Welcome to misalpav.com
लेखक: सुब्बु | प्रसिद्ध:
माझा हा मिपा वरील पहिला लेख आहे. दोन मुली असल्यामुळे मला जे आपल्या समाजातून अनुभव आलेले मी इथे सांगत आहे. मी मध्यमवर्गीय घरातील स्त्री, घरातले सगळे उच्चशिक्षित.घरामध्ये स्त्री ला खूप चांगली वागणूक. मला पहिली मुलगी झाली आणि सगळे आनंदी झाले. कारण ती गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झाली होती. मग आम्ही तीच नाव निकिता ठेवला. तिच्या बाललील्लानी आम्ही खूप आनंदीद झालो होतो. काही वर्षांनी जवळच्या लोकांकडून दुसर्या chance साठी विचारणा झाली. आणि दुसरा मुल मुलगा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा होती. मी स्वतः मुलगा आणि मुलीमध्ये कधीच भेदभाव करत नाही . आणि मला दुसर्या वेळीही पुन्हा मुलगी झाली. जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा सगळे जन नाराज होते. कुणी उनाशी बोलत न्हवत. आणि त्यावेळी वातावरण खूप गंभीर झालेला होते . माझे मिस्टर फक्त माझ्या जवळ बसले होते. थोड्या दिवसांनी हे वातावरण सुद्धा निवळले. नवीन बाल सुधा सगळ्यांचे लाडके बनले. मला सुद्धा २ मुली आहेत याचा अभिमान वाटायला लागला कारण खरच माझ्या निकिता आणि शिरीन खूप activ सुंदर आणि हुशार आहेत. मला मुलगा नाही ह्या बधल काहीच कमी वाटत न्हवती. पण काही दिवसांनी काही लोकां कडून मुलगा नाही म्हणून काही वक्तव्ये ऐकायला मिळाली. सगळेजन आमच्या property चा भावी वारसदार कोण असा विचार करू लागले. कुणी सांगितला माझा मुलगा दत्तक घ्या तर जवळची एक नातेवाईक बोलली आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार. ह्या गोष्टीने मी पुरती हलली होती. पुन्हा पुन्हा तेच विचार डोक्यात घोळायला लागले. मला २ मुली आहेत म्हणून असा कुणी का म्हणून माझ्या मुलींच्या हक्का मध्ये आडवा येतंय. मी असा कधी होऊ देणार नाहीच. पण आला खूप प्रश्न पडतात माझ्या मुली आमच्या संसाराच्या वंश वेलीवरची २ सुंदर फुले आहेत. अजून सुद्धा मुलींना पाहिजे तो दर्जा मिळत नाही. उच्च शिक्षित माणसाने च असे विचार केले तर काय होईल? मला मुलगा नाही म्हणून माझ्या मुलींचे हक्क मी असे दुसर्या नातेवाईकाच्या मुलाला का द्यायचे? अजून खूप प्रश्न आहेत पण उत्तरे मिळत नाहीत. पण एक मात्र नक्की , मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

पहिल्याच लेखाबद्दल अभिनंदन. या महत्वाच्या विषयावर योग्य ती चर्चा इथे घडून यावी, असे वाटते.

जे लोक असा वाटा मागतील त्यांना सरळ तोंडावर सुनवा: आमची प्रॉपर्टी अन आमच्या मुली काय ते बघून घेतील, मध्ये निर्लज्ज हावरटागत बोलायचं काम नाही. असले दीडदमडीचे लोक डोक्यात जातात.

मामला प्रॉपर्टी वगैरेचा आहे, तर आत्तापासूनच या विषयीच्या कायदे-कानून इ. ची व्यवस्थित माहिती काढून ठेवावी. पुढचे अनेक त्रास वेळीच व्यवस्थित माहिती करून घेण्यामुळे वाचतील. तुम्हा उभयतांच्या पश्चात तुमच्या वाट्याची प्रॉपर्टी मुलींना मिळावी, यासाठी कायदेशीर तजवीज करून ठेवावी (जरी मुली अद्याप लहान असल्या तरिही). 'सावधपण सर्वविषयी' असे समर्थ सांगून गेलेतच.

निदान महाराष्ट्रात तरी आता वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलींना त्यांच्या वारसाहक्कउतरंडीच्या प्रमाणात हिस्सा मिळतो असे ऐकले आहे.

तुमच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही व तुमच्या दोन्ही मुली सोडुन कोनाचाही कायदेशिर हक्क होवु शकत नाही.त्यामुळे असला विचार सोडा,दुसर सगळ्यात महत्वाच लेकींना फिजिकल आणी मेंटली इतक स्ट्रांग बनवा की त्यांना हिस्सेदारी मागण्याची कोनाच्या बापाची हिंमत होणार नाही.या साठी कराटे क्लास्,योग या सर्व गोष्टींचा अवलंब करा. साधारण वयाच्या पाचव्या वर्षापासुन कराटे क्लास लावा. ती पाचवीला जाईपर्यंत ब्लॅक बेल्ट होते. यामुळे फक्त शाररीक नाही तर माणसिक सुदृढता देखिल यामुळे मिळते.दुसरी गोष्ट मोठ्या कन्येला आत्तापासुनच तिला सर्व गोष्टी पहायच्या आहेत याची जाणिव करुन देत जा.कारण कधी कशी वेळ आयुष्यात येईल हे कोनीच सांगू शकत नाही.तिच बालपण हरवु देवु नका पण जबाबदारी देखिल शिकवा.तुमच्या इनव्हेस्टमेंट , अ‍ॅसट्स, कर्जे याची माहिती गप्पा मारता मारता सहज तिच्या कानावर पडेल अस बोलत जा.बराच फरक पड्तो.(मी देखिल दोन लेकींचा बाप आहे पण याचे वाईट किंवा भिती मला कधीच वाटत नाही.माझी मोठी लेक कराटे,स्केटींग,शुटींग,स्विमिंग,नाचण् आणी जमलच तर थोडाफार अभ्यास असे सगळच करते.मीच काय माझ्या अख्या खाणदानात तिच्या कुठल्या गोष्टींवर हक्क सांगायची कोनाचीच हिंमत नाही.)त्यामुळे तुम्हीही ही खंबिर बना आणी लेकींना देखिल खंबिर बनवा.

खूप आभार. मुलीना खूप खंबीर तर बनवणारच आहे पण तुमच्या विचारामुळे मुळे खूप उभारी मिळाली

लोक काय काहीही बोलतात हो.. त्यांना फाटयावर मारायचं अस्तं (म्हणजे लक्ष द्यायचं नाही..) तुम्हाला मुली असोत वा मुलगे.. तुमची "स्वकष्टार्जित" संपत्ती तुमच्याच लेकरांना मिळते. बाकीच्यांचा काहिही संबंध नाही. बाकी जी संपत्ती वाडवडिलांकडुन मिळाली असेल तिच्या वरही तुमच्या मुलींचा "कायद्याने" मुलांएवढाच हक्क आहे. तरीही वाटत असल्यास "मृत्युपत्र / इच्छापत्र" करुन ठेवा. ही त्या विषयीची माहिती:- स्वतःच तयार करा - स्वतःचे इच्छापत्र!

सल्ले देणारांना फक्त म्हणायचं....'तुम्हाला विचारलंय?' बाकी असे प्रॉपर्टीबद्दल बोलणारांना 'तुम्ही बांगड्या भरल्यात काय, तुम्हाला पैसे मिळवायला काय झालंय' असा प्रश्न विचारा. (स्त्रीवादी येतील भांडायला, त्यांचा विचार करु नका, बांगड्या 'कम्फर्टेबल नसल्यानं' काम करताना काढून ठेवलेल्या बायकाच भांडायला येतील, डोन्ट वरी!)

अजूनही अशी मानसिकता असलेली माणसे आहेत हे ऐकून वाईट वाटले आणि रागही आला . पण तु म्ही भाग्यवान आहात ़ कारण Son is your Son till he gets a wife. And daughter is your daughter for the whole life.

Son is your Son till he gets a wife. And daughter is your daughter for the whole life.
हा पुरुषद्वेष्टा कोट टाकायची इथे गरज नव्हती असे वाटते. बहुत काय लिहिणे, तुम्ही सूज्ञ असा.

+२ अब्राहम लिंकन म्हणाला होता - "मला गुलामगिरीचा तिटकारा आहे. याचा अर्थ गुलामांप्रति प्रेम आहे असा होत नाही."

Son is your Son till he gets a wife. And daughter is your daughter for the whole life. :- १००% सहमत (नियमाला एखाद दुसरा अपवाद असू शकतो.)

कैच्याकै. असा विचार करणारे आई-बाप 'दुखी आत्मा' कॅटॅगरीत मोडतात. बिचार्‍या मुलांचे मधल्यामध्ये हाल होतात. अनुभवाचे बोल असतील तरी जनरलाइझ करु नका.

हां विचार करणारच आहेत, नावे कुणा कुणाला ठेवणार ? मुली सुध्दा अमुक तमुक मुलाची इस्टेट नोकरी काय आहे बघुनच त्याला जवळ करतात मग या या एकुण प्रकारात अनैसर्गिक काय आहे ?

जी सुशिक्षित पार्श्वभूमी आपल्या कुटुंबाची दिलेली आहे तिथे वारस कोण हां प्रश्नच निर्माण हॉट नाही कायदा मुलगा मुलगी फरक करत नाही हे शेन्बड्या पोरालाही आता ठाउक असते.

मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील. या लिखाणावरून स्पष्ट दिसतंय की तुम्हाला सगळं माहिती तर आहे. आता फक्त तेच आचरणात आणा. कायदाही तेच म्हणतो आहे. लोक काय दोन्ही बाजूनी बोंब मारण्यात पटाइत असतात. "ऐकावे जनाचे, करावे मनाचे" हा मंत्र नीट लक्षात ठेवा म्हणजे झाले. हाकानाका.

जयवंत दळवींच्याच एका नाटकात उद्गार आहेत - मुलाला खाली बोटभर असतं ते सोन्याचं असतं का? अर्थात - मुलगा हवा मुलगा हवा अशी जी अडाणी अन दुर्दैवी हौस असते त्यावर ओढलेला कोरडा आहे.

पाहता लेखिकेची भिती अनाठायी आहे.बाकी मुलींच्या नावे संपत्ती करताना स्वत:ची तजविज करुन ठेवा. अशी बरीच प्रकरण पाहिली आहेत की मुली परत हिंग लावुनही आपल्या पाल्याला विचारीत नाहित. (अपवादात्मक)

सहमत. आपली अपत्ये, कायदेकानून बर्‍यापैकी जागेवर असताना लोकांच्या (अगदी नातेवाईकांच्याही) बोलण्याला भीक घालायचे दिवस संपले. म्हणजे तसे ते कधी नव्हते पण आपणच जरा भाव देत होतो. परंपरागत संपत्तीबाबत तुमच्या यजमानांच्या वाटयाला काय यायचे त्यातच भेदभाव केवळ 'तुम्हाला मुली असणे' या कारणामुळे होतोय असे तुमचे म्हणणे आहे की काय ते समजले नाही.

मुली परत हिंग लावुनही आपल्या पाल्याला विचारीत नाहित.
खरं आहे. पण एसमाळीजी एकवेळ तसं परवडलं पण हगल्या-पादल्या कारणावरुन भांडून माहेरी येऊन, पालकांच्या डोक्याला कल्हई करणार्‍या मुली नकोत. तशाही पाहील्यात म्हणून म्हणते.

शुचीजी,आपल्या मताशी सहमत आहे. पाल्याला न विचारणारी किंवा रडत भेकत माहेरी येणार्या मुली एकाच वर्गात येतील.रेवती ताईंच्या प्रतिसादातील शेवटचा भाग समजला नाही .

आजी आजोबा जर म्हणायला लागले की "मुला, तुला रे वाटणी घेऊन काय करायची? तुला मुली आहेत तर देत नाही, किंवा कमी देऊ" असा अर्थ आहे.

एकंदरित स्थावर जंगम वगैरे सर्व मालमत्ता, मुलगे असोत वा मुली, माय-बापाच्या मृत्यूनंतरच वारसांना मिळावी, अशी तजवीज करणेच जास्त चांगले, असे अनेक उदाहरणावरून दिसून येते.

काही काळजी करू नका हो, सगळं व्यवस्थित होईल. कायद्याने तुमचे कोण काही वाकडे करू शकत नाही. फाट्यावर मारा पुढे चला. मलाही दोन मुलीच आहेत. दुसरी मुलगी झाल्यावर माझे बरेच नातेवाईक येवून माझे सांत्वन करू लागले. मी संतापून म्हणालो "आयला मला काही दुख: नाही आहे तुम्ही कशाला एवढे सांत्वन करताय ? असे काही बोलायचे असेल तर हॉस्पिटल मध्ये कृपा करून येवू नका"

आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार.
तुमची तुम्ही म्हणता ती मालमत्ता स्वकष्टार्जित (म्हणजे तुम्ही आनि तुमच्या नवर्‍याने मिळवलेली) आहे का? जर तशी असेल तर वरील वाक्याला अर्थ उरत नाही. स्वकष्टार्जित मालमत्ता तुम्ही तुमच्या मुलींना द्या किंवा गल्लीत वाटून टाका, तो तुमचा अधिकार आहे. जर तुमची मालमत्ता स्वकष्टार्जित आणि पुष्कळ (सबस्टॅन्शियल) असेल तर गावातला सगळ्यात चांगला इस्टेट वकील बघून (मग तो कितीही पैसे चार्ज करत असला तरी तोच घ्या!)तुमचं विल आणि ट्रस्ट करून टाका. तुमचं वय जर चाळीसच्या पुढे असेल तर ही बाब निकडीची आहे.

मला एक पटलं नाहि ... जेव्हा दुसर्यांकडुन विचारणा झाली ... तेव्हाच तुम्ही दुसरा चांस का घेतला ... म्हणजे मला म्हणायचय कि इतकं काय लोकांचं ऐकायचं ... दुसर्या लोकांचं एक ऐकलं का मग त्यांच्या अपेक्षा वाढत जातात .. त्यांना वाटतं मग आपलं दुसरं पण ह्यांनी ऐकावं दुसरा चांस तुम्ही स्वखुशीने ... स्वताहाला हवा असताना घ्यायला हवा होता ...

@शुचि ताइ सीता के वनवास जाने मी बडी सीख है सीता के वनवास जाने मी बडी सीख है घरमे तीन तीन सांस हो तो जंगल हि ठीक है

जेव्हा दुसर्यांकडुन विचारणा झाली ... तेव्हाच तुम्ही दुसरा चांस का घेतला ...
कुणाला कशाचं तर पूजेला कशाचं!!! ओ सासूबाई, वाचताय ना? तुमचा धाक कमी होत चाल्लाय हो!!! :)

आपण मेल्यावर काही का होईना, जिवंत असेपर्यंत दुसर्‍या कोणाचं कशाला ऐकावं?
जवळची एक नातेवाईक बोलली आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार.
असं तुमच्या जाऊबै म्हणाल्या वाट्टं! तिला मान काय घ्यायचा तो घेऊ दे की! वडिलोपार्जित इस्टेट काय असेल त्यात तुमचा नवरा, दीर, नंणंद सगळ्यांचा सारखाच हक्क आहे. ती इस्टेट पुढे दोन्ही मुलींना सारखी मिळेल. त्यात या दीर जाऊ इ लोकांचा काही संबंध नाही. आणि मुलगा दत्तक घ्या म्हणणारे कोण ते येडपट? तुमच्या मुलींना सांभाळायला ते आले होते का? मग झक मारू देत ना!