Welcome to misalpav.com
लेखक: आशु जोग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

A Search In Secret India अनुवाद भारताच्या अध्यात्मिक रहस्याच्या शोधात Dr . Paul Brunton ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी प्रतिभा रानडे व्यासपर्व दुर्गा भागवत कृतूचक्र दुर्गा भागवत मी अल्बर्ट एलिस

रक्तरेखा - शशी भागवत मर्मभेद - शशी भागवत चंद्रकांता - मूळ लेखक देवकीनंदन खत्री - मराठी अनुवाद - जनार्दन ओक हिरण्यदुर्ग - संजय सोनवणी (आगामी - पुढील महिन्यात प्रकाशित होईल- जबरदस्त आहे) शालिवाहन = शक - गो.ना.दातार अधःपात - गो.ना.दातार इंद्रभुवनगुहा - गो.ना.दातार कालिकामूर्ति - गो.ना.दातार बंधुद्वेष - गो.ना.दातार वीरधवल - नाथमाधव

सध्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिलेले वाचकप्रिय लेखक संजय सोनवणी यांची काही सुंदर पुस्तके थरार कथा : रक्त हिटलरचे अंतिम युद्ध वॉर टाईम मृत्युरेखा डेथ ऑफ प्राईम मिनिस्टर विश्वनाथ ब्लडी आयलंड ऐतिहासिक: ...आणि पानिपत असूरवेद कुशाण क्लिओपात्रा अश्वत्थामा सामाजिक : सव्यसाची वरील सर्व पुस्तके भरपूर वाचनानंद देतात.

मिसळीवर पुस्तकांचा विषय निघाला पण शेषराव मोरे यांचा अद्याप उल्लेख झाला नाही हे विशेष आहे.

तुकाराम दर्शन - सदानंद मोरे - तुकारामांवरचे आतापर्यंतचे सर्वात विश्वासार्ह व सुंदर पुस्तक म्हणता येईल शेषराव मोरेंच्या पुस्तकांवर @वल्ली नेमके लिहू शकेल. अलिकडेच त्याने त्यांची बरीच पुस्तके वाचली आहेत. बाकी अनुवादीत कादंबर्‍यांबद्दल सिडने शेल्डनची ब्लडलाईन, अदर साईड ऑफ मिडनाईट एकदम भारी (मराठी अनुवाद) आयर्विंग वॅलेसची सेकंड लेडी, द सेव्हन्थ सिक्रेट(मराठी अनुवाद) मारिओ पुझो ची गॉडफादर सगळ्या अफलातून कादंबर्‍या आहेत

खरे तर सर्व कांदबर्‍या वाचनीय आहेत.. मला खास आवडणारी "काजळमाया.."

साकेत प्रकाशन चे "सत्तर दिवस" नामक एक पुस्तक एकदम भारी आहे. पियर्स लॉर्ड नामक मुळ इंग्रजी लेखकाचे !! मला हे पुस्तक खूप उर्जा देतं !

मिसळपाववर हात-पाय, आणि काय काय आपटत स्वताच्या नसलेल्या अकलेचा टेंभा मिरावनार्यांसाठी (टोला कोणाला हाणलाय ते ज्याचं त्याला कळलं असेल ). Princes: JEAN SASSON - सौदी अरेबिया ची राजकुमारी किती पारतंत्र्यात असते .सगळी सुख हाथ जोडून उभी असताना सुधा कशी दुखात असते हे तिच्याच शब्दांमध्ये. श्रीमंत अरब देशांमध्ये स्त्रियांची काय अवस्था आहे ह्याची कल्पना येते. Diary of Ann frank : नाझींच्या दहशतवादावर आधारित आहे. एका किशोर्वायातल्या मुलीने चोरून लिहिलेली हि diary . हिचा मराठी अनुवाद पण आहे. पण अनुवाद करणारे लेखक कोण आहेत ते आठवत नाही. वैरयाची रात्र : नाझींच्या क्रूर पणावर आधारित असलेला हे पुतक. श्रीमान योगी : शिवाजी महाराजांचं चरित्र. पण हे वाचताना आपण कुठलाही रणजीत देसाई चरित्र वाचत आहोत असं वाटत नाही. जणू काही आपण तिथेच उपस्थित आहोत असा वाटत. मृत्युंजय : रणजीत देसाई. कर्णाच्या जीवनावरचा हे पुस्तक बहुदा सगळ्यांनी वाचलेलं असतं. wise and otherwise: sudha मूर्थी . सुंदर पुस्तक .sudha मूर्थीना भेटलेली वेगवेगळी माणसं आणि त्यांचे किस्से. काही किस्से मनाला चटका लावून जातात. गंमत गोष्टी : द मा मिरासदार . विनोदी पुस्तक. ग्रामीण भागातल्या विनोदी कथा. द मा मिरासदारांची सगळीच पुस्तके भन्नाट. थोडीशी गूढ पण खर्या विषयांवरची पुस्तके; many masters many lives : वर कोणीतरी ह्याचा उल्लेख केला आहे. दिव्यस्पर्शी - Dhananjay Deshpande : The Third Eye - Lobsang Rampa. आपल्यातल्या अध्यात्मिक शक्तीला कसं जागवला आणि त्याचा उपयोग कसं करून घेतला ह्यावरचा हे पुस्तक. Lobsang रामपा हे तिबेट चे राजपुत्र. परंतु वयाच्या ७ व्या वर्षी ज्योतिषाने वर्तवलेल्या भाविश्यावरून ह्यांना राजवाडा सोडून जावं लागतं आणि पुढे काय होतं हे वाचण्यासारख आहे.(Third Eye म्हणजे २ भुवयांच्या मध्ये असणारं आज्ञा चक्र ) योगी कथामृत - परमहंस योगानंद . हि एका योग्याची आत्मकथा आहे. जन्नाथ कुन्ठेंची खालील ५ पुस्तके वाचावी अशीच आहेत. नर्मदा परिक्रमा, त्यांची अध्यात्मिक साधना, ईश्वर कृपा , त्यांचे अद्भुत अनुभव ह्या सगळ्यांवर हि पुस्तके आहेत. कृपया हि पुस्तके खाली दिलेल्या क्रमानेच वाचावीत. नर्मदे हर हर साधनामस्त धुनी नित्य निरंजन कालिंदी

मृत्युंजय : रणजीत देसाई.नि केंव्हा लिहिले माझ्या वडिलांकडे कोणीतरी शिवाजी सावंत म्हणून आहेत त्यांचे नाव असलेले पुस्तक आहे - बहुदा डुप्लिकेट असेल !

कमला सोहनी या भारताच्या पहिल्या आहार शास्त्रज्ञ होत्या . हे पुस्तक वाचून आपल्या आहाराकडे बघण्याची एक नवीन दृष्टी लाभते. उदा. कलिंगड खाल्यावर सहसा बिया टाकल्या जातात, पण या बी मध्ये बदामा इतकीच उपयुक्त जीवनसत्वे असतात आणि खायला देखील वाईट लागत नाही, अशा बर्याच टिप्स मिळतात.

डॉक्टर जयंत नारळीकर आणि डॉक्टर श्रीराम गीत यांनी या पुस्तकात कासव पासून क्रायोजेनिक इंजीन अशा सर्व प्रकारची प्राथमिक माहिती साधारण १ पान इतकी फार सुरेख दिली आहे. सारखे प्रश्न विचारणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी फारच उपयुक्त

काही दिवसांपूर्वी एक पुस्तक हाती लागले. "मुस्लिम मनाचा शोध". लेखक शेषराव मोरे. शेषरावांनी इतर अनेक पुस्तके लिहिली पण मुस्लिम मनाचा शोध हे पुस्तक त्यांची ओळख बनले. शेषराव हे मुळात इंजिनीयर. अनेक वर्षे इंजिनीयरींग कॉलेजात अध्यापन केल्यावर केवळ अभ्यासासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. या पुस्तकात कुराण, हदीस आणि इतिहासातील काही घटना यांच्या आधारे इस्लामचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मोठमोठे इस्लामिक विद्वान जेव्हा एखाद्या ठिकाणी अडतात तेव्हा हे वाद शेषरावांपर्यंत येतात. आज भारतात(कदाचित जगात) इस्लाम या विषयात शेषराव मोरे हा अंतिम शब्द मानला जातो. या पुस्तकात लेखकाने कुठेही स्वतःचे वैयक्तिक मत मांडलेले नाही. असे असूनही लेखकाने खूप काही म्हटले आहे असा अनुभव वाचकांना येतो.

नक्षलवादाचे आव्हान - देवेंद्र गावंडे देवेंद्र गावंडे हे लोकसत्तामधील पत्रकार आहेत. नक्षलग्रस्त भागातील असल्याने नक्षलवादाचा जवळून परिचय आहे. नक्षलवादालाही एक तत्त्वज्ञानाची बैठक देण्याचा प्रयत्न केला जातो परंतु कुठल्याही इझमशी तत्त्वाशी नक्षल्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही हे या पुस्तकात ध्यानात येते. शासनही याबाबतीत अपुरे पडते आहे असे दिसते. वाचल्यानंतर आपल्या मनातल्या नक्षलवादासंबंधीच्या कल्पनांना सुरुंग लागू शकतो.

अप्रतिम पुस्तक आहे. ह्यावर आत्ताच एक चित्रपत देखिल येउन गेल आहे.

धागा थोडा उसवतोय माफी असावी एक जुन्या काळातले, पहिल्या पिढीतले संघातले कार्यकर्ते होते स ह देशपांडे. रा स्व संघाच्या शाखांच्यावाढीसाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. पुढे काही काळाने ते संघापासून ते दूर झाले. हे सगळं आलं आहे स. ह. देशपांडे यांच्या संघातले दिवस या पुस्तकात.

माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे नाव बराच काळ ऐकून होतो. पुढे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकावरचे अभिप्राय वाचायला मिळाले. पण त्यांचे पुस्तक वाचण्याचा योग कधी आला नव्हता. तो अलिकडे आला. अंतर्वेध - हे गडाखसाहेबांनी लिहिलेले पुस्तक वाचनीय आहे.

पुण्याच्या एका माजी खासदारांनी लिहिलेले पुस्तक वाचायला मिळाले. राजकारणातला माणूस एवढं चांगलं लिहू शकतो याचे आश्चर्य वाटते. पण या माणसाने एक नव्हे अनेक पुस्तके लिहीली आहेत. त्या पुण्याला असे खासदार आता का मिळत नाहीत पुस्तकाचे नाव आहे अनगड मोती - १९५५ च्या आसपासचे पुस्तक आहे, १९१८ पासूनच्या घटनांचे उल्लेख त्यात येतात ललित लेखन म्हणून हे पुस्तक उत्तम आहे. फार साधे सोपे सरळ लेखन आहे.

पु.ल. यांनी लिहिलेले एक हि पुस्तक नाही. मला आवडलेली काहि पुस्तके व्यक्ती आणि वल्ली : लेखक - पु ल देशपांडे बाराला दहा कमी : अणूबॉंब शोध आणि इतिहासावर मस्त पुस्तक. मला वाटते लेखक - पद्मजा फाटक रारंग ढांग : लेखक - प्रभाकर पेंढारकर बाकी यादी नंतर वेळ मिळेल तशी

पुरंदरे प्रकाशनच्या स्किम मधे घेतलेले बाबासाहेबांचे शेलार खिंड सध्या वाचतो आहे. लहानपणी लायब्ररीतून घेउन वाचले होते. परत वाचायला तितकीच मजा येत आहे. या नंतर राजाशिवछत्रपती वाचणार आहे. त्याच प्रमाणे मो. रा. गुणे यांचे "अमित आनंदाचे विश्र्व" हे सुध्दा एक सुरेख पुस्तक आहे. गुण्यांनी कोणताही तत्ववेत्याचा आव न आणता करुन दिलेली उपनिशदांची ओळख. एकदा वाचायला घेतले की झपाटल्या सारखे होते. तसेच झपाटलेपण विवेकानंदांचा ज्ञानयोग, कर्मयोग वाचताना पण आले होते.

माझीही थोडीशी भर .. फ्रीडम ट्रयाप ( लेखक आठवत नाही) इंडिया अंडर औरंगजेब ( जदुनाथ सरकार) हायवेवर हीप्पी ( जेम्स हेडली चेस) :-) @ आशुजोग तुम्ही भा. द. खेर यांचे चाणक्य हे पुस्तक वाचले का?

मोदीनामा - मधु किश्वर मराठी अनुवादही उपलब्ध आहे माहितीपूर्ण आणि अनेकांचे दुकान बंद करणारे हे पुस्तक आहे

ख्रिस्ती धर्मांतरावर आधारीत एक पुस्तक मराठीत आलेले आहे. त्याचे नाव कुणी सांगू शकेल का ! मागच्या वर्षभराच्या कालावधीत त्या पुस्तकाचा परिचय वृत्तपत्रात आला होता. गोव्याला लागून असलेल्या कोकणातील घटना इतिहास यांची पार्श्वभूमी त्यामधे होती.

हे पुस्तक कधीचे आहे... इतक्यात आलेले आहे का हे मिळवून नक्की वाचेन

धागाकर्ते साहेब, इथे सुचवल्या गेल्यांपैकी कोणती पुस्तके तुम्हाला वाचायला जमली, वाचली तर आवडली का वगैरे अपडेट्स द्या की. :)

यशोधराजी जमेल तसे अभिप्राय कळवत राहीन... अलिकडे सुधा मूर्ती यांचे अस्तित्त्व पाहण्यात आले. का कुणास ठाऊक त्यातल्या लॉस्ट अँड फाऊंड फॉर्म्युल्यामुळे टागोरांच्या नौकाडुबीची आठवण झाली. म्हणून नौकाडुबी पुन्हा वाचून काढले. नौकाडुबीची प्रत जुनी होती. पहिली पाने फाटलेली. अनुवाद कुणी केला इ. कळायला काहीच मार्ग नाही. पण अनुवाद छान आहे.

ज्यांना चित्रपट बारकाईने पहायची आवड असते अशांसाठी एक होती प्रभातनगरी - बापू वाटवे बापू वाटवे हे स्वतः केवळ समीक्षक नव्हते तर प्रभातमधे ते सहदिग्दर्शकही होते. एखाद्या रंजक चित्रपटाइतकेच हे पुस्तकही रंजक आहे. या पुस्तकाचे ऐतिहासिक महत्त्वही मोठे आहे. लता मंगेशकरांचा जन्मही झाला नव्ह्ता तेव्हापासून शांताराम चित्रपट व्यवसायात होते. बातमीमागची बातमी असते तशी चित्रपटामगची कहाणी यात वाचायला मिळते.

पुस्तकाचे नावः The Black Hole War: My Battle with Stephen Hawking to Make the World Safe for Quantum Mechanics माहिती लिंक: http://en.wikipedia.org/wiki/The_Black_Hole_War माझे मतः फक्त कॉस्मॉलॉजीची आवड असणार्‍यांकरिताच आणि अतिशय जटिल.

विजय तेंडुलकरांची ही व्यक्तीरेखांची पुस्तके वाचण्या सारखी आहेत. १. हे सर्व कुठुन येते २. ते ३ आणि मी. राज कपूर, वसंतराव नाईक, चीमणभाई पटेल, पानवलकर, जयप्रकाश नारायण ह्यांच्या बद्दल ची निरीक्षणे मस्त आहेत आणि निरीक्षणातून आलेली तेंडुलकरांची मते सुद्धा. जयप्रकाशांच्या लेखात लालूप्रसाद चा उल्लेख आहे तो वाचण्यासारखा आहे. ( लेख १९७७ चा आहे )

ह.मो. मराठेंची कुठलेही पुस्तक वाचण्यासारखेच आहे. पण "बालकांण्ड" आणि "काळेशार पाणी" सुरेखच. त्यांच्या व्यक्तीरेखा आणि लेखांची पुस्तके पण छान आहेत जसे की "मधले पान"

बनगरवाडी : माणदेशी खेड्यामधल्या खडतर जीवनावर आधारित व्यंकटेश माडगुळकर सुंदर यांची कादंबरी. केलिडोस्कोप : अच्युत बर्वे यांची "एका बेलगाम व बेफाम लोकप्रिय लेखकाचे" व्यक्तिचित्र. बखर राजधानीची : दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या दिल्ली वास्तव्यामधील घडामोडी आवर्तन :तालयोगी सुरेश तळवलकर यांचे नुकतेच प्रकाशित झालेले चरित्रात्मक पुस्तक. आपल्या महान संगीतकारांना समजून घेताना आपल्या मर्यादा स्पष्ट होतात. तबला तथा शास्त्रीय संगीताची उच्च अभिरुची असेल तर जरूर वाचावे !

बाबा कदमांचं साहित्य अभिजात ?? हे तुम्ही उपहासाने तर म्हणत नाही आहात ना ? बाबा कदमांची पुस्तकं टाइमपास म्हणून वाचायला उत्तम असतात . ते माझेही आवडते लेखक आहेत . त्यांची एक वेगळीच शैली आहे . आरामशीर जीवनशैली - शेती / मळा - भरपूर दूधदुभतं , निसर्गाच्या सान्निध्यातलं घर , निरनिराळी मद्य , उत्तमोत्तम मांसाहारी पदार्थ , अनैतिक किंवा चोरटे प्रेमसंबध ( कृपया माझ्या वाचनातील आवडीबद्दल गैरसमज करून घेऊ नये ) , एक कोणीतरी अन्यायी , अत्याचारी , श्रीमंत , क्वचित सत्ताधारी माणूस , त्याच्याविरुद्ध चांगल्या माणसांची एक टीम आणि मग रंगलेली कोर्ट केस असंच त्यांच्या ८० % कादंबऱ्यांचं स्वरूप आहे . तरीही प्रत्येक कादंबरी वाचताना तोचतोचपणा जाणवून कंटाळा येत नाही , ह्यातच त्यांच्या लिखाणाचं यश आहे हेही मान्य . त्यांची किमान १५ - २० तरी पुस्तकं मी वाचली आहेत , ४ - ५ खरेदीही केली आहेत पण त्यांच्या लेखनाला अभिजात वगैरे म्हणण्याचं धारिष्ट्य काही माझ्याने होणार नाही .

'ओसरलेले वादळ' हे एक चांगले पुस्तक आहे. अनेक व्यक्तींवर लिहीलेले लेख यामधे आहेत. जगभरातील अनेक व्यक्ती यात भेटतात. ज्ञानात भर पडते. त्यातही काही व्यक्तींवरचे लेख हे तर केवळ 'दर्शन' ठरतात. याचे कारण लेखकाला स्वतःला वेगळी दृष्टी लाभलेली आहे. (लेखकाचे नाव मुद्दामच देत नाही. नाव ऐकल्यावर अनेक जण शिवीगाळ सुरु करतात)

चारही पुस्तके अनिल बर्वे यांची दिली याचे एकमेव कारण म्हणजे या धाग्यावर अजुन त्यांचा उल्लेख दिसला नाही म्हणून मला करावासा वाटला. बाकी पण खूप पुस्तके आहेत पण त्याचे बारकावे सांगितल्याशिवाय नुसती नावे देण्यात खरच काही मजा नाही म्हणून दिली नाहीत. १. डोन्गर म्हातारा झाला - अनिल बर्वे - कम्युनिस्ट विचारांनी भारलेले अनिल बर्वे जेव्हा संघर्ष रंगवतात त्याची वेगळीच खुमारी जाणवते एका हिल स्टेशनच्या जवळील आदिवासी जमातीचा आणि सत्ताधार्यांचा संघर्ष जमिनिसाठी होतो जी जमीन भांडवलदारना नवीन रिज़ॉर्ट साठी हवी असते. नन्तर तेथे आलेला एक निवृत्त लष्कर अधिकारी जेव्हा त्यात पडतो... २. थॅंक यु मिस्टर ग्लाड - अनिल बर्वे - फाशीची शिक्षा झालेला एक दहशतवादी आणि जेलर यांच्यातील तुफान संवाद. अतिशय खिळवून ठेवणारे पुस्तक. यातच ग्लाडच्या मुलीचे तत्काळ सिझेरियन ऑपरेशन करायची वेळ येते आणि... ३. अकरा कोटी गॅलन पाणी - अनिल बर्वे - कोळसा खाणीतील कामगार आणि मालक यांच्यातील संघर्ष. त्यातच जुन्या बंद केलेल्या खाण कामाचे अफरतफरीचे संदर्भ आणि त्याच्याशी निगडीत चालू खाणीतील कामगारांचे आयुष्य पणाला लागते. याचवेळी नवीन इंजिनियर येतो... ४. स्टड फार्म - अनिल बर्वे - रेसच्या घोड्याच्या आयुष्याचा बॅकड्रोप घेऊन आलेली कथा. पण परत भांडवलदार आणि मजूर संघर्ष पदोपदी जाणवून देत पुढे सरकणारी. घोड्याचे आणि त्यांच्या घोडेस्वारांचे, आणि सर्वात शेवटी मालकांचे संबंध - त्यातील बारकावे यांचे छान चित्रण आहे.

मी पाॅपिलाॅन हे अनुवादित पुस्तक वाचले. विनाकारण शिक्षा झालेला एक कैदी आणि दोघे मिळून प्लॅन करून जेल मधून पळतात व समुद्र मार्गात त्याची नाव भरकटते व एका किनार्याला लागतात व तेथील जंगली लोकांच्या तावडीत सापडतात पुढे रोमहर्षक कथेचा प्रारंभ होताे.

पॅपिलॉन - हेन्री शॅरीयर, अनु-रविंद्र गुर्जर पुस्तक रंजक आहे. पण सगळ्या गोष्टी खर्‍या असतील का अशी अनेक ठिकाणी शंका येत राहते..

मी नुकतीच गणेश मतकरींची "खिडक्या अर्ध्या उघड्या" हि कादंबरी वाचली.. एक वेगळ्या प्रकारची मांडणी आहे या पुस्तकाची.. सध्याच्या जीवनपद्धतीचे चित्रण आहे. या पुस्तकाला मराठीतून लिहिलेलं इंग्लिश पुस्तक म्हणावं का असा प्रश्न पडू शकतो.. पण overall पुस्तक आवडलेलं आहे..

गणेश हा मूळात लेखक आहेत का... की ते नाटकाच्या इतरही प्रांतात त्यांचे नाव आहे ? कला, वेशभूषा असे काही.

आर्किटेक्ट आहेत. नाटक, चित्रपट आणि मालिका यांच्या निर्मिती शी संबंधित आहेत. त्यांची बहिण सुप्रिया विनोद नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम करते. ते स्वत: अनेक चित्रपटांचं समीक्षण करतात जे वृत्तपत्रांमध्ये छापून येतं. त्या अर्थानं कलेशी संबंधित आहेत.

रविंद्र पिंगे यांची सर्व पुस्तके . त्यांच्या पुस्तकांमधून को़कणातील निसर्ग , जीवन दर्शन , प्रवास वर्णन छान सांगितले आहे .