Welcome to misalpav.com
लेखक: आशु जोग | प्रसिद्ध:
सध्या मोदी हे देशाचे जवळ जवळ पंतप्रधान बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या मोदीसमर्थकांचा उन्माद विशेष लक्षात येण्याजोगा आहे... मोदींहूनही मोदी भक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच मोदी येतील का ? त्यासाठी भाजपा किती जागा मिळवील ? अकाली, सेना, पासवान अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता येणारे सरकार खिचडी सरकार असेल. ते २ २|| वर्षे टिकेल

.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मोदी पंतप्रधान बनणे खुप अवघड आहे. राहुल गांधीकडे पंतप्रधान पद पर्याय नाही म्हणून जाईल अशी शक्यता आहे. मात्र वर्शाच्या आत परत निवडणुका होतील.

पण आआपमुळे जो मोदींचा प्रचार चाललाय, त्यामुळे बरेचसे कुंपणावरचे मतदार एव्हाना एका कुठल्यातरी बाजुला झुकले असतील. त्याचा फायदा आआप आणि भाजप, दोघांनाहि होईल. आआपला जास्त कारण त्यांना या निवडणुकीत गमवण्यासारखं काहि नाहि. काँग्रेसचं भवितव्य एव्हाना फ्रीझ झालं असेल. त्यांच्या संभाव्य मतदारांची संख्या निवडणुकींपर्यंत तरी फारशी वाढणार वा घटणार नाहि. पण प्रॉबॅबिलिटीच काढायची झाली तर मोदिंचे चान्सेस सर्वात जास्त आहेत असं वाटतं

संपादकांना सतत त्रास देणारा धागा काढल्यापद्धल धागाकर्त्याचा निषेध! अनावश्यक प्रतिसाद लवकरात लवकर उडवण्यापद्धल संपादकांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन!

>>> मोदी खरच पंतप्रधान बनतील का ! एप्रिल-मे २०१४ च्या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान बनण्याची शक्यता खूपच कमी आहे. माझ्या अंदाजानुसार भाजपला १९०-२०० व रालोआला २२५ च्या आसपास जागा मिळतील व काँग्रेसला १२०-१३० व संपुआला १४०-१५० जागा मिळतील. रालोआला बहुमतासाठी अंदाजे ५० जागा कमी पडतील. अशा परिस्थितीत २-३ शक्यता आहेत. (१) मोदींऐवजी अडवाणी/स्वराज्/जेटली अशांपैकी कोणाचे नाव पुढे करून तथाकथित निधर्मी पक्षांचा (तॄणमूल काँग्रेस, बिजद इ.) पाठिंबा मिळवून सरकार स्थापन करायचे. हा पर्याय मोदींना फारसा आवडणार नाही कारण पक्षातच पर्यायी नेतृत्व उभे राहते जे भविष्यात त्रासदायक ठरेल. भाजपला देखील हा पर्याय फारसा आवडणार नाही कारण हे सरकार काही काळ चालून परत निवडणुका झाल्यास परत काँग्रेसच्या जागा वाढून भविष्यात त्रासच होणार. परंतु अडवाणी, स्वराज इ. ची महत्वाकांक्षा थोपवून धरणे अवघड आहे. (२) सरकार स्थापन न करता विरोधी पक्षात बसणे. हा पर्याय मोदींसाठी व पर्यायाने भाजपसाठी चांगला ठरेल. कारण १९९६ प्रमाणे तिसर्‍या आघाडीचा कोणतरी पंतप्रधान होऊन एक अस्थिर व कडबोळे सरकार स्थापन होईल जे फार थोडा काळ टिकेल आणि ते पडून मध्यावधी निवडणुका झाल्यावर भाजपसाठी अजून चांगली परिस्थिती असेल. १९९८ मध्ये भाजप व २००५ मध्ये बिहारमध्ये संजद-भाजप युतीला असाच फायदा झाला होता. (३) तिसर्‍या आघाडीचे काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणे (१९९६ प्रमाणे) किंवा मीराकुमार/सुशीलकुमार शिंदे इ. दलित नेत्याचे नाव पुढे आणून काँग्रेसने तिसर्‍या आघाडीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणे. हे सरकार अत्यंत अस्थिर व अल्पकालीन असेल. भाजपसाठी पर्याय (१) आत्मघात ठरेल. पर्याय (२)/(३) हेच योग्य ठरतील.

आम आदमी पार्टीचा तरूण चेहरा, जनतेचे तारणहार, आणि सार्‍या भारतवर्षाची एकमेव आशा* असलेले धडाडीचे नेते श्री. अरविंद केजरीवाल यांनी खास लोकाग्रहास्तव वाराणसीतून निवडणूक लढणार असे जाहीर केले आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन! त्यांनी स्पष्टपणे म्हणले आहे की खासदार होणे महत्वाचे नाही तर मोदींना हरवणे महत्वाचे आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा! गंगेत घोड न्हालं! ;) * आशाच... लता नाही कारण तीचे मोदींनी पंप्र व्हावे असे स्वप्न आहे. :angry:

माझ्या सारख्या सामान्य त्रस्त मुंबईकराना मोदीनां पंतप्रधान पेक्षा रेल्वे मंत्री पदावर पाहायला जास्त आवडेल , विकास झालाय कि नाही झालाय ते फक्त रेल्वेच्या कामावरूनच स्‍पस्ट कळते. इतर विकासांचे नुसते कागदी आलेख असतात . ते उलटे -सुलटे करून पहिले तरी काही केल्या समजत नाही . *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: एक शंका मोदी जर भारताचे पंतप्रधान झाले तर अंतराष्ट्रय स्तरावरील राजकारणाला त्यचा ताप होईल का? म्हणजेच युद्धाच्या संभावना वाढतील का? अंतराष्ट्रय स्तरावरील राजकारणातील लोकांना सुद्धा ते भारताचे पंतप्रधान पदावर नसावे असे वाटत असेल का ? *nea* *NO* *NO*

आपच्या उदयामुळे मोदी पंतप्रधान बनण्याचा धोका वाटत नाही. सध्या कुठल्याही पक्षाला निर्णायक बहुमत मिळण्याचे दिवस गेले आहेत.

मोदी पंतप्रधान बनण्याचा धोका वाटत नाही. म्हणजे आप पुढे मोदी पंतप्रधान होणे हा धोका नसून वरदान ठरेल असे म्हणायचे आहे का? :)

मनमोहन गेले मोदी आले ,अशीच परीस्थीती असणार आहे. जुनीच दारु आहे, बाटलीही जूनीच फक्त टोपण बदलेले आहे. तुम्ही मोदी यांना टोपण म्हणालात ! निष्षेध !

माझ्या मते मोदी पंतप्रधान होणार नाहीत. १. मोदींच्या पोलरायजेशनमुळे मायनॉरिटी कधीच मते देणार नाही. २. त्यांनी विवाहीत असुन आपल्या पत्नीला नाकारल्याने महिलांमधे त्यांची ढासळत चाललेली लोकप्रियता. (त्यात भर म्हणून भाजपची एकूणच बुरसट सनतानी विचारांची एक प्रतिमा. प्रमोद मुतालिक प्रकरण इ.) ३. मोदींच्या मिनिअन्सनी जिथे तिथे घातलेला धुमाकुळ. अर्वाच्य शिवीगाळ, फेकूगिरी करणारी फोटोशॉप केलेली पोस्टर्स, फुगवलेले आकडे इ.इ. ज्यामुळे दुरावत असलेला मॉडरेट इंटरनेट सॅव्ही ग्रुप. (ज्यांची मते आआप नक्की मिळवणार आणि चुरशीच्या लढतींमधे भाजपा उमेदवार पडणार) ४. त्यात भर म्हणून स्वत: मोदी करत असलेली बेताल विधाने, जसे की केजरीवाल हे पाकिस्तानी एजंट आहेत वगैरे ५. मोदींचा नुसताच सभा घेण्यावर भर, कठीण प्रश्नांना सामोरे न जाण्याचा निर्णय. ६. भाजपातील अंतर्गत बंडाळी. गडकरी, अडवाणी, सुषमा स्वराज, जसवंत सिंघ, मुरली मनोहर इ.इ. अनेक भाजपा नेत्यांशी बिघडलेले त्यांचे संबंध वरील कारणांमुळे पंतप्रधान होणे तर सोडाच, वाराणसीतुन लाजिरवाणा पराभवास सामोरे जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

एके ४९ म्हणजेच अरविंद केजरीवाल. त्यांनी नुकताच एक नव्या पक्ष स्थापन केला असून पक्षाच्या वेबसाईटवर त्यांनी भारताचा भाग असलेले काश्मीर सरळ पाकिस्तानला देऊन टाकले आहे. ज्यांनी देशाला दुभागण्याचे काम केले, ते देश कसा सांभाळणार असा प्रश्न विचारत केजरीवाल हे पाकिस्तानचे एजंट आणि भारताचे शत्रू असल्याचा अशा शब्दांत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला साभार:केजरीवाल पाकिस्तानचे एजंट- नरेंद्र मोदी यात चुकीचे काय आहे बंडा मामा!

मोदींनी "ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट" म्हणलेले नाही. त्यांचे वाक्य असे आहे: "There are three AKs in Pakistan who are being admired. AK 47, AK Antony and AK49. This third one, AK 49, has just launched a political party," अर्थात केजरीवालांच्या एकाच वेळेस खुळचटपणामुळे आणि लबाडीमुळे ते असे काही वागत आहेत जे पाकीस्तानच्या पथ्यावर पडत आहे आणि म्हणून पाकीस्तान त्यांचे कौतुक करत आहे... असे काय ते करत आहेत? खालची चित्र पहा... हे आप च्या संस्थळावरचे आहे. नकाशातले काश्मीर भारतात नाहीच! तेच अरूणाचल प्रदेशाचे पण... अर्थातच बोंबाबोंब झाल्यावर ते काढून टाकण्यात आले आहे. पण माहीतीतंत्रज्ञानाच्या जगात काही कायमस्वरूपी खोडणे अवघडच असते. तेच येथे पण झाले आहे: (इंडीया टूडे मधून घेतलेला आहे). AAP Map The embarrassing botch-up on the AAP website's donations page, a map of India which showed parts of Kashmir as a part of Pakistan, has now been removed from the website, yet it has already been circulated on Twitter.
गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?
हे दुसरे रेडीओ पाकीस्तानचे ९ जाने. २०१४ चे अधिकृत ट्वीट आहे. ते अजूनही ट्वीटरवर मिळू शकते. PakRadio त्या व्यतिरीक्त आपचे नेते प्रशांत भूषण काय म्हणाले ते माहीत असेलच. नक्षलवादासंदर्भात आत्ता चर्चा नको. तो मुद्दा पण येईलच लवकर... थोडक्यात मोदींच्या भाषणात एके हे एजंट आहेत असे म्हणलेले नसताना देखील, कस्सा माझा गरीबबिचार केजरू... ट्वीट करतो, "Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? " ... ह्याला खोटारडेपणा म्हणायचे नाहीतर काय म्हणायचे?

यावेळी मोदी त्यांना एजंट म्हणाले आहेत असे दिसते.ही बातमी बघा मोदी म्हणतातः "These agents of Pakistan and enemies of India are speaking the language of Pakistan" मग, आता त्यांना खोटारडे म्हणायचे नाही असे तुम्ही ठरवलेय का? ;)

मस्त! असे प्रतिसाद दिसले की फोरम्सवर आल्याचे सार्थक होते.

यावेळी मोदी त्यांना एजंट म्हणाले आहेत असे दिसते.ही बातमी बघा दुव्याबद्दल धन्यवाद. केजरीवाल हे कसे खोटे नाहीत हे दाखवताना त्यांचे काश्मीर संदर्भातील नकाशा चुकीचा आहे, किमान चुकून आला असेल इतके पण म्हणावेसे वाटत नाही? मग, आता त्यांना खोटारडे म्हणायचे नाही असे तुम्ही ठरवलेय का? अहो त्या धर्मराजांचा रथ हा तीन हात आकाशातून जात होता एकेकाळी. पण आता तो नुसता जमिनीवरच नाही तर जमिनीखाली ६ हात (पक्षी: खड्ड्यात) गेला आहे. इतरत्र दिलेल्या प्रतिसादातील काही भाग चोप्य पस्ते करतो: केजरीवालांनी खालील गोष्टी स्पष्ट केल्या होत्या...
  1. राजकारणात येणार नाही.
  2. (मुलांच्या डोक्यावर हात ठेवून) काँग्रेस भाजपाला पाठींबा देणार नाही आणि घेणारही नाही.
  3. ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांच्या खात्यावरील त्या काळातली (दिल्लीतली) वीज बील थकबाकी माफ करेन.
  4. दिल्लीत आमदार झालेल्यांना (त्यात स्वतः एके पण आले) खासदारकीची तिकीटे दिली जाणार नाहीत.
  5. वगैरे वगैरे
पण ते असो. काय गंमत आहे ह्या प्रकरणात काश्मीर संदर्भात जे मुद्दे बोलले गेले त्याबाबत ना केजरीवाल केजरीवाल बोलत आहेत ना त्यांचे समर्थक. त्यामुळे मोदींचे विधान नुसतेच राजकीय सभेतले विधान नसून खरेच आहे असे वाटू लागले आहे. आणि हो नकाशात केवळ काश्मीरच नाही तर अरूणाचल प्रदेश देखील वादग्रस्त म्हणून दाखवला आहे. काश्मीरचा युएन ठराव नॉन बाइंडींग आहे हे वास्तव असताना देखील परत परत जो देश दहशतवादी भारतात आणि जगात निर्यात करतोय त्यांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर का दाखवला जातो? जो नकाशा घटनेनुसार आणि कायद्यानुसार भारताचा आहे तो वापरला का जात नाही? अगदी तो इंटरनॅशनल नकाशा असला तरी गुगल देखील भारताच्या (.in) संस्थळावर संपूर्ण भारत दाखवते, कारण कायद्याने बंधनकारक आहे म्हणून. अर्थात अ‍ॅनार्किस्ट केजरीवालना हे कायदेच मान्य नसावेत.

रथ चालण्याच्या संदर्भात दुरुस्ती म्हणजे धर्मराजांचा रथ तीन अंगुळे वर चालत असे तीन हात नाही. (मोदी म्हटल्यावर संदर्भ चुकलेच पाहिजेत असे अनेकदा होते बॉ)

मुद्दा लक्षात आला ना? रथ तीन अंगु़ळे का तीन हात ह्याने कुणावर नकळत देखील चिखलफेक झाली नसती म्हणून कन्फर्म करत बसलो नाही. आणि तसे देखील आम्ही पोथीनिष्ठ नसल्याने रामायण-महाभारतातले मतितार्थ समजण्यावर भर देतो. :) पण मोदीद्वेष्टे हे मात्र तसे करताना कायम दिसतात. बाकी तुमचे देखील एकदा काश्मीरवरचे मत सांगून टाकाना कारण तो मुद्दा होता. का त्यावरील सोयिस्कर दुर्लक्ष हे पाकीस्तानच्या घशात काश्मीर आणि चीनच्या नरड्यात अरूणाचल घालण्यासाठीची सहमती समजायची?

मोदी पंतप्रधान व्हावेत किंवा नाहीत या चर्चेसंदर्भात फार तर मोदींचे काश्मीरबाबतचे मत जाणून घेणे आवश्यक ठरावे. माझे काश्मीरबाबतचे मत समजल्याने मोदींच्या पात्रतेसंदर्भातील विश्लेषणास काही मदत होईल किंवा कसे हे जाणून घेण्यास अस्मादिक असमर्थ आहेत. सदर चर्चेत काश्मीरसंदर्भात मत देणे आवश्यक आहे किंवा प्रत्यक्ष मतदान करतानाही मिसळपाववरील मोदीसंदर्भातील चर्चेत काश्मीरसंदर्भात मत देणे आवश्यक आहे असा फतवा इलेक्शन आयोगाने काढला आहे काय? असो. काश्मीरसंदर्भात माझे काहीही विशेष मत नाही. फारच उत्सुकता असल्यास - काश्मीर भारतात असल्यामुळे किंवा नसल्यामुळे मराठी संकेतस्थळांवर चघळण्याचा एक विषय याउप्पर माझ्या दैनंदिन आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही. माझ्यापेक्षा काश्मीरमधील नागरिकांचे यासंदर्भातील मत आवश्यक आहे असे मला वाटते. एकंदर विस्तृत पटलामध्ये सदर प्रश्नाबाबतचे सर्व हक्क मी मतदान करुन लोकप्रतिनिधींकडे डेलिगेट केले आहेत. लोकसभा वा अन्य योग्य ठिकाणी यावर विस्ताराने चर्चा होऊन माझे लोकप्रतिनिधी त्यावर मतप्रदर्शन करतील.

>>> एकंदर विस्तृत पटलामध्ये सदर प्रश्नाबाबतचे सर्व हक्क मी मतदान करुन लोकप्रतिनिधींकडे डेलिगेट केले आहेत. लोकसभा वा अन्य योग्य ठिकाणी यावर विस्ताराने चर्चा होऊन माझे लोकप्रतिनिधी त्यावर मतप्रदर्शन करतील. इथे बोलण्यासारखं काहीच्च राहत नाही का मग? चला तर मग, मतदान करुन येऊ या! कायको बोलबच्चन. त्या विकास अण्णाला नाही काम! तुम्ही करा. कशाला ह्या भानगडीत पडावं. नै का? :)

मोदी पंतप्रधान व्हावेत किंवा नाहीत या चर्चेसंदर्भात... तसे म्हणायचे असेल तर धर्मराजाचा रथ किती उंचीवरून चालला होता हा देखील या चर्चेचा मुद्दा नव्हता आणि इतर असे अनेकदा असताना आपण आपल्या पिंका टाकताच की! मग आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?

आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?
जर नकाशामध्ये सद्यस्थितीचा विपर्यास असेल (तुम्ही म्हणताय तसे श्रीनगर भारतात दाखवले नाहीये अशा प्रकारच्या चुका असतील) तर ते चुकच आहे. मात्र, निव्वळ वादग्रस्त भागाला वादग्रस्त दाखवण्यात किंवा वेगळे आरेखन करण्यात माझ्या मते काहि चुक नाही. फार तर ते अधिकृत भुमिकेचा विपर्यास म्हणून बेकायदेशीर असु शकते - ती ही खात्री नाही पण असु शकते, पण प्रत्येक बेकायदेशीर गोष्ट चुकीची मानलीच पाहिजे असे नाही - जसे मी समलैंगिक संबंध ठेवणे बेकायदेशीर असले तरी चुकीचे मानत नाही. जर असे नकाशे प्रकाशित करणे बेकायदेशीर असेल तर त्यावर सरकारने योग्य ते गुन्हे दाखल करून त्यांना योग्य ती कायदेशीर शिक्षा करावी. मात्र अश्या चुकांचा संबंध थेट अख्ख्या आआपच्या राष्ट्रवादाशी वगैरे जोडणे हास्यास्पद व टोकाचे वाटते. या विषयावर अतिशय तपशीलवार व सांगोपांग चर्चा खूप पूर्वी ऐसीवर झाली होती. ती अत्यंत वाचनीय ठरावी. त्यातील श्रावण मोडक यांच्या पुढिल मताशी सहमती आहे:
चुकीचे प्रायश्चित्त त्यांना द्यावे भारताच्या सरकारने. पण असे नकाशे प्रकाशित करण्याचे पराक्रम भारतात इतरांनीही केले आहेत. अगदी पुणे विद्यापीठानेही हा पराक्रम केल्याचे आठवते. हे असे नकाशे अंगभूत असणाऱ्या सॉफ्टवेअरवर भारताचे सरकार बंदी घालेल का, किमान आजवर अशी सॉफ्टवेअर विकल्याबद्दल फौजदारी गुन्हे नोंदवेल का? बड्या कंपन्यांना अंगावर घेण्याची हिंमत लागेल त्यासाठी. राष्ट्रवादासाठीची ती हिंमत मला आजवर तरी दिसलेली नाही.

काश्मीर बाबत अपेक्षित उत्तर मिळाले त्याबद्दल आश्चर्य वाटले नाही. :) निव्वळ वादग्रस्त भागाला वादग्रस्त दाखवण्यात किंवा वेगळे आरेखन करण्यात माझ्या मते काहि चुक नाही. आय होप महाराष्ट्र सरकार बेळगाव नकाशात वादग्रस्त म्हणून दाखवत नसावे. तेच हैद्राबाद आणि तेलंगणा राज्यनिर्मितीच्या आधी... वादग्रस्त भाग जर प्रत्येक नागरीक ठरवू लागला आणि त्याचे समर्थन करायचे असले तर देश कशाला म्हणायचे. अर्थात अनेकांना देश ही संकल्पनाच मान्य नसते तशी तुम्हाला देखील देश ही संकल्पना मान्य नसली तर गोष्ट वेगळी आहे. पण प्रत्येक बेकायदेशीर गोष्ट चुकीची मानलीच पाहिजे असे नाही - जसे मी समलैंगिक संबंध ठेवणे बेकायदेशीर असले तरी चुकीचे मानत नाही. Apple-Orange... राष्ट्राच्या सीमा या केवळ कायद्याचा भाग नसतात. मात्र अश्या चुकांचा संबंध थेट अख्ख्या आआपच्या राष्ट्रवादाशी वगैरे जोडणे हास्यास्पद व टोकाचे वाटते. ट्रेंड काय आहे हे बघून राष्ट्रवादाशी संबंध जोडला जातो. नकाशा नंतर काढला पण बदलला नाही. हा मुद्दा आहे. त्या व्यतिरी़क्त प्रशांत भूषण यांचे स्टेटमेंट आणि घटनेवर हात ठेवून शपथ घेत नंतर स्वत:स सतत अ‍ॅनार्कीस्ट म्हणत गोंधळ घालणारी व्यक्ती लोकांशी लॉयल नाही हे सिद्धच झाले आहे पण देशाशी लॉयल खरेच असू शकेल का हा प्रश्न आहे...

धर्मराजाचा रथ किती उंचीवरून चालला होता हा देखील या चर्चेचा मुद्दा नव्हता
हो पण भारताच्या सांस्कृतिक संदर्भात आम्हाला रस असल्याने व अशा चुका करणे ही 'आप'ची मक्तेदारी नसून, इतरांकडूनही अशा संदर्भाच्या चुका होऊ शकतात हे दाखवून द्यावेसे वाटल्याने तो मुद्दा पुढे आणला.
आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?
'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे. 'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे. 'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे. एकंदर या प्रकरणात पुढे काय झाले ह्यात पुरेसा रस नसल्याने व/वा केजरीवाल आणि मोदी या दोन्ही व्यक्तींमध्ये अधिक भंपक कोण यासंदर्भातच अद्याप विचार करत असल्याने पुढे काय झाले हे नक्की माहिती नाही. मात्र दोन शक्यता संभवतात. हा नकाशा चुकीचा असल्याने 'आप'ने तो काढून टाकला असावा किंवा हा 'चुकीचा नकाशाच बरोबर आहे' असा आपचा दावा असावा. हा नकाशा चुकीचा असल्याचे उघडकीस आल्यावर 'आप'ने चूक मान्य करुन बरोबर नकाशा दाखवला असल्यास (किंवा चुकीचा नकाशा काढून टाकला असल्यास) प्रकरण फारसे उगाळण्यात अर्थ नाही असे वाटते. मात्र निवडणुकीसंदर्भात हा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. (चर्चा तर होणारच!) मात्र भारताचा चुकीचा नकाशा हाच बरोबर नकाशा आहे असा 'आप'चा दावा असल्यास 'आप'वर काही कारवाई करण्यासंदर्भात कोणी एसेमेस स्वरुपात माझे मत मागवले तर मी अशी कारवाई करण्यासंदर्भात होकार देईन.

आधी पंतप्रधान,मग पक्षाध्यक्ष मग पंतप्रधान्पदाचे दावेदार किंवा पक्षाध्यक्षांचे चिरंजीव असा क्रम हवा ना ?

>>> आधी पंतप्रधान,मग पक्षाध्यक्ष मग पंतप्रधान्पदाचे दावेदार किंवा पक्षाध्यक्षांचे चिरंजीव असा क्रम हवा ना ? तसाच क्रम आहे. अल्पसंख्याकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी उजवीकडून डावीकडे चित्रे छापलेली आहेत.

अल्पसंख्याकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी उजवीकडून डावीकडे चित्रे छापलेली आहेत ये तो मैने वाच्याच नै था !

अल्पसंख्याकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी उजवीकडून डावीकडे चित्रे छापलेली आहेत
मुस्लिमफोबियापासून श्रीगुरुजी लवकर बरे व्हावेत यासाठी साक्षात राजनाथसिंग यांनी काही मुस्लिम धर्मगुरुंची भेट घेतल्याचे कळते.

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती पाहा. http://minorities.in/profiles.php यातील उजवीकडून डावीकडे लिहिणारे कोण आहेत बरे? बहुदा पारशी आणि मुसलमान. आता यातील पारशी आणि मुसलमान यांच्यापैकी कोणाच्या लांगूलचालनाबाबत 'श्रीगुरुजी' या नावाने लिहिणाऱ्या आयडीला आक्षेप असेल असे तुम्हाला वाटते? श्रीगुरुजी या मूळ व्यक्तीबाबत अधिक माहिती येथे पाहा: http://en.wikipedia.org/wiki/Madhav_Sadashiv_Golwalkar

>>> केजरीवालांनी खालील गोष्टी स्पष्ट केल्या होत्या... 1.राजकारणात येणार नाही. 2.(मुलांच्या डोक्यावर हात ठेवून) काँग्रेस भाजपाला पाठींबा देणार नाही आणि घेणारही नाही. 3.ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांच्या खात्यावरील त्या काळातली (दिल्लीतली) वीज बील थकबाकी माफ करेन. 4.दिल्लीत आमदार झालेल्यांना (त्यात स्वतः एके पण आले) खासदारकीची तिकीटे दिली जाणार नाहीत. 5.वगैरे वगैरे अजून (६) सरकारी लाल दिव्याची गाडी वापरणार नाही. (७) सुरक्षा घेणार नाही. (८) सरकारी निवासस्थान घेणार नाही. (९) घटनेशी प्रामाणिक राहीन (मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना) यातले काहीच पाळले नाही ते वेगळे.

श्रीगुरुजी, त्याची उत्तरे केजरीवाल देतील हो.. परंतु तुम्ही इथुन पळ का काढलात ते सांगा.. या कमेंटवरुन http://www.misalpav.com/comment/reply/27411/566824 या धाग्यावर माझ्या प्रत्येक प्रतिसादाचा आपण विनाविलंब प्रतिवाद केला आहे ,हा मुद्दा सोइस्कररित्या विसरलात..जरा या मुद्द्याचाही प्रतिवाद करा.

श्रीगुरुजी ... या इथे प्रतिवाद न करताच आपण पळ काढलात. http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824 बोखिरीया व सोलंकीच्या प्रकरणांवर आपली मते ऐकायला आवडतील.

>>> श्रीगुरुजी ... या इथे प्रतिवाद न करताच आपण पळ काढलात. http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824 बोखिरीया व सोलंकीच्या प्रकरणांवर आपली मते ऐकायला आवडतील. तुम्ही पूर्वी 'ग्रेटथिंकर' हा आयडी वापरून पिचकार्‍या टाकत होता. त्या आयडीपासून पळून जाऊन नंतर तुम्ही 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' असे नामांतर करून पिंका टाकायला सुरूवात केलीत. जुन्या आयडीपासून पळ काढून नवीन आयडी का घेतला ते आधी सांगा. त्यानंतर मी माझी मते सांगतो. काही आठवड्यांनंतर 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' या आयडीपासून पळून जाऊन तुम्ही 'नानासाहेब नेफळे' असे नामांतर करून बरळायला सुरूवात केलीत. 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' आयडीपासून पळ काढून नवीन आयडी का घेतला ते आधी सांगा. त्यानंतर मी माझी मते सांगतो. केजरीवाल संबंधात आपणच काही दिवसांपूर्वी काय लिहिलं होतं ते विसरलेले दिसतंय. तुमच्या आठवणीसाठी ते खाली देत आहे. (http://www.misalpav.com/node/26781). जरा विचारात सातत्यता तरी राखा. ________________________________________________________________________________ केजरीवाल हा खोटारडा आहे हे टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Sat, 18/01/2014 - 21:32 केजरीवाल हा खोटारडा आहे हे त्याच्याकडे बघितल्यावरच कळते ,आप हे 'खाप'च्याच औलादीचे वाटायला लागलेत,याचा बोलवता धनी वेगळाच असावा .... सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥ न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥ _______________________________________________________________________________ जो केजरीवाल आज तुम्हाला भारतवर्षाचा उद्धार करण्यासाठी युगायुगातुन अवतार घेणारा अवतारीत महापुरूष वाटतो आहे, तोच केजरीवाल जेमतेम २ महिन्यांपूर्वी तुम्हाला 'खोटारडा' वाटत होता. तुम्ही त्यांच्या बाबतीत एकदम १८० अंशाचे वळण का घेतले ते आधी सांगा. त्यानंतर मी माझी मते सांगतो. जो 'आप' पक्ष काही काळापूर्वी तुम्हाला 'खाप' पंचायत वाटत होता तोच पक्ष तुम्हाला अचानक भारताचा उद्धारक का वाटू लागला ते आधी सांगा. त्यानंतर मी माझी मते सांगतो. 'ग्रेटथिंकर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' आणि 'नानासाहेब नेफळे' या ३ आयडींव्यतिरिक्त अजून किती वेगवेगळ्या नावांनी तुम्ही इथे वावरत आहात त्याचीही माहिती द्या. त्यानंतर मी माझी मते सांगतो. तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांवर माझा प्रतिसाद तयार आहे. तो वाचल्यानंतर तुमच्या सर्व कुशंका व संभ्रम दूर होतील. पण त्याआधी तुमची विश्वासार्हता आणि पात्रता सिद्ध व्हायला हवी.

श्रीगुरुजी, आपण प्रत्येक धाग्यावर तत्परतेने प्रतिवाद करता, परंतु मी आपल्याला जिथे प्रतिवाद करायला सांगत आहे तिथे आपण सोईस्कर डोळेझाक करत आहात. आपण आपल्या आकडेवारीसहित माझ्या मुद्द्याचा प्रतिवाद करावा अशी मी आपल्याला मित्रत्वाची विनंती करतो.इथे हे बघा इथे. http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824

आपण माझ्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे सोईस्कर डोळेझाक करत आहात. आपण माझ्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन माझे शंकानिरसन करावे अशी मी आपल्याला मित्रत्वाची विनंती करतो. तुमच्या प्रश्नांसाठी माझा प्रतिसाद लिहून तयार आहे. तुम्ही माझ्या वरील प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन आपली विश्वासार्हता आणि पात्रता सिद्ध केली की लगेच प्रतिसाद पेस्ट करतो.

श्रीगुरुजी आपण कसे ओळखता.... हस्ताक्षरावरून का ! :)