Welcome to misalpav.com
लेखक: अक्शु | प्रसिद्ध:
विवाह निश्चित झाल्याची खूण म्हणून वाग्दत्त वधू आणि वर एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घालतात.ही अंगठी अनामिकेतच का घालतात? दुसऱ्या बोटात का नाही घालत? . . एका तत्त्ववेत्त्याची ही एक सुरेख मांडणी पाहा. ......... . . त्याच्या मते, आपला हात म्हणजे दहा बोटे. हे एक कुटुंब. . . त्यातील अंगठा हे आपल्या आई-वडिलांचे प्रतीक. . . अंगठ्याजवळचे बोट आपल्या भावंडांचे प्रतीक. . . मधले बोट म्हणजे आपण स्वत: . . चौथे अनामिका...म्हणजे आपला जोडीदार, . . तर करंगळी म्हणजे आपली अपत्ये. . . . ही झाली गृहीतकं.आता पाहू या कुटुंबातील या घटकांशी आपली नाती कशी आहेत ती. . . . . हाताचे तळवे नमस्काराप्रमाणे जोडा. . . मधली बोटे दुमडून बाकी बोटांची फक्त वरची टोकं जुळवा.आता प्रथम अंगठे एकमेकांपासून दूर करा. ते उघडता येतील. . . कारण आई-वडील काही जन्मभर लाभत नाहीत. कधी ना कधी ते आपल्याला सोडून जातात. . . अंगठे मिटवून त्याच्या शेजारील बोटे उघडा.तीही उघडतील.कारण भावंड त्यांना त्यांची कुटुंबं आहेत.स्वत:ची आयुष्यं आहेत. . . आता ती बोटं जुळवून आपल्या करंगळ्या उघडा. . . त्याही उघडतील.कारण तुमची मुलं मोठी झाल्यानंतर घरटं सोडून भरारी घेणारच आहेत. . . . . आता करंगळ्या मिटा आणि अनामिका एकमेकांपासून वेगळ्या करा. . . . . आश्चर्य वाटेल; पण त्या वेगळ्या होत नाहीत.कारण जोडीदार,म्हणजे पती-पत्नी आयुष्यभरासाठी एकत्र राहणार असतात.ते सुखात आणि दु:खातही एकमेकांना साथ देतआआत आत्ताच फेसबुकवर वाचलेला हा एक सुंदर संदेश.काही वेळा अगदी साध्या गोष्टींमधून कसले भारी अर्थ निघू शकतात ह्याचे आश्चर्य वाटते.तुम्हाला काय वाटते?
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

प्यारेराया??? प्यारेराया वरुन खालील तीन गाणी आठवली, नको प्यारेराया अंत अता पाहु व्याकरण हे सर्वथा पाहु नये, भीडस्त रावांनी मजे मधे लिहीले सिरीयसली त्यास घेउ नये दुसर गाण, सुध्दलेखन कधी का कुनाच चुकल, दोश न द्यावा फुका प्यारेराया मला टेंपोत बसवु नका किंवा तिसर मिपा येतय बहरात भावड्या, नका शोधु डोळ्यातल कूसू, प्यारे राया चला टेंपो मधी बसू अशी गाणी आठवली

पैजारबोआ लेखणी सिद्धहस्त आहे अगदी.... मिपाचे 'गदिमा'ही खिताबत आपणास बहाल व्हायला काही प्रत्यवाय नसावा. :-D :-D :-D

भीडस्त , आता नाव बदलाच. ;) आणि राया म्हटल्याबद्दल नेमकं 'काय' म्हणावं ह्या संभ्रमात आहोत. पैजारबुवांना एक मस्तानी आमच्यातर्फे लागू!

राया म्हणजे राजा असतंय ना राव.. रामराया,देवराया आठवा की जरा ;-) दाते कर्वे शब्दकोष पृष्ठ क्रमांक २६२० राया-पु. डौलानें बोलतांना फांकडे, फंदी, अफीणबाज इ॰ कांनीं स्वत:स लावलेली ऐश्वर्याची व वैभवाची पदवी. [सं. राज् तसेच मोल्सवर्थ शब्दकोष पृष्ठ क्रमांक ६९३ राया [ rāyā ] m (राय King.) A title of majesty or grandeur, assumed by blades, swells, opium-eaters &c. in speaking pompously हे नजरेत राहूद्या. लयीच हूलझपट कराया लावली मित्रा तुम्ह्या. :-D :-D

छिद्रान्वेष आजच्यापुरता पुरे करावा असं वाटल्याने पैजारबुवांना एक मस्तानी आमच्यातर्फे लागू हे दुर्लक्षिले आहे. ;-) ;-)

नका हे नवं ओझ आमच्यावर लादू. तरुण पणी आम्ही बाजीरावा सारखे दिसत होतो खरे, पण तेव्हा कोणी मस्तानी दिली नाही. आता या वयात घरी काशीबाई आहेत तेवढंच पुरे वाटत. फार दगदग केली तरी गुढगे दुखतात हो आजकाल. मस्तानी वगेरे तुमच्या सारख्या तरुणांना ठिक आहे. सध्या आम्ही आलं घातलेल्या कपभर चहातच आनंद शोधतो.

पर्दापणातच हाफ शेंच्युरी माराणार्या अक्शु भौ चे हार्दिक अभिनंदन . चेपु च्या पोस्टला प्रतिसाद देणार्या मिपाकरांचे जाहिर आभार . शुभेच्छुक-जेपी आणी समस्त 'मी पयला क्लब' सदस्य.

धन्यवाद जेपी भौ. आमाला बी सामील करून घ्या की तुमच्या 'मी पयला' क्लबात :-))

असे कळले की पाश्च्यात्यांमधे अंगठी डाव्या हातात घालण्याचे प्रॅक्टिकल कारण म्हणजे लोक उजव्या हाताचा वापर जास्ती करत असल्याने (डावखुरे अपवाद वगळता) त्या मौल्यवान धातू/ खड्याची झीज कमी व्हावी/ सहज चरे पडू नयेत. आता त्यातही कमीत कमी वापर करंगळीचा केला जातो पण करंगळी फारच छोटी असल्याने त्या अंगठीवर कलाकुसर करण्यास फारच कमी वाव राहतो म्हणून मग अनामिका. आता असाच प्रॅक्टिकल विचार करता भारतात डाव्या हातात न घालण्याचे कारण म्हणजे डावा हात = धुता हात हे असावे बहुधा.