Welcome to misalpav.com
लेखक: नानासाहेब नेफळे | प्रसिद्ध:
. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी ह्यांचा सध्या दणक्यात प्रचार चालू आहे. मोदीँना विकासपुरुष या टॅगखाली प्रोजेक्ट केले जात आहे. ज्या प्रमाणे त्यांनी गुजरातचा विकास केला त्याप्रमाणे ते भारताचा विकास करणार आहेत अशी आश्वासनांची खैरात टीव्ही ,सोशल मिडीया, रेडीओवर सतत करण्यात येत आहे .परंतु या विकासपुरुषाच्या प्रचारामागे भाजपची जातीय गणिते चालू आहेत, ज्याचा लेखाजोखा माध्यमं जनतेपर्यंत पोचवत नाही आहेत. आज पर्यंत भाजपाचे जे राजकारण राहीले आहे ते शेटजी भटजी या संज्ञेने ओळखले जाते. भाजपचा पिता 'जनसंघाला सुरवातीला याचा फायदा झाला .आणिबाणी नंतरही जनसंघ सत्तेत आला याला कारण त्याचे सुखवस्तु लोकांचे राजकारण .. परंतु जसे जसे जातीय अस्मितेचे राजकारण सुरु झाले तसा जनसंघ/जनता पार्टी निप्रभ होत गेले व काँग्रेस आणखी प्रबळ झाली. भाजपचा जन्म झाल्यानंतर मात्र हा शेटजी भटजीचा शिक्का पुसण्यासाठी ओबिसींचे ध्रुवीकरण करण्याची सुरवात झालि. भाजपात असलेला ओबिसी नेत्यांचा भरणा याचेच द्योतक आहे. परंतु भाजपने कधिही ओबिसी नेत्यांना अतिमहत्वाची पदे दिलेली नाहीत. एनडीएच्या काळात वाजपेयी ,अडवाणी, प्रमोद महाजन ,मुरली मनोहर जोशी ,यशवंत सिन्हा ,जसवंत सिंग या गैर ओबिसींच्या हातात सुत्रे दिली गेली. ज्याचा परिणाम म्हणजे शायनिंग इंडीयाचा फुटलेला फुगा ..ओबिसींनी डावलले गेल्याच्या भावनेतुन काँग्रेसला व तत्सम पक्षांना मतदान केले .भाजपचा बेस असलेला ओबिसी समाज त्यांच्यापासुन दूर गेल्यानेच त्यांनी आता नरेंद्र मोदींच्या रुपाने ओबिसी कार्ड खेळले आहे. मोदी हे घंची /तेली या ओबिसी जातीचे आहेत. त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करुन भाजपने दोन प्रकारे त्यांचा प्रचार चालू ठेवला आहे.. भारतभर तरुण वर्गात सोशल मिडीयाचा वापर करुन त्यांना विकास पुरुष म्हणुन पुढे करायचे... त्याच वेळी जिथे जातीय समिकरणे महत्वाची आहेत व दिडशे लोकसभा मतदार संघ आहेत अश्या युपी बिहार व हिंदी बेल्टमध्ये मोदींना ओबिसी म्हणुन प्रोजेक्ट केले जात आहे. याचे कारण ओबिसींची सर्वाधिक संख्या या पट्ट्यात आहे. नुकतेच नरेंद्र मोदींनी बिहारात "माझ्यासारख्या मागासवर्गीयाला भाजपने पंतप्रधानापदाचे उमेदवार केले आहे" त्यामुळे भाजपवरचा ब्राह्मणांचा पक्ष असल्याचा दावा खोटा असल्याचे म्हण्टले आहे. भाजपचे राजकारण नेहमीच संभ्रमाचे राहीले आहे, ऐकीकडे हिंदुत्वाच्या व्याख्येचा दाखला देऊन जातीय आरक्षणाला विरोध करायचा त्याचवेळी अनेक तुकड्यात विखुरलेल्या ओबिसी समाजाचा वापर करुण घ्यायचा ,परंतु वरवर असे करुन चालणार नाही याची चुणुक त्यांना २००४च्या निवडणुंकांमध्ये आली आहे. नरेंद्र मोदींनी भाजप खाऊन टाकला आहे वा त्यांना तसे करताना अंतर्गत विरोध झाला नाही याचे कारण त्यांच्या ओबिसी असण्यात आहे.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

तुमची नक्की हरकत कशाला आहे ? मोदींच्या ओबीसी असण्याला की भाजपाने ओबीसी नेतृत्व पुढे केले त्याला ?

ग्रेट डूआयडी पकड्याच की !!! पण ग्रेट थंंकिंग करताना अशी मिष्टेक??? जाणदो, बडे बडे लोग ऐसी छोटी छोटी मिस्टेका (बारबार) करते र्‍हयते है । +D

अहो ते बरोबर. पण दुसरा कुणी परत आला की त्याला निर्लज्ज हेच म्हणतात. स्वतः आले की तुमच्या या मताकडे बोट दाखवतील. असो. तुमचे 'मिपाचे यश' हे मत पटले हे पुन्हा सांगतो. :)

काय चाललं आहे? गारपीटीचा इशारा ५ दिवस आधी दिला जाऊन ही शेतकर्‍यांपर्यंत तो पोचवण्यातच आला नाही. शिवजयंती नावाचा आत्तापर्यंत साधेपणाने साजरा होणारा सण धुमधडाक्यात साजरा केला गेला आणि कोट्यावधी रुपये उधळले गेले. तिकडे शेतकरी मरतो आहे. त्याला या मराठा आणि ओबीसींच्या तथाकथित नेत्यांनी कसलीही मदत केलेली नाही. लाज वाटते का? अशा वेळी असले मुद्दे उकरून काढायला, लाज वाटते?

अहो शेतकर्यांचीही जात बघितली जाते... विदर्भातला शेतकरी मरतो ,पण पश्चिम महाराष्ट्रातला नाही.. याची कारणं 'जातीय' सुद्धा आहेत. शेतकर्यांना कर्जमाफी दिली गेली तेव्हा राज्यातल्या एका धनदांडग्या जातीने ती कर्जमाफी घेतली व विदर्भात शेतकरी आत्महत्या करत राहीले...

अहो शेतकर्यांचीही जात बघितली जाते... विदर्भातला शेतकरी मरतो ,पण पश्चिम महाराष्ट्रातला नाही.. याची कारणं 'जातीय' सुद्धा आहेत.
मग विदर्भातल्या नेत्यांच्या नावानी बोंब मारा ना बाहेरच्यांची जात काढायच्या आधी. मग त्या शेतकर्‍यांच्या "जातवाल्या" संघटना काय उपटतं बसल्यात का गारपिट झालेल्या शेतातली नासाडी झालेली पिकं? आरक्षणासाठी एकत्र येऊन बोंब मारता येते ना मग नुकसानभरपाईसाठी येउ देत की एकत्र. हल्ली काय नैसर्गिक संकटं पण जात बघुन यायला लागली का?

अहो शेतकर्यांचीही जात बघितली जाते... विदर्भातला शेतकरी मरतो ,पण पश्चिम महाराष्ट्रातला नाही.. याची कारणं 'जातीय' सुद्धा आहेत. गारपीट पण जात बघून होते का? लवकर बरे व्हा. गेट वेल सून,

....आता याला जळी, स्थळी, काष्ठी व पाषाणी जर केवळ मोदी आणि मोदीच दिसतोय यातच सारे काही आले, केवळ याचा नाविलाज म्हणुनच अशी आपली भडास काढतोय दुसरे काय.. काय रे नान्या ??? बरोबर ना ??? विनोद१८

मिपाची काळजी नसती तर मोदींची जात काढल्याबद्दल अ‍ॅट्रॉसिटीच्या खाली या नेफळेसाहेबांना आत टाका अशी तक्रार केली असती पोलिसात. काय नेफळेसाहेब. जायचंय का आत?

आणि आक्षेपार्ह बोलल्यास गुन्हा दाखल करणे हे त्या बोलणार्‍याच्या जातीवर अवलंबून असते काय? म्ह. एका मागासवर्गीयाने दुसर्‍या मागास जातीबद्दल काही आक्षेपार्ह बोलल्यास काय तरतूद आहे? की फक्त सवर्णांनी मागासवर्गीयांस बोलल्यासच शिक्षेची तरतूद आहे?

कोकणस्थाने देशस्थाला "ए देब्रा" असे म्हणल्यास आणि देशस्थाने कोकणस्थाला "ए कोब्र्या " असे म्हणल्यास नकी कोणाला कोणावर केस करता येईल ? :D

आँ???? असं पण अस्तं?
हेच काय अजुन खुप असतं ... कोब्रांना वाटतं ते टॉपला तर देब्रांना वाटतं ये ग्रेट ... कर्‍हाडे असतात त्यांचे वेगळेच मत ... सीकेपींची अजुन वेगळी तर्‍हा ! अहो इतकंच काय तर ऋग्वेदी आणि यजुर्वेदी मधेही यजुर्वेदी ग्रेट असं आमचं स्पष्टं मत आहे त्यातही कृष्णयजुर्वेदी हे शुक्ल पेक्षा ग्रेटर ....:D D नोट : हलकं घ्या ! चेष्टेतच लिहिलय !!

फक्त सी के पी च सी के पी ना ब्राम्हण मानतात. इतर कोब्रा देब्रा यजुर्वेदी ऋग्वेदी कर्‍हाडे सारस्वत यांच्या लेखी ते वेगळेच आहेत. असो. भाजपचे राजकारण नेहमीच संभ्रमाचे राहीले आहे, हे एक वाक्य बरोबर आहे. भाजप म्हणजे भ्रम जोपासणारा पक्ष असेच आहे. मोदींबद्दल अजूनतरी भाजपने स्पष्टपणे जात हा मुद्दा समोर आणलेला नाही. पण भाजपची भूमीका कल्याणसिंग / बंगारुलक्ष्मणांबद्दल वेगळी आणि गडकरींबद्दल वेगळे अशीच राहिलेली आहे

ब्याट्या गौड सारस्वतात म्हणजे ( गावस्कर /वेंगसरकर / शेणॉय ) आणि चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ( प्रधान , राजे, अधिकारी , तेंडुलकर , गुप्ते , तवकर , ठाकरे ) यांच्यात गल्लत केली तर ठाणे + वांद्रे आणि दादर अशी दोन्हीकडची लोकं येतील ना ब्याटी अन तलवारी घेवून

हलके घ्या म्हणायला काय किडमिडीत कोब्रा भटं आहे काय ?? ऋग्वेदी च भारी ..आकार वजन आनि इतर सर्व ! ;)

हे वाचल्यावर एका सापाचं आणि नागाचं भांडण आठवलं. एकदा एक नाग चिडून एका सापाला म्हणतो, "ए नालायक सापड्या". त्यावर नाग तसेच प्रत्त्युत्तर देतो.

कोकणात रहात असलेल्या गावी सर्रास "ये म्हा**च्या, ये कुं**च्या, ये आ**च्या असे बोलले जायचे आणी वक्ता व श्रोता यांना त्याचे वाईटही वाटत नसे. तर..... कोणाला "ये गाढवीच्या" म्हटले तर ते अ‍ॅट्रासिटीच्या कायद्यान्वये आक्षेपार्ह्/दंडकारक असेल काय ?

कुणा माणसाला असं म्हटलं तर गाढवाच्या बाबतीत अ‍ॅट्रॉसिटी होईल. पण ते केस दाखल करू शकणार नाही.

प्राण्यांना अश्या सावत्रभावाने वागवणार्‍या कायद्याचा णीशेढ ! (PETA ला पत्र लिहिण्यासाठी मजकूर शोधण्यात व्यस्त) इए

आपलं सर्कार आलं की नवीन कायदा करून टाकू! हाकानाका! मात्र मला पंतप्रधान आणि अर्थखात्याची मंत्री केलं पाहिजे. मग मी तुम्हाला वन आणि वन्यजीव, पेट्रिलियम, कोळसा, खाण, दूरसंचार, रेल्वे वगैरे सगळी चराऊ खाती देऊन टाकीन!

मात्र मला पंतप्रधान आणि अर्थखात्याची मंत्री केलं पाहिजे. मग मी तुम्हाला वन आणि वन्यजीव, पेट्रिलियम, कोळसा, खाण, दूरसंचार, रेल्वे वगैरे सगळी चराऊ खाती देऊन टाकीन! राजकारणात आणि सत्ताकारणात पैसा असणे महत्वाचे आहे याचा आज वेगळाच अर्थ मला समजला! :)

चालेल हो आपल्याया पंतप्रधान आणि अर्थखात्याची मंत्री करू, पण त्या बदल्यात मिपाला एक बँक काढायची ची परवानगी दिली पाहिजे.म्हणजे आम्हाला मिसळपाव देणारे ATM सर्वीकडे टाकता येतील. उद्यापासूनच भरती चालू करू या कि मिसळपाव बँकेची!