Welcome to misalpav.com
लेखक: सुब्बु | प्रसिद्ध:
माझा हा मिपा वरील पहिला लेख आहे. दोन मुली असल्यामुळे मला जे आपल्या समाजातून अनुभव आलेले मी इथे सांगत आहे. मी मध्यमवर्गीय घरातील स्त्री, घरातले सगळे उच्चशिक्षित.घरामध्ये स्त्री ला खूप चांगली वागणूक. मला पहिली मुलगी झाली आणि सगळे आनंदी झाले. कारण ती गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झाली होती. मग आम्ही तीच नाव निकिता ठेवला. तिच्या बाललील्लानी आम्ही खूप आनंदीद झालो होतो. काही वर्षांनी जवळच्या लोकांकडून दुसर्या chance साठी विचारणा झाली. आणि दुसरा मुल मुलगा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा होती. मी स्वतः मुलगा आणि मुलीमध्ये कधीच भेदभाव करत नाही . आणि मला दुसर्या वेळीही पुन्हा मुलगी झाली. जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा सगळे जन नाराज होते. कुणी उनाशी बोलत न्हवत. आणि त्यावेळी वातावरण खूप गंभीर झालेला होते . माझे मिस्टर फक्त माझ्या जवळ बसले होते. थोड्या दिवसांनी हे वातावरण सुद्धा निवळले. नवीन बाल सुधा सगळ्यांचे लाडके बनले. मला सुद्धा २ मुली आहेत याचा अभिमान वाटायला लागला कारण खरच माझ्या निकिता आणि शिरीन खूप activ सुंदर आणि हुशार आहेत. मला मुलगा नाही ह्या बधल काहीच कमी वाटत न्हवती. पण काही दिवसांनी काही लोकां कडून मुलगा नाही म्हणून काही वक्तव्ये ऐकायला मिळाली. सगळेजन आमच्या property चा भावी वारसदार कोण असा विचार करू लागले. कुणी सांगितला माझा मुलगा दत्तक घ्या तर जवळची एक नातेवाईक बोलली आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार. ह्या गोष्टीने मी पुरती हलली होती. पुन्हा पुन्हा तेच विचार डोक्यात घोळायला लागले. मला २ मुली आहेत म्हणून असा कुणी का म्हणून माझ्या मुलींच्या हक्का मध्ये आडवा येतंय. मी असा कधी होऊ देणार नाहीच. पण आला खूप प्रश्न पडतात माझ्या मुली आमच्या संसाराच्या वंश वेलीवरची २ सुंदर फुले आहेत. अजून सुद्धा मुलींना पाहिजे तो दर्जा मिळत नाही. उच्च शिक्षित माणसाने च असे विचार केले तर काय होईल? मला मुलगा नाही म्हणून माझ्या मुलींचे हक्क मी असे दुसर्या नातेवाईकाच्या मुलाला का द्यायचे? अजून खूप प्रश्न आहेत पण उत्तरे मिळत नाहीत. पण एक मात्र नक्की , मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

वा वा पहिलाच लेख! दोन मुलींच्या ऐवजी मुलगे असते तर लेखिकेला मिसळपाववर पहिला लेख लिहायची उसंत मिळाली नसती; तरीही स्वागत आहे! बाकी लग्न-बिग्नादि सांस्कृतिक गोष्टींच्या मुळाशी फक्त अर्थव्यवहार असल्याने असे अनुभव आले त्यात काही आश्चर्य नाही. एकतर या निव्वळ संपत्ती रक्षणासाठीच निर्माण झालेल्या लग्नाच्या व्यवस्थेचा स्विकार करु नये आणि केलाच आहे तर जी तिची रीत आहे त्याप्रमाणे आलेले अनुभव स्विकारावे. तरी आधुनिक काळात कायदा आणि बराचसा समाजही मुलींच्या बाजूने असल्याने तुमच्या मुलींनाच तुमची संपत्ती मिळेल. काळजी नसावी. मुळात भविष्यात काय घडेल हे माहित नसताना आपल्या संपत्तीचा विचार करत बसणारे लोक डोक्यात जातात आणि त्यांना महत्त्व देणारेही तेवढेच डोक्यात जातात. आपल्या अपत्यांबरोबर अर्थपूर्ण आयुष्य घालवून त्यांना खर्‍या महत्त्वाच्या गोष्टी शिकवायचे की याच व्यवस्थेला आधार देणारे वेल्थ प्रोटेक्शन मशिन बनवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे.

आपल्या अपत्यांबरोबर अर्थपूर्ण आयुष्य घालवून त्यांना खर्‍या महत्त्वाच्या गोष्टी शिकवायचे की याच व्यवस्थेला आधार देणारे वेल्थ प्रोटेक्शन मशिन बनवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे.
अगदी खरे. खरेतर हेच महत्वाचे आहे. आणि 'प्रेम' हे मूल्य सर्वोपरी महत्वाचे. तरी सुद्धा 'सावधपण सर्वविषयी'हवेच.

तुमच्या नवऱ्याला जो वडीलेपार्जितवाटणीचा हिस्सा मिळणार तो पुढे जावयांपर्यँत पोहोचणार हे त्यांना नको आहे .तसा तो आत्याच्या(नणंदेच्या)नवऱ्यापर्यँत जाणार त्याचेमात्र सुतक नसते . बाकी मुलगे असणाऱ्यांना प्रॉपटीची भांडणे म्हातारपणी बघत बसावी लागतातच .मुलांच्या आधाराने राहिल्यास ब्लैकमेल करतात आणि छळतात .परदेशात आईबाप पोरांना विशीला XXच्यावर मारून हाकलतात आणि स्वतंत्र राहातात पण उतारवयात कोणी पाहात नाही . वंशवेल ही कल्पना खोटी आहे .उतारवयात आपलं कसं होणार हा खरा विचार असतो .दोन्ही पध्दतीत फायदे तोटे आहेत .बाळपणी आणि म्हातारपणी सुख केवळ नशिबाने मिळते ते विकत अथवा कष्टाने मिळत नाही .

त्यामुळे आता प्रॉपर्टीसाठी पुन्हा डान्स न करणं उत्तम. मुलींचं उत्तम संगोपन करुन जावयांनाच पुत्र माना म्हणजे कुटुंब एकसंध राहून सगळं साधेल.

म्हणजे तुम्हाला मुलगा हवाच आहे असा अर्थ निघतो. कशाला जावयाला पुत्र माना. जावयाने पैसे मागितले तर अवघड जागी दुखणे होते. मुलासारखे स्वच्छ सांगता येईल का पैसे मिळणार नाहीत म्हणून. साधे सरळ मला दोन मुली( किंवा मुलगे) आहेत त्यांच्या बाललीलांचा आनंद घ्या. त्यांना मोठे होताना बघताना जो आनंद होतो त्याचा उपभोग घ्या कि. जावयाला पुत्र माना ( किंवा सुनेला मुलगी माना) हा आव कशासाठी?

बरोब्बर.. मुलीला मुलगा माना.. जावयाला मुलगा माना.. कुणाला न कुणाला तरी "मुलगा" मानाच हे काय नाटक आहे.. ज्या त्या नात्याला, त्या त्या हिशोबानी वागवायचं असतं..

+++++++++++++++++++ १११११ . सून कधीही मुलगी होऊ शकत नाही त्याचप्रमाणे सासू हि सासूच असते . जावई कधीच मुलगा बनू शकत नाही . फारच थोडे अगदी बोटावर मोजण्या इतके देखील अपवाद असतील कि नाही माहिती नाही . उगीचं का जावयाला पत्रिकेतला ग्रह म्हटले जाते ? कित्येक वर्षे झाली तरी बर्याच गोष्टी होत्या तशाच आहेत . सुखावह बदल फारच कमी आहेत . कृपया इथे दुसर्यांची उदाहरणे देऊ नये . अमका-तमका/अमकी-तमकी कसा/कशी मुलासारखा / मुलीसारखी आहे इई. शेवटी मुला-मुली , आई-वडील यासारख असण वेगळ आणी प्रत्यक्षात ते नात असण वेगळं.

शेवटी सगळी नाती हा मान्यतेचाच खेळ आहे कारण विवाह या `प्रार्थमिक मान्यतेतून' ती निर्माण होतात. मुलीला मुलगा माना, सुनेला मुलगी माना किंवा जावयाला मुलगा माना (किंवा पत्नीला परस्त्री माना!) सगळा वैयक्तिक दृष्टीकोन आणि पारस्पारिक संबंध आहे. मी स्वतः (नातं काय आहे यापेक्षा) समोरच्या प्रसंगात काय योग्य आणि आवश्यक आहे त्याप्रमाणे निर्णय घेतो. मग मुलगा असो, पत्नी, आई की वडील. त्यामुळे जावई पैसे मागतोयं, की मुलगा, की भाऊ, की मित्र यापेक्षा प्रसंग काय आहे आणि घेणार्‍याची सचोटी आणि निकड काय आहे हा निकष राहातो. तस्मात आर्थिक असो की भावनिक कोणत्याही प्रसंगात कधीही पश्चात्तापाची वेळ येत नाही. लेखिकेला (वर्तमानात) भविष्यकालीन आधाराची गरज आहे त्यामुळे तिला दिलासा मिळावा आणि पुन्हा नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकविधानानं नवे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून तो पर्याय सुचवलायं. कारण खरा मुद्दा असा आहे... 'म्हणजे कुटुंब एकसंध राहून सगळं साधेल'.

लेखिकेला (वर्तमानात) भविष्यकालीन आधाराची गरज आहे त्यामुळे तिला दिलासा मिळावा आणि पुन्हा नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकविधानानं नवे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून तो पर्याय सुचवलायं
दिलासा मिळण्यासाठी कुणाला तरी "मुलगा" मानणं आवश्यक आहे काय? त्यांच्या मुलीच खंबीर होऊन त्यांच्या संपत्तीची काळजी घेऊ शकतातच ना. "जावयाला मुलगा माना" ह्याची आवश्यकताच काय? "मुलींनाच खंबीर बनवा" हा जास्त सोपा उपाय नाही का? मनाला संपत्ती बाबत आश्वस्त होण्यासाठी मुलगाच हवा अस्तो का? मुली असल्या की चिंता अस्ते, मुलगा असल्यास ती नसते असे काही ग्रुहितक आहे का?

आवश्यक आहे काय? नाही तर लेखिकेनं ही पोस्ट कशाला टाकली असती?
"मुलींनाच खंबीर बनवा" हा जास्त सोपा उपाय नाही का?
इथे मुला-मुलीचा प्रश्न कुठे येतो. प्रत्येक मूल खंबीरच असायला असाच पालकाचा प्रयत्न असतो.
मनाला संपत्ती बाबत आश्वस्त होण्यासाठी मुलगाच हवा अस्तो का? मुली असल्या की चिंता अस्ते, मुलगा असल्यास ती नसते असे काही ग्रुहितक आहे का?
नाही. मन स्वस्थ होण्यासाठी स्वतःवर विश्वास लागतो मग संपत्ती असली काय, मुलगी असली काय आणि मुलगा नसला काय कशानं काही फरक पडत नाही.

नाही तर लेखिकेनं ही पोस्ट कशाला टाकली असती?
आँ? म्हणजे त्यांनी कुणाला न कुणाला मुलगा मानलं की त्यांना दिलासा मिळणारे का? अहो नाही हो.. त्या अगदी उलट म्हणत आहेत.. असो..

हे लेख वाचून लक्षात येत नाही काय? त्यांना मुलीला मुलगा मानता येत असतं तर विषयच संपला होता.

पण एक मात्र नक्की , मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील
त्यांनी इथे फक्त त्यांचा अनुभव मांडलाय.. थोडी भीती दर्शवली आहे इतकंच.. पण आपल्या मुलींबाबतच्या मतांवर त्या ठम आहेतच.. कुणाला मुलगा मानु हा त्यांचा प्रश्न नाहिचे (आणि तसं करायची काही एक गरजही नाहीये).. त्या मुलींमध्ये सुखी आहेत..

+++ १ . प्रसंगानुरूप सगळीच नाती बदलतात . म्हणून याला हे माना त्याला ते माना याची गरजच नाही . रादर तो पर्याय होऊच शकत नाही . जे आहे ते आहे आणि ते कायम तसंच असतचं . आहे ती नाती आधी योग्य प्रकारे सांभाळावीत म्हणजे मग मानलेल्या नात्यांना वागवाव लागत नाही . आई बापाशी संबंध तोडून सासुर्याना आईबाप मानण हे किती जणांना रुचेल आणि त्यांच्या सख्ख्या आईबापाला काय वाटेल याचा विचार केलात का? आणि व्हायीस व्हर्सा . स्वतःच्या आईबापाला सोडून किती जण घरजावई बनतील ??? मला सांगू नका स्वतःच उत्तर प्रामाणिक असू द्या म्हणजे झाल . सुनेने मात्र परंपरा /रूढी म्हणून सासरीच यायचं . माहेर विसरायचं ई. असो गाडं भलतीकडेच जायचं .

जावई घरीच हवा हा अट्टाहास कशापायी? त्यानं मुलींशी सुखात संसार केला आणि सासू-सासर्‍यांचा अडचणीला उपयोगी पडला की झालं.

तेच ना लांब राहून करायचं . अगदी अडचणीच्या वेळी सासू सासर्यांनी काय करायचं ? कुठे जावयाला शोधायचं ? जर तो दुसर्या शहरात / राज्यात / देशात असेल तर . याला म्हणतात काडीने औषध लावणे . म्हणजे काय आपण करतो , काळजी आहे हे दाखवायचं पण लांबून . घराजावइ असावा ही अपेक्षाच नसते कोणाला कारण जगजाहीरच आहे . असो . रक्ताची नाती ती रक्ताची नातीच . काही वेळा मानलेली नाती श्रेष्ठ ठरतात पण ती मनापासून असली तर जस कि मैत्रीच नात . ते कोणी जबरदस्ती केली म्हणून वागवल/ ताणल जात नाही . ते अगदी आतून असत . इष्टेटीसाठी / स्वार्थासाठी जर नाती जोडायची /मानायची असतील तर बोलायलाच नको .

रक्ताची नाती ती रक्ताची नातीच
वस्तुस्थिती तशी नाही....कारण
शेवटी सगळी नाती हा मान्यतेचाच खेळ आहे कारण विवाह या `प्रार्थमिक मान्यतेतून' ती निर्माण होतात.

असो . कितीही लिहाल तरी कमीच आहे . कारण माझा मुद्दा मला योग्यच वाटतोय तसाच तुमचा तुम्हाला . चर्चा भरकटण्या आधी थांबणे योग्य .

जग कुठे चाललाय आपण कुठे चाललोय . दुसरे लोक इतके महत्वाचे असतात का आपल्या आयुष्यात कि आपण आपले महत्वाचे निर्णय त्यांच्यानुसार घ्यायचे/बदलायचे? तुम्ही सुशिक्षित दिसता . कायद्याच थोडाफार ज्ञान सगळ्यांनाच असत . कमीत कमी स्वतःच्या फायद्याच ग्यान तर नक्कीच . मग हे काय ???? स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशावर / मालमत्तेवर दुसरा कोणी कसा हक्क सांगू शकेल ? चांगला वकील बघा , चांगला सल्ला घ्या . तो जास्त उपयोगी पडेल तुमच्या असल्या फालतू आणि खालच्या दर्जाच्या विचारसरणीच्या माणसांपेक्षा . बाकी सगळ्यांनी योग्यच सांगितलं आहे . मुली आहेत मुलींसारख वागवा . कराटे शिकवा , टफ बनवा , दुनियादारी हळूहळू समजावा . एक मैत्रीण ढसाढसा रडत होती . वडील गेले जानेवारीत . आठव्या दिवसापासून मोठा भाऊ भांडतोय आईशी इष्टेटी साठी . आईकडे बघत नाही . नुसता छळवाद मांडलाय . बर त्याला काही कमी नाही परदेशात राहतो , नोकरी करतो त्यालाही एकाच मुलगा आहे . मनात म्हंटल थांब ग त्याच्यावर हि वेळ येयीलच कधीतरी .