Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मस्त रंगतेय म्याच! आधी शेवटचं क्रमशः बघितलं आणि जीव भांड्यात पडला! त्या उगा लगबग करणार्‍या अक्कांचं चित्र मस्त काढलंय!

आता पर्यंत अटेंड केलेली तीन्-चार जवळची लग्नं डोळ्यासमोरुन गेली. त्यातल्या त्या उद्धट आणि खवचट माम्या/मावशा/काकवांना दिलेली तितकीच खवचट उत्तरं आठवली. ;)

@त्यातल्या त्या उद्धट आणि खवचट माम्या/मावशा/काकवांना दिलेली तितकीच खवचट उत्तरं आठवली. >>> =)) सूडुक..मेल्या...तू माज्या बरोबर १/२ म्याच'ला चलच! चांगलं,जाsssड-काठाचं मद्राशी धोत्तार नेसवून(सॉरी! नेसायला देऊन! :D ...) भस्म लाउन..त्यांचं भस्म-करायला नेतो तुला. =)) . . . मला खात्री आहे. एकदा ही "तोफ" लावली,की बुरुजांच्या आत लढायला म्या मोकळा! :D

@नावाजलेला शिंपीही धरू शकणार नाही.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif काय माप काढता राव!? http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif कार्या-लयात "गेलेल्या"(राम नाम सत्य हो! :D ) प्रत्येक गुरुजिच्या जिभेचा बोरू होतोच!(पुण्यात तरी!) तशी "गरजच" आहे इथली! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

"फुकट" अधिकारी भाग आवडला आहे. यांच्या चर्येवरील भाव पाहून "असूरी आनंद" कस्सा असतो हे सोदाहरण समजेल. यात मावश्यांबरूबर काही "काकोबा" ही आघाडीवर असतातच. पु.भा.प्र.

एका अशाच एका काकाची आठवण आली. एका ओळखीच्या घरात एकाचा अकाली मृत्यू झाला. घरचे अगदी सावरण्याच्या पलिकडे गेलेले आणि हे साहेब १२वे १३वे कुठे करावे, मालाडला की दादरला आणि भटजी कसे चुकत आहेत याचीच चर्चा करायला बसलेले. गेलेल्याचा एक नातेवाईक त्याना मारायला उठलेला.

@ गेलेल्याचा एक नातेवाईक त्याना मारायला उठलेला.>>> असल्या बे'भानांवर अशी वेळ येते खरी! त्यांना,आपल्याला याच्यातलं कित्ती ज्ञान आहे..हे दाखवायची सुरसुरी (कुठेही) येते! एकदा एका ठिकाणी याच तेराव्याच्या कार्यक्रमात,असाच एकजण...तेराव्याचं श्राद्ध दु.१२ वाजता असतं..असं माहित असल्याचं दाखवत असलेला महाभाग,आमचे सकाळचे शांतोदकाचे विधि सुरु असल्यापासून पिंड कधि करायचे..ते सांगा! म्हणून माझ्या मागे लागलेला होता. शेवट..त्यानी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारल्या नंतर,मी त्याला-"कुणाचे???" असा टोला लागावून,त्याचा पिंड मात्र तिथेच-पाडला. तोपर्यंत तो "पिंड" रागानी चरफडत दूर गेलावता!

मस्त एकदम. एकापेक्षा एक इरसाल नमुने मस्त रेखाटलेत. त्यांना तितकेच खवचटपणे हाणणारे गुर्जीही भारीच.

फार आवडला हा भाग. साक्षात लग्नमंडपातून सैर करवलीत. अन सनईचे सूर अन लगबग, अत्तरांचा-गजर्‍याचा सुवास, लफ्फेदार शालू-साड्यांची सळसळ सग्गळं अनुभवलं. :)

होय अत्तर, वाळा, गुलाबपाणी अन वाकून नमस्कार करणे, थोरामोठ्यांनी आज्जी-काकवांनी नीट निरखून सूनेला पारखणे ... देवक, रुखवत एकंदर सगळच मनाने अनुभवलं.

आवडला. (रिटायमेंट नंतर पार्ट टाईम करायला , आणि टाइमपास करायला, हा धंदा बरा आहे, असे वाटत होते.पण तुमचे अनुभव वाचून, असा धंदा न करता, एखादी पानाची टपरी टाकावी म्हणतो.)

वा गुरुजी, अतिशय उत्तम लेखमाला. अगोदरचे सर्व लेख वाचले असले तरी पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात आणि महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही क्रमाने वाचले तरी तितकीच मजा येते. मला फार पूर्वीपासून गुरुजींच्या बद्दल वाईट वाटत आले आहे. ( माझ्या दोन मित्रांचे वडील पौरोहित्य करत असत) कारण आपण लिहिले आहे तसे आपण शंभर पापे केली तरी चालतील गुरुजींनी सोवळे राहिलेच पाहिजे आणि आमची पापे धुण्यास मदत केली पाहिजे हा दांभिकपणा समाजाकडून पाहत आलो आहे. यादी स्वच्छ शब्दात लिहिली असेल तरी लोक महत्त्वाच्या गोष्टी विसरतात आणि गुरुजीना "जमवून घ्या" सांगतात हा प्रकार पण डोक्यात जाणारा आहे.(हे म्हणजे आमच्या धंद्यात पथ्य पाळा सांगूनही आम्ही पाणीपुरी खाणार आणि पोट बिघडले कि डॉक्टरवर परत खापर फोडायला तयार. १००% मधुमेही असे करतातच.) असो आपल्या ताजमहालाला आमची वीट नको. आपले लेखन उत्कृष्टच आहे. प्रत्येक भागानंतर आता प्रतिक्रिया देतो असे ठरवत होतो पण येणारा प्रत्येक भाग सुरेखच आहे त्यामुळे सर्व भागांना वेगळी प्रतिक्रिया न देता एकत्रच देत आहे. लिहिते राहा. आपला कृपाभिलाषी सुबोध खरे .

सर्व प्रथम सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद! @ कारण आपण लिहिले आहे तसे आपण शंभर पापे केली तरी चालतील गुरुजींनी सोवळे राहिलेच पाहिजे आणि आमची पापे धुण्यास मदत केली पाहिजे हा दांभिकपणा समाजाकडून पाहत आलो आहे.>>> येस्स्स्स्स! आणि नेमका याच दांभिकपणामुळे आमचा 'पुरोहितपणा' बाजारी झालेला आहे. म्हणून तर मी स्वतःला (स्वतःच्या मनात) धार्मिक एंटरटेनर म्हणवतो. ;) @यादी स्वच्छ शब्दात लिहिली असेल तरी लोक महत्त्वाच्या गोष्टी विसरतात आणि गुरुजीना "जमवून घ्या" सांगतात>>> हे ही बरेच ठिकाणी घडतं. पण तरिही मी, असं सांगणारा माणूस समंजस वृत्तीचा असेल तर खरच 'जमवून घ्यायला' तयार असतो/आहे. आणि त्यात काहि चुकिचंही नाही. कारण ज्याच्या जश्या श्रद्धा..तसा त्याचा धर्म!-हे सत्य. :) पण जे तत्ववादी असतात त्यांना मात्र अश्या प्रसंगी अडवावसंच वाटतं. कारण आंम्ही असं काही(ही) विसरलो की मग मात्र हे लोक आंम्हाला कध्धिही माफ करत नाहीत! @लिहिते राहा. >>> येस्स स्सर!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-195.gif अजुन एक म्हणजे-तुमच्या या प्रतिसादामुळे ... या लेखमालेच्या दरम्यान/शेवटी कधितरी.. माझ्या हातून "माझ्या भावविश्वातला गुरुजी" असा लेख बाहेर येणार हे नक्की! :)