग्गदी ख्खर्र !!!!!! मागे एकदा ते असेच परखड, लोकमताची पर्वा न करता जे सत्य आहे ते ओकले होते.... तेव्हा सम्भाजी बी-ग्रेड वाल्यांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढला होता आणि काळे फासले होते....असो... बाकी 'नरेन्द्र' नावाच्या दोन व्यक्तींचा बादरायण सम्बन्ध जोडण्याचा जो पराक्रम त्यांनी केला... त्याला खरोखर तोड नाही!! :) मला तर वाटते बहुतेक नरेन्द्र दत्त उर्फ स्वामी विवेकानन्द यांचे नाव जोडण्यास बहुधा केतकर विसरले असावेत!.. मोदींच्या फोबियातून बाहेर पडल्यावर पुढचा नम्बर स्वामी विवेकानन्दांचा असेल!

चि केतकर- बेसुमार डेटा अतिसुमार निष्कर्षाची मनोरूग्ण केस.>>>>>>> तुमचे नि त्यांचे विचार जुळत नाहीत म्हणून ते मनोरुग्ण. आणि ज्यांचे नि तुमचे तुमचे विचार जुळतील ते अक्कलवान. बरोबर न चौराजीं... असो ज्याची त्याची दृष्टी.

आम्ही केतक्ररांसारखे, अभ्यंकरांसारखे व भातखळकरांसारखे इझम वाले नाही .. अन्याय होणार्‍या शेतकर्‍याबद्द्ल कणव आहे पण काद्यांचा भाव वाढला की सेलेब्रशन करायचे व पडला की लिलाव बंद पाडायचे असे दुटप्पी ध्रोरण काय कामाचे हो? पिळवणूक करणारे उद्यूगपती व चुकार कामगार आम्हाला दोन्ही शत्रू वाटतात या देशाचे !

महाराष्ट्रात जे काही विचारवंत आहेत त्यात केतकरांचे स्थान अग्रणी आहे. एखाद्या विषयात तथ्य असल्याशिवाय केतकर सर त्या विषयाबद्दल बोलणारच नाहीत.

महाराष्ट्रात जे काही विचारवंत आहेत त्यात केतकरांचे स्थान अग्रणी आहे. एखाद्या विषयात तथ्य असल्याशिवाय केतकर सर त्या विषयाबद्दल बोलणारच नाहीत.
गुड कीप इट अप!!! .... "कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा" मुळे अश्या विनोदांची सवय झालीये!!!!! आपण तिकडे असे विनोद पाठवत जा.... त्यानिमित्ताने आपले व केतकरांचेही ग्लोबलायझेशन होईल!!!!! :)

तुमच्या विरोधी प्रतिक्रिया दिली तर विनोदी. सगळ्यांनीच तुमचे जे मत असावे त्या मताचे असावे हा अट्टाहास का? मी कधी असा अट्टाहास केला?... :) मी फक्त माझी प्रतिक्रिया दिली.... :)

केतकरांनी जे मुद्दे मांडले ते खोडणे ह्याला म्हणतात प्रतिक्रिया. टिंगल टवाळी तर काय कॉलेजचे पोरही करतात. त्यात कसला आलाय मोठेपणा आपल्या विरोधी विचार खोडता आले नाही कि माणूस हा मार्ग अवलंबतो.

कॉमेडी प्रोग्रॅम्स मध्ये देण्याच्या लायकीचे विनोद कुणी कितीही गम्भीरपणे केले अथवा मान्डले, तरी आम्ही ते सिरियसली घेत नाही.... अर्थात आपण एक मोठा विनोद केला, हे करण्यालाच कळू नये.. हा दुसरा विनोद.. अजून काय?!?!.... बाकी चालू द्यात... :)