Welcome to misalpav.com
लेखक: यश पालकर | प्रसिद्ध:
नियती कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही ती तुमच्या आयुष्यासोबत समांतर चालत असते. वाऱ्यासारख तीच अस्तित्व जाणवत असत. कधी रणरणत्या उन्हात वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करून जाते तर कधी सोसाट्याचा वारा सुटल्यावर घर उध्वस्त करून जातो. नियती पण रंकाला राजा बनवते आणि कधी क्षणात होत्याचे नव्हते करून जाते. आपण सारी स्वप्न सजवतो पण नियतीच्या मनात काय चाललं आहे ह्याचा आपणास मागमूसही नसतो. सार काही सुरळीत चालू असताना नियतीच वागण आपल्याला जाणीव करून देत कि ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य चालू आहे.असं जरी असल तरी ह्याचा अर्थ हा नाही कि आयुष्याचा खेळ खेळायचाच नाही. उलट नियतीच्या खेळाला धैर्याने ,संयमाने तोंड द्यायचं आणि विस्कटलेला डाव सावरायचा आणि पुन्हा उभं राहायचं.कधी न कधीतरी नियतीचे फासे आपल्या बाजूने नक्कीच पडतील .... यशवंत
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

आता तुमच्या या प्रतिसादाला मी काही उत्तर देणार. मग तुम्ही काही लिहिणार, मग मी पुन्हा उत्तर देणार, मग तुम्ही पुन्हा काहीतरी म्हणणार... हे चालू राहणार. बरं त्यातून निष्पन्न काय होईल तर काहीच नाही. तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहणार आणि मी माझ्या. त्यापेक्षा उत्तर न देणे उत्तम. कसें? जाता जाता मी चारोळया वयात पाडलेली चारोळी:
मार्ग आपला आधीच आखलेला आपण फक्त त्यावरुन चालणं काहीच हाती तसं नसतं आपल्या फक्त नियतीचे ईशारे पाळणं
धन्यावाद (सहारा प्रणाम च्या चालीवर :D )

मी वरील टाईपच्या प्रतिक्रीया दिल्या तर मिपाच्या क्वालिटीत पाॅझिटीव्ह फरक पडेल काय? तदनुशंगे काही विशिष्ट लोकांना आनंद होईल काय ?

धन्या, बरं झालं प्रतिसादांचा सिलसिला थांबवला . तसंही माझ्या प्रतिसादांना तुम्ही कडाडून विरोध करता पण दुसर्या लेखांवर मात्र माझे आधीचेच प्रतिसाद तुम्ही कॉपी करून टाकता हे माझं observation आहे . ;-)

ओ ताई, धन्या खोडसाळ आहे, दंगेखोर आहे कधिकधी तो माफक हलकट पणाही करतो पण कसाही असला तरी धन्या वरीजनल आहे. त्याचे प्रतिसाद नेहमीच अभ्यासपुर्ण / मार्मीक असतात. (तुम्ही त्याच्यावर आरोप केला म्हणुन त्याचे जाहीर कौतुक करावे लागत आहे) उगा त्याच्यावर चोरीचा आळ घेउ नका. पैजारबुवा

हो.. अगदी अगदी.. धन्या खोडसाळ आहे, दंगेखोर आहे.. धन्या चावट आहे .. पण धन्या नीच नाही.. ;)

तसंही माझ्या प्रतिसादांना तुम्ही कडाडून विरोध करता पण दुसर्या लेखांवर मात्र माझे आधीचेच प्रतिसाद तुम्ही कॉपी करून टाकता हे माझं observation आहे .
गोड गैरसमज आहे हा तै तुमचा. जास्त काही लिहित नाही. मला व्यक्तिशः ओळखणार्‍यांना मी काय आणि किती वाचतो हे माहिती आहे. :)

बरं ते जाउंदे, पण गदिमांनी 'पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा' मधल्या कडव्या कडव्यात जे मांडलय त्याविषयी काय मत आहे? प्रत्यक्ष प्रभू राम म्हणतायत तिथे की माझ्या पूर्वसंचिताचे भोग आहेत म्हणून.. ;)

याचा अर्थ गदिमांनी "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक वाचलेले दिसत नाहि. आणि त्याही आधि लिहिलेले स्वामी विवेकांनदांनी लिहिलेले "कर्मयोग" हेही पुस्तक वाचलेले दिसत नाहि. तसे पाह्ता हे दोन्ही पुस्तके भगवतगीतेवरच आधारलेली आहेत्. भगवतगीता जितक्या अधिक वेळेला वाचाल तशी ती अधिकाधिक समजत जाते असे म्हणतात!

त्याचे प्रतिसाद नेहमीच अभ्यासपुर्ण / मार्मीक असतात
असेल कि आम्ही कुठे नाही म्हणलंय. म्हणजे बाकीच्या लोकांचे अभ्यासपुर्ण / मार्मीक नसतात असा तर अर्थ होत नाही ना.
गोड गैरसमज आहे हा तै तुमचा.
गैरसमजाचा प्रश्न येतोच कुठे ? सिद्ध करू शकते . असो . जास्त अवांतर नको .

बाकीच्या लेखावारचे प्रतिसाद बघा कि. जशीच्या तशी माझी वाक्यं आहेत . मी जेव्हा असं म्हणले होते तेव्हा मात्र त्याला विरोध झाला होता. आता सगळेच काही प्रतिसाद इथ टाकत बसत नाही. धन्या ला समजलं बस झालं.

कोंबडयाला वाटत असेल त्याच्या आरवण्यानेच दिवस उजाडतो, तर त्याचं सुख हिरावून कशाला घ्यायचं. तुमचं चालू दया मी तुमची वाक्ये कॉपी केली आहेत हे पालूपद. :)