Welcome to misalpav.com
लेखक: निमिष सोनार | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मग काय ठरलं शेवटी? मी या मालिकेचे १ ते दीड भाग पाहिले आणि मग मालिका आहे हे विसरून गेले. पूर्वीची महाभारत अशीच काहीकाळ पाहिली होती. मग रामायण आणि महाभारत या मालिका सुरू असताना बाजारात गेल्यास रस्ते आणि दुकाने रिकामी मिळतात हा बहुमूल्य शोध लागला त्यामुळे त्या मालिका प्रचंड आवडू लागल्या. महाभारतावर अनेकांनी अनेक प्रकारे लिहिले आहे त्यात आणखी थोडी भर. काय फरक पडतो? जौ द्या. टीव्हीवर आलेल्या महाभारत मालिकांपैकी "भारत एक खोज" मालिकेच्या काही भागात जे महाभारत दाखवले होते ते मला बर्‍यापैकी आवडले होते.

रामायण आणि महाभारत या मालिका सुरू असताना बाजारात गेल्यास रस्ते आणि दुकाने रिकामी मिळतात हा बहुमूल्य शोध लागला त्यामुळे त्या मालिका प्रचंड आवडू लागल्या.
अगदी असेच आमचेही झाले. त्यावेळी निवांतपणे फिरायला जायचो. बाकी आतचे महाभारत विनोदी कार्टून सारखे बघावे, असा विचार आहे. या सिरियलबद्दल एक मला न सुचलेला विचार काल कळला, तो म्हणजे कार्टून मालिका बघाणार्‍या अल्पपवयीन मुलांना हे असे उड्डाण करून येणारे पांडव वगैरे प्रचंड आवडतात. त्यामुळे ही बाळगोपाळ मंडळी महाभारत बघतील, आणि त्यांच्या आवडीच्या स्वरूपात त्यांच्यापर्यंत महाभारत पहुचेल, ही एक फार चांगली गोष्ट होईल, असे म्हणू शकतो. वयस्क, ज्यांनी महाभारतावरील अनेक पुस्तके वाचली आहे, त्यावर मनन केलेले आहे, त्यांनी ही मालिका बघण्यापेक्षा आजवर महाभारताची ओळख न झालेल्या लहान मुलांनी ती बघणे जास्त गरजेचे आहे, आणि हल्ली उपलब्ध असलेल्या कार्टूनांशी स्पर्धा असल्याने निर्मात्यांनी महाभारतात असा मालमसाला टाकला असावा, असे वाटते.

अरे आनंद्-कार्लसन लढतीसारखे धावते समालोचन आहे कि काय? झाला नविन भाग की टाक स्टोरी. मराठी आंतर्जालावर हा एक नविन प्रकार सुरु झालाय असे समजावे का? ;)

अरे आनंद्-कार्लसन लढतीसारखे धावते समालोचन आहे कि काय? झाला नविन भाग की टाक स्टोरी. मराठी आंतर्जालावर हा एक नविन प्रकार सुरु झालाय असे समजावे का?
माबो ची परंपरा मिपावर सुरू झालेली दिसतीये

फारएंड सायबाच्या कडून परीक्षण कस करावे ते शिकावे .............फारइंडांचे परीक्षण कमीतकमी पुढील १० वर्षे वाचावे .......आणि लिहिते व्हावे .....

म्हैसतै, तुम्ही नेहमीच संदर्भांशिवाय बोलत असता. आणि संदर्भ मागितले कि देत नाहीत.
इकडचं तिकडचं काहीतरी वाचत बसण्यापेक्षा मूळ महाभारत वाचा. द्रोण वचनाला बांधील होते म्हणून त्यांनी असं केलं. तसच खाल्लेल्या मिठाला जागायला सुधा बांधील होते म्हणून इच्छा नसताना कौरवांच्या बाजूने लढावं लागलं

चित्रगुप्ताच्या मताशी सहमत . ह्यात 6०% उगीच आपला काहीतरी बाळबोध दाखवलंय पण ४०% मूळ महाभारताला धरून आहे ह्याच्याशी सुधा सहमत