काथ्याकूट
भारतरत्न नेमके कोणाला द्यायला हवे??
Primary tabs
मध्यंतरी भारतरत्न कोणाला द्यायचे हा वादाचा विषय होता. शेवटी भानगड नको म्हणून कोणालाच भारतरत्न दिले गेले नाही.
पण भारतरत्नास पात्र अशा कित्येक व्यक्ती भारतात आहेत. बाबा आमटे यांनी जीवनभर देशसेवा केली. सचिनने अगदी लहान वयापासून क्रिकेट जगतात महत्त्वाची कामगिरी बजावून अनेकांची मने जिंकली. असे अजूनही कित्येक महाभाग आहेत, जे भारतरत्नास पात्र ठरतात.
मग भारतरत्न नेमके कोणास मिळायला हवे होते, असा प्रश्न मनात उमटतो व आपणच 'कन्फ्युस' होऊन जातो.
जगात भारताचा सांस्कृतिक किंवा राजकीय क्षेत्रात उज्ज्वल ठसा उमटविणा-या व्यक्तीसच भारतरत्न द्यावे. आज माझ्या माहितीतील अशा तीनच व्यकी आहेत
१. डॉ. जयंत नारळीकर.
२. डॉ. अब्दुल कलाम.
३. डॉ. रघुनाथ माशेलकर.
आज हयात असलेले इतर कोणीहि यांच्या स्तराला अजून पोहोचलेले नाही.
प्रखर भारतीय
सुधीर कांदळकर.
कांदळकरसाहेबांनी जी ती नांवे सुचविली आहेत त्यांचाशी मीदेखील सहमत आहे.
त्याशिवाय हिंदुस्थानी अभिजात संगीतातील जागतिक कीर्तीचे गवई स्वरभास्कर, पद्मविभूषण पंडित भीमसेन जोशी यांनाही हा पुरस्कार मिळावा असे मला मनोमन वाटते...
आपला,
(भीमसेनभक्त) तात्या.
यावर एकदा मिपा वर चर्चा झालेली आहे. वडापाव यांनी ती वाचून इथे हे काथ्याकुट लिहायले हवे होते.
- (सर्वव्यापी)प्राजु
खुपच गहन प्रश्न आहे.
महाभाग ?
आपल्या देशाची ज्यांनी सेवा केली आहे दुसर्या शब्दात येथील नागरिकांना शांतीपूर्वक स्वस्थ्य आणि चांगल्या रीतीने जगता याव या साठी ज्यांनी प्रयत्न केले आहे. त्यांना भारत रत्न दिले जाते. (पण बहुतेक राजनीतिज्ञ यात येत नाही तरी ही त्यांना भारत रत्न मिळाले आहे त्याची राजनीतिक कारणे आहेत, पण राजनीतिक लोक देशाला शांती आणि शिरता निश्चित देतात) कधी कधी कुणाला भारत रत्न कुणाला का दिले काळात नाही 'अमर्त्यसेनला भारत रत्न का दिले मला अद्याप ही कळले नाही' कारण भारतीय नागरिकांची कुठली ही सेवा त्यांनी केली नाही, बहुतेक अमेरिकेला प्रसन्न करण्यासाठी त्यांना पुरस्कार दिला असेल असो
मलाही एक नाव सुचवायचं आहे त्याचं कार्य गेल्या शेंकडो वर्षात झालेल्या कुठल्या ही व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. ते खरोखरचे भारत रत्न आहेत. ऋषी-मुनी संकल्प करायचे आणि संकल्प त्वरित सिद्ध व्हायचे हे स्वत: २१व्या शताब्दीत डोळ्यांनी बघितले.
१०-१२ वर्षाचा मागासलेल्या वर्गाचा एक मुलगा झाडावरून पडला, पाठीच्या मणक्यांना गंभीर दुखापत झाली. उठणे-फिरणे अशक्य झाले.घरची परिश्तितीमुळे महागडी चिकित्सा परवडणे शक्य नव्हते. अश्या परीस्थित योगाच्या साहाह्याने हा मुलगा उभा राहिला, वेदशास्त्र आणि आयुर्वेद शिकला आणि जगाला ही योगाचे साहाह्याने जगाला स्वस्थ: शरीर आणि मानाने जगायला शिकविण्याच्या त्याने निर्धार केला. सन्यास घेतला. आज वर्षातून २०० दिवस तरी देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हजार्रोंच्या संख्येने लोक सकाळी ५ वाजता योगशिविरात येतात. असे ३-४ हजारपेक्षा जास्त शिवीर त्यांनी घेतले असेल. लोकांना स्वास्थ्य मिळावे म्हणून जगात सर्वात जास्त भटकणारा हा योगी. (त्यांचा एवढा सडक मार्गाने देशाचा प्रवास जगात आतापर्यंत कुणी ही गेला नसेल (ट्रक चालक सोडल्यास). करोडो लोकांना स्वस्थ्य राहण्याचा मूलमंत्र त्यांनी दिला आहे. देशातील लाखो लोक गंभीर आजारातून मुक्त झाले आहे. शिवाय आजारी न पडण्यासाठी देशातील काना कोपर्यात आज लोक सकाळी उठून थोडा फार व्यायाम करू लागले आहे. याचा देशाला किती फायदा झाला आहे. याचे आकलन करणे कठीण. देशातील मोठे मोठे हॉस्पिटल ही आज रोग्यांना प्राणायाम शिकवितात. (माझी मुलगी ज्या हॉस्पिटलात आहे तिथे ही वर्षभरापासून हृद्य रोग्यांना प्राणायाम शिकविला जातो. - हे सर्व एका माणसा मुळे घडले आहे.)
ग्रामीण भागात शेतकर्याला शेतीशिवाय अन्य पर्याय नाही. स्वामी रामदेवानी पहिले जंगलात आवळ्यांच्या झाडा वरचे आवळे सडतात, ग्यारपाठा, अमृता (गीलोय)अनेक वानौपज इत्यादींचा ग्रामीण जनतेला काही ही फायदा होत नाही. ज्यांच्या जवळ पैसा आहेत असे शहरी नागरिक पित्झा इत्यादी खाण्यात किंवा कोल्ड ड्रिंक पियुन स्वास्थ खराब करीत आहे , ग्रामीण जनतेला रोजगार आणि लोकांना स्वास्थ्य वर्धक वस्तू खायला मिळाव्या म्हणून पतंजली मध्ये खाद्य संस्करण यंत्र लाविले. केवळ स्वस्थ्वार्धक पदार्थांची निर्मिती करायची हे लक्ष्य. आधुनिक आणि मोठे सयंत्र लावले सुरवातीला लोक हसले २ लाख लिटर अलोविरा रोज कोण पिणार. पण आज ते ही कमी पडते आहे. केवळ ६०० कोटी (ते ही जनतेचे )करून १०,००० जास्त लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि अप्रत्यक्ष रीतीने किती तरी लाख ग्रामीणांना अतिरिक्त रोजगार देणारी ही एकमेव संस्था असेल. लोक ही आज आवळा केंडी, खस,ब्राह्मी, बुरांश नावाच्या फुलांचे शरबत, अलोविरा इत्यादी १०-१२ फळांचे शरबत.विभिन्न फळांचे जम , कणकीचे बिस्किटे, साबणे (गोमूत्र, अलोविरा इत्यादी पासून बनवलेले शरीराला अपाय न करणारे) इत्यादी.
आयुर्वेद औषधांची निर्मिती: जुने ज्ञान आणि आधुनिक तकनिकी यांचा मिलन करून अत्याधुनिक पद्धतीने आयुर्वेदिक औषधी निर्मिती त्यांनी सुरु केली. लोकांचा आयुर्वेदिक औषधांवर विश्वास वाढला. अत्याधुनिक परीक्षण शाळेत इतर कंपन्याही आपल्या औषधांची गुणवत्ता तपासतात.
शिवाय भारतीय गायांची नसल सुधारण्याचा कार्यक्रम,जैविक खाद वर संशोधन गव्हा वर संशोधन, काचर्या पासून वीज प्रकल्प (देशातील पहिला पतंजली मधेच लागला आहे) इत्यादी इत्यादी हे सर्व सरकारच्या मदती शिवाय.
शिवाय भविष्यात प्रत्येक गावात गोबर गस प्लांट, काचर्या पासून वीज बनविण्याचे प्रकल्प, अनेक मोठ्या प्रमाणावर ग्रामीण जनतेला रोजगार मिळेल चालविण्याचा विचार आहे. शिवाय भारतीय खाद्य प्रस्करण उद्योगांना एकत्रित आणण्याचा त्यांचा विचार आहे (कालच इंदापूर येथे त्यांनी हा विचार बोलून दाखविला - कदाचित सोनाई गायीचे तूप लोणीक पुढे पतंजलीच्या माध्यमाने देशभर सर्वत्र पोहचेल). (देशाला 'केवळ उपभोक्ता बाजार म्हणून पाहणाऱ्या विदेशी कंपन्या आणि त्यांचा चाटूकारांचा विरोध पत्करून ही हिमालया सारखा उभा आहे). गेल्या ५ वर्षात देशात एकाच क्षेत्रात सर्वात जास्त प्रगती केली आहे ती म्हणजे खाद्य प्रसंस्करण या क्षेत्रात (माननीय शरद पवार या मंत्रालयाचे कार्य बघतात. दुसर्या शब्दात एकमेव सफल मंत्री)
रोज सकाळी ३ वाजता उठणे आणि रात्री १ ला झोपणारा हा योगी. सतत फिरत राहणारा चरैवेति चरैवेति या मंत्राला साक्षात अनुभव करून देणारा. कित्येक भारत रत्न याच्या समोर कमी आहेत.
(मी ही आपल्या मणक्यांच्या आजारांनी ६ महिने बेड रेस्ट होतो, वर्ष दोन-तीन वर्षे अत्यंत खराब गेले, तणाव मुळे हृद्य विकारचे झटके ही आले. गेल्या १ वर्षापासून रोज सकाळी ५-५.३० पर्यंत उठून अर्धा तास का होईना अनुलोम विलोम प्राणायाम करतो. आज दिवसातून ६-७ किलोमीटर रोज चालतो)
भारतरत्न रामदेव बाबा यांना द्यायला हवे, याशी सहमत.
चुकीचे शब्द
शिरता : स्थिरता
काळात: कळत
(विषय बदल होत असल्यास .....सर्वाची माफी मागून .............)
कुसुमार केतकर यांना द्या ना ........
खालील व्यक्तींना भारतरत्न दिला जावा ही विनंती.
१. सोनिया गांधी
२. राहुल गांधी
३. प्रियांका गांधी
४. रॉबर्ट वड्रा
५. रेहान वड्रा
६. मिराया वड्रा
तो तर मिळेलच...
भारतरत्न हा फक्त क्रिकेटवीर, फिल्म स्टार अशा खेळातील व मनोरंजनातील व्यक्तींना द्यावा. त्यांचा अमाप त्याग देशविदेशात देशाचे नाव करण्याची क्षमता अफाट असते.
क
१ शंका....तुमीबी "हात"वाले"च" का?? ;)
मंजै काय?
हा हा हा...समजेलच सगळ्यांना आता...आणखी १ "थिंकर" आला
आय एम नॉट ए थिंकर ,आय एम ए फिलोसॉफर... एण्ड माईण्ड इट वेल ,आय एम इन 'टॉप गिअर'
अभ्यास वाढवा :)
चामारी आता एसटी ला बी डबल टॉप चे इंजिन असतेत. शिंगल टॉप घाटात डेंजर.
ब्रेक हाय नव्ह? मनावर ब्रेक उत्तम ब्रेक.
आलं का ध्येनात?
गाड्या आपल्याकडे पन्नास हायत, फक्त विचारांचे इंजिन आणि कृतीतून त्याचे ट्रान्समिशन करणे, येवढेच आमच्या हातात ,आले का ध्यानात?
किती म्हणजे कित्ती गुण जुळावेत :)
संजय क्षीरसागर ओनली.
आमच्या मते त्यांच्यासाठी अजूनेक वेगळा खिताब तयार केला पाहिजे.
भारतरत्न नेमके कोणाला द्यायला हवे??................क्रिकेटवीर, गायक, गायिका ह्यांना हा पुरस्कार मिळालाय आता कोणालाही मिळाला तरी काय फरक पडतोय ?
१. हा धागा खूप जुना आहे. तो वर काढावासा का वाटला असावा?? (मुळात मी तरी तेव्हा हा धागा का बरं काढला असावा? असा प्रश्न पडलाय)
२. काढला तर काढला, विषयाला धरून 'शिरीअस' चर्चा होताना दिसत नाही, चर्चा होईल असंही वाटत नाही. सगळंच अवांतर आणि निरर्थक आहे.
३. संपादकांना विनंती की हा धागा वाचनमात्र करावा (पूर्णपणे काढूनच टाकला तर अतिउत्तम)
दलीतांची कैवारी बहन मायावती,सेक्युलरॅइमचा झगा घातलेले रामविलास पासवान,तामिळी अस्मितेचे खंदे समर्थक करुणानिधी,८० व्यावर्षी देखिल तरुणाना लाजवतील असे एन्.डी.तिवारी....... अशी खुप मोठी लिस्ट आहे.
सामाजिक ऐक्याचे प्रतिक मोदी राह्यले कि
मोदी भारतीय जनतेच्या हृदयात विराजमान आहेत. त्यांना वेगळ्या पुरस्कारांची गरज नाही.
आपण अव्दीतीय लोकांबाबत चर्चा करत आहोत.आता तर आपले राहुल बाबाच आता पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत मग अजुन लिस्ट वाढवता येईल जर त्यानी फाडुन टाकली नाही तर.
मोदी अद्वितीय नाहीत?
अर्थात ते अद्वितीय आहेतच.
खरतर कलावतीच्या घरी भाकरतुकडा खाणारे,बाह्या मागेसारुन घमेली उचलणारे,कागद टराटरा फाडणारे राहुल बाबा अव्दितीय आहेत. आता दोन भुरटी लोकं नमो आणि केजरीवाल सामान्य माणसासाठी भांडत आहेत्.त्याचे काय मनावर घ्यायचे.
सचिन भौ तुम्ही आणि सुमारसर त्यांच्या अॅड्व्हाईझ टीमला जॉईन व्हावे म्हणजे सगळा कोरम पुर्ण होईल.
खरतर कलावतीच्या घरी भाकरतुकडा खाणारे,बाह्या मागेसारुन घमेली उचलणारे,कागद टराटरा फाडणारे राहुल बाबा अव्दितीय आहेत. >>>>>>>>> हे जे त्यांनी केले ते काय अपराध ह्या सदरात मोडते का ?
हे जे त्यांनी केले त्याला जनतेला बनविण्यासाठी केलेला नाटकीपणा आणि ढोंगीपणा म्हणतात.
भुरटी आहेत हे खरे बोल्लात बघा.
राजा होणे शक्य नाही.म्हणुन तर त्याना मी अद्वितीय म्हणालो.कलावती आजकाल खुप सुखात आहे. घमेली उचलणार्या बाया पण खुशीत आहेत्.संसदेत राहुल बाबाच्या समोर कायदा पास करुन घेणारे मनमोहन तो परत फाडुन राहुलबाबांचे कौतुक करताहेत्.किती महती वर्णावी राहुल बाबाची. सेक्युलर हा शब्द उचारला तर त्याचेच नाव डोळ्यासमोर येते.
घमेली उचलणारा एकतरी भाजपचा नेता सांगा?
सेक्युलर असणे चुकीचे आहे का ?
काय मुर्ख आहात सचिनजि, ते लोक फक्त एक लाख रुपयाचा मासा पाळतात
>>> घमेली उचलणारा एकतरी भाजपचा नेता सांगा?
फोटोसेशनसाठी पायात नाईकेचे स्पोर्ट्स शूज घालून प्लॅस्टिकचे रिकामे घमेले उचलून दाखवून मिरविण्याचा ढोंगीपणा भाजपचे नेते करत नाहीत.
>>> सेक्युलर असणे चुकीचे आहे का ?
हो
तुम्ही कोणताही गुन्हा करा पण जर तुम्ही सेक्युलर असाल तर तुमचे सर्व घुन्हे माफ.......
लालुने चारा खाल्ला पण त्याच्या कडे सेक्युलरची हलगी आहे,ती वाजवत आता तो कॉग्रेसच्या साथीने बीजेपी व आप वाल्यची वाट लावणार आहे.
रामविलास पास्वान ह्याचे क्वालीफिकेशन म्हणजे दलित आणि सेक्युलर झगा ह्याच्याकडे आहे,त्यामुळे ह्याचे देखिल सर्व गुन्हे माफ.
कॉग्रेस गेली ६० वर्ष झाली भारतातील गरीबी स्वीसबॅकेच्या साह्याने कमी करण्याचा प्रयत्न करत आहे,भ्रष्टाचार हा शब्द ह्याच्या इथे माहीती देखिल नाही,सर्वजण गरीबीतुन अजुन ही कॉग्रेसची पर्यायाने देश्याची सेवा करत आहेत कारण हे पिढीजात सेक्युलर आहेत.
मायावती ह्यानी उत्तरप्रदेशात सर्वत्र स्वःताचे पुतळे बसवुन घेतलेत. ह्याची राहणी अत्यंत साधी आहे.सेक्युलर शब्द ह्याच्या कर्तुत्वसमोर थिटा पडतो.
मुलायमसिंग यादव..... ह्यानी जगाला सेक्युलर शब्दाचा अर्थ सैफई महोत्सवातुन जगाला सांगितला.
करुणानिधी ह्यची थोरवी काय सांगावी,देश्याची सेक्युलर होऊन सेवा करायला एकटे कमी पडतो म्हणुन ह्यानी सर्व नातलगाचा फौजफाटा गोळा करुन संसदेत पाठवला व देशात टेलिकॉम क्रांती घडवुन आणली.
शरद पवार साहेब ह्याची व कॉग्रेसचे फक्त सेक्युलर ह्या शब्दामुळे प्रेम जुळले आहे.
आता राहिले भाजपावाले. त्याची जरा तुम्हीच माहिती घेतली तर बरे होईल.अटलबिहारी वाजपेयी,नरेद्र मोदी.परिकर हे सर्व भ्रष्टाचारी जातियनेते आहेत.
रामविलास पास्वान ह्याचे क्वालीफिकेशन म्हणजे दलित आणि सेक्युलर झगा ह्याच्याकडे आहे,त्यामुळे ह्याचे देखिल सर्व गुन्हे माफ.>>>>>> गोरगरीब दलितांसाठी काम करणे हा रामविलास पासवान ह्यांचा गुन्हा आहे का ?
लालुने चारा खाल्ला पण त्याच्या कडे सेक्युलरची हलगी आहे,ती वाजवत आता तो कॉग्रेसच्या साथीने बीजेपी व आप वाल्यची वाट लावणार आहे.<>>>>>> लालूंनी चार खाल्ला असेल तर त्यांचा न्याय न्यायपालिका करेन पण कॉंग्रेसला साथ देणे गुन्हा आहे का?
तुमच्या मते SECULAR म्हणजे भ्रष्टाचारी ठीक आहे मग विरोधी पक्ष भाजपा काय करतोय किती मंत्र्यांना त्यांनी आतापर्यंत धक्क्य्याला लावले.
त्याच प्रकारे मोदींना न्यायालयाने क्लिन चीट दिली आहे
अजिबात नाही...मग त्याच प्रकारे काही लोक मोदींना पाठींबा देतात
अवांतर - मी ना युवराज भक्त ना मोदी भक्त ना केजरीवाल भक्त नाही कुणा दुसर्याचा भक्त
डुआडि च कायतर करा
नेमके मला.
नेमके मला.>>>>>>>>>>>>>>>>>>>>भारतरत्न पुरस्कारात आता तो मोठेपणा नाही. क्रिकेटवीर, गायक, गायिका ह्यांनाही तो मिळू शकतो तर तुमच्या सारख्या अतिसामान्य व्यक्तीला तो मिळाला तरी काय फरक पडतोय. आनंदच आहे
गेलाबाजार सुमार केतकरांना देऊन त्याचे मूल्य अजून ढासळवणेचे करावे ही इणंती!!
किती ती जळजळ जळजळ :-P
अरेरेरेरे, इनो घ्या इनो!!! ५ रुपये किलो फक्त मोदीविरोधकांसाठी.
मिपा वर आयडी अॅप्रुव्ह होण्याची सिस्टीम ऑटोमेटेड आहे का? (कशाला मराठीत लिहिलय मी हे वाक्य...?)
लोक काहीच्या काही डु आयडी घेत आहेत.. गोंधळ घालत आहेत.. पण मुद्दलात असे आयडी येतात कसे? आयडी हॅण्डल तर असे की सरळ सरळ डु आय्डी आहे हे कळेल.. आणि गंमत म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यात एकच ध्यास आहे, "मोदी वि. काँग्रेस".. तोंडी लावायला विषय म्हणुन केजरीवाल आहेच.. ज्या धाग्यावर पहावं तिथे हिच चर्चा.. उबग येत नाही का?
सहमत आहे.
पण हा विषय निवडणूक होईपर्यंत चालेल. नंतर दुसरा विषय मिळेल.
तसेही हा तात्कालिक विषय आहे. नैतर गेलाबाजार निवासी-अनिवासी, स्त्री-पुरुष(हा तर काहींच्या परम जिव्हाळ्याचा विषय आहे), आस्तिक-नास्तिक, सगुणनिर्गुण, इ. विषय आहेतच.
पण नक्की उबग कशाचा आहे? या चर्वितचर्वणाचा की स्वतःला रस नसलेल्या विषयातले चर्वितचर्वण पाहून ;) =))
काका.. आम्हाला रस असलेल्या विषयांवर सुद्धा आम्ही प्रत्येक धाग्यावर जाऊन महिनोन्महिने चर्चा करत बसत नाही.
तेही असो.. ज्यांना वेळ आहे, ते करोत बापडे..
मुद्दा हा आहे की तेवढ्यासाठी होलसेल मध्ये डु आयडी येत आहेत असं वाटतय.. इतके की "केलं मिपा साठी सदस्यत्व अप्लाय..झालं अप्रुव्ह" असा काही प्रॉग्राम केलाय का?
आणि हे आयडी दुसर्या कुठल्याच मुद्द्यावर बोलत नाहीत.. फक्त मोदी..कॉग्रेस..मोदी..कॉग्रेस..मोदी..कॉग्रेस..
कुच तो गडबड हय..
तुम्हाला टेस्ट म्याचपेक्षा २०-२० मध्ये चौके छक्के मारायला आवडतं हे जाणून आहोत आम्ही ;)
दया!!!!!