ह्म्म्म...
जरासे विषयांतर करावेसे वाटते,म्हणुन करतो.
आपल्या देशातील राजकारणी आणि एकंदर राजकारण एकदम रसातळाला गेलेले दिसते.त्याची झलक पाहिची असेल तर सध्या सगळ्या वॄत्तवाहिन्यांवर उत्तराखंडच्या आपत्तीवरुन जे काही चालले ते पाहुन या सर्व राजकारण्यांच्या मानसिकतेची पातळी कळेल ! *यात सर्व पक्ष येतात*
कालच एक बातमी पाहतो त्यात कॉग्रेस पार्टीचे व्हाईस प्रेसिडेंट राहुल गांधी आणि त्यांच्या माताजी सोनिया गांधी आणि कॉग्रेस पक्षाच्या वतीने आपत्ती ग्रस्तांच्या मदतीसाठी काही खाण्याचे आणि इतर सामानांचे २४ ट्रक पाठवले. मी म्हणतो ही एक महत्वाची आणि चांगली गोष्ट आहे,पण त्याचा इतका देखावा का ? हा जो काही समारंभ केला गेला त्याची काय गरज आहे ? जितका वेळ समारंभ चालला आणि त्या समारंभाच्या नियोजनाच्या वेळे पासुन तो संपे पर्यंत ही सामुग्री थांबुन राहिली.
अगदी झेंडा दाखवुन ट्रक पाठवले गेले ! का ? ही कोणत्या गाड्यांची स्पर्धा अथवा एफवन रेस प्रतियोगिता होती ? की झेंडा दाखवल्या शिवाय सामान पाठवायचे नाही ? बरं राजपुत्र देखील परदेशी होते म्हणे,ते सुद्धा उपस्थित झाले !वेळेवर कार्यक्रमाला हजेरी लावली म्हणायची यांनी !
सर्व वॄत्तवाहिन्यांवर वादविवादाच्या पलिकडे काही होताना दिसत नाही,दिसते ती फक्त आपापसातील साठमारी ! कोणासाठी जनतेसाठी छ्या हो असा भ्रम चुकुन सुद्धा करुन घेउ नका ! सत्ते पलिकडे या सर्व पक्षिय राजकारण्यांना काहीच दिसत नाही ज्या प्रमाणे पुत्रप्रेमात धॄतराष्ट्र आंधळा झाला होता त्याच प्रमाणे सत्ता प्रेमात हे राजकारणी आंधळे झाले आहेत. फरक इतकाच आहेत की आजच्या घडीला आंधळ्या धॄतराष्ट्रांची संख्या बेसुमार वाढली आहे.
आपल्या राष्ट्रहिताचा विचार करणारा आणि या आपत्तीत सुद्धा राजकारण न-करणारा पक्ष आपल्या देशात नाही हेच आपले आणि आपल्या राष्ट्राचे खरे दुरेदैव म्हणाला लागेल. :(
विनाशकाले विपरीत बुद्धी!
हे सुभाषित जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींनी आणिबाणी जाहीर केल्यानंतर उच्चारले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा व संजय गांधी हारले होते आणि कॉंग्रेस चा दारुण पराभव झाला होता. श्रीगुरुजी यांच्या विश्लेषणावरून आता पुढील निवडणुकीत असेच काही होईल असे भाकित करता येईल.
स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थ व महत्त्वाकांक्षेपायी नितीशकुमारांनी जून २०१३ मध्ये भाजप बरोबर असलेली १७ वर्षांची जुनी युती तोडून स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे असे भाकीत मी १० महिन्यांपूर्वी केले होते.
आज संयुक्त जनता दलाला फक्त २ जागा मिळाल्यामुळे भाकीत खरे ठरले. २००९ मध्ये भाजप व संजदने युती करून अनुक्रमे १५ व २५ जागा लढवून प्रत्येकी अनुक्रमे १२ व २० जागा जिंकल्या होत्या. आज भाजपने लोजपशी युती करून फक्त स्वतःच्याच २२ जागा मिळविल्या व लोजपला देखील ३-४ जागा मिळत आहेत.
भाजपच्या खांद्यावर उभे राहून निव्वळ स्वतःच्या स्वार्थासाठी ढोंगी धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून भाजपला लाथ घालणार्या नितीशकुमारांच्या पक्षाही धूळधाण उडाली ही आनंदाची गोष्ट आहे.
अमेरिकेचे माहीत नाही. एक दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या भारतातील राजदूतांनी मोदींची भेट घेतली होती. तेव्हा "रिलेशनशिप रिपेअर" करायला सुरूवात झाली आहे हे समजले होते :)
सुडो शेकुलारिझमचा पाडाव झाला. लालू प्रसाद , शरद पवार यांची चांगली जिरली. लोकाना भाकरी महत्वाची की गीता कुराण
हे समजायला लागलेय.पुतळे, फोटो, पुण्यतिथ्या ई हळू हळू राजकारणातून मागे पडतील. व जिवंत माणसांचे हित हा कार्यक्रम पुढे येईल तो सुदिन.
नितीशकुमारांनी जून २०१३ मध्ये युतीतून भाजपला हाकलून लावल्यानंतर मंत्रीमंडळातील सर्व १२ भाजप मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. पक्षात मंत्रीपदावरून बंडाळी ओळखून नितीशकुमारांनी आजतगायत त्या जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे संजद मध्ये अंतर्गत असंतोष होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर संजद मधील काही जणांनी पक्षत्याग करून भाजपमध्ये गेले तर काही जणांनी मोदींची स्तुती केल्यावर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. काल निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर संजद मोदीलाटेत पालापाचोळ्यासारखा उडून गेला. बिहार विधानसभेत नितीशकुमारांकडे जेमतेम निसटते बहुमत आहे. त्यामुळे पक्षांतर्गत दबाव वाढून काही आमदार संजदला सोडचिठ्ठी देणार हे निश्चित आहे. हे ओळखून आज नितीशकुमारांनी राजीनामा दिला आहे. पक्ष फुटुन बहुमत गमावल्यामुळे राजीनामा देण्याची नामुष्की झेलण्यापेक्षा स्वत:हूनच राजीनामा देऊन आपली प्रतिमा त्यांनी काहीशी सावरली आहे.
प्रतिक्रिया
ह्म्म्म...
+१
विनाशकाले विपरीत बुद्धी!
स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थ व
अम्रीका, खांग्रेस, नितीश्कुमार, आडवाणी, स्वराज,राजनाथ वगैरे
अमेरिका
होय. मोदींबाबत अमेरीकेचे दिशाभुल केली
पाडाव
नितीशकुमारांनी जून २०१३ मध्ये
Pagination