मी अत्यंत प्रामाणिक आहे बरं! आपल्या देशातलाच काय, या जगातला सर्वात प्रामाणिक माणूस आहे मी! त्यामुळेच तर या भ्रष्टाचारी राक्षसांकडून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी मी पक्ष स्थापन केला. माझा पक्ष मोठ्या संख्येने निवडून आल्याबरोबर लगेच सत्तेचे दलाल सावध झाले. सगळ्यांनी माझ्याविरुद्ध कट केला. मला माहितच होते ते. ते आतून कसे एक आहेत, हेच तर मला जनतेला दाखवून द्यायचे होते. माझे सरकार स्थापन झाल्याबरोबर मला आणि माझ्या माणसांना किती काम करु आणि किती नको असे झाले. रोजच्या रोज आम्ही कामांचा फडशा पाडायला सुरवात केली. सरकारी नियम हे आपणच केलेले असतात नं? मग ते वाकवले, मोडले तर एवढी बोंबाबोंब का करायची ? मागे तिकडे मरहट्ट देशांत नाही का,उघड्यावर शपथविधी झाला? मग आम्ही तो केला तर एवढा गहजब का?
रोज नवी धमाल उडवून द्यायलाही डोकं लागतं. आणि इथे कुणाला पांच वर्षं राज्य करायचं होतं? इतक्या कुरापती काढल्या, पण ते दलाल सगळे निर्ढावलेले होते. सरकार पाडतच नव्हते. मग जालीम इलाज केला. असं बिल आणलं की त्यांना विरोध करावाच लागला. त्यांची ही अभद्र युती मी लोकांसमोर आणली आणि दिला बार उडवून. राजीनामा का दिला म्हणून काय विचारता? अहो, कधी एकदा मोक्कळं होऊन रस्त्यावर येतोय असं झालं होतं! आता एका दगडांत किती पक्ष/पक्षी मारायचे ही काय कोणाची मोनोपोली आहे? आता बघाच तुम्ही! ही तर फक्त झलक होती. आता 'मेन शो' तुम्हाला लोकसभेतच बघायला मिळेल! अरे,मिरपूड कसली फवारताय? आम्ही तर एकेकाला चुलाणावरच बसवू. कारण विचारताय पुन्हा? जरा थांबा, एकदा त्यांची गठडी वळली की बघतो मग तुमच्या मिडीयाकडे पण! कारण उघड आहे, या जगांत फक्त आम्हीच काय ते प्रामाणिक आहोत. खोकतो सुद्धा प्रामाणिकपणे!
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
छान
मला त्या भाऊचीं काळजी वाटुन
भारतात लोकशाही आहे हे खुप
बाबासाहेबांमुळे शिक्षणात
मस्त !!!
प्रामाणिक माणसांचे हे जग नाही
ह्म्म बोलतात खरे..
आम्हास या “शिलाजित” ची कीव येवू पहाते
मिस्टर प्रामाणिकची फेकुगिरी !